शुक्रवार, ८ मे, २०२०

उद्धावसाहेबानी  बदामराव पंडित यांना विधान परिषदेवर घेवून जनतेसाठी काम करण्याची संधी द्यावी - समद शेख यांची  मागणी


गेवराई, प्रतिनिधी :- शिवसेना मजबूत करण्यासाठी बळ द्यावे अशी मागणी तमाम  नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना व शिवसैनिकांनी पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे भाजप युतीची जागा न मिळाल्याने बदामराव पंडीत हे अपक्ष यांच्याकडे केली आहे . म्हणून निवडणूक लढले .पक्षाची उमेदवारी नसतानाही आज ३ मे रोजी बदामराव पंडित यांचा तब्बल ५२ हजार मतदारांनी त्यांना मतदान रूपी आशिर्वाद वाढदिवस आहे . याच वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणुन दिले आजही बदामराव पंडीत हे ठामपणे पक्षाच्या शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे संयमी मुख्यमंत्री विचारांवर व नेतृत्वावर विश्वास ठेवुन बीड जिल्ह्यामध्ये ना.उध्दवजी ठाकरे यांनी बदामराव पंडीत यांना पक्षासाठी निष्ठेने काम करीत आहेत .गेल्या तीन वर्षांत विधानपरिषदेवर आमदार म्हणुन काम करण्याची संधी शिवसेना पक्षाला बदामराव पंडीत यांच्या रूपाने सामन्याला द्यावी , अशी मागणी पत्राद्वारे समद शेख यानी  केली आहे . आपलेसे वाटणारे नेत्रत्व मिळाले आहे . पुढील काळात बीड मागील २५ वर्ष बदामराव पंडित यांनी गेवराई मतदार जिल्हा हा शिवसेनेचा हक्काचा जिल्हा करण्यासाठी संघाचे प्रतिनिधी म्हणुन जनतेची सेवा केली आहे यामध्ये लोकनेते बदामराव पंडीत यांच्या रूपाने शिवसेनेचा दोन वेळा अपक्ष तर एक वेळ पक्षाचे आमदार म्हणून तर विधानपरिषद सदस्य म्हणून म्हणुन निवड करून , पुन्हा १९९४ साली युतीच्या सरकार मध्ये राज्यमंत्री म्हणुन जनतेसाठी काम करण्याची संधी त्यांना द्यावी , अशी मागणी बदामराव यांनी काम केलेले आहे . व विनंती गेवराई विधानसभा मतदार संघातील , संघटक गेल्या २ वर्षात बदामराव पंडित यांनी शिवसेना  तमाम शिवसैनिक अशोक मुंडे समद शेख  अशोक नाईकनवरे , नाविद शेख पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना, पक्षात प्रवेश करून , बीड जिल्ह्यात गेवराई मतदार संघात भार    शिवसेना पक्षवाढविण्याचे काम मोठ्या प्रमाणावर केले आहे   समद शेख यानी  केली आहे . गेवराई (वार्ताहर ) गेवराई मतदार संघासह व महाराष्ट्रातील जनतेसाठी आहोराञ २४ तास सर्पकात राहुन काम करणारे माजी मंत्री,शिवसेना नेते बदामराव पंडित यांना विधानपरिषदेवर घेण्यात यावे अशी समद शेख यांनी केली आहे

बीड हॅलो रिपोर्टर

रेल्वे रुळावर थकून झोपलेली १४ मजूर मालवाहू रेल्वेखाली चिरडली.


या दुर्दैवी अपघाताला जबाबदार कोण प्रशासन की संभाव्य परिस्थिती ? 



औरंगाबाद, प्रतिनिधी : औरंगाबाद तालुक्यातील सटाणा शिवारात ( करमाड डीएमआयसी परिसर) रेल्वे रुळावर थकून झोपलेली १४ मजूर मालवाहू रेल्वेखाली चिरडली गेली. हा भीषण अपघात दिनांक 8 मे शुक्रवारी पहाटे ५.१५ वाजता घडला. यात २ मजूर गंभीर जखमी असून तिघे जीव वाचविण्यात यशस्वी झाले आहेत. सर्व मजूर मध्य प्रदेश येथील असून ते जालना येथे लॉकडाऊन मध्ये अडकले होते. घराच्या ओढीने सर्व मजूर पायी रेल्वे रुळाच्या मार्गे निघाले होते.याबाबत अधिक माहिती अशी की, जालना येथील एसआरजे कंपनीत मध्य प्रदेश येथील १९ मजूर काम करतात. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे ही मजूर जालना येथे अडकली गेली. दरम्यान, शासनाने परप्रांतीय मजुरांना घरी जाण्यासाठी विशेष रेल्वे सुरू केल्या आहेत अशी माहिती या मजूरांना मिळाली. तसेच भुसावळ येथून मध्य प्रदेशला रेल्वे जाणार असल्याची माहिती या १९ मजुरांना मिळाली असता पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ते रेल्वे रुळाच्या मार्गे औरंगाबादच्या दिशेने चालत निघाले. सटाणा परिसरात रात्री थकून हे मजूर रेल्वे रुळावर झोपले. पहाटे अचानक  एक मालवाहू रेल्वे त्यांच्या दिशेने आली . काही कळायच्या आत १४ मजूर रेल्वे खाली  चिरडले गेले तर दोघे गंभीर जखमी असून तिघे प्राण वाचविण्यात यशस्वी झाले आहेत.जालना येथील स्टील कंपनीचे १९  कामगार भुसावळला  जाण्यासाठी रेल्वेरुळावरून पायी निघाले होते. सटाना परिसरात ते रुळावर झोपले असतांना मालगाडीने त्यांना चिरडले. यात १४ जण ठार  तर २ कामगार जखमी झाले. सर्वांचे मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे पाठवण्यात आले आहे.


बीड हॅलो रिपोर्टर न्यूज

रेल्वे रुळावर थकून झोपलेली १४ मजूर मालवाहू रेल्वेखाली चिरडली.

या दुर्दैवी अपघाताला जबाबदार कोण प्रशासन की संभाव्य परिस्थिती ? 


औरंगाबाद, प्रतिनिधी : औरंगाबाद तालुक्यातील सटाणा शिवारात ( करमाड डीएमआयसी परिसर) रेल्वे रुळावर थकून झोपलेली १४ मजूर मालवाहू रेल्वेखाली चिरडली गेली. हा भीषण अपघात दिनांक 8 मे शुक्रवारी पहाटे ५.१५ वाजता घडला. यात २ मजूर गंभीर जखमी असून तिघे जीव वाचविण्यात यशस्वी झाले आहेत. सर्व मजूर मध्य प्रदेश येथील असून ते जालना येथे लॉकडाऊन मध्ये अडकले होते. घराच्या ओढीने सर्व मजूर पायी रेल्वे रुळाच्या मार्गे निघाले होते.याबाबत अधिक माहिती अशी की, जालना येथील एसआरजे कंपनीत मध्य प्रदेश येथील १९ मजूर काम करतात. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे ही मजूर जालना येथे अडकली गेली. दरम्यान, शासनाने परप्रांतीय मजुरांना घरी जाण्यासाठी विशेष रेल्वे सुरू केल्या आहेत अशी माहिती या मजूरांना मिळाली. तसेच भुसावळ येथून मध्य प्रदेशला रेल्वे जाणार असल्याची माहिती या १९ मजुरांना मिळाली असता पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ते रेल्वे रुळाच्या मार्गे औरंगाबादच्या दिशेने चालत निघाले. सटाणा परिसरात रात्री थकून हे मजूर रेल्वे रुळावर झोपले. पहाटे अचानक  एक मालवाहू रेल्वे त्यांच्या दिशेने आली . काही कळायच्या आत १४ मजूर रेल्वे खाली  चिरडले गेले तर दोघे गंभीर जखमी असून तिघे प्राण वाचविण्यात यशस्वी झाले आहेत.जालना येथील स्टील कंपनीचे १९  कामगार भुसावळला  जाण्यासाठी रेल्वेरुळावरून पायी निघाले होते. सटाना परिसरात ते रुळावर झोपले असतांना मालगाडीने त्यांना चिरडले. यात १४ जण ठार  तर २ कामगार जखमी झाले. सर्वांचे मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे आहेत.


गुरुवार, ७ मे, २०२०

जालना न्युज

सदर बाजार पोलीसांची कारवाई गावठी हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर छापा.



जालना,प्रतिनिधी :- सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास सदर बाजार पोलिसांना माहिती मिळाली की हनुमान घाट येथे नदीच्या कडेला काटेरी झुडपात सार्वजनिक ठिकाणी एक महिला आपल्या फायद्या करिता गावठी हातभट्टीची दारू विक्री करीत आहे अशी माहिती मिळाल्याने, सदरची माहिती वरिष्ठांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागवे पोलीस हेडकॉन्स्टेबल परशुराम पवार कांगणे पोलीस कॉन्स्टेबल अंबादास दांडगे महिला पोलीस कॉन्स्टेबल नागरे असे सदर ठिकाणी जाऊन छापा मारला असता त्याठिकाणी एक बाई दारू पिणाऱ्या ची गर्दी जमुन चोरटी दारू विक्री करत असताना दिसली परंतु पोलिसाचं पथक येताच दारू पिणारे व दारू विक्री करणारी महिला पोलिसांना पाहून अंधाराचा फायदा घेऊन काटेरी झुडपातून पळून गेले तिचे नाव चौकशीतून समोर आले की दारू विक्री करणारी महिला आरोपी लक्ष्मीबाई श्याम गायकवाड वय तीस वर्ष राहणार हनुमान घाट जालना पोलिसांनी तिच्या ताब्यात असलेल्या गावठी हातभट्टीच्या एकूण सहा प्लास्टिक कॅन ज्यामध्ये 90 लिटर हातभट्टीची दारू जिची बाजारमूल्य, सहा हजार तीनशे असलेली पंचा समक्ष जप्त करून जागीच नाश केली आहे, तिच्याविरुद्ध सरकार तर्फे पोलीस हेडकॉन्स्टेबल परशुराम पवार यांनी फिर्याद देऊन तपास पोना वाहुळ हे करीत आहे.



सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री एस चैतन्य अप्पर पोलीस अधीक्षक श्री समाधान पवार उपविभागीय पोलिस अधिकारी श्री सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री संजय देशमुख  सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री नागवे पोलीस हेडकॉन्स्टेबल परशुराम पवार, कांगणे पोलीस कॉन्स्टेबल अंबादास दांडगे महिला पोलीस कॉन्स्टेबल नागरे यांनी केली आहे


मनसेच्या वतीने जालना जिल्हाधिकारी यांना निवेदन.


जालना प्रतिनिधी :- जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने नोंदणीकृत हरभरा उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी गावोगावी जाऊन करण्यात यावी.जालना जिल्ह्यातील शासनाने हरभऱ्याला 4850 रु प्रति क्विंटल असा हमीभाव जाहीर केला आहे.परंतु कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये व्यापारी आणि आडत दुकानदार यांच्याकडून सद्या हरभरा 3800 रुपये प्रति क्विंटल ने खरेदी केला जात आहे. यात शेतकऱ्यांचा प्रति क्विंटल 1000 रु तोटा होत आहे. याकडे शासनाच्या कसलेही लक्ष नाही.शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा यासाठी शासनाने खरेदी केंद्र सुरू केले आहेत परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता ह्या चार दिवसांत हे खरेदी केंद्र सुरू झाली आहेत. खूप उशिराने ही खरेदी केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांची तोबा गर्दी होत आहे. जालना जिल्ह्यातील या गर्दीमुळे शेतकऱ्यांना कोरोनाचा धोका संभवु शकतो त्यामुळे शासनाने खरेदी केंद्राची सर्व यंत्रणा गावोगावी घेऊन जाऊन गांव निहाय नोंदणीकृत शेतकऱ्यांची खरेदी करावी. अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष जालना प्रकाश सोळंके यांनी जिल्हाधिकारी यांना ईमेल द्वारे निवेदन पाठवले आहे.
                   

आमदार कैलास गोरंट्याल यांचे निवासस्थानी बुद्ध पौर्णिमा साजर करण्यात आली साजर करताना आमदार कैलाश गोरंट्याल व नगराध्यक्ष संगीताताई गोरंट्याल यावेळी उपस्थित नगरसेवक विनोद रत्नपारखी रमेश गोरक्ष व आदी मान्यवर उपस्थित होते

दैठणा .बु. चे सरपंच शत्रुघ्न कणसे यांचा पुढाकार, २ हजार लोकांना मोफत रेशनचा पुरवठा 



परतूर /प्रतिनिधी :- प्रशांत वाकळे
 गत दोन महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाऊन मुळे ग्रामीण भागातील अनेक शेतमजूर, गोरगरीब कुटुंबाच्या हाताला रोजगार नाही. जवळ असली नसली जमापुंजी महिनाभर पुरली आता पुढे काय ? असा प्रश्न ग्रामीण भागातील शेतमजूर जनतेला पडला आहे. 
शासनाकडून स्वस्त दरात मिळणारे  रेशन या कुटुंबासाठी मोठा आधार आहे, मात्र हे स्वस्त दरातील रेशन विकत घेण्यासाठी सुद्धा पैसा शिल्लक नाही. अशा स्थितीत लोकांची अडचण ओळखून. संकटात लोकांच्या मदतीला धावून जात परतूर तालुक्यातील दैठणा बुद्रुक येथील सरपंच शत्रुघ्न कणसे गावातील सर्व रेशन कार्ड धारकांचे पैसे स्वतःच्या खर्चातून भरून गावकऱ्यांना मोफत रेशन उपलब्ध करून दिले आहे. यामध्ये गव्हू,तांदूळ आणि साखर या सामानाचा समावेश आहे.  गावातील २००० लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ झाला आहे. माझे गाव हे माझे कुटुंब असल्याचे मी मानतो, गावाच्या संकटाच्या काळात मदतीला धावून जाणे हा माणुसकी धर्म आहे, तोच माणुसकी धर्म आपण जपत असल्याचे सरपंच शत्रुघ्न कणसे सांगतात. मागील महिन्यात गावातील प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी १ किलो साखरेचे मोफत वाटप करण्यात आले होते.



 लॉकडाऊन मध्ये अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचारी, पोलीस, किराणा दुकानदार, गिरणी चालक आणि पत्रकार यांना तीन एकरातील मोसंबीचे मोफत वाटप करण्याचा उपक्रम दैठणा बु. येथील सरपंच शत्रुघ्न कणसे हाती घेतला आहे. माजी मंत्री बबनराव लोणीकर व भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी हा उपक्रम सुरु केला आहे. सोबतच तालुक्यातील आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि पत्रकार यांना १५०० मास्क, ग्लोज, सनीटायरचे वाटप देखील करण्यात आले आहे.   महिनाभरापासून मोफत शुद्ध फिल्टर पाणी पुरवठा : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी वैयक्तिक स्वच्छता तसेच सामाजिक स्वच्छतेचे आचरण महत्वाचे आहे. पिण्याचे  पाणी अशुद्ध असेल तर त्या माध्यमातून अनेक रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. ही गरज ओळखून दैठणा बु ग्रामपंचायतच्या वतीने सुरुवातीला सशुल्क पाणी जार दिले होते. लॉक डाऊन मध्ये लोकांची अडचण ओळखून पाणी जार मोफत वाटप करण्याचा निर्णय ग्रामपंचायतने घेतला आहे. याचा मोठा फायदा गावकऱ्यांना झाला असल्याचे काही गावकऱ्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया :- मागील दोन महिन्यापासून कामधंदा बंद आहे. शासनाच्या वतीने स्वस्त दरात रेशन मिळते पण, ते रेशन घेण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. अशा बिकट परिस्थितीत सरपंच शत्रुघ्न कणसे यांनी मोफत रेशन देण्याचा जो निर्णय घेतला त्यामुळे आम्हाला मोठा. दिलासा मिळाला आहे. आमच्यावरची उपासमारीची वेळ टळली म्हटले तर वावगे ठरणार नाही. – विठ्ठल उमाजी घोडे, ग्रामस्थ दैठणा बु.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...