मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२०

जालन्यात सकल मातंग समाजाच्या वतीने मोठ्या संख्येने विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा
जालना (प्रतिनिधी):- महाराष्ट्रामध्ये दिवसान दिवस मातंग समाजावर होत असलेल्या अन्याया बाबत मातंग समाजाच्या मुलीवर झालेल्या अत्याचार साठी आरोपीना कठोर शिक्षा देण्यासाठी जालना येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
मातंग समाजावर होत असलेल्या अत्याचार व अन्याय विरुध्द जालना जिल्ह्यातील मातंग समाज जागृत झाला आहे. या अनुषंगाने जालना येथे अक्रोश मोर्चा काढण्यात आला.या मोर्चाचे झालेल्या खुन प्रकरण, बलात्कार व मातंग समाजाला आरक्षण मिळावे श्री साईबाबा विद्यालय, शंकर नगर, नांदेड येथील अल्पवयीन विद्यार्थीनीवर चार शिक्षकांनी केलेल्या अत्याचार प्रकरणी त्या शिक्षकांना फाशिची शिक्षा देण्यात यावी ,ग्राम मरोडा, ता.अकोट, जि.अकोला, येथे घडली मातंग समाजातील विद्यार्थीनीवर गावातील चार गादगुंड नराधमांनी केलेल्या अत्याचार प्रकरणी त्यांना अटक करुन तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी.पोलीस स्टेशन दहिहंडा येथील ठाणेदार प्रेमानंद कात्रे, बिट जमादार शाम बुंदीले, पो.कॉ.सुरेश ढोरे, यांना तात्काळ निलंबीत करण्यात यावे.मातंग समाजातील दिपाली रमेश शेंडगे, म्हाडा कॉलनी, टी.व्ही. सेंटर, जालना येथील तरुणीचा खुन केल्याप्रकरणी त्या आरोपीना तात्काळ फाशी देण्यात यावी..मातंग समाजातील राहुल कचरु उमप या तरुणाच्या खुनाची चौकशी सि. आय.डी.मार्फत करण्यात यावी.कळंब, जि.उस्मानाबाद येथील मुकेश झोंबाडे या मातंग युवकाचा खुन करुन त्यांचा मृतदेह, ढोकी रेल्वे फाटकावर फेकून आत्महत्या दाखवण्याचे प्रयत्न करणारे आरोपींना तात्काळ अटक करावे.जालना जिल्ह्यातील गायरान जमीन व सव्हे नं. ४८८, गायरान ज्मीन गायरणधारकाच्या कास्तक-्याच्या करण्यात यावे.मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात स्वंतत्र आरक्षण (अ.ब.क.ड) देण्यात यावे. क्रांतीगुरु लहुजी वस्ताद पुर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा. संजय ताकडेयांनी मातंग समाजाच्या आरक्षणासाठी आपले बलीदान दिले. त्यांचे बलिदान व्यर्थ न जाता मातंग समाजाला तात्काळ आरक्षण देण्यात यावे. माळीपुरा जुना जालना येथील सा.अण्णाभाऊ साठे शॉपी सेंटरची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी. नगर परिषद जालना मार्फत गुत्तेदारी पध्दतीने मातंग समाजातील साफ सफाई करणाऱ्या कर्मचार्यांना नगर परिषद जालना येथे कायमस्वरूपी करण्यात यावे. दि. १८ फेब्रुवारी रोजी डोंगरगाव सिल्लोड येथील ३२ वर्षीय दलित महिलेसोबत सात वर्षाच्या मुलीला सोबत घेऊन गवत आणायला गेली. शनिवारपासून ती गायब होती. त्यांच्या दोघीचे विहिरीत प्रेत आढळून आले. या गुन्हेगारांना तात्काळ अटक करुन गुन्हा दाखल करण्यात यावे व शिक्षा देण्यात यावी. वरिल मांगण्या तात्काळ मंजूर न झाल्यास यापूढे महाराष्ट्र राज्यभर जेलभरो आंदोलन करण्यात येईल. आंदोलनात कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास या घटनेची जवाबदारी प्रशासनावर राहील.. दाविद गायकवाड,संतोष तुपसौंदर,किसन लांडगे, संतोष निकाळजे, अर्जुने दाकतोडे, अनिल थोरात, विक्की हिवाळे, ललित कुचेकर, गंगाधर लाखे, ओंकार घोड़े,द्वारकाबाई लोंढे संगिता कांबळे ,विशाल लांडगे, आशाबाई साबळे सह आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...