गुरुवार, २३ एप्रिल, २०२०


कोविड -19 विषाणूच्या पार्श्वभूमीवर नोंदणीकृत बांधकाम कामगारांना
            शासनाकडून दोन हजार रुपये अर्थसहाय्य

  जालना, प्रतिनिधी :- महाराष्ट्रात सुरु असलेल्या कोविड -१९ विषाणू संकटाच्या पार्श्वभूमीवर इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना शासनाकडून दोन हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.लॉक डाऊन परिस्थितीमुळे सर्व प्रकारची बांधकामे बंद पडले आहेत. बांधकाम कामगारावर बेकारीचे संकट ओढवले असल्यामुळे या संकट काळात त्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगारांना कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अर्थात डी.बी. टी.पद्धतीने मंडळाकडील नोंदीत व सक्रीय (जिवीत) असलेल्या बांधकाम कामगारांच्या खात्यात दोन हजार रुपये अर्थसहाय्य जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.
कामगारांनी कुठलाही अर्ज भरण्याची किंवा चौकशीसाठी कार्यालयात गर्दी करू नये तसेच कुठल्याही व्यक्तीच्या भूलथापांना बळी पडू नये. अशा व्यक्तीची तक्रार संबंधित पोलिस स्टेशनला करावी. असे जिल्हा सरकारी कामगार अधिकारी टी.ई. कराड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.


     कोरोनावर मात करीत तीन रूग्ण बरे होवून परतले घरी..!
शेगांव येथील दोन व चितोडा ता. खामगांव येथील रूग्णांचा समावेश
                   टाळ्यांच्या गजरात रुग्णांचे स्वागत

                आतापर्यंत 11 कोरोना बाधीत झाले बर

बुलडाणा, प्रतिनिधी:-कोरेाना विषाणू संपूर्ण जग आपल्या कवेत घेतले आहे. जिल्ह्यातही हळूहळू पाय पसरविणाऱ्या कोरोनाने चांगलीच खळबळ उडवून दिली होती. जिल्ह्यात सात तालुक्यांमध्ये आपली उपस्थिती दर्शवित कोरोनाने प्रशासनाला गंभीर केले.  कन्टेटमेंट प्लॅन, लॉकडाऊन, गर्दी कमी करण्यासाठी विविध योजलेले उपाय यामुळे कोरोना नियंत्रणात येत आहे. 
जिल्ह्यात आज 23 एप्रिल रोजी कोरोनावर मात करीत तीन रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. 
     जिल्ह्यात चिखली येथे तीन,  चितोडा ता. खामगांव येथे दोन, शेगांव येथे तीन, देऊळगांव राजा येथे दोन,  सिंदखेड राजा येथे एक, मलकापूर येथे चार आणि बुलडाणा येथे सहा कोरोनाबाधीत रूग्ण आढळले होते. त्यापैकी आतापर्यंत बुलडाणा येथील चार, शेगांव येथील एक, चितोडा ता. खामगांव येथील एक, चिखली येथील एक आणि दे.राजा येथील एक कोरोनाबाधीत रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. त्यामध्ये आज तीन रूग्णांची भर पडली आहे. आज शेगांव येथील दोन आणि चितोडा ता. खामगांव येथील एक अशाप्रकारे तीन रूग्ण बरे होवून स्वगृही परतले आहेत. अशाप्रकारे एकूण 11 रूग्ण बरे झालेले आहे.
     प्रशासनाने आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून राबविलेल्या उपाययोजनांमुळे आज तीन रूग्णांचे दुसरे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहे. त्यांना आनंदाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्यासह सर्व डॉक्टर्स, नर्सेस, ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवून बरे झालेल्या रूग्णांचे स्वागत केले.  शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उपचारादरम्यान संबंधित रुग्णांचे दाखल केल्यापासून 14 व 15 दिवसानंतरचे दोन्ही अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. दोन्ही तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याने चितोडा ता. खामगांव व शेगांव येथील रुग्णांना डिस्जार्ज देण्यात आला आहे.  त्यांच्यावर उपचार करणारे सिस्टर्स व ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवित त्यांना प्रोत्साहित केले. कोरोनावर मात केल्याने रूग्णांचे चेहरेही आनंदाने फुलले होते. समाधानाचे हास्य रूग्णांच्या चेहऱ्यावर होते.
   जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पंडीत यांनी डिस्चार्ज पेपर दिला. त्यानंतर रुग्णवाहिकेतून संबंधित रुग्णांना त्यांच्या  घरी सोडण्यात आले. या तीन रूग्णांमुळे जिल्ह्यात कोरोनापासून बरे झालेल्या रूग्णांची संख्या 11 झाली आहे. जिल्ह्यात कोविड -19 आजाराने 21 रूग्ण बाधीत होते. त्यापैकी एकाचा 28 मार्च रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर 17 एप्रिल रोजी तीन, 20 एप्रिल रोजी पाच आणि आज 3 रूग्णांना बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले. आता 9 रूग्णांवर कोविड रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या कोरोनाबाधीत रूगांना तपासणी अहवालानंतर कोरोना संसर्ग वार्डात दाखल करुन या सर्वांवर उपचार करण्यात आले.  तसेच शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार या रुग्णांवर तसेच जिल्ह्यात संशयित आढळून येणाऱ्या रुग्णांवर शासकीय रूग्णालयातील आयसोलेशन कक्षात तपासणी, उपचार करण्यात आले. कोरोना बाधित आढळलेल्या या व्यक्तींचे दोन्ही स्वॅब घेवून तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. पहिला व दुसरा तपासणी रिपोर्ट निगेटीव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला. दोन्ही अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाल्याने शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सदर बाधीत रूग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना आज डिस्चार्ज देवून घरी सोडण्यात आले.
   कोरोनाच्या या जीवघेण्या आजारातून वाचलेल्या सर्व कोरोना निगेटीव्ह रूग्णांचे चेहरे आनंदीत होते. सर्व मनोमन आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर्स, नर्सेस यांचे आभार मानत होते. कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी अजूनही लॉकडाऊनचे पालन करावे, घरातून विनाकारण बाहेर पडू नये. सर्वांनी मास्क किंवा स्वच्छ हात रूमाल चेहऱ्यावर ठेवावा. अनावश्यक बाहेर  न पडता घरातच रहावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने  करण्यात आले आहे.                                                                                                                                                 

मादळमोहित सार्वजनिक रक्तदान शिबीरास उत्षपुर्त प्रतीसाद.45 युवकांचे दानत्व

मादळमोहि (हँलो रिपोर्टर .न्युज )दि.24. :- महाराष्ट्रात कोरोना आजाराने सर्वानाच हैराण केले आसुन केंद्र व राज्य सरकार आणि प्रशासकीय आधिकारी .हे ऊदभवलेल्या माहामारीला आटोक्यात आनण्यासाठि कामाला लागले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्र्यी श्री राजेश टोपे यांनी राज्यातील नागरीकाना केलेले आव्हान. मादळमोहि करानी त्याला साद दिली देत. सार्वजनिक रित्या रक्तदान शिबीराचे 23 एप्रिल गुरुवार रोजी सरकारी दवाखना मादळमोहित आयोजित करण्यात आले होते. महिलासह तब्बल पंचेचाळीस युवकांनी या सामाजिक ऊपक्रमात आपला सहभाग नोंदवत गावकर्यानी दाखवून दिले कि "संकट काळी" आम्ही काही मदत मागण्या ऐवजी येथील  युवक मदत करणारे आहोत .आणी तो रक्तदानाचा ऊपक्रम येथील वैद्यकीय अधिकारी डाँ. लांजेवार. डाँ. लोकरे. यांच्या उपस्थित तर बीड.जी.प.चे.माजी .आरोग्य सभापती. पंढरीनाथ लगड.संपादक चंद्रकांत हक्कदार. गेवराई. प.स.स.जयसिंग जाधव  यांच्या ऊपस्थित सोशल डिस्टंट मध्ये पार पडला.

गेवराई तालुक्यात मादळमोहि येथे काल गुरुवारी गावकर्यानी सार्वजनिक रित्या रक्तदान शिबीर आयोजीत केले.आसताना .मादळमोहि भंडगवाडी.जवाहरवाडी. येथील सर्वपक्षीय युवक या वेळी राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी केलेल्या आव्हानाला व  सामाजिक ऊपक्रमाला साद दिली.आणी रक्तदानाच्या माध्यमातून  गरजु व गरीब रुग्णाच्या कामी याव.नाही तरीही सध्या महाराष्ट्रात कोरोना सारख्या आजाराने थैमान घातले आसुन आनेकांना रक्ताचा तुटवडा जान ऊ नये गरजुवंताना मदत म्हणून येथील नागरीकांनी रक्तदान शिबीर आयोजीत केले होते.या शिबिरात महिलाचेहि योगदान लाभले. येथील सामाजिक कर्यकर्ते श्री पंढरीनाथ लगड .पत्रकार चंद्रकांत हक्कदार. कैलास भुजबळ.रमेश जीजा तळेकर.आदिनाथ गावडे.आजीत वर्मा. आमर जगताप. ईत्यादी सह सर्व पक्षिय कार्यकर्त्यांनी या वेळी पुढाकार घेतला.याप्रसंगी. माऊली तळेकर.विनोद भोपळे. प्रमोद घाटे.सुरज लगड.विशाल दुधाळ.सुरेश भोपळे. शोहेबभाई.आक्षय तळेकर.जयसिंग जाधव .परमेश्वर केकरे.आमोल जवरे. गंगाधर जवरे. आजय बांगर .राज बांगर.आमर काशिद.संदिप मेंडके.शरद पवार. भरत पवार. नितीन आखाडे. आमर काशिद.कैलास भुजबळ. पारस तळेकर.सौ.दिव्या आजित वर्मा. श्वेता बळीराम लगड.सुदाम दुधाळ.आशोक सरपते.शरद धूरंधरे.ईत्यादी सह पंचेचाळीस रक्तदात्यानी सहकर्यकरत सदरील शिबीर पार पाडले या वेळी मादळमोहि येथील सरकारी दवाखन्यातील डाँ.नर्स सेवक सुपरवायझर. तर विशेष बीड येथून आलेले जिल्हा आरोग्य विभागात कामरणारे ब्लड डोनेशन टिम या सर्वानी मादळमोहि रक्तदान शिबीरास सहकार्य केल्या बद्ल गावकर्यानी सर्वाचे आभार मानले.
अंबड़ तालुक्यातील वाड़ी शिराढोंन येथे पिण्याच्या पाण्याची सुवेवस्था प्रशासनाचे दुर्लक्ष

एक हंडा पाणी भरण्यासाठी जीव धोक्यात घालून शर्यतीचे प्रयत्न करावे लागत


अंबड़/अरविंद शिरगोळे: कोरोना विषाणु ने तर जगभरात खळबळ झाली आहे. त्यातली त्यात लॉक डाऊन संचारबंदी  अंबड़ तालुक्यातील वाडी शिरढोण येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई असून पानीचे प्रश्न होत आहे  ग्रामपंचयत
निश्काळजीपनाचे कळस,प्रशासन ही गंभीर नाही व  सरपंच शफीक पटेल याची दखल न घेता दुर्लक्ष केले आहे. यात गावकारी बांधव एक हंडा पाणी भरण्यासाठी जीव धोक्यात घालून शर्यतीचे प्रयत्न करावे लागत आहेत. तरी गावकारी व भारतीय विद्यार्थी मोर्चा अध्यक्ष बाबू  घुले,अनिल जमधडे,संदीप उघडे,  यांनी प्रशासनाला वेळो वेळी कल्पना, नवेदन दिलेले असून तरी ही यावर अद्याप कुठलीही निर्णय घेतला गेलेला नाही.याची दखल लवकर लवकर घेण्यात यावी अशी मागणी भारतीय विद्यार्थी मोर्चा अध्यक्ष बाबू घुले व इतर कार्यकर्ते यांच्याकडून होत आहे.


नळविहीरा गावात वाढला नशेली पदार्थ विक्री चा धुमाकुळ
जाफराबाद,प्रतिनिधी:- जाफराबाद नळविहीरा गावामध्ये जि. प. शाळेसमोर  दुकानामध्ये नसेली पदार्थ 
सर्वात जास्त प्रमाणात विकल्या जात आहे.यामुळे शाळेतील लहान मुलांना यावर परिणाम दिसून येत आहे याकडे शालेय शिक्षण समिती सदस्य काना डोळा करत आहेत. या दुकानामध्ये नसेली पदार्थ  तंबाखू गुटखा बार मावा पेट्रोल यादी नसेली पदार्थ विकल्या जातात. तर दुसरीकडे याच गावामध्ये जुगार खेळायला ५ ते६  गावचे लोक येत असतात. यामुळे कोरोना भिती  पोटी गावामधील नागरीकांना हिताचे वातावरण पसरले आहे.या गावाच्या शिवारात गावरान दारु सुध्दा मिळते. यामुळे गावातील महीलांना चितां जनक  होत आहे  . या संबंधी  आम्ही विचारपुस  केली असता ग्रामपंचायत कोणतेही कारवाई करायला तयार नाही.याकडे पोलीस प्रशासनाने सक्त प्रमानावर कारवाई करण्याची गरज आहे.

घरपोच किराणा वाटपाचा शुभारंभ : गरजवंतांसाठी शिवसेना ठरली " आधारवड "
शिवसेना प्रमुखांचे संस्कार कृतीतून जोपासण्याचा प्रयत्न - माजी मंत्री अर्जुनराव  खोतकर
 जालना ( प्रतिनिधी) :-कोरोना महामारीस रोखण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊन मुळे हातावर पोट असलेल्या गोर- गरीब, मजूर, कामगार, श्रमजीवी कुटूंबियांसमोर जगण्याची भ्रांत पडली असतांना " संकटं तिथे मदतीला शिवसेना " हे ब्रीद सार्थ ठरवत सर्व प्रथम जालना शहर व जिल्हाभरात शिवसेना पक्ष गरजवंतांना मदतीसाठी धावून आला आहे.
मुंबई येथील कोरोना ग्रस्तांना मदत, पहिल्या टप्प्यात जनजागृती, घरपोच भोजनाची पाकीटे, भाजीपाला वितरित करत माणसे जगविण्यासाठी सुरू असलेल्या सेवा यज्ञात शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी मोठा समिधा वाहिला असून आता घरपोच किराणा साहित्य मिळणार असल्याने  गरजवंतांसाठी शिवसेना मोठी आधार वड ठरली आहे. तथापि " गरज पडेल तिथे मदतीचा हात सदैव पुढे करा " ही शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण प्रत्यक्ष कृतीत जोपासून मदतीचा अल्पसा प्रयत्न केला असल्याचे माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
शिवसेनेच्या वतीने हजारो कुटूंबांना सोशल डिस्टन्स चे पालन करून किराणा साहित्य वाटपाचा शुभारंभ गुरूवारी ( ता.२३) भागवताचार्य प.पू.शेष महाराज गोंदीकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर राव अंबेकर, माजी आ. संतोष सांबरे, अनिरूध्द खोतकर, संजय खोतकर, पंडितराव भुतेकर, रावसाहेब राऊत, संतोष मोहिते,शहर प्रमुख विष्णू पाचफुले, आत्मानंद भक्त,दीपक रन्नवरे,युवासेना समन्वयक अभिमन्यू खोतकर, जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, पांडुरंग डोंगरे, हरीहर शिंदे, नगरसेवक विजय पवार,अशोक पवार, निखिल पगारे, संतोष जांगडे, गणेश घुगे, गोपीकिशन गोगडे,संदीप नाईकवाडे, किशोर पांगारकर, संताजी वाघमारे, दादाराव पाचफुले, राम सतकर,शंकर लुंगे, विजय जाधव, जगन्नाथ चव्हाण, आदींची उपस्थिती होती.
माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यावेळी बोलतांना म्हणाले की, एकीकडे राज्याला कोरोना मुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे प्रत्येक क्षणास झटत आहेत. लॉकडाऊन मुळे संकटात सापडलेल्यांना मदतीसाठी शासनासोबतच शिवसेना पक्षाकडून युद्ध पातळीवर मदतकार्य सुरू आहे. असे खोतकर यांनी नमूद केले. जालना जिल्ह्यात वाडी, वस्ती, तांडे यांसह शहरी भागातील झोपडपट्टया, कामगार, श्रमजीवी व सर्वसामान्य कुटुंब राहत असलेल्या वसाहतींमध्ये मदत पोहोचविण्याचे कार्य सातत्याने सुरु असून याच सेवेचा एक भाग म्हणून ही मदत देण्याचा अल्पसा प्रयत्न आहे. असे सांगून सर्व नगरसेवक, शिवसेना, युवा सेना पदाधिकारी यांच्या मार्फत नियोजन बध्द रितीने सोशल डिस्टन्स राखत सदरील मदत वाटप केली जाणार असल्याचे अर्जुनराव खोतकर यांनी सांगितले.
या वेळी अंकुश पाचफुले, घनश्याम खाकीवाले, संतोष सलामपुरे, राजेश घोडे, किशोर नरवडे, राजू सलामपुरे, किशोर शिंदे, सुशील भावसार,दीपक वैद्य, संतोष परळकर, दीपक राठोड, संतोष क्षोञीय, भोला कांबळे शिवाजी मुळे यांच्या सह नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.
गरजूंना जगण्याचे बळ मिळाले : प.पू.शेष महाराज
आजमितीस रोजगार नसल्याने अनेकांसमोर  जगण्याचा प्रश्न निर्माण झालेला असतांना सातत्याने समाजकार्यात अग्रेसर असलेल्या माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी माणसे जगविण्यासाठी  मदतीचा हात दिल्याने गरजवंतांना जगण्याचे बळ मिळाले असा विश्वास भागवताचार्य प. पू.शेष महाराज गोंदीकर यांनी व्यक्त केला. विपरीत परिस्थितीत दातृत्वाची ज्योत प्रज्वलित ठेवून अर्जुनराव खोतकर यांनी धर्माचरण जपले असून गरजवंतांचे आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी राहतील. असेही शेष महाराज गोंदीकर यांनी सांगितले.
खोतकर यांची सामाजिक बांधिलकी स्फुर्ती देणारी : भास्कर राव अंबेकर
संकट काळात गरजूंना मदतीसाठी सदैव तत्पर असलेले माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी कायमच सामाजिक बांधिलकी ची भूमिका जोपासली असून त्यांचे कार्य सर्व घटकांना स्फुर्ती देणारे आहे. असे शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर राव अंबेकर यांनी सांगितले. आज कुठल्याही पदावर नसतांना स्वखर्चाने गरजवंत कुटुंबांना घरपोच किराणा वितरित करण्यासाठी खोतकर यांनी उचललेले पाऊल गरजूंना नवी उर्जा देणारे आहे. असे भास्कर राव अंबेकर यांनी नमूद केले.

पालकमंत्री राजेश टोपे यांच्या प्रयत्नातुन जालना येथील कोव्हीड हॉस्पीटलसाठी 20 पोर्टेबल व्हेंटीलेटर व पाच हजार मास्क
  जालना,प्रतिनिधी:- राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या प्रयत्नातुन जालना येथील कोव्हीड हॉस्पीटलसाठी यावेळी अपर जिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी श्री कडले, सिद्धेवर वाघमोडे आदींची उपस्थिती होती.
सीआरआर फंडातुन 20 पोर्टेबल व्हेंटीलेटर व पाच हजार मास्क उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. जालना जिल्ह्यातील जनतेला आरोग्याच्या सेवा अधिक चांगल्या प्रमाणात उपलब्ध करुन देण्यासाठी पालकमंत्री राजेश टोपे सातत्याने प्रयत्नशिल असुन त्यांच्या पुढाकाराने जालना येथे 150 खाटांच्या उभारण्यात आलेल्या कोव्हीड रुग्णालयासाठी क्रश्ना डायग्नोस्टीक प्रा. लिमिटेड, पुणे या कंपनीच्यावतीने सीएसआर फंडातुन एलटीव्ही 950 या बनावटीचे 20 पोर्टेबल व्हेंटीलेटर व पाच हजार मास्क कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर श्रवण मुथा यांनी आज दि. 23 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे सुपूर्द केले.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...