बुधवार, १ एप्रिल, २०२०

        गोरगरीबांना हक्काचे तीन महिन्याचे राशन सुरक्षीत                        ठेवून,आपातकालीन मोफत अन्नधान्य वाटप करावे.
ह्युमन चाईल्ड वेलफेअर अॕन्ड एज्यु.सोसायटीचे अध्यक्ष अब्दुल रफीक अ.रशीद यांचे शासनास निवेदन.
जालना, प्रतिनिधी :- कोरोना विषाणुच्या
पार्श्वभूमीवर देशात व राज्यात लाॕक डाऊन असल्या मुळे रोजंदारीवर मजूरी करणारे मजूर,कामगार,छोटा व्यवसाय करून पोट भरणारे,तसेच भटकंती करून ऊदरनिर्वाह करणारे यांच्या रोजीरोटीचा फार बिकट प्रश्न निर्माण झालेला आहे. अशा परिस्थीतीमध्ये सर्वांना राज्यशासनाकडून अन्नधान्यामध्ये आपत्ती काळातील विशेष पॕकेज देण्यासंबंधीची मागणी ह्युमन चाईल्ड वेलफेअर अॕन्ड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अब्दुल रफीक अ.रशीद यांच्या वतीने करण्यात आली आहे.
 निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, राज्यातील विशिष्ट
आपातकालीन परिस्थिती विचारात घेता, लक्षनिर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थ्यानां तीन महीन्यांचे धान्य एकत्रीतपणे उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, म्हणजे एप्रिल,मे व जून २०२० या तीन महिण्याचे अन्न धान्य वितरीत करण्याचा आदेश व निर्णय राज्य शासन घेतला आहे.आपातकालीन परिस्थीतीत घेतलेल्या निर्णयाचे स्वागतच आहे.परंतू आज लॉकडाऊन मुळे लाखो
मजूर,कामगार,रोजदारीने काम करणारे लोक आणि मध्यमवर्गीय कुटुंब सुध्दा आर्थिक अडचणीत अडकलेले आहेत.
अशा लोकांवर भूकमरीची वेळ आलेली आहे.
 आपण एप्रिल,मे व जुन महीन्याचा आगोदर धान्य देऊन आपातकालीन परिस्थीत त्यांना संभाळत आहे. त्यांच्याच शिधा कोठ्यातून आगोदर धान्य देत आहेत. परंतू में, व जून महिन्यात त्या लोकांना
पुन्हा उपासमारी व भुकमरीची वेळ येईल, कारण की त्यांच्या आगोदर महिण्याचे शिल्लक धान्य आपातकालीन परिस्थीत वाटप करुन शासन त्यांच्या हिश्शाचे आहे तेच वाटप करीत आहे.
म्हणून एप्रिल,मे जुन २०२० चा साठा देण्या एवजी,त्याःचा साठा सुरक्षित ठेवून आपातकालीन धान्य गोरगरीबानां जिल्हा अधिकारी व प्रशासन अधिकाऱ्यांच्या देखरेखीत मोफत वाटप करावे,झोपड्पट्टी भागात व गोरगरीब लोकांकडे
अजूनही शिधा पत्रक नाहीं, ऑनलाइन दुरुस्त्या झालेले नहीं, या परिस्थीत खुलेपणे आपातकालीन धान्य राज्याच्या गोरगरीब जनतेला वाटप करण्यात यावे.म्हणजे पुढील मे व जुन महिन्यात त्या लोकांना त्यांचे हक्काचे धान्य
सुरक्षित राहीन.
  ह्युमन चाईल्ड वेलफेअर अँन्ड एज्युकेशन सोसायटी,जालना चे अध्यक्ष अब्दुल रफीक अ.रशीद यांच्या वतीने राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री मा.छगन भुजबळ यांना अश्या आशयाचे एक निवेदन पर पत्र पाठविण्यात आले. त्यांच्या ह्या निवेदनाची मा.राज्यमंत्री छगन भुजबळ साहेबांनी दखल घेतली तर राज्यातील गोरगरीब जनतेला नक्कीच फार मोठा आधार मिळणार आहे.म्हणून सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे.
             आरोग्य दुत यांच्याकडून जनजागृती
जालना (प्रतिनिधी) कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी शासनाकडून जनजागृती करण्यात येत असून प्रत्येक गाव
१००% लोकडाऊन करण्यात येत आहे,याच पारश्वभूमीवर दरेगाव,रामनगर,जळगाव, ममदाबाद,मनेगाव, निरखेडा तांडा या ठिकाणी क्रांतिसिंह बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आरोग्य दुत यांची नेमणूक करण्यात आली असून हे गावात लोकांमध्ये कोरोना विषाणू विषयी जनजागृती करत आहेत.
     कार्यात गावातील नागरिक स्वयंस्फूर्तीने पुढे येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
जनजागृतीच्या या कामात बचत गटाच्या महिला मागे नाहीत.
आरोग्य दुत व गावातील तरुण मंडळी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन गावात जनजागृती करून गाव १००% बंद करत आहे कोणीही रस्त्यावर किंवा गावात फिरताना दिसत नाही यामध्ये स्टिकर,बॅनर,व दवंडी याचा वापर करून गावात जनजागृती करण्यात येत आहे तसेच गरीब कुटुंबाला मदत करत आहे. यामध्ये संस्थेचे अध्यक्ष विष्णु
 पिवळ, आरोग्य दुत उषा शिंदे, गजानन गाढे,भागवत वराडे, सुनीता जाधव, अदी कार्य करत आहे.
औरंगाबाद हुन नांदेड ला पायी जाणाऱ्यांची जेवणाची व्यवस्था....
सिंधीकाळेगाव (प्रतिनिधी) कोरवणाच्या
धास्तीने औरंगाबाद येथे कामानिमित्त राहत असलेल्या तीन जणांना औरंगाबाद हुन नांदेड कडे पायी जात असलेल्या तीन व्यक्तीला  जालना तालुक्यातील रामनगर येथील शकील शेख, निसार मौलाना यांनी जेवणाची व्यवस्था केली.
कोरोना संचारबंदीच्या काळात एलपीजी गॅसची कमतरता भासणार नाही
जालना, प्रतिनिधी:- कोरोना विषाणूचा
प्रार्दुभाव रोखण्यासाठी सध्या लागु करण्यात आलेल्या संचारबंदीच्या काळात आयओसी / बीपीसी / एचपीसी सारख्या तेल विपणन कंपन्या ग्राहकांना अत्यावश्यक सेवा म्हणजेच एलपीजी पुरवित आहेत. ग्राहकांना घरांमध्ये एलपीजीची गॅस ची कमतरता भासणार नाही आणि प्रत्येक घरातील सिलिंडर वितरित व्हावेत यासाठी आमची सर्व वितरक (Distributor) आणि वितरक नेटवर्क अथांग प्रयत्न करीत आहेत जेणेकरून ते त्यांच्याघरात सुरक्षित राहतील. असे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड डीएनओ यांनी जारी केलेल्या प्रसिध्दीपत्रकात नमुद केले आहे.
  या प्रसिध्दीपत्रकात पुढे नमुद करण्यात आले की,आम्ही आमच्या ग्राहकांना एसएमएस संदेश, सोशल मीडिया इत्यादी माध्यमातून सांगत आहोत की ग्राहकांची सुरक्षा हीच आपली मुख्य चिंता आहे, त्यांना घरी रहाण्याची गरज आहे आणि आम्ही त्यांच्या घरी सिलिंडरचे वितरण करू. रोकड / पैसे हाताळणी टाळण्यासाठी त्यांनीऑनलाईन तसेच ऑनलाईनबुक करुन ऑनलाईन पेमेंट करावे. एलपीजीला आवश्यक वस्तूखाली येत नसल्याने लॉकडाऊन स्थितीतून सूट दिली गेली आहे . आमचे सर्व वितरक कर्मचारी, गोडाऊन कीपर, मेकॅनिक आणि डिलिव्हरी बॉय या लॉक-डाऊन कालावधीत आणि त्याच्या पलीकडे सर्व ग्राहकांना विनाव्यत्यय एलपीजी सिलिंडर्सचा पुरवठा संकटाच्या काळात तयार ठेवतात.
  कोविड -19 चा धोका आमच्या वितरणातील सर्व कर्मचार्यांना, एलपीजी प्लांटमधील ट्रान्सपोर्टर्स आणि कंत्राटदारांना लागू आहे. अशा प्रकारे, मृत कर्मचार्याच्या जोडीदाराच्या कोव्हीड– 19 च्या खात्यावर लाइफ कव्हरेजची तरतूद रू. पूर्व अनुदान रक्कम 500000/- इतकी देय रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारत सरकारने एप्रिल ते जून 2020 या कालावधीत सर्व उज्ज्वला ग्राहकांसाठी कोविड – 19 च्या कालावधीत विनामूल्य एलपीजी गॅस देणे जाहीर केले आहे. ही देय रक्कम उज्ज्वला लाभार्थींच्या रिफिलच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातील. गॅस सिलिंडर खरेदी करण्यासाठी रक्कम. या योजनेंतर्गत 88569 उज्ज्वला लाभार्थ्यांना जालना जिल्ह्यात फायदा होईल..चला कोविड - 19विरूद्ध लढा देण्याच्या राष्ट्रीय कार्यात सामील होऊ या आणि गरिब आणि गरजू लोकांना समाज म्हणून मदत करू आणि आपले योगदान देऊ. चला सरकारने वेळोवेळी दिलेल्या कोविड - 19च्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करू आणि इतरांनीही तसे केले आहे याची खात्री करुन घेऊया.घरी रहा सुरक्षित रहा, असे जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रिना बसैय्ये यांनी कळविले आहे.


हातावरील पोट असलेल्यांना गरिबांना शासनाच्या वतीने दहा हजार रुपये आर्थिक मदत द्या- सौ.शालिनी शर्मा
अन्याय प्रतिकारक दलाच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन.
जालना प्रतिनिधी :- कोरोना साथी मुळे 
देशभरात जनता कर्फ्यु लागु
 रिक्शाड्रायव्हर पासुन ते रोज काम केल्याशिवाय त्यांच्या घरात चुली सुध्दा पेटत नाही खास करुन झोपडपट्टीतील लोकांची तर फार दयनीय अवस्था झालेली आहे, बाहेर जावे तर कोरोना साथी मुळे मृत्यु व घरी रहावे तर परीवाराची होत असलेली उपासमार पाहुन ह्यांना आत्महत्या करावीशी वाटत आहे.करीता सर्वांना त्वरीत संसारोपयोगी सर्व धान्य देउन जो पर्यंत कोरोना साथीचे निवारण होत नाही तोपर्यंत प्रत्येकी कुटूंब प्रमुख च्या नावाने १००००/रु.अनुदान देण्यात यावे.आज देशभरात कोरोनासाथी मुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून जनता कर्फ्यु लागु आहे ह्या कारणे जे गोरगरीब हातांवर रोज काम करुन पोट भरत आहे अश्या परीवारावर फार बिकट वूळ आलेली आहे.तसेच जनता कर्फ्यु यशस्वी होणे कामी प्रधाणमंत्री गरीब योजनेत बदल झाल्यास शक्य होईल.नुसते गहु, तांदुळ,गो,तेल,व दाळी देऊन शक्य होणार नाही.कारण दर्या परीवारात १० ते १५ आहेत त्यांना सरासरी किमान १०,०००/ ते १५,०००/रु.खर्च येतो .तसेच घरात बारीक ते बारीक गोष्टी (गरजा)असतात.सरकार ने फक्त उज्वला गैसचाच उल्लेख केला आहे.पण उज्वला गैस किती लाभार्थ्यांकडे आहे.माझ्या मते याप्रसंगी ज्यांचेकडे जे गैस कनेक्शन आहे ते मिळायला हवे.ज्या परीवारात १५ व्यक्ती आहे अश्या परीवारात आठ दिवसांत २० किलो गहू व १० किलो तांदूळ लागते,तर बाकीचे वस्तु (सामान)किती लागते याचा अंदाज लावण्यात यावा.व या सोबत मिठ ,मिर्ची,हळद,मसाले,साबणी,सह दाळी, कडधान्य आलेच,व दुध,साखर,पत्ती,जर हे सगळे साहित्य (सामान) गरजुंपर्यंत तात्काळ पोहचले तर ही गरीब जनता बाहेर पडणार नाही.जर हे शक्य होत नसेल तर महाराष्ट्रातील सर्व गरीब जनतेच्या कुटूंब प्रमुखांच्या नावे त्यांच्या खात्यात कोरोना वायरसचे निवारण होत नाही तोपर्यंत प्रती महिना १००००/रु, अनुदान देण्याची व्यवस्था करावी ज्यामुळे गरीब जनतेच्या डोक्याला आलेला आर्थिक टेंशन दुर झाल्यास हे लोक कामांकरिता चोरुन इकडे तिकडे जाणार नाही व जनता कर्फ्यु यशस्वी होईल.करीता हे.साहेबांनी त्वरीत धान्यपुरवठा करून प्रत्येक कुटूंब प्रमुखांच्या नावे बैंक अकॉउंटला १००००/रु.टाकावे. अशी मागणी अन्यायप्रतिकारक दलाच्या मराठवाडा सरचिटणीस सौ.शालिनी शर्मा यांच्यावतीने करण्यात आली आहे.



*ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे देवगवात घाणीचे साम्राज्य*
*बदनापूर प्रतिनिधी:* ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे देवगवात घाणीचे साम्राज्य देवगाव गावामध्ये गेल्या सहा 
महिन्यांपासून गावातील पाण्याच्या टाकीच्या बाजूला खड्डे दूषित पाण्याने पाणी साचले आहे त्याठिकाणी गावातील पाईप लाईन फुटलीली आहे आणि तेच पाणी गावातील लोकांना प्यायला मिळते.व दूषित पाण्याने गावतील नागरिक आजारी पडत आहे.त्याचवेळेस कोरोना विषाणूची साथ चालू आहे .डेंग्यू ची आजार होण्याची शक्यता आहे.अशावेळेस नागरिकांची परेशाणी होत आहे.तरी ग्रामपंचायत  ने लवकरात लवकर पाइपलाइन दुरुस्त करावे अशी मागणी विनोद मगरे(भावी सरपंच)यांनी केली आहे.

              *बुलढाण्यात कोरोना पॉझिटिव्ह संख्या 4 वर*

बुलडाणा प्रतिनिधी :- आज दि.01 एप्रिल
ह एक रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. प्रेमचंद पंडित यांनी दिली. आज पॉझिटिव्ह आलेला केवळ 23 वर्षांचा तरुण आहे. अजून 8 चाचण्यांचे रिपोर्ट येण्याची बाकी आहेत, त्यातील 1 रिपोर्ट हाय रिस्क नमुन्यात ला येणे बाकी आहे. बुलडाणा शहरात कोरोना पॉझिटिव्ह संख्या आता 4 त्यातील एक जण आधीच मृत झालेला आहे.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...