मंगळवार, १७ मार्च, २०२०

जनतेच्या हितासाठी आ पवारानी कोरानोवर उपाययोजनासाठी घेतली तातडीची बैठक.

इम्रान सौदागर | गेवराई कोरोनापासून रूग्ण आणी नागरीकाचा बचाव करण्यासाठी आज उपजिल्हा रुगनाल्य गेवराई येथे आमदार श्री लक्ष्मण आण्णा पवार याच्यां उपस्थितीत बैठक सपंन्न झाली .

यावेळी या रोगाचा प्रसार कशापद्धतीने होत आहे ,.आणी त्यावर उपाययोजना कशा पद्धतीने करता येतील .तसेच मोठया संख्येने एकत्र येत असलेली नागरीकाना एकत्र येऊ नये तसेच ज्या ठिकाणी लोकांची गर्दी होते .सिनेमा हाँल ,बाजार ,असे सर्व उदयापासून बंद रहाणार आहे .तसेच सार्वजनिक ठिकाणी जास्त लोकानी एकत्रित येऊ नये यासाठीही आपल्याला कशी उपाय योजना करता येतील यावर सर्व  डाँक्टराशी चर्चा करण्यात आली .यावेळी डाँ शिन्दे साहेब. डाँ माने. डाँ सराफ. नगर अध्यक्ष सुशिलभाऊ जवंजाळ. लक्ष्मण सेना प्रमूख याहीया खान. पोलीस उपनिरीक्षक जोगदंड मँडम. पोलीस उपनिरीक्षक झिजुंर्डे साहेब. सरवर खान.ईम्रान सौदागर. पत्रकार अध्यक्ष मधुकर तौर मा सुभाष सुतार.  भागवत जाधव .  आणी पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते .
येणारे 15 दिवस अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर निघा
परदेशातुन आलेल्या व्यक्तींची माहिती जिल्हा प्रशासनाला द्या
कोरोनाचा जिल्हयात एकही पॉझिटीव्ह रुग्ण नाही
                                   जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आवाहन

            जालना,प्रतिनिधी:-  कोरोना विषाणू प्रसार 
रोखण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असुन नागरिकांनीही या विषाणुचा प्रसार होऊ नये यादृष्टीने येणाऱ्या पंधरा दिवसात अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडापरदेशातुन आलेल्या व्यक्तींची माहिती जिल्हा प्रशासनाला देण्याबरोबरच प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छता राखण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले आहे.
  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.त्याप्रसंगी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना जिल्हाधिकारी श्री बिनवडे बोलत होते.
            यावेळी अपर जिल्हाधिकारी रवींद्र परळीकरनिवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाडउपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळीजिल्हा शल्य चिकित्सक डॉएम.केराठोडजिल्हा आरोग्य अधिकारी   डॉखतगावकरतहसिलदार श्री पडघनसंतोष बनकर यांच्यासह माध्यम प्रतिनिधींची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणालेकोरोनाचे गांर्भीय जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व माध्यमातुन जनजागृती करण्यात येत असुन गर्दी जमणाऱ्या कुठल्याही कार्यक्रमास परवानगी नाकारण्यात आलेली आहेजिल्ह्यातील सर्व शाळामहाविद्यालयेही बंद ठेवण्याच्या सुचना देण्याबरोबरच आठवडी बाजारधार्मिक स्थळेपर्यटनस्थळे बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत.  बाजारामधील जीवनाश्यक वस्तु किराणा दुकानदुधऔषध विक्रेताभाजीपाला आदी दुकानांना परवानगी देण्यात आली असल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात क्वारंटाईनचे तीन ठिकाण निश्चित करण्यात आले असुन सर्व उप विभागीय अधिकारी व तहसिलदार यांना तालुकास्तरावर शोध घेण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे.  जिल्ह्यातील 217 उपकेंद्रावर डॉक्टर्स.एन.एमआशाअंगणवाडी सेविकातलाठी व ग्रामसेवक यांचा आराखडा तयार करण्यात येत असुन जनतेचे सर्वेक्षण करण्यात येऊन त्याबाबतच्या माहितीचे मॅपिंग करण्यात येणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी दिली.
सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन एस.टीमहामंडळातील बसेस व खासगी बसेसना स्वच्छ व निर्जंतुकीकरण करण्याबरोबरच प्रवासामध्ये आजारी असलेल्या प्रवाशांची यादी तयार करुन ती प्रशासनाला सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.  अन्न व औषधी विभागामार्फत दुकानांची तपासणी करुन औषधी उपलब्ध असल्याची खात्री करण्यात येत असुन जनतेला सॅनीटायजर व मास्क पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतील याची दक्षता घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेतजिल्ह्यात दूरध्वनी,  इंटरनेट व विद्युत पुरवठा सुरळीत राहण्यासाठी सर्व संबंधित विभागाला निर्देश देण्यात आले असल्याचेही जिल्हाधिकारी  श्री बिनवडे यांनी यावेळी सांगितले.
विविध कामांसाठी नागरिकांची शासकीय कार्यालयात होणारी गर्दी टाळण्यासाठी नागरिकांची शासन दरबारी असलेली कामे करण्यासाठी कार्यालयात ड्रॉपबॉक्सची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे.  तसेच ई-मेल अथवा व्हॉटसअपद्वारे नागरिकांनी त्यांच्या कामासंदर्भात संदर्भात संपर्क साधावासात दिवसांमध्ये त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कोरोनापासुन बचावासाठी प्रत्येकाने आवश्यकता असल्यासच घराबाहेर पडावेवैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा.  सातत्याने गरम पाणी पिणेस्वच्छताजे व पौष्टिक अन्न खावेसातत्याने साबानाने हात धुवावेतसर्दी खोकलाताप असल्यास नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन आपली तपासणी करुन घ्यावी.  तसेच जनतेने जागरुक रहावेकुठलीही माहिती लपवु नये व प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी यावेळी केले.
 जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दि. 12 मार्च रोजी एक रुग्ण दाखल झाला होता.  त्या रुग्णाचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने रुग्णाला साधारण कक्षामध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहेदि. 16 मार्च रोजी एक रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन त्याचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेततसेच या रुग्णाच्या सहवासात आलेल्या 34 जणांची तपासणी करुन त्यांना अलगीकरण कक्षात ठेवण्याची कार्यवाही सुरु आहे.  तसेच  दि. 17 मार्च रोजी प्रत्येकी एक रुग्ण दाखल असुन त्याचेही नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.  या रुग्णाच्या सहवासात आलेल्या 4 जणांची तपासणी करुन अलगीकरण करण्यात येत आहेतसेच जालना शहरातील सात व्यक्ती थायलंड येथे 5 मार्च रोजी गेल्या होत्या.  त्या व्यक्ती दि. 11 मार्च, 2020 रोजी जालना शहरात परतल्या असुन त्यापैकी पाच व्यक्तींची तपासणी करुन त्यांना घरीच अलगीकरण करण्यात आले असुन इतर दोन व्यक्ती इतर शहरात गेल्या असुन त्यांनाही सुचना देण्यात आल्या असल्याचेही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी सांगितले.
जालना शहरातील मदरसा अरबियाफैजुलउलुम,चंदनझिरा येथे "मदरसा परिचय"कार्यक्रम संपन्न.
जालना प्रतिनिधी :-या कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड.अब्दुल मजिद,प्रमुख पाहुणे जेआयएचचे सय्यद शाकेर, मा.नगरसेवक
सतीष दादा जाधव, ओम क्लिनिक हॉस्पीटचे डॉ.वसंत टकले, डॉ.भागवत काळे, डॉ.गजेंद्र मगर, शांतीलाल राऊत, जीवनराव केंढे,संपतराज जांगीड,राहुल मुंढे, सुभाष पारे, बाबुलाल मोरवाल, रमेश कवडे ई. मान्यवर उपस्थिती होते.सर्वप्रथम मदरशाचा परिचय देतांना मौलाना अब्दुल रऊफ म्हणाले, सर्वांसोबत न्याय करणे व अन्यायाविरूद्ध उभे राहणे ही शिकवण विद्यार्थ्यांस दिली जाते. देशाच्या रक्षणासाठी न्याय,सुरळीत अर्थव्यवस्था, शांती यांची आवश्यकता असते. समाज सुधारण्यासाठी प्रत्येक व्यक्तीचेसुधारणे आवश्यक असते. देशाच्या विकासासाठी देशातील काही भ्रष्टाचार लोकांनी भारत देशाला चुना लावून विदेशात पळून गेलेत. यामुळे भ्रष्टाचार थांबविण्याची गरज आहे. मदरश्यातील विद्यार्थी हे वाईट गोष्टींपासून दूर राहण्याची शिकवण मिळते. देश बांधवांना मदत करणे व इतरांशी चांगले वागणे, कोणावरही अत्याचार न करणे व कोणाला अत्याचार करू न देणे, जगातील प्रत्येक व्यक्ती एकमेकांचे भाऊ आहेत. कारण जगातील पहिल्या जोडप्यापासूनच (आदम आणि हव्वा)सर्व मानव जातीची वेल वाढत आली आहे अशी महिती मौलाना अब्दुल रऊफ यांनी दिली.यापुढे चंदनझि-याचे मा. नगरसेवक सतिष जाधव (दादा) यांनी आपले मत मांडतांना सांगितले की, प्रत्येक धर्म ही शांततेची शिकवण देते. आपआपसातील संवादाच्या कमतरतेमुळे जो दुरावा निर्माण झाला आहे तो कमी करण्याची गरज आहे. संघटीत होऊन भारताच्या विकासासाठी हातभार लावण्याची गरज आहे.यावेळी डाॕ. भागवत काळे सर,राहूल मुंढे सर, शांतीलालजी राऊत ई. मान्यवराःनी आपले मनोगत व्यक्त केले.शेवटी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक नौशाद उस्मान साहेब यांनी समाजामध्ये सद्भावना जोपासणे हा फार मोठा उद्देश मदरश्याचा आहे. तसेच शांतता समितीत सहभाग घेणे हे इमामचे कार्य असते. खरा अध्यात्मिक मनुष्य हा धर्मसहिष्णु असतो.धर्म प्रचारक व्यक्ती धर्म सहिष्णु असतो. तो दंगली करू शकत नाही. मग तो कोणत्याही धर्माचा प्रचारक असो. पुढे ते म्हणाले की, स्वातंत्र्यासाठी उलमा व्यक्तीनी कठोर परिश्रम घेतले व इंग्रजांकडून त्यांचे मृतदेह झाडांवर लटकविण्यात आले हे मदरश्यातील लोक होते.धर्माला दहशतवादाशी जोडणे अत्यंत चुकीचे आहे. पुढे भाषण करतांना नौशाद साहेब म्हणाले की, मदरशाला दहशतवाद व आंतकवादाशी जोडणे फार चुकीचे आहे.कार्यक्रमासाठी लोकहीत संघटनेचे सय्यद नासेर, बशीर खान,ई.पदाधिका-यांची ऊपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुफ्ती एहसान साहेब, मौलाना अब्दुल रऊफ साहेब, मौलानाअब्दुल अजीम (इत्तेहाद फांऊडेशन), सलीमभाई, शब्बीर पठाण, हाफीज आमेर, सुफियान खानआदींनी परिश्रम घेतले.
दोन हजार रुपये ची लाच घेताना तलाठी अँन्टी करप्शनच्या        जाळ्यात
जालना/ प्रतिनीधी :-  दोन हजार रूपयाची लाच घेताना
तलाठी व एक खासगी ईसम लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात अडकले
याबाबतीत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांनी दिनांक 16.03.2020 रोजी तक्रार दिली की, माझे सासूचे वारसा हक्क नोंद करणेसाठी व 6 क देण्यासाठी कोसगाव सज्जा येथील तलाठी अतुल सर्जेराय बोर्डे यांनी 3,000/-रूपयांची लाचेची मागणी केली. सदर कामासाठी तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना येथे संपर्क साधून तक्रार दिली. सदर तक्रारीयरून आज दिनांक 16.03.2020 रोजी सापळा लावला असता, लोकसेवक यांनी तक्रारदार यांना 3,000/- रुपये लाचेची मागणी केली व तडजोडीअंती2,000/- रुपये स्वीकारण्यास तयार होवून लोकसेयक श्री अतुल सर्जेराय बोर्डे वय 42 वर्ष व्यवसाय नोकरी तलाठी, सज्जाको सगाय ता. भोकरदन रा. वरुड (बु.) ता जाफ्राबाद जि. जालना यांनी त्यांचे सोबतचे खाजगी इसम नामे श्री. विलास सांडुआगळे यांचे हस्ते पंचासमक्ष 2,000/- रुपये लाच स्वीकारली असतांना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालनाप थकाने भोकरदन - जाफ्राबाद रोडवरील तलाठी कार्यालयात माहोरा ता. जाफ्राबाद येथे रंगेहाथ पकडण्यात आले.लोकसेवक श्री अतुल सर्जेराव बोर्डे व संगणक आॕपरेटर श्री विलास सांडु आगळे दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्याबाबत पुढील कार्यवाही चालु आहे.सदरची सापळा कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. अरविंद चावरीया, अपर पोलीस अधिक्षक डॉ. अनिता जमादार,ला.प्र.विभाग औरंगाबाद, पोलीस उप अधिक्षक श्री.रविंद्र डी.निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.संग्राम शिवाजी ताटे, पोलीस निरीक्षक, एस.एस.शेख तसेच कर्मचारी श्री.मनोहर खंडागळे, श्री. अनिल सानप, श्री.आत्माराम डोईफोडे, श्री. ज्ञानेश्वर म्हस्के, श्री.सचिन राऊत, श्री. शिवाजी जमधडे, श्री. कृष्णा देठे, श्री गजानन कांबळे,श्री गणेश चेके, श्री गणेश बुजाडे, श्री जावेद शेख, श्री प्रवीण खंदारे, श्री आरिफ शेख यांनी पार पाडली.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील
              शासकीय शाळा व खाजगी शाळा बंद
जिल्हाधिकारी यांचा आदेश 31 मार्च 2020 पर्यंत असणार बंद
बुलडाणा, प्रतिनिधी : साथरोग अधिनियम 1897 मधील
तरतुदींनुसार कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजनेचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व शासकीय, खाजगी शाळा व अंगणवाड्या तसेच महाविद्यालये यांचे आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था, खाजगी कोचिंग क्लासेस 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. तसेच ग्रामीण भागातील इयत्ता 10 वी, 12 वी च्या परीक्षा विहीत वेळापत्रकानुसार घेण्यात याव्यात. त्याचप्रमाणे आजारी विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणार नाही, यासाठी आवश्यक ती दक्षता व खबरदारी घेण्याच्या सूचना आदेशात देण्यात आल्या आहेत. या आदेशाद्वारे विहीत करण्यात आलेल्या कोणत्याही निर्बंधाची किंवा सदर आदेशाची अवज्ञा करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा संघटना ही भारतीय दंडसंहीता च्या कलम 188 नुसार दंडनीय कारवाईस पात्र असणार आहेत.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून राज्यातील सर्व ग्रामीण भागातील सर्व शासकीय व खाजगी शाळा, अंगणवाड्या तसेच महाविद्यालये यांचे आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था आदी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये निर्गमीत करण्यात आलेली अधिसुचना व नियमावली मधील तरतुदी नुसार सक्षम प्राधिकाऱ्यांचे मान्यतेने 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवणेबाबत सुचीत करण्यात आले आहे, असे जिल्हादंडाधिकारी यांनी आदेशान्वये कळविले आहे.


                          

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...