शनिवार, १५ फेब्रुवारी, २०२०

संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त
मंत्रालयात अभिवादन
मुंबई (प्रतिनिधी) :- संत सेवालाल महाराज यांच्या 281 व्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात  वने, भूकंप व पुनर्वसन मंत्री संजय राठोड यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश गोविंद राठोड, सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव (रवका) श्रीमती अन्शु सिन्हा, अवर सचिव म.की.वाव्हळ,ज.जी.वळवी,यांनी ही संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अभिवादन केल्यानंतर अरदास’ प्रार्थना म्हणण्यात आली.
                  जालना जिल्ह्यातील पाथरूड तांडा येथे
       संत सेवालाल महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

सिंधी काळेगाव (प्रतिनिधी) :- बंजारा समाजाचे आराध्य दैवत राष्ट्रसंत सेवालाल महाराज जयंती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथ्रूड तांडा केंद्र सावंगी 
 तलान येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या वेळी सहशिक्षक सतीश श्रीखंडे,मुख्याध्यापक नारायण माहोरे,अनिल राठोड,श्याम राठोड,बंडू राठोड व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जालना तालुक्यातील सांगितलं येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी.
सिंधीकाळेगाव (प्रतिनिधी) :- जालना तालुक्यातील सावंगी तलान ग्रामपंचायत कार्यालय येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
  यावेळी विद्या विलास रंधवे सरपंच, शाम कळकुंबे ऊपसरपंच, कमलाकर कळकुंबे कृ. ऊ. बा. स. संचालक पि टी. चिंचोले साहेब ग्रामसेवक, तुकाराम राठेड, विनायक राठोड, रामराव खराडे, काशिनाथ राठोड, सखाराम मुळे, किशोर झोरे, प्रभाकर रंधवे, राजु राठोड, राजु बायस, कृष्ना राठोड, नामदेव राठोड, जमीर सय्यद. आदि उपस्थित होते.
     जिल्हाधिकारी जालना कार्यालयात संत.सेवालाल महाराज 
                   यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन.
जालना (प्रतिनिधी) :- दि.15 फेब्रुवारी 2020 रोजी संत.सेवालालमहाराज यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अपर                                          जिल्हाधिकारी रविंद्र परळीकर यांनी प्रमिमेस
   पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, उपविभागीय अधिकारी केशव नेटके, सर्व तहसीलदार याच्या सहप्रशासकीय इमारतीमधील विविध कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.
            संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम 
                शंकरराव पाटील तौर प्राथमिक शाळा 
          कुंभार पिंपळगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा.

कुंभारपिंपळगाव (प्रतिनिधी) :- आज दि.15 फेब्रुवारी 2020 वार शनिवार रोजी शंकरराव पाटील तौर प्राथमिक शाळा, कुंभार पिंपळगाव ता.घनसावंगी जि.जालना येथील शाळेत संत सेवालाल महाराज यांच्या जयंती चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे 
 अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप चव्हाण हे उपस्थित होते.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून निळकंठ खिस्ते हे उपस्थित होते. सर्व प्रथम अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी संत सेवालाल महाराज यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच शाळेतील शिक्षक मोहन अवचार, विष्णु शिंदे, दिपक सांगळे, भगवान साबळे, विजयकुमार काळे, सहदेव वाघमारे,यांनी संत सेवालाल महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांनी संत सेवालाल महाराज यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून महत्त्व पटवून दिले. शेवटी अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाचा समारोप झाला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुं. प्रतिक्षा जाधव व अमृता धुरट यांनी केले तर आभार कु.कोमल आढळकर यांनी मानले.
    प्रायव्हेट मोबाईल रिचार्ज कंपनीने केलेली भरमसाठ दरवाढ                संदर्भात ग्राहक संरक्षण समिती महाराष्ट्राच्या वतीने
                   जिल्हाधिकारी नाशिक यांना निवेदन
नाशिक (प्रतिनिधी) :- प्रायव्हेट मोबाईल रिचार्ज कंपनी केलेली 25 ते 30% भरमसाठ दरवाढ म्हणजे ग्राहकाचे खूप मोठे नुस्कान होत आहे.मोबाईल कंपनी जिओ आयडिया एअरटेल कंपनी वाढलेल्या रिचार्ज जवळपास 30 टक्के वाढ केली आहे या सर्व वाढीचा फटका ग्राहकांना सोसावा लागत आहे. 
 या दरवाढीमुळे ग्राहकांना आर्थिक सुरुवात मोठी मोबाईल कंपनीकडून लूटमार होत आहेत,तरी ग्राहकांची होणारी लूटमार थांबण्यासाठी प्रयत्न करावे.मल्टिप्लेक्स थिएटर याठिकाणी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात लूटमार होत असते या थेटरमध्ये खाण्यापिण्याच्या वस्तू पिण्याची मिनरल वॉटर मनमानी दार लावून ग्राहकांची फसवणूक करत आहे थेटरच्या बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी मिळणेबाबत व तिथे मिळणारे खाद्यपदार्थ दर कमी करण्याबाबत. या मागण्यासंदर्भात श्री दादाभाऊ केदारे राज्य उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयावर नाशिक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनावर श्री. दादाभाऊ केदारे (वरिष्ठ उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य),मा.सौ.स्मिता मुठे(अध्यक्ष विभागीय), मा.प्रसादभाऊ बोडके (अध्यक्ष नाशिक शहर),मा.मोहिनी भगरे (अध्यक्षा नाशिक शहर),मा.कुंदनभाऊ खरे (जिल्हा उपाध्यक्ष) ,मा.श्रीकांत कार्ले(धुळे जिल्हा),मा.मंगला खोटरे (उपाध्यक्ष नाशिक शहर ) मा.वैशाली दराडे (महासचिव)नाशिक शहर आदि उपस्थित होते.
  अंबड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची धुळीच्या    साम्राज्याने अवहेलना
                   अनाधिकृत असल्याच्या कारणावरून 
    महाराजांच्या पुतळा साफसफाईला कायद्याची आडकाठी

अंबड / (प्रतिनिधि): स्वराज्य निर्माण व्हावे यासाठी छत्रपती शिवरायांनी रायरेश्वराला करंगळी कापून रक्ताभिषेक केला मावळ्यासोबत स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि स्वराज्य स्थापनेसाठी संघर्ष सुरू केला तो स्वकीय आणि परकियांसोबत.
छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेले स्वराज्य प्रेरणादायी असुन त्याचे प्रतिक म्हणून संबध देशभर छत्रपती शिवरायांचे अनेक ठिकाणी पुतळे उभे केलेले आहेत.मात्र याच पुतळ्यांचा राजकारणासाठी उपयोग होवु लागल्याने छत्रपती शिवरायांच्या कार्याची अज्ञातपणे अवहेलना सुरू झाल्याचा सुर शिवप्रेमी लोकांतुन समोर येत आहे.अंबड शहरातील पाचोड नाका म्हणजेच शहरात प्रवेश होणाऱ्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज पुर्णाकृती पुतळ्याची जागा होती तिथे अंबड नगर परिषदेने चौथारा निर्माण केला होता आणि याच चौथ-यावर विधानसभा निवडणुकीपुर्वी भाजपचे आमदार नारायण कुचे यांनी दि.12 सप्टेंबर 2019 रोजी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला.पुतळा उभा करण्यास कोणतीही परवानगी नसल्याच्या कारणावरून आ.कुचे यांचेसह 43 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात येवून त्यांना अंबड पोलीसांनी अटक केली होती.(विनापरवानगी पुतळा उभारल्या प्रकरणी आ. नारायण कुचे यांच्यासह ४४ जणांविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात कलम
१४३,१४९,१४७,४४७ तसेच महाराष्ट्र राज्य पुतळ्याचा पावित्र्य भंग प्रतिबंध कलम ११ नुसार गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत)
छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करुन मत मिळवणे हाच काय तो एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून मध्यरात्रीच्या अंधारात पुतळा उभा केला मात्र त्या पुतळ्याची अद्यापपर्यंत विधीवत पुजा आणि मानसन्मान अजुनही झाला नाही.अटकेतुन बाहेर आल्यानंतर सर्व 44 लोकांचा ठिकठिकाणी सत्कार झाले, सुटकेचा आनंद ही मोठमोठ्या तोफा वाजवून पुष्पहार आणि मिठाईने साजरा केला गेला.छत्रपतीचा पुतळा बसवल्यामुळे मतदार संघातील गावागावात सत्कार सोहळे झाले.
पुतळ्यामुळे आ.कुचे हे पुन्हा एकदा विधानसभेत पोहचले
मात्र छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी अद्यापपर्यंत कोणतेही ठोस पाऊल न उचलल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची नियमित साफ सफाई होईना त्यात रस्ता कामामुळे पुतळ्यावर धुळ माती बसल्याने एक प्रकारची अवहेलना सुरू झाली.छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थान ची अस्मिता असतांना त्यांच्या पुतळ्याची साफसफाई करण्यासाठी कायद्याची आडकाठी आल्याने समस्त अंबडकरांतुन संताप व्यक्त केला जात आहे छत्रपती शिवरायांची जयंती काही दिवसांवर येवून ठेपली असुन अंबडचा पुतळा धुळीच्या थराने विद्रुप होत आहे.
बसवलेल्या पुतळ्याची नियमित साफ सफाई झाल्यास आणि त्यावर पाणी पडल्यास तो लवकर खराब होईल या भितीने पुतळ्याची साफसफाई होत नाही अशीही चर्चा दबक्या आवाजात येत असुन पोलीस निरीक्षक अंबड यांनी पुतळ्याबद्दलची खरी माहिती द्यावी अशी सर्वसामान्याकडुन अपेक्षा व्यक्त होत आहे.चार दिवसावर छत्रपती शिवरायांचा जन्मसोहळा येवून ठेपला असुन पुतळ्याच्या रंगरंगोटी तसेच स्वच्छता व विधीवत पुजेकरिता कोणताही निर्णय प्रशासनाकडून न झाल्याने मोठा संताप व्यक्त केल्या जात आहे पुतळा बसवुन पाच महिने झाले मात्र त्या पुतळ्याची विधीवत पुजा कायद्याच्या आडकाठी मुळे करता येवु नये हे अंबडकरांचे दुर्देव आहे. ज्यांनी पुतळा बसवण्यासाठी “रात्रीचा खेळ” केला त्यांनी किमान पुतळ्याच्या मान्यतेसाठी प्रशासकीय पाठपुरावा करावा.जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही मत्स्योदरी देवी मंदिरासमोर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा सूर्योदयानंतर एकाच दिवशी हजारो लोकांच्या साक्षीने तो पुतळा बसवला होता पुतळा बसवण्यापुर्वीच शासनाकडून सर्व मान्यता मिळवल्या होत्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा मंत्री राजेश टोपे यांच्या शुभहस्ते विधीवत पुजे सह स्थापन झाला होता पुढे शिवसेनेचे तत्कालीन आमदार संतोष सांबरे यांनी आपल्या आमदार फंडातून पाच लाख रुपयांचा निधी देवुन पुतळ्याची दगडी भिंत बांधलेली आहे तर मत्स्योदरी देवस्थान नियमितपणे या पुतळ्याची देखभाल आणि साफसफाई करीत असते.
     लालदेव फाटा जि जालना येथे संत श्री सेवालाल महाराज
                 यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.   
जालना  (प्रतिनिधी) :- जालना जिल्ह्यातील लाल लाल देव फाटा पारेगाव तालुका जिल्हा जालना येथे संत श्री सेवालाल महाराज यांची  जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
त्या निमित्त जयंती मध्ये मोठ्या मान्यवरांची उपस्थिती होती. मा श्री रावसाहेब पाटील दानवे (केद्रीय मंत्री भारत सरकार) याच्या अर्तगत निधितुन सेवालाल महाराजांच्या मंदिरा साठी व सभामंडपा साठी 100000 लाख रुपये देण्यात आले आहे.मा.भास्कर (आबा) दानवे पाटील (भाजपा जिल्हा उपाध्यक्ष व नगरसेवक मार्केट का सभापती) याच्या हस्ते निधी देण्यात आले.कार्यक्रमा उपस्थित सरपंच पारेगाव व मा.अविनाश चव्हाण मा. संजय डोगरे (सर्कल प्रमुख) मा.कोल्हे साहेब,मा.डॉ.कळकुंबे, मा. पांडुरंग पोहेकर,मा संजय आडुळे,मा. नारायण जाधव,मा.दत्ता जाधव, मा. शंकर काळे, मा.नारायण मोहीते, मा. अर्जुन मोहिते, मा.तुकाराम राठोड इत्यादी उपस्थित होते.
   कोटपा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.                                                                          डॉ.कासलीवाल

जालना (प्रतिनिधी) :- तंबाखू आणि तंबाखू जन्य पदार्थ च्या सेवनाने युवा पिढी कॅन्सर च्या आहारी जात आहे मौखिक कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे याला आळा घालण्यासाठी कोटपा कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन डॉ आकाश कासलीवाल यांनी केले आहे.
मराठवाडा ग्रामीण विकास संस्था औरंगाबाद क्रांतीसिंह बहुद्देशीय सेवाभावी संस्था,दरेगाव व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या तंबाखू नियंत्रण कक्षाच्या वतीने जालना पोलीस अधीक्षक कार्यालयात कोटपा कायद्याची अंमलबजावणी यावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती यावेळी पावरपाईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून कोटपा कायद्याच्या विविध कलमाची माहिती देण्यात आली यावेळी जालना पोलीस अधीक्षक एस चैतन्य, पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर क्रांतिसिंह बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विष्णू पिवळ तंबाखू नियंत्रण कक्षाचे जिल्हा सल्लागार डॉ संदीप गोरे कार्यक्रम अधिकारी रंगनाथ जोशी गजानन गाडे आदी उपस्थित होते.
संजय काळेना समाजभूषण पुरस्कार  
बजाजनगर /प्रतिनिधी   वाळूज महानगरातील पत्रकार, शिक्षक तथा मूप्टा शिक्षक संघटनेचे विभागीय प्रसिद्धीप्रमुख संजय रामचंद्र काळे यांना शब्दगंध समूह प्रकाशनच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय डाॕ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार १४ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथील मराठवाडा साहित्य परिषद सभागृहात  येथे झालेल्या कवि संमेलनात मराठी सहित्यीक डाॕ.महेश खरात यांच्या हस्ते  वितरीत करण्यात आला.यावेळी शब्दगंध प्रकाशन समूहाचे प्रमुख संदीप त्रिभूवन यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती . यापूर्वी  संजय काळे यांना  मराठवाडा भूषण, सावित्रीबाई फुले पुरस्कार , परिवर्तन रत्न, एकता गौरव , आदर्श पञकार, जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार यासारखे ६२ पुरस्कार मिळाले आहेत .त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अनेकांनी भेटून त्यांचे अभिनंदन केले आहे.

शिवाजी महाराजांच्या एकेरी उल्लेख करून अपमान करणाऱ्या ESIC कामगार राज्य विमा निगम च्या वरिष्ठ अधिकारी गुन्हा दाखल करा अखिल भारतीय क्रांती सेनेच्या वतीने मागणी.

औरंगाबाद (ब्युरो चीफ) :- अवघ्या राष्ट्राचे दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा सन 2020 च्या दिनदर्शिकेत एकेरी उल्लेख करून केंद्र
 सरकारच्या अखत्यारीत असलेल्या E S I C ने अकलेचे तारे तोडले आहेत,हाच का यांचा छत्रपतींचा आशीर्वाद ?महाराष्ट्रातील अनेक लोकप्रतिनिधी  या कमेटीवर सदस्य असतांना ही जखमेवर मीठ चोळणारी चूक होतीच कशी, हे महाराष्ट्रातील लोक प्रतिनिधी काय मीटिंग ला फक्त चहा बिस्कीट खाण्या साठी जातात का ?असा सवाल आज क्रांतिसैनिकांनी ESIC च्या वरिष्ठ अधिकाऱ्याना विचारून चिकलठाणा व वाळूज कार्यालयात प्रदेश सरचिटणीस नितीन देशमुख यांच्या नेतृत्वखाली ठिय्या आंदोलन केले,यावेळी पोलीस आयुक्त श्री चिरंजीवी प्रसाद यांना भेटून गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली.दवाखान्यांमध्ये आमच्या कामगार बंधूंचे काय हाल होतात हे जगजाहीर आहे,दवाखान्याची काय दुरावस्था आहे हे कोणालाही वेगळे सांगायला नको,आणि हे सगळे असताना ,देशाच्या अस्मितेशी ही सरळ सरळ खेळत आहे,या दिनदर्शिकेचे वितरण त्वरित थांबावे ,महाराष्ट्रातील समस्त शिवप्रेमींची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लेखी माफी मागून ,नवीन दिनदर्शिका शिवजयंती पूर्वी छापाव्यात,प्रकाशक,वितरक,मुद्रक यांच्यावर गुन्हे दाखल करून निलंबनाची कार्यवाही करावी,अशी मागणी अखिल भारतीय क्रांतिसेनेच्या वतीने करण्यात आलीआजच्या आंदोलनामध्ये प्रदेश सरचिटणीस नितीन देशमुख, दिनेश दुधाट वाळूज महा अध्यक्ष,मनोहर निकम शहर जिल्हा अध्यक्ष,औदुंबर देवडकर वाळूज युवा अध्यक्ष,भारत फुलारे डावात मचाळा पार्टी, दीपक गायकवाड वाळूज उपाध्यक्ष,राजू शेरे जिल्हा संघटक,संजय कोकाटे मार्गदर्शक,विजय राजगुरू,शरद कदम,गणेश गवली, निलेश जाधव ,राहुल सुरडकर,राहुल अग्रवाल,इत्यादी पदाधिकारी सहभागी झाले होते.


जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल मातंग समाज क्रांती मोर्चा
     सकल मातंग क्रांती मोर्चा मध्ये उलटला अथांग जनसागर

औरंगाबाद (ब्युरो चीफ) :- औरंगाबाद येथे झालेल्या सकल मातंग क्रांती मोर्चा मध्ये उलटला अथांग जनसागर महाराष्ट्रात गेली दोन-ते तीन वर्षापासून सातत्याने मातंग समाजातील महिलांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी आणि मातंग समाजाच्या ज्या प्रमुख मागण्या गेली कित्येक वर्षापासून शासनदरबारी प्रलंबित आहेत त्या मागण्या मान्य करण्यासाठी काल दि १४ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयांवर मातंग समाजाचा सकल मातंग क्रांती मोर्चा धडकला
या मोर्चात संपूर्ण महाराष्ट्रातुन विविध संघटनांच्या प्रमुख नेत्यांसहित पदाधिकारी, कार्यकर्ते समाजबांधव आणि माता-भगिनींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती जिकडे-तिकडे मोर्चेकरांच्या हातातील पिवळे झेंडे आणि महापुरुषांच्या घोषणांनी संपूर्ण शहर दणानून गेले होते उन्हाची परवा न करता तरुणांबरोबरच लहान लेकरांसहित वृद्ध लोकांनी या मोर्चा मध्ये मी आणि माझा समाज म्हणून सहभाग नोंदवला होता.
         क्रांती चौक येथून निघालेल्या या मोर्चाचा समारोप विभागीय आयुक्त कार्यालय याठिकाणी करण्यात आला येथे उपस्थित जनसमुदायाला प्रमुख नेत्यांनी संबोधित केले यांवेळी औरंगाबाद चे खासदार इम्तियाज जलील, लहुजी शक्ती सेनेचे विष्णुभाऊ कसबे, क्रांतीगुरु लहुजी साळवे विकास परिषदेचे उत्तमरावजी कांबळे, समाजाचे नेते संजय ठोकळ, ज्यांच्या पुढाकाराने हा मोर्चा यशस्वी रीतीने संपन्न झाला ते वीर योद्धा लाल्या मांग यांचे नातू प्रभुभाऊ बागुल, अजिंक्य चांदणे, शिर्डी येथील विराट प्रतिष्ठान चे प्रदीप सरोदे, लहुजी टायगर सेनेचे शरद त्रिभुवन, डॉ.शेषराव नाडे, विनोद साबळे, राजु आहिरे, कमलेश चांदणे, कबीरानंद बबनरावजी दाभाडे, राजु खाजेकर आदींनी भाषणे केली यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने मा.विभागीय आयुक्त यांना अन्याय-अत्याचाराला वाचा फोडण्याचे आणि मागण्यांचे लेखी निवेदन देण्यात आले यांवेळी निवेदन देतांना संजय ठोकळ, प्रभुभाऊ बागुल, विनोद साबळे, अजिंक्य चांदणे, प्रदीप सरोदे, संदिप मानकर, डॉ.शेषराव नाडे, डॉ.सचिन साबळे, संदिप चांदणे, सुवर्णा साबळे, राजश्री साठे, ज्योती जाधव आदींची उपस्थिती होती....!!
            ------------------------------- ● ● ----------------------------

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...