*💥व्यापारी प्रतिष्ठाने बंद तर जीवनावश्यक वस्तूंची घरपोच सुविधा असणार सुरू - मुख्याधिकारी वायकोस💥*
चिखली,प्रतिनिधी:- संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे जिल्हा हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे.त्या पार्श्वभूमीवर चिखली नगरपालिकाद्वारा दिनांक १४ एप्रिल ते १६ एप्रिल पर्यंत मेडिकल व दवाखाने वगळता सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉक डाऊन चा कालावधी वाढवल्याने व जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने जिल्हाधिकारी डॉ.सुमन चंद्रा यांच्या आदेशांव्यये शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने पुढील आदेशापावतो बंद राहतील असे मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांनी कळविले आहे. मात्र जीवनावश्यक वस्तूंसाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून उपाय योजना करण्यात आले असून त्यानुसार शहरातील जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारे व्यापारी यांनी आपल्या ग्राहकांना होणारी गैरसोय टाळण्यासाठी त्यांना घरपोच सेवा देण्याचे सांगितलेले आहे.म्हणजे किराणा दुकान,भुसार माल ,दूध,भाजीपाला विक्री सुरू राहणार असून या दुकानदारांनी घरपोच सेवा देणे अनिवार्य करण्यात आले. त्यासाठी ग्राहकांनी आपल्या नेहमीच्या व्यावसायिकाकडे फोन अथवा व्हाट्सएपच्या माध्यमातून आपल्या मालाची नोंदणी करावी, संबधित दुकानदार यांनी तो माल ग्राहकांना घरपोच द्यावा मात्र त्यासाठी दुकानदाराने आपली प्रतिष्ठाने उघडी ठेऊन माल विक्री करू नये अथवा दुकानात गर्दी जमवू नये. तसेच नेमून दिलेल्या भाजी विक्रेत्यांनी सुद्धा आपल्या ग्राहकांना घरपोच सुविधा देने अनिवार्य आहे. कोणत्याही ही परिस्थितीत दुकान उघडून भाजी विक्री करू नये. शासनाने लावून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे सांगितले असून नियमांचे उल्लंनघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे ही स्पष्ट केले. तसेच लवकरच न.प. प्रशासन द्वारे प्रत्येक प्रभागासाठी समनव्यक म्हणून न.प. कर्मचाऱ्याची नेमणूक सुद्धा करण्यात येणार आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी न.प. च्या मदत केंद्राशी संपर्क साधण्याचे मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांनी सांगितले आहे.