रविवार, २३ फेब्रुवारी, २०२०

           क्रांतिगुरूचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा
 बुलढाण्यात संपन्न नारायण माहोरे रामदास आमले व गंगाधर वानोळे पुरस्काराने सन्मानित.

सिंधीकाळेगाव,२१ ( प्रतिनिधी)  :- महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नामवंत व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्याची परंपरा गेल्या दहा वर्षापासून बुलडाण्यातील
क्रांतिगुरू संस्था करीत आहे. यावर्षी नारायण माहोरे,गंगाधर वानोळे व रामदास आमले यांची निवड करून त्यांच्या कार्याची दखल घेतलेली आहे.
      शैक्षणिक व सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर राहून विविध कार्य  केल्याबद्दल गंगाधर वानोळे यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार, रामदास आमले यांना राज्यस्तरीय समाजसेवा गौरव पुरस्कार तर नारायण माहोरे राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
      बुलडाणा जिल्ह्यातील क्रांतिगुरू बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने गुरुवार,दि.२० रोजी बुलडाण्यातील गुंधा येथे पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा प्राचार्य भाऊसाहेब झोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र बोरकर,ल.स.क.म.चे विदर्भ प्रमुख प्रा.ज्ञानदेव मानवतकर, वंजारी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम केंद्रे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सदानंद तेजनकर,लोणार बँकेचे कार्यकारी संचालक शिवप्रसाद सारडा,पंचायत समिती सदस्या हर्षदाताई डव्हळे, मनसेचे तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम पिसे, संचालक हनुमान इंगळे,सुधाकर राऊत,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस समाधान पोफळे, जिल्हा परिषद सदस्य तुळशीराम जाधव,आयोजक शंकरराव मानवतकर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे. सोहळ्याचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशवराव फुके यांनी केले.
 पुरस्कार सोहळ्यास महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील मान्यवरांची व श्रोत्यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविक ज्ञानेश्वर गिलवरकर, संचलन अश्रू फुके तर आभार आयोजक शंकर मानवतकर यांनी मानले.ज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल माजी आमदार डॉ. संतोष टारपे, गटशिक्षणाधिकारी महेंद्र महामुनी,गुरुवर्य डी.एम.राठोड यांच्यासह पत्रकार, लेखक, साहित्यिक, अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संघटना यांच्यासह सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
शेतकऱ्याची फसवणूक आणि महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ  बदनापूर तहसील कार्यालयावर 25 तारखेला धरणे आंदोलन बदनापूर भाजपाचे विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांनी घेतली पत्रकार परिषद केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन
बदनापूर (प्रतिनिधि):- बदनापूर येथील विद्यमान आमदार ना.रायण कुचे नारायण कुचे दिनांक 22 रोजी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की 25 फेब्रुवारी सकाळी11:ते 3:00 यावेळेस या सरकारच्या
  निशा अर्थ धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.ते म्हणाले की जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत त्यांचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी तर्फे मंगळवारी दिनांक 25 फेब्रुवारी 2020 बदनापूर येथे तहसील कार्याल समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
अशी माहिती आमदार नारायण कुचे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 आमदार नारायण कुचे म्हणाले की भाजपाचा विश्वासघात करून राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेने प्रमुखांनी आणि आताच्या मुख्यमंत्र्यांनी तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीची प्रमुख नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अवकाळी  ग्रस्तांना.25000 आणि फळबागासाठी 50 हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती पण महा विकास आघाडी सरकारच्या प्रमुखांना आपल्या आश्वासनाला विसर पडला आहे.सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करू अशा घोषणा करणाऱ्या महाविकास नेत्यांनी या पैकी एकही आश्वासन पाळले नाही महाविकास आघाडी सरकारची कर्जमाफी योजना ही शेतकऱ्यांची सरसकट फसवणूक करणारी आहे महा विकास आघाडी सरकारे शेतकऱ्यांची फक्त अल्प मुदतीचे पीक कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे त्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही दोन लाखावर कर्ज असलेल्या तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांबाबत महा विकास आघाडीच्या कर्जमाफी योजनेत असल्याचा उल्लेख नाही भाजपा सरकारच्या कर्जमाफीत पीक कर्ज तसेच मध्यम मुदतीचे कर्ज समाविष्ट केल्याने पॉलिहाऊस ,शेडनेट, शेती उपकरण,पशुपालन, शेळीपालन,मधमाशीपालन अशा सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता भाजप सरकारच्या व्यापक कर्जमाफी मुळे 43 लाख खातेधारांना 19 हजार कोटीची लाभ देण्यात आला होता.तूर खरेदीची निकष महा विकास आघाडी सरकारने बदलल्यामुळे शेतकऱ्याकडून होणारा खरेदीची प्रमाण खूप कमी काम झाले आहे. शेतकर्‍यांची घोर फसवणूक करणाऱ्या महा विकास आघाडी सरकारचा भारतीय जनता पार्टी निषेध करीत आहे असे आमदार नारायण  कुचे म्हणाले त्यांनी सांगितले की गेल्या महिनाभरात राज्यातील महिला वरील अत्याचाराच्या घटनांमुळे मोठी वाढ झाली आहे.महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना धाक बसविण्याऐवजी महा आघाडी सरकारची मंत्री सत्कार घेण्यात गावोगावी मग्न आहे.हे सरकार सत्तेवर आल्यानंतर गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही हिंगणघाट येथील प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे ॲसिड हल्ला अल्पवयीन मुलीवर अत्याचार बलात्कार महिलांना जाळून टाकणे अशा घटना घडू लागल्यामुळे महिला-तरुणी मुलीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यात अपयशी ठरलेल्या महा विकास आघाडी सरकारचा भाजप तीव्र निषेध करीत आहे  पुढे नारायण कुचे यांनी सांगितले की मंगळवारी होणाऱ्या धरणे आंदोलनात केंद्रीय मंत्री माननीय श्री रावसाहेब पाटील दानवे, माजी मंत्री बबनराव लोणीकर ,भाजपा जिल्हाध्यक्ष संतोष दानवे, बदनापूर विधानसभा आमदार नारायण कुचे, तसेच भाजपा तालुकाध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी ,आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, बाजार समितीच्या संचालक, सरपंच उपसरपंच, शक्ती केंद्रप्रमुख, बुथ प्रमुख ,भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थितीत  धरणे आंदोलन धरणे तहसील कार्यालय येथे  होणार आहेत.
या पत्रकार परिषदेत उपस्थित भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष भुजंग महाराज, तसेच शहराध्यक्ष महेशजी लड्डा, सत्यनारायण गिल्डा ,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष भगवान जी मात्रे ,नगरसेवक बाबासाहेब कऱ्हाळे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडली.

महाराष्ट्रातील आरोग्यसेवकाच्या बळकटीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातून अधिकचा निधी मिळवा -आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची केंद्रीय आरोग्यमंत्री कडे मागणी.

मुंबई, (प्रतिनिधी):- दि.२३: महाराष्ट्रातील आरोग्यसेवेला बळकटी मिळण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून अधिकचा निधी मिळावा, अशी मागणी करतानाच मुंबईतील आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेतील विद्यार्थ्यांनी आरोग्य विभागात इंटर्नशीप करावी. जेणेकरून विविध राष्ट्रीय आरोग्य योजनांच्या सर्वेक्षणात त्यांना सहभागी होता येईल, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी सांगितले.देवनार येथील आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेच्या शैक्षणीक आणि प्रशासकीय इमारतीचा भूमीपुजन सोहळा झाला. त्यावेळी आरोग्यमंत्री टोपे बोलत होते. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन. केंद्रीय सचिव प्रिती सुदान आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या संस्थेच्या इमारतीच्या कामाचे केंद्रीय आरोग्यमंत्री व राज्याचे आरोग्यमंत्री यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले.आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की,  एकमेव अशा या आंतरराष्ट्रीय संस्थेचे संशोधनाचे कार्य अभिनंदनीय आहे.  संस्थेतील विद्यार्थ्यांनी आरोग्य विभागात इंटर्नशीप करण्या करीता आले पाहिजे. आम्ही  त्यांचे स्वागतच करू. आरोग्य विषयक ज्या राष्ट्रीय योजना आहेत त्यांचा नेहमी सर्वे केला जात असतो त्यामध्ये या विद्यार्थ्यांचा सहभाग झाल्यास नक्कीच त्याचा फायदा या योजना चांगल्या पद्धतीने राबविण्यासाठी होऊ शकतो.या संस्थेच्या माध्यमातून राज्यातील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे. संस्थेने केलेल्या संशोधनाचा फायदा त्यांना मिळू शकेल.त्याचबरोबर आरोग्य विषयक योजनांच सामाजिकदृष्ट्या लेखापरिक्षणही करावे, अशी मागणी श्री. टोपे यांनी यावेळी केली.कोरोनाच्या संसर्गापासून देशाला सुरक्षीत ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रभावशाली-केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धनकेंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले, कोरोनाच्या संसर्गापासून देशाला सुरक्षीत ठेवण्यासाठी आपली आरोग्य यंत्रणा प्रभावीपणे काम करीत आहे. सर्वांसाठी आरोग्य या जागतिक आरोग्य संघटनेच्या लक्ष्यपूर्तीसाठी आपला देश प्रयत्नशील आहे. आरोग्य सेवेच्या आपल्या देशाचं हे मॉडेल अन्य देशांकडूनही राबविले जाईल, असेह त्यांनी यावेळी सांगितले. बाळंतपणा दरम्यान एकाही महिलेचा मृत्यू होऊ नये आणि देशातील अकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये याध्येयाने काम केले जात आहे. या आंतरराष्ट्रीय संस्तेतील तरूण विद्यार्थ्यांनी संशोधनातून नविन योजना आरोग्य क्षेत्रात पुढे आणाव्यात असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 
         सावता परिषदेच्या जालना युवक जिल्हाध्यक्षपदी 
          संदीप मगर पाटील यांची तिसऱ्यांदा फेरनिवड

सिंधीकाळेगाव/प्रतिनिधी:-दि २०/०२/२०२० रोजी सावता परिषदेची विभागीय,जिल्हा कार्यकारी जाहीर करण्यात आली,समाज कार्यासाठी समाज संघटन हे ब्रीद घेऊन सावता परिषद मागील तेरा वर्षांपासून महाराष्ट्रभरात मोठ्या ताकदीने सक्रिय आहे.
  सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मा.कल्याणराव आखाडे यांच्या नेतृत्वाखाली संदिप मगर पाटील हे मागील नऊ वर्षांपासून संघटनेत प्रभावीपणे एकनिष्ठ राहून कार्य करत आहेत,मागील काही दिवसांपूर्वी त्यांची संघटनेच्या प्रदेश संयोजन समितीच्या सदस्य पदी देखील निवड झालेली आहे,संदिप सुधाकर मगर पाटील हे राममूर्ती ता.जालना येथील रहिवासी असून ते शिवराय,फुले,शाहू,आंबेडकरांच्या विचारांचे पाईक आहेत.संघटनेमध्ये कार्य करत असताना अनेक युवकांना त्यांनी संघटनेत सामील करून घेतले,तसेच विविध उपक्रम असो,महापुरुषांचे जयंती उत्सव असो,अथवा समाजउपयोगी कामे अत्यंत प्रभावीपणे करत असतात,त्यांच्या या समाज कार्याची तळमळ व कार्याची दखल घेत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या आदेशानुसार सावता परिषदेचे प्रदेश महासचिव यांनी पत्रकाद्वारे सदरील नियुक्ती जाहीर केली.
या नियुक्ती बद्दल संदिप मगर पाटील यांचे जिल्हाभरातून सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...