शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२०

जळगाव चे पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांना राष्ट्रपती पदक प्रदान झाल्याबद्दल जाहीर सत्कार.
जळगाव ( प्रतिनिधी ) :- गुणवत्तापूर्ण सेवेसाठी " डॉ .श्री.पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक जळगावयांना राष्ट्रपती
पोलीस पदक ( PM )  प्रदान  प्राप्त झाल्याने जळगाव जिल्हयातील राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्ष - सामाजिक न्याय विभाग जळगाव व राष्ट्रवादी महिला शहर अध्यक्ष यांचे कडुन  -  डॉ.श्री.पंजाबराव उगले यांचा सत्कार सोहळा संपन्न.याबाबत सविस्तर माहिती अशी पोलीस अधीक्षक श्री.डॉ . पंजाबराव उगले यांना १५ ऑगस्ट २०१८ या वर्षी शासनाकडुन गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक (PM) ( मा.राष्ट्रपती ,भारत सरकार यांचे कडुन जाहिर ) जाहिर करण्यात आले होते.माननिय राज्यपाल महोदयांच्या हस्ते  पदक प्रधान करण्याबाबतचा 'अलंकरण समारंभ ' सोहळा मंगळवार दिनांक :- १८ / ०२ / २०२० रोजी महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय, कुलाबा, मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमात पोलीस अधीक्षक श्री.डॉ.पंजाबराव उगले यांना सन्मानिय राज्यपाल श्री.भगतसिंह कोश्यारी , महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते गुणवत्तापूर्ण सेवेसाठीचे पोलीस पदक (PM) प्रधान करण्यात आले होते.
त्या अनुषंगाने आज मा .पोलीस अधीक्षक  जळगाव यांच्या दालनात जळगाव जिल्हयातील राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्ष - सामाजिक न्याय  विभाग जळगाव - कल्पना गरीबदास अहिरे , राष्ट्रवादी महिला शहर अध्यक्ष - ममताताई सोनवणे , उपाध्यक्ष - सुवर्णा  हेमकांत पवार , सरचिटणीस  -शिल्पा बाविस्कर ,उपाध्यक्ष - सुमनताई बनसोडे , उपाध्यक्ष - मनीषा देशमुख , मिनाक्षी पाटील , सुवर्णा सोनवणे यांचे हस्ते डॉ.श्री.पंजाबराव उगले यांचा सत्कार करण्यात आला .
मराठी भाषा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे
            जालनादि. 27 - जागतिकीकरणाच्या आजच्या युगात इंग्रजी भाषेचा प्रभाव वाढत आहेअशामध्ये अनेक प्रादेशिक भाषा हरवत चालल्या आहेतमराठी भाषा बोली भाषेतलिखाणातश्राव्य साहित्याच्या स्वरुपात टिकवणे आवश्यक आहेमराठी भाषा टिकावी आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहचावी यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांनी केले.
          
  जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन व विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री हजारे बोलत होते
यावेळी माहिती सहाय्यक अमोल महाजनतांत्रिक सहाय्यक ज्ञानेश्वर पैठणेशंकर पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            श्री हजारे म्हणालेदरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज  यांचा जन्मदिवस हा 'मराठी भाषा गौरव दिनम्हणून साजरा केला जातोया माध्यमातुन मराठी भाषा टिकावी आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहचावी यासाठी प्रयत्न केले जातातशालेय स्तरापासून प्रशासकीय स्तरावर विविध स्पर्धाकार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतेबदलत्या काळानुसार भाषेवर भौगोलिक,राजकीयसंस्कृतिक बदलाचे परिणाम होतातमराठी भाषेवरही ते होत आहेतत्यामुळे ते स्वीकारत भाषा टिकवली तरच ती पुढच्या पिढीपर्यंत ती पोहचू शकते असे सांगत मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.  
            माहिती सहाय्यक श्री महाजन म्हणाले भारत देशातील प्रमुख भाषांपैकी मराठी एक भाषा आहेमहाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये मराठी ही अधिकृत राजभाषा म्हणून ओळखली जातेमहाराष्ट्र शासनासोबतच अनेक मराठी भाषा प्रेमींकडून 27 फेब्रुवारी दिवशी 'मराठी राजभाषा दिनाचंऔचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करत मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध उपायमोहिमा राबवल्या जात असल्याचे सांगत प्रत्येकांने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            सर्वप्रथम मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे फित कापुन उदघाटन करण्यात आलेतसेच विष्णू वामन शिरवाडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आलीयावेळी उपस्थितांना मराठी भाषेची प्रतिज्ञा देण्यात आली.
        कार्यक्रमास नागरिक तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
           पालकमंत्री राजेश टोपे यांचा जालना जिल्हा दौरा

जालना, प्रतिनिधी :- राज्याचे  आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री राजेश टोपे  यांचा जालना जिल्हा दौरा
पुढीलप्रमाणे आहे.शनिवार दि. 29 फेब्रुवारी 2020 रोजी  सकाळी 5.30 वाजता देवगिरी एक्सप्रेसने जालना येथे आगमन व अंजिक्य बंगला येथे राखीव सकाळी 10.00 वाजता जालना येथुन अंकुशनगर ता.अंबडकडे प्रयाण, सकाळी 11.00 वाजता अंकुश नगर येथे आगमन व नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (पोखरा) बाबत बैठक ( स्थळ- कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना अंकुशनगर) दुपारी 1.00 वाजता कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना येथुन सोयीनुसार प्रयाण व मुक्काम. 

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...