शनिवार, ६ जून, २०२०

जिल्ह्यात अकरा व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह तर सात रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज - जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती



जालना,प्रतिनिधी :- जिल्हा सामान्य रुग्णालयातुन   चांदई एक्को ता. भोकरदन येथील तीन, पेवा ता. मंठा येथील एक, शहरातील जुना जालना परिसरातील एका खाजगी दवाखान्यातील एक कर्मचारी व कर्मचा-याच्या निकट सहवाशीतातील एक, खापरदेव हिवरा ता. घनसावंगी येथील एक असे एकुण सात कोरोनाबाधित रुग्णांवर यशस्वी उपचार करुन व त्या सर्वांच्या दुस-या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच दि. 6  जुन 2020 रोजी  अकरा व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे. पॉझिटिव्ह सापडलेल्या व्यक्तींमध्ये जालना शहरातील पंचमुखी हनुमान मंदिर मोदीखाना परीसरातील पाच, मोदीखाना येथील एक, क्रांतीनगर येथील एक, नानसी ता. मंठा दोन व आकणी ता. मंठा येथील दोन, अशा एकुण 11 व्यक्तींचा समावेश आहे.मुंबई येथुन परतीलेली व मुळची पांगरी ता. घनसावंगी येथील रहिवाशी असलेल्या 60 वर्षीय महिलेस दि. 29 मे 2020 रोजी ताप, सर्दी व श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दि. 31 मे 2020 रोजी अत्यावस्थ परिस्थितीत आय. सी. यु. मध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी त्या महिलेल्या स्वॅबची तपासणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. संबंधीत महिलेला उच्च रक्तदाब, मधुमेह हे आजार देखील होते.  या  महिलेवर उपचार सुरु असतांनाच तिचा दि. 6 जुन 2020 रोजी पहाटे 2 वाजुन 40 मि. मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.* जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण -2910 असुन सध्या रुग्णालयात -68 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती -1144, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या - 88 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या -3098, एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने – 11 ,असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -185, एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या -2812, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-372, एकुण प्रलंबित नमुने -97, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1072,14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती – 10, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती – 962, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -79, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -505, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत–17,  सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 68, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती -80, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-07, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या -88,  सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या- 92 (+ एक रेफर औरंगाबाद), पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 5940 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 04 एवढी आहे. 
कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 505  व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास होस्टेल जालना-15,डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेल, जालना-25,  मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह -30, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-32, पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना -212, कस्तुरबा गांधी बालिका वसतीगृह परतुर  -37, हिंदुस्थान मंगल कार्यालय,जाफ्राबाद-08, जिजाऊ इंग्लिश स्कुल, जाफ्राबाद- 01, राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कुल, टेंभुर्णी, जाफ्राबाद-00 डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, अंबड -15 शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-15, डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, घनसावंगी येथे –48, अल्पसंख्यांक गर्ल्स होस्टेल, घनसावंगी -12, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल इमारत क्र.2-02, मॉडेल स्कुल मंठा-43, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -12 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 159 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन 757 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 819 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली   3 लाख 10 हजार 230 असा एकुण 3 लाख 37  हजार  38 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
*शेतकऱ्यांना ची अडवणूक करणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेवर कार्यवाही करा-दत्ता पाटील सुरुंग*
*हॅलो रिपोर्टर न्युज*
परतूर प्रतिनिधी/इम्रान कुरेशी
पंतप्रधान किसान सन्मान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना पैसे न देता ताळाताळ करीत असून जिल्हा मध्यवर्ती बँकेवर
कार्यवाही करण्या बाबत,निवेदन शिवसेना शहर प्रमुख दत्ता पाटील सुरुंग यांनी जिल्हाधिकारी जालना यांना दिले आहे,निवेदनात म्हटले असे की मागील सहा ते सात महिन्या पासून मध्यवर्ती बँकेच्या मुख्य शाखा जालना येथे शेतकऱ्यांचे पंतप्रधान किसाण सन्मान योजने अंतर्गत निधी जमा झालेली आहे,जिल्ह्यातील मध्यवर्ती च्या ईतर शाखेमध्ये आतापर्यंत पैसे वर्ग व्ह्याला पाहिजे होते, परंतु अधिकाऱ्याच्या आडमुठ्या धोरणा मुळे असे झाले नाही म्हणून जिल्ह्यातील ईतर शाखेतही पैसे नाही, यामुळे शेतकरी नाहक त्रास गेल्या,कितिक दिवसा पासून बँकेत चकरा मारत आहेत त्यांना बँकेत उडवा उडविचे उत्तरे मिळत असून शेतकरी मोठया मानसिक तणावाखाली जीवन जगत आहेत, कोरोना संख्या संसर्गजन्य कोरोना रोगामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाले असून हवाल दिल झाला आहे, तसेच परतूर शहारामध्ये सीसीआय चे  एकच सध्या कापूस खरेदी केंद्र चालू असून खरेदी केंद्र वाढविने जरुरीचे झाले आहे, जर खरेदी केंद्र वाढविले नाही तर शेतकऱ्यांचा कापूस घरीच राहील आणि मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याशिवाय राहणार नाही गेल्या दोन ते तीन महिन्यापासून लॉक डाऊनमुळे संपूर्ण व्यवहार बंद असल्यामुळे उदरनिर्वाहप्रश्न निर्माण झाला आहे, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपण च न्याय द्यावा अशी शेवटी निवेदनात शिवसेना शहर प्रमुख दत्ता पाटील सुरुंग यांनी विनंती केली आहे.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...