मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२०

             शहरी महानेट प्रकल्पाचा अप्पर जिल्हाधिकारी 
                  रवींद्र परळीकर यांच्या हस्ते शुभारंभ
जालना (प्रतिनिधी):- दि.24 -सध्या इंटरनेटचा वापर प्रत्येक कामकाजात आवश्यक झाला आहे .शासकीय कार्यालयासह सर्वानाच आता ऑनलाईन  कामकाजामुळे इंटरनेट शिवाय पान  हालत नाही. त्यामुळे इंटरनेट सुविधा असणे आणि ती विनाव्यत्यय  सुरु राहणे हे अत्यंत गरजेचे झाले आहे . त्यासाठी शासनाने  शहरी महानेट प्रकल्प  सुरु केला असून या शहरी महानेट  प्रकल्पचा शुभारंभ अप्पर
 जिल्हाधिकारी रविंद्र परळीकर यांच्या हस्ते नुकताच तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आला .यावेळी तहसिलदार श्रीकांत भुजबळ, नायब तहसिलदार श्री.राजमाने, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक आण्णासहेब वाघमारे,मंडळ अधिकारी श्री.भोरे, वरिष्ठ नेटवर्क अभियंता अंकुश तुपेकर, सागर खैरनार, रिलांस जिओचे देवेंद्र कुलकर्णी, रुपेश गुप्ता यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील महत्वाचे शासकिय विभाग त्यांच्या अखत्यारित असलेले 203 शासकिय कार्यालये,शाळा, शासकिय विभाग इ. ठिकाणी ऐकमेकांना जोडली जाणार आहेत.नव्याने निर्माण करण्यात आलेल्या फायबर ऑप्टिक इंटरनेट सुविधे अंतर्गत त्या त्या ठिकाणी  उच्च गतीने सेवा देण्यात येणार आहे.   यावेळी जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक अण्णासाहेब वाघमारे यांनी योजनेचे फायदे तसेच सामान्यांसाठी होणा-या लाभाची माहीती दिली. शासकीय कार्यालये,शाळा वस्तीगृहे यांना मोफत व अल्प दरात जोडणी देण्यात येणार आसल्याचेही त्यांना शेवटी सांगितले. दुर्गम भागातील तालुक्याला देखील याचा लाभ मिळणार आसल्याने अप्पर  जिल्हाधिकारी  श्री. परळीकर  यांनी समाधान व्यक्त केले.या उपक्रमा अंतर्गत जिल्हातील शासकिय कार्यालयामध्ये ई-गव्हर्नस, आरोग्य सेवा, शिक्षण, ई-डेटा  उपक्रमांना गती देउन त्यांचा दर्जा सुधारणार आहे. नागरिकांना मिळणा-या दाखलांचे कामकाजही गतीशील होणार असल्याने समस्या निकाली निघणार आहे.इंटरनेट वापराचे महत्व वाढल्याने या शहरी महानेट प्रकल्पाचा लाभ शासकिय कार्यालयांना होणार आहे या प्रकल्पामुळे इंटरनेटची सेवेची गती वाढणार असुन यामुळे शासकिय कार्यालयातील कामकाजाला गती मिळणार आहे.
स्वा.सै.स्व.धाकलेश्वर करनाडे यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन
जालना/प्रतिनिधी :- येथील माजी आमदार दलितमित्र स्वातंत्र्य सैनिक स्व. धाकलेश्वर (दादा) मक्काजी करनाडे यांच्या १६ व्या पुण्यतिथी निमित्त रहेमान गंज वासीयांतर्फे अभिवादन करण्यात आले. यावेळी स्व. करनाडे यांच्या प्रतिमेस राहुल करनाडे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी त्यांच्या जीवन कार्याविषयी खलील पहेलवान यांनी विचार मांडले. तसेच उपस्थितांचे अकबर बादशाह व शे. सिद्दीक यांनी आभार मानले. या कार्यक्रमास चुन्नु रफीक, ईश्वर सिंग, राहुल करनाडे, शेख परवेज, शेख जफर यांच्यासह रहेमानगंजवासीयांची मोठ्या संख्येेने उपस्थिती होती.
माजी आमदार दलितमित्र स्वातंत्र्य सैनिक स्व. धाकलेश्वर (दादा) मक्काजी करनाडे यांच्या १६ व्या पुण्यतिथी निमित्त रहेमान गंज वासीयांतर्फे अभिवादन करण्यात आले. यावेळी खलील पहेलवान, अकबर बादशाह, शे. सिद्दीक, चुन्नु रफीक, ईश्वर सिंग, राहुल करनाडे, शेख परवेज, शेख जफर यांची उपस्थिती होती.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...