रविवार, ५ एप्रिल, २०२०

               आपत्कालीन परिस्थितीत काम करणा-या 
                       कर्मचा-यांना बिस्कीट पुडे वाटप
जालना, प्रतिनिधी - कोरोना विषाणुच संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागु करण्यात
पण आहे. याबाबत राज्याचे आरोग्य व कुटुंबकल्याण  तथा पालकमंत्री  राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली दि. 29 मार्च 2020  रोजी जिल्हाधिकारी कार्यालया जालना येथे बैठक घेण्यात आली होती. त्यांच्या सुचनेनुसार सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत काम करणारे अधिकारी, कर्मचारी यांना ब्रिटानिया बिस्कीट प्रा. लिमीटेड कंमनी, मुंबई यांच्याकडुन एकुण 40 हजार 104 बिस्किट पुडे प्राप्त झाले असून अत्यावश्यक सेवा देणा-या  कार्यालयांना बिस्किटांचे  पुढीप्रमाणे वाटप करण्यात आले. पोलीस विभाग जालना  1000 बिस्किट पुडे, आरोग्य विभाग जिल्हा परिषद जालना 1000 बिस्किट पुडे, जिल्हा शल्य चिकित्सक जालना 5000 बिस्किट पुडे,  नगर परिषद जालना 5000 बिस्किट पुडे, इंडस प्रकल्प जालना 5000 बिस्किट पुडे, आपत्ती कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय जालना 5 हजार 104 बिस्किट पुडे अशाप्रमाणे  बिस्किट पुड्यांचे  वाटप करण्यात आलेले आहे असे जिल्हा पुरवठा अधिकारी जालना यांनी कळविले.
   शहागड येथील 26 नागरिक खबरदारीची  उपाययोजना म्हणुन            सामान्य रुग्णालय  जालना येथे तपासणीसाठी भरती.
जालना, प्रतिनिधी – निलंगा शहरात आढळलेल्या 8 कोरोना बाधीत व्यक्ती यांच्या प्रवास इतिहासात 
त्यांनी जालना जिल्ह्यामध्ये दि.5 एप्रिल 2020 रोजी 29  रुग्ण नव्याने दाखल झाले आहे आतापर्यंत एकुण 147 रुग्ण विलगीकरण कक्षात  दाखल होते. त्यापैकी 176 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले असुन त्यापैकी 140 रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले असुन ते निगेटिव्ह आले आहेत व 3 नमुने रिजेक्ट असुन 33 नमुन्यांची अहवाल प्रलंबित आहे.आज रोजी 70 रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल असुन 70 रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. सदर रुग्णाचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला असुन त्याचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे.रुग्णालयातुन डिस्चार्ज झालेल्या तसेच परदेशी प्रवासाचा पुर्व इतिहास असणा-या सर्व व्यक्तींचे घरी अलगीकरण करण्यात आलेले आहे. आजपर्यंत एकुण 128 परदेश प्रवास केलेले व्यक्तींपैकी 121 व्यक्तींचे घरीच अलगीकरण करण्यात आलेले आहे. तसेच इतर  शहरे व राज्यातुन आलेल्या 15 हजार 842 व्यक्तींचे तपासणी अंती घरीच अलगीकरण करण्यात आले आहे.संस्थेत अलगीकरण केलेल्या सहवाशितांची (Contact) संख्या 124 असून संत रामदास मुलांचे शासकीय वसतीगृह येथे 47, बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहामध्ये 39, मुलींचे शासकीय वसतीगृह येथे 38 जणांना दाखल करण्यात आलेले आहे. कोरोना विषाणुचा (कोव्हीड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि.13 मार्च 2020 पासुन लागु करण्यात आलेला असून त्याअनुषंगाने शासन निर्देशानुसार दि. 1 मार्च 2020 नंतर परदेश प्रवासावरुन आलेल्या नागरीकांची आरोग्य तपासणी  व आवश्यकतेनुसार अलगलीकरण किंवा विलगीकरण करणे अत्यावश्यक आहे. तरी सर्व नागरीकांनी परदेशात प्रवास केल्याची माहिती प्रशासनास देऊन स्वत:ची व आपल्या कुटुंबियांची तपासणी सामान्य रुग्णालय, जालना येथे करुन घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शहागड येथे चहा पाणी करण्यासाठी थांबल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या शहागड येथील 26 नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणुन सामान्य रुग्णालय जालना येथे तपासणीसाठी आणण्यात आले असून त्यांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. या सर्व 26 व्यक्तींना जिल्हा सामान्य  रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

 लॉकडाऊनमुळे तीन महिन्यांचे लाईटबिल शासनाने माफ करावे -                                                केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई, प्रतिनिधी - लोकडाऊनमुळे सर्व  गरिबांचे तीन महिन्यांचे लाईटबील शासनाने माफ करावे; 
सर्व बिल माफ करता येत नसेल तर किमान 50 टक्के वीजबिलाची रक्कम माफ करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली आहे. 50 टक्के वीजबिल माफ करण्यासाठी  त्यातील अर्धी वीज बिलाची रक्कम म्हणजे 25 टक्के बिल वीज कंपनी ने माफ करावे तसेच पुढील 4 महिने  थकबाकीमुळे कोणाचाही विजमिटर कापू नये अशी सूचना ना रामदास आठवले यांनी विजकंपन्यांना केली आहे. मुंबई उपनगर येथे अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनी ने 18 टक्के वीजबिल माफ केले आहे मात्र आणखी वीजबिल माफ करण्याचे आपण त्यांना आवाहन केले असल्याची माहिती ना रामदास आठवले यांनी केली आहे. मुंबई शहरात वीज पुरवठा बेस्ट करीत असून मुंबई महापालिके ने स्थायी समिती मध्ये याबाबत ठराव करून 3 महिने वीजबिल किमान 50 टक्के माफ करण्यासाठी निर्णय घ्यावा असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले आहे. वीजबिल माफ करण्यासोबत कोरोना ची चाचणी मोफत करावी किंवा अल्प दरात करण्यात यावी .सध्या कोरोना चाचणी साठी 5 हजारापर्यंत दर आकारले जात आहेत. त्या ऐवजी मोफत किंवा  रु.500 एव्हढया अल्पदरात कोरोना चाचणी करावी अशी आपली मागणी असून याबाबत लवकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार असल्याचे ना रामदास आठवले यांनी सांगितले आहे. रुग्णालयातील डॉक्टरप्रमाणे नर्स यांनाही कोरोना चे  किट उपलब्ध करून दिले पाहिजे. पुरेश्या सुविधा नर्सेस ला ही दिल्या पाहिजेत. तसेच खाजगी डॉक्टरांनी दवाखाने बंद करू नयेत. कोरोना ला घाबरुन जर खाजगी डॉक्टर घरी बसले तर कोरोनाशी लढा कसा जिंकणार? असा सवाल ना रामदास आठवले यांनी केला असून खाजगी डॉक्टरांनी दवाखाने सुरू कारण्याचे आवाहन ना रामदास आठवले  यांनी केले आहे.
रिपब्लिकन कार्यकर्ते विविध ठिकाणी मदत करीत आहेत त्यांनी रक्तदान करण्यासाठी ही पुढे आले पाहिजे असे आवाहन ना रामदास आठवले यांनी आज केले.

                
         कोरोना अलर्ट :  जिल्ह्यात आज प्राप्त 10 रिपोर्ट ‘निगेटीव्ह’
               संस्थात्मक विलगीकरणात 14 नागरिकांची वाढ
                       अलगीकरणात 5 संशयीत दाखल
बुलडाणा, प्रतिनिधी :  जिल्ह्यातून शेगांव, खामगांव व बुलडाणा आयसोलेशन (अलगीकरण) कक्षात
दाखल संशयीत व्यक्तींचे तसेच संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या संशयीत 17 व्यक्तींचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तसेच कालपर्यंत 16 संशयीतांचे नमुने पाठविण्यात आले आहे. अशाप्रकारे 33 संशयीत नागरिकांचे नमुने कोरोना तपासणीसाठी पाठविले. त्यापैकी आज 10 नमुन्यांचे रिपोर्ट प्रात्प झाले असून ते निगेटीव्ह आहेत.  जिल्ह्यात दिल्ली येथील कार्यक्रमातून परतलेल्या 17 व त्यांच्या संपर्कात आलेल्या 13 संशयीत व्यक्तींच्या  नमुन्यांचाही यामध्ये समावेश आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी दिली आहे. 
घरामध्ये विलगीकरण करण्यात आलेल्या  नागरिकांमध्ये आज  भर पडली नाही. त्यामुळे क्वारंटाईनच्या संख्येत आज वाढ नाही. काल दि. 3 एप्रिल 2020 पर्यंत 76 भारतीय नागरिकांना  त्यांच्या घरीच स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली (होम क्वारंटाईन) ठेवण्यात आले होते. गृह विलीगकरणातील नागरिकांची आज मुक्तता करण्यात आली नाही. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 76 नागरिक ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यात  संस्थात्मक विलगिकरणात आज 14  व्यक्तींना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. संस्थात्मक विलागिकरणातून आज मुक्तता करण्यात आलेली नाही. संस्थात्मक विलगीकरणात आज एकूण 36 नागरिक आहेत.
जिल्ह्यात आज बुलडाणा आयसोलेशन (अलगीकरण) कक्षात 2, शेगांव 2 व खामगांव येथे 1 संशयीत म्हणून दाखल करण्यात आले आहे. अशाप्रकारे 5 संशयीतांना दाखल करून त्यांचे स्वॅब नमुने  प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. आयसोलेशन (अलगीकरण) कक्षात सध्या 17 व्यक्ती दाखल आहेत. त्यामध्ये खामगाव 4, शेगांव 4 व बुलडाणा 9 व्यक्तींचा समावेश आहे.  घरीच स्वतंत्र खोलीत 14 दिवस निरीक्षण कालावधी पूर्ण केलेल्या आजपर्यंत 48 नागरिकांची निरीक्षणातून मुक्तता करण्यात आली. तसेच संस्थात्मक विलगीकरनातून 14 दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर  आजपर्यंत 61 नागरिकांना निरीक्षणातून घरी सोडण्यात आले. तसेच सध्या जिल्ह्यातील 17 नागरिक आयसोलेशन कक्षात दाखल आहेत. अलगीकरणातून आजपर्यंत 18 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली असून यामध्ये बुलडाणा येथील 11 व खामगांव येथील 7 व्यक्तींचा समावेश आहे.
  आतापर्यंत प्रयोगशाळेत जिल्ह्यातून एकूण 86 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी 63 नमुन्यांचे रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 5 पॉझीटीव्ह व  58  निगेटीव्ह रिपोर्ट  आले आहेत.  तसेच 23 नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सांगळे यांनी दिली आहे.                                    

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...