शनिवार, २० जून, २०२०

झूम ॲप वापरताना सावध राहा : ‘महाराष्ट्र सायबर’चे नागरिकांना आवाहन.


मुंबई,ब्युरोचीफ :- सध्या अनेकजण घरुन काम (Work From Home) करत आहेत.ऑनलाईन मिटिंगसाठी वापरायला सोपे असल्याने झूम (zoom) या सॉफ्टवेअरचा जास्त प्रमाणात उपयोग होत आहे.सायबर भामट्यांनी झूम ॲप सदृश काही मालवेअर (malware) व खोटी ॲप बनवली आहेत. त्यामुळे हे ॲप वापरताना सावधानता बाळगणे आवश्यक आहे, असे आवाहन ‘महाराष्ट्र सायबर’ने केले आहे.   आपल्या सहकाऱ्यांबरोबरच्या ऑनलाईन मिटिंगसाठी झूम, मायक्रोसॉफ्ट मीटिंग, स्काईप, सिस्को वेबेक्स (zoom ,microsoft meetings ,skype ,cisco webex) आदी सॉफ्टवेअर आणि ॲप्स वापरली जात आहेत. झूम त्यामध्ये वापरायला सोपे असल्याने  या सॉफ्टवेअरचा जास्त प्रमाणात उपयोग होत आहे .सायबर भामट्यांनी बनविलेली झूम ॲप सदृश काही मालवेअर जर डाऊनलोड केली, तर तुमच्या सर्व मिटिंग रेकॉर्ड होतील व तुमची सर्व माहिती त्यांना मिळू शकते व तुमच्या मोबाईल किंवा संगणकाचा ताबादेखील हे सायबर भामटे घेऊ शकतात . ‘महाराष्ट्र सायबर’ने सर्व नागरिकांना विशेष करून झूम ॲप वापरणाऱ्यांना  हे ॲप वापरताना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.झूम ॲप हे अधिकृत वेबसाईट किंवा प्लेस्टोअरवरूनच डाउनलोड करावे. शक्यतो कुठलीही गोपनीय माहिती अशा मिटिंगमध्ये बोलणे टाळावे किंवा संबंधित लोकांशी थेट बोलूनच त्यांना ही माहिती द्यावी . मिटिंग ॲडमिनने मिटिंगचे आयडी व पासवर्ड हे शक्यतो संबंधित व्यक्तींनाच थेट कळवावेत. तसेच सदर पासवर्ड हा थोडा क्लिष्ट ठेवावा जेणेकरून एखाद्या दुसऱ्या व्यक्तीस तो समजण्यास कठीण जाईल. तसेच संबंधित मिटिंग ॲडमिन /होस्टने फक्त मिटिंगच्या विषयाच्या संबंधित व्यक्तींचीच लॉगिन रिक्वेस्ट स्वीकारावी.

पुढील बाबी लक्षात ठेवा

तुम्ही जर मीटिंग होस्ट असाल तर पुढील बाबी लक्षात ठेवणे गरजेचे आहे

१) तुम्हाला जो रँडम मिटींग आयडी व पासवर्ड मिळेल त्याचाच  शक्यतो वापर करा, तुमचा कुठलाही आयडी किंवा पासवर्ड वापरू नका .

२) तुम्ही मिटींग सेटिंग अशा प्रकारे बदल करा की तुमच्याशिवाय मिटींग मधील अन्य कोणीही व्यक्ती ती रेकॉर्ड करू शकणार नाही .

३) मिटींग मध्ये सर्व अपेक्षित व्यक्तींनी लॉगिन केल्यावर सदर मिटींग लॉक करा जेणेकरून अन्य कोणी व्यक्ती त्यात अनाहूतपणे लॉगिन करू शकणार नाही .

४) मिटिंग सेटिंग अशी करा की तुमच्या आधी व तुमच्या परवानगीशिवाय कोणी त्यात लॉगिन करू शकणार नाही.

५)तुम्ही जर काही कारणाने मिटींग सोडून जात असाल किंवा  मिटिंग संपली असेल तर लीव्ह मिटींग चा  पर्याय न वापरता एंड मिटींगचा पर्याय वापरा .

६) मिटिंगची लिंक आयडी व पासवर्ड ओपन फोरमवर शेअर करू नका .


कॉग्रेस पक्ष नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर - आ. गोरंट्याल

जिल्हा कॉग्रेस कमिटीच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न.

जालना (प्रतिनिधी) :- जालना जिल्हा व शहर कॉग्रेस कमिटच्या वतीने शुक्रवारी रोजी कॉग्रेस पक्षाचे नेते खा. राहुल गांधी यांच्या जन्मवाढदिवसा निमित्त रक्तदान शिबीराचे उद्धघाटन आणि अन्न पाकीट वाटप आ. कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते करण्यात आले. श्री स्वामी समर्थ ब्लड बँक जालना येथे शुक्रवार रोजी दुपारी 2 वाजता रक्तदान शिबीर आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलतांना अ. कैलास गोरंट्याल म्हणाले की, कॉग्रेस पक्षाचा बलीदानाचा इतिहास आहे. देशाची अंखडता आणि राष्ट्रीय एकत्माता मंजबुत करण्यासाठी कॉग्रेस पक्षाने देशाला धर्म निरपेक्ष विचार देवुन देशाची राज्यघटना आबाधीत ठेवण्यासाठी प्रयत्नाची पराकष्टा केली आहे. खा. राहुल गांधी यांच्या जन्मवाढदिवसाच्या निमित्त रक्तदान करुन कार्यकर्त्यानी भारतीय राज्य घटना देशात कायम टिकवीण्यासाठी ही एक रक्तदानातुन शपथ आहे. कॉग्रेस कार्यकर्ते समाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असतात हे आजच्या या रक्तदान शिबीरातुन उघड झाले आहे. असे ही आ. कैलास गोरंट्याल यांनी यावेळी सांगीतले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक शहर कॉग्रेस कमिटचे अध्यक्ष शेख महेमुद यांनी केले. याप्रसंगी जिल्हा कॉग्रेस कमिटचे कार्याध्यक्ष राजेंद राख, प्रदेश सचिव विजय कामड, सत्सग मुंढे, बदर चाऊस, दिनकर घेवदे, आनंद लोंखडे, डॉ.विशाल धानुरे, एकबाल कुरेशी, तालुक्याध्यक्ष वसंत जाधव, विठ्ठल सिंह राना, नगर सेवक विनोद रत्नपारखे, संदीप खरात, अरुन मगरे, शेख शकील, राजू पवार, गणेश चौधरी, दिलीप मोरे, विठ्ठल बापू डोंगरे, नासेर बेग, शहेनाज शेख, सय्यद निजाम, शिवराज जाधव, गणेश भालेराव, चंद्रकात रत्नपारखे, विजय लहाने, अरुण घडलिंग, संदीप वाघ, अंकुश गायकवाड आदी कायकर्ते उपस्थित होते.
यावेळी या रक्तदान शिबीरामध्ये कॉग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्योनी रक्तदान केले. रक्तदान शिबीरा नंतर गरजुना अन्नाचे पाकीटवाटप करण्यात आले. श्री स्वामी ब्लड बँकेचे प्रकाश भागे, आंनद घाडगे, अनिकेत पाखरे, फ्रान्कीक कांबळे आदी कर्मचारी रक्तदान शिबीरामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचलान गणेश चौधरी यांनी तर तालुक्यध्यक्ष वसंत जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.


वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी पिडीत पाईकराव यांना दिली भेट                      


जालना,ब्युरोचीफ :- मच्छींद्रनाथ चिंचवली ता.घनसावंगी येथील तुळसिराम पाईकराव यांना गावगुंडांनी जातीय भावनेतून दोन हात निकामी होई पर्यंत जबर मारहाण  केल्या प्रकरणी दिनांक 20 जून रोजी जालना येथील शासकीय रुग्णालयात  वंचित बहुजनआघाडीचे पदाधिकारी  भिमराव दळे, दीपक डोके, विष्णु शेळके,बि.के.कारके,गनेश खरात, अँड.कैलास रत्नपारखे, सचिन कांबळे, कैलास रत्नपारखे,राज रत्नपारखे यांच्यासह भेट दिली व वंचित बहुजन आघाडी पिडीत पाईकराव यांना न्याय मिळावा यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे भिमराव दळे," यांनी यावेळी सांगितले".

मागासवर्गीयांवरील हल्ले,कधी होणार कारवाई, वंचितच्यावतीने आंदोलनला सुरवात



मुंबई,ब्युरोचीफ :- राज्यातील मागासवर्गीयांवरील वाढते हल्ले पाहता प्रशासनाने अद्यापही ठोस पावले उचललेली नाहीत, राज्यभर निवेदने देऊन तीन दिवस झाले, मात्र कारवाई व योग्य तपासाला सुरुवात न झाल्याने वंचित बहुजन आघाडी अनुशक्तीनगर विभागाच्यावतीने उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन जाब विचारण्यात आला. मागासवर्गीयांनवरील हल्ले वाढत असून योग्य ती कारवाई केली जात नसल्याचा आरोप वंचित बहुजन आघडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आरोपींना पाठीशी घालण्यात येत असून व योग्य ती कारवाई होत नसल्याने राज्यभर तीव्र आंदोलन करीत सरकार विरोधात निवेदन देण्यात आले होते. असे असतानाही अद्याप कारवाईला सुरुवात न झाल्याने किमान तशी घोषणाही न केल्याने वंचितच्यावतीने जाब विचारो आंदोलन करण्यात आले. अनुशक्तीनगर विभागाचे अनिल वाकोडे, सुरेश वाघमारे,सुनीता डोळस, मकरंद कांबळे, कविता, दगडू साळवे,भाऊसाहेब जाधव, राणी अब्दुल्ले या कार्यकर्त्यानी उपजिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन सरकारला जाब विचारला आहे. धर्मवादी, जातीयवादी असलेले हे सरकार जोपर्यंत निःपक्षपातीपणे कारवाई करायला सुरुवात करीत नाही, तोपर्यंत राज्यभर आंदोलन करून सरकारला जाब विचारला जाईल,असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला दिला होता. त्यानुसार राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. 

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...