मंगळवार, १९ मे, २०२०

*लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातील मार्गदर्शक सूचना जारी*
● राज्यात आता फक्त दोन झोन
● रेड झोन वगळता दुसऱ्या झोनमध्ये काही निर्बंध शिथिल

मुंबई,ब्युरोचीफ :- कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातील मार्गदर्शक सूचना आज शासनाने जाहीर केल्या असून त्यामध्ये रेड झोन आणि नॉन रेड झोन असे दोन भाग केले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेसह मुंबई महानगर प्रदेश परिसरातील सर्व महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला आणि अमरावती या महापालिकांचे क्षेत्र ‘रेड झोन’ म्हणून जाहीर करण्यात आले आहेत तर त्याव्यरिक्त उर्वरित भाग हा ‘नॉन रेड झोन’ म्हणून घोषित केला आहे. पावसाळ्यापूर्वीची कामे, देखभाल, निगा आणि दुरुस्तीसाठी ‘रेड झोन’मध्ये दुकाने, मॉल, आस्थापना, उद्योग येथे सकाळी ९ ते सायंकाळी पाचपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून या ठिकाणी कुठलेही वाणिज्यिक व्यवहार केले जाणार नाहीत. मात्र ‘नॉन रेड झोन’मध्ये बाजारपेठा, दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी पाचपर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.  जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.  या मार्गदर्शक सूचनांव्यतिरिक कुठल्याही जिल्हा अथवा महापालिका प्रशासनाला मुख्य सचिवांच्या मान्यतेशिवाय स्वतंत्र आदेश काढता येणार नाहीत. आज जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना दि. २२ मे पासून राज्यात लागू होणार आहेत.
*लॉकडाऊन ४.० मध्ये खालील बाबींना कायमस्वरूपी बंदी असेल-*

● आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विमानवाहतूक यांना बंदी. तथापि वैद्यकीय सेवा तसेच अपवादात्मक परिस्थितील हवाई ॲम्बुलन्स सेवा आणि इतर आवश्यकता वाटल्यास वैदयकीय सेवांना परवानगी असेल.
● मेट्रो सेवा पूर्णपणे बंद.
● शाळा, महाविद्यालये, शिक्षण संस्था, प्रशिक्षण देणाऱ्या संस्था विविध वर्ग (क्लासेस) यांना बंदी. ऑनलाईन/ ई- लर्निंग शिक्षणाला उत्तेजन देण्यात येईल.
● ज्या हॉटेलमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी/ पोलीस/ शासकीय अधिकारी/ आरोग्य कर्मचारी/ काही कारणास्तव अडकली आहेत अशांसाठी तसेच यात्रेकरू आणि अलगीकरण व्यवस्था यांच्यासाठी सुरू राहतील. त्याशिवाय ठराविक बस डेपो, रेल्वे स्थानके आणि  एअरपोर्ट येथील कॅन्टीन व्यवस्था सुरू राहील. याव्यतिरिक्त बाकी सर्व उपहारगृहे आणि हॉटेल्स बंद राहतील. मात्र उपाहारगृहातील घरपोच व्यवस्था सुरु राहील.
● सर्व चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल्स, व्यायामशाळा, क्रीडा संकुल, तरणतलाव, करमणूक संकुले, नाट्यगृहे, बार आणि ऑडिटोरियम, हॉल यांना पूर्पपणे बंदी.
● सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक सण आणि कार्यक्रम आयोजित करण्यावर बंदी.
● सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे यांना बंदी. धार्मिक कारणासाठी एकत्र येण्यावर बंदी.
● कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी निर्धारित केलेल्या राष्ट्रीय मार्गदर्शक सूचना व तरतुदी राज्यभरात कायम राहतील.

*रात्रीची संचारबंदी*

● अत्यावश्यक सेवा वगळता रात्री 7 ते सकाळी 7 वाजता या दरम्यान संचारबंदी असेल. स्थानिक प्रशासन यासंदर्भात सीआरपीसीचे कलम 144  आणि इतर नियमांनुसार आदेश जारी करुन याची कडक अंमलबजावणी करेल.
ज्येष्ठ नागरिक, बालकांची सुरक्षा
● 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि 10  वर्षाखालील मुले यांनी अत्यावश्यक किंवा वैद्यकीय  कारण वगळता घरातच थांबणे आवश्यक आहे.

*भारत सरकारचे निकष, उपलब्ध आरोग्य सुविधा आणि इतर आवश्यक घटक लक्षात घेऊन राज्यातील बाधित क्षेत्र पुढीलप्रमाणे सुनिश्चित करण्यात येत आहे-*
*रेड झोन्स –* मुंबई महापालिकेसह एमएमआर क्षेत्रातील सर्व महापालिका. पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला आणि अमरावती महापालिका.
*रेड झोन नसलेले क्षेत्र (ऑरेंज आणि ग्रीन झोन) –* राज्यातील उर्वरित क्षेत्र

*कंटेनमेंट झोन्स –*
● केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन संबंधीत महापालिका किंवा जिल्हा प्रशासन हे त्यांच्या भागातील रेड झोन, नॉन रेड झोन तसेच कंटेनमेंट झोन निश्चित करतील. महापालिका क्षेत्रात आयुक्त आणि जिल्ह्याच्या उर्वरित भागात जिल्हाधिकारी यांना कंटेनमेंट झोन निश्चित करण्याचे अधिकार देण्यात येत आहेत. निवासी कॉलनी, मोहल्ला, झोपडपट्टी, इमारत, इमारतींचा समूह, गल्ली, वॉर्ड, पोलीस ठाण्याचे क्षेत्र, गाव किंवा गावांचा छोटा समूह असे कंटेनमेंट झोनचे क्षेत्र असू शकेल. यापेक्षा मोठे क्षेत्र (संपूर्ण तालुका किंवा संपूर्ण महापालिका क्षेत्र इत्यादी) कंटेनमेंट झोन म्हणून मुख्य सचिवांशी सल्लामसलत करुन जाहीर करता येऊ शकेल. कंटेनमेंट झोन क्षेत्रात फक्त अत्यावश्यक बाबींसंदर्भातील कार्याला परवानगी देण्यात येत आहे. वैद्यकीय कारण आणि अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा वगळता अन्य कोणत्याही कारणासाठी या क्षेत्रात लोकांना बाहेर जाण्या-येण्यास पूर्णत:  प्रतिबंध करण्यात येत आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शिकेतील सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

*रेड झोनमध्ये पुढील कामे सुरु राहतील-*
● या आधी  अत्यावश्यक सेवेची जी दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती, ती दुकाने पूर्ववत सुरु राहतील.
● या आदेशाच्या आधी दिलेले निर्देश आणि शिथिलतेचे निकष लक्षात घेऊन व महापालिकेच्या धोरणानुसार अत्यावश्यक सेवा नसणारी दुकाने पूर्ववत सुरु राहतील. परवानगी असल्यास मद्य विक्रीची दुकाने सुरु राहतील.
● या आधी मॉल, उद्योग, दुकाने, प्रतिष्ठाने सुरु ठेवण्याची परवानगी नव्हती.ती आता देण्यात आली आहे. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत या कालावधीत यंत्रसामग्री, फर्निचरची दुरुस्ती, देखभाल, निगा राखणे, पावसाळ्यापूर्वीची कामे या सर्व ठिकाणी करता येतील. मात्र याशिवाय कोणतीही (वाणिज्यिक) कामे  करता येणार नाहीत. उत्पादन सुरु करता येणार नाही.
● अत्यावश्यक  आणि अत्यावश्यक नसलेल्या वस्तू आणि साहित्यासाठी ई-कॉमर्स प्रणालीचा वापर करता येईल.
● या  आधी ज्या औद्योगिक घटकांना  सुरु करण्याची परवानगी दिली होती, ते औद्योगिक घटक सुरु राहतील.
● ज्या खाजगी व शासकीय बांधकामांना सुरु करण्याची परवानगी देण्यात आली होती, ती सुरू राहतील. पावसाळ्यापूर्वीची सर्व शासकीय व खाजगी बांधकामे करण्याची परवानगी देण्यात येत आहे.
● टॅक्सी, कॅब  आणि समूहाची वाहतूक करणारी साधने (ॲग्रेगेटर), रिक्षा यांना परवानगी नाही. अत्यावश्यक कामासाठी एक आणि त्याशिवाय फक्त दोन अशा व्यक्तींच्या वाहतुकीसाठी चारचाकी वाहनास परवानगी असेल. फक्त एकट्यालाच अत्यावश्यक कामासाठी दुचाकी वापरता येईल.
● अत्यावश्यक सेवेच्या कामासाठी येणारे कर्मचारी (आरोग्य आणि वैद्यकीय, कोषागारे, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, अन्न व नागरी पुरवठा, महापालिका सेवा, एनआयसी, एफसीआय ), त्यांच्या आवश्यकतेनुसार कार्यरत राहतील. संचालनालये आणि आयुक्तालयांसह सर्व शासकीय कार्यालये (उपनिबंधक/ प्रादेशिक परिवहन कार्यालये, उप प्रादेशिक परिवहन कार्यालये सुरु राहतील. अशैक्षणिक कार्यासाठी उपयोगात येणारे विद्यापीठीय आणि महाविद्यालयांचे कर्मचारी, पेपर तपासणी, मूल्यमापन,निकाल आणि ई-कंटेट (आशय) ची निर्मिती करणारे कर्मचारी कार्यालयात येऊ शकतील. मात्र एकूण मनुष्यबळाच्या ५ टक्के किंवा किमान १० व्यक्ती (जी संख्या अधिक असेल ती.) या प्रमाणातच अशा कर्मचाऱ्यांची उपस्थिती कार्यालयात राहणे आवश्यक राहील.केंद्र सरकारची कार्यालये ठरवून दिलेल्या निकषानुसार सुरु राहतील.)
● होम डिलिव्हरी (घरपोच सेवा ) करणारी उपहारगृहे आणि स्वयंपाकगृहे सुरु राहतील.
● या आधी जी कामे सुरु करण्याची परवानगी देण्यात आली होती, ती सुरु राहतील. मात्र सर्व खाजगी कार्यालये बंद राहतील.

*आरोग्य सेतू ॲपचा वापर*

● आरोग्य सेतू ॲप हे कोरोना संसर्गाच्या संभाव्य जोखमीची लवकर ओळख करण्यास मदत करते. हा ॲप  व्यक्ती आणि समुदायासाठी ढाल म्हणून कार्य करतो.
● कार्यालये आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता ठेवण्याच्या दृष्टीकोनातून  मोबाइल फोन असलेल्या सर्व कर्मचार्‍यांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड  केले आहे, याची कार्यालय प्रमुखांनी खात्री करावी.  
● नागरिकांनी त्यांच्या मोबाइल फोनवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करावे व त्यांच्या आरोग्य स्थितीची माहिती त्यावर अद्यावत ठेवावी असा सल्ला जिल्हा प्रशासन देऊ शकते. आजाराचा धोका असलेल्या व्यक्तिला या ॲपमुळे वेळेवर वैद्यकीय सेवा मिळण्यास मदत होईल.

*विशिष्ट प्रकरणांमध्ये व्यक्ती आणि वस्तू/ मालाची वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी निर्देश-*
● सर्व यंत्रणांनी डॉक्टर्स, परिचारिका आणि  वैद्यकीय कर्मचारी,  स्वच्छता कर्मचारी आणि रुग्णवाहिकांना कोणत्याही प्रकारच्या निर्बंधाशिवाय राज्यातल्या राज्यात आणि एका राज्यातून दुसऱ्या राज्यात  जाण्यासाठी परवानगी द्यावी.
● सर्व प्रकारच्या जीवनावश्यक  वस्तूंची वाहतूक व , मालवाहतूक करणाऱ्या  आणि रिकाम्या ट्रक यांना राज्यातल्या राज्यात  येण्या - जाण्यास सर्व यंत्रणांनी परवानगी द्यावी.
● शेजारील देशांसोबत जे करार करण्यात आले आहेत त्या अंतर्गत होणाऱ्या कोणत्याही वस्तू किंवा माल-वाहतुकीस आपल्या सीमेवर प्रतिबंध करण्याचा अधिकार  कोणत्याही यंत्रणेला नसेल.

*रेड झोन व्यतिरिक्तचे क्षेत्र*
● या आदेशाच्या अनुच्छेद ४ मध्ये समाविष्ट बाबी वगळता तसेच स्पष्टपणे प्रतिबंधित किंवा बंदी घातलेल्या बाबी वगळता अन्य सर्व बाबींना खालील अटींच्या अधीन राहून परवानगी असेल.
● परवानगी असलेल्या बाबी करण्यासाठी कोणत्याही शासकीय प्राधिकाऱ्याकडून अनुमती, मंजुरी घेण्याची आवश्यकता नाही.
● क्रीडा संकुल, खेळाचे मैदान आणि अन्य सार्वजनिक खुल्या जागा या व्यक्तिगत व्यायामासाठी खुल्या राहतील; तथापि, प्रेक्षक आणि समूह व्यायामप्रकार किंवा खेळ आदींना अनुमती नसेल. सर्व शारीरिक व्यायाम इत्यादी हे योग्य शारीरिक अंतराचे (सोशल/ फिजिकल डिस्टंसिंग) नियम पाळून करता येतील.
_*सर्व सार्वजनिक आणि वैयक्तिक वाहतुकीचे व्यवस्थापन खालीलप्रमाणे करावे:*_ 
दुचाकी वाहने : १ चालक (रायडर)/ तीनचाकी वाहन : १ अधिक २/ चारचाकी वाहन : १ अधिक
● जिल्ह्याअंतर्गत बस वाहतूक ही आसनक्षमतेच्या कमाल ५० टक्के क्षमतेनुसार चालविण्यास परवानगी राहील. तथापि, बसमध्ये योग्य शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन होण्यासह बसचे निर्जंतुकीकरण (सॅनिटायजेशन) करणे आवश्यक राहील.
● आंतरजिल्हा बस सेवेच्या अनुषंगाने वेगळे आदेश निर्गमित करण्यात येतील.
● सर्व दुकाने (मार्केट/शॉप्स) सकाळी ९ वा. ते सायं. ५ वा. या कालावधीत चालू ठेवता येतील. कुठेही गर्दी किंवा योग्य शारीरिक अंतराच्या नियमांचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास अशी दुकाने तात्काळ बंद करण्याचे आदेश प्राधिकृत अधिकाऱ्यांकडून देण्यात येतील.
● कंटेनमेंट झोनमध्ये आरोग्य विषयक प्रोटोकॉल मागील आदेशाप्रमाणेच लागू राहील. या मार्गदर्शक सूचनांव्यतिरिक अन्य कुठलीही सूचना, आदेश  जिल्हा, विभागीय, राज्य प्राधिकरणाला मुख्य सचिवांच्या मान्यतेशिवाय काढता येणार नाहीत. कुठल्याही व्यक्तींकडून या आदेशातील सूचनांचे उलल्ंघन झाल्यास त्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ५१ ते ६० नुार कारवाई केली जाईल. त्यासोबतच कलम भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ नुसार कायदेशीर कारवाईस पात्र राहील. तसेच अन्य कायदेशीर कारवाई देखील केली जाईल.

अपघातग्रस्त रुग्णांची पालकमंत्र्यांकडून विचारपूस.


यवतमाळ,ब्युरोचीफ :- आर्णी तालुक्यातील कोळवण येथे आज (दि.19) पहाटे साधरणत: 3.30 ते 4 वाजताच्या दरम्यान बस आणि टिप्परचा अपघात झाला. यात चार जण ठार तर 28 जण जखमी झाले. जखमींना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन अपघातग्रस्त रुग्णांनी भेट घेतली.तुम्ही कुठे राहता, सोलापूरला कामाकर‍िता केव्हा गेले होते. तुमचा परिवार कुठे राहतो, आदी बाबींची पालकमंत्र्यांनी अतिशय आस्थेने विचारपूस केली. तसेच सर्वांना येथून बरे करूनच पाठवू. तुम्ही चिंता करू नका. येथील प्रशासन तुमची काळजी घेईल. तसेच बरे झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या राज्यात रेल्वेने पाठविण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी किरकोळ जखमींना भरती केलेल्या वॉर्डात तसेच गंभीर जखमी असलेल्या अतिदक्षता वॉर्डात जाऊन अपघातग्रस्त रुग्णांची पाहणी केली. याप्रसंगी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर.पी.सिंह, विभागप्रमुख डॉ. मिलिंद कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी बावीस्कर आदी उपस्थित होते.आर्णी जवळ बस आणि टिप्परचा अपघात : सोलापूरवरून नागपूर येथे स्थलांतरीत मजुरांना घेऊन जाणारी बस, टिप्परला धडकल्याने झालेल्या अपघातात चार जण ठार झाले. मृतकांमध्ये सोलापूर येथील बस चालकाचासह दोन महिला छत्तीसगड आणि एक जण झारखंड येथील आहे.यवतमाळ जिल्ह्यातील आर्णि तालुक्यात कोळवण येथे आज (दि.19) पहाटे साधरणत: 3.30 ते 4 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. या बसमध्ये दोन चालक व 30 प्रवासी असे एकूण 32 जण होते. यात झारखंडचे 19 जण, छत्तीसगडचे 8 आणि मध्यप्रदेशच्या 3 जणांचा समावेश होता. अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले असून 22 जण किरकोळ जखमी आहेत. सर्व जखमींना यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.मृत झालेल्या व्यक्तिंचा मृतदेह रुग्णवाहिकेने पाठविण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली असून जखमींची पूर्ण काळजी, त्यांचा औषधोपचाराकरीता जिल्हा प्रशासन मदत करणार आहे. जखमी नागरिक बरे झाल्यानंतर त्यांना आपापल्या जिल्ह्यात सोडण्याची व्यवस्था सुध्दा प्रशासनाकडून करण्यात येईल, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी कळविले आहे.

खडकेश्‍वर व ताडहादगांव बृहत लघु तलावातून अवैध पाणी उपसा थांबेना लॉकडाऊनमध्ये पुंडलिक हरिश्‍चंद्रे यांचे औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयसमोर 27 मे पासून उपोषण.


जालना/प्रतिनिधी :- अंबड तालुक्यातील खडकेश्‍वर व ताडहादगांव बृहत लघु तलावातून शेतीसाठी सुरू असलेला अवैध पाणी उपसा थांबवावा, अन्यथा विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबादसमोर 27 मे पासून अमरण उपोषण करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ता पुंडलिक विश्‍वनाथ हरिश्‍चंद्रे यांनी दिला आहे.याबाबत विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद व जिल्हाधिकारी जालना यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, सध्या खडकेश्‍वर व ताडहादगांव बृहत लघु तलावात अत्यल्प पाणीसाठा आहे. यावर गावातील पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. आगामी काळात धरणातील उपलब्ध पाणीसाठा केवळ पिण्यासाठी वापरला जावा, यादृष्टीने नियोजन हवे. या धरणातून होत असलेल्या पाणीचोरीबाबत औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी जालना, तहसिल कार्यालय अंबड, पाटबंधारे उपविभाग अंबड यांना वेळोवेळी निवेदन दिले होते. उपोषण केली. मात्र, कारवाई केली जात नव्हती. ’पिण्यासाठी धरणातील पाणीसाठा राखीव ठेवण्याची आवश्यकता असताना दिवसरात्र विद्युत मोटारी वारेमाप पाणी उपसा करीत आहे. अशीच पाणी चोरी सुरू राहिली तर हे पाणी 15 दिवसात संपण्याची शक्यता आहे. सध्या कडक उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. धरणात अत्यल्प जलसाठा आहे. पाटबंधारे विभागाने वेळोवेळी गांभीर्याने कारवाई करणे गरजेचे आहे. अन्यथा गावासह इतर गावांना भीषण पाणीटंचाईला समोरा जावे लागणार आहे,’ असे निवेदनात म्हटले आहे.पाणी चोरी रोखण्यात अपयश खडकेश्‍वर व ताडहादगांव बृहत लघु तलावातून पाणी चोरी रोखण्यात पाटबंधारे विभागाला अपयश आल्याचे दिसत आहे. केवळ कागदोपत्री घोडे नाचवल्याने पाणीचोरी रोखली जाणार नाही, तर त्यासाठी ठोस कारवाई करावी अशी मागणीही हरिश्‍चंद्रे यांनी केली आहे.*

पीककर्जासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी


                   जिल्हा प्रशासनाचे आवाहन.


   जालना,प्रतिनिधी : - खरीप हंगाम 2020- 21 करीता जिल्ह्यामध्ये बँकांतर्फे पिक कर्ज वाटप सुरु आहे. जागतिक महामारी कोवीड – 19 विषाणु संसर्गाच्या पार्श्वभुमीवर शासनाकडुन देशपातळीवर संचारबंदी घोषीत करण्यात आलेली आहे. कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने कोविड -19 या आजाराचा  प्रसार होऊ नये, यासाठी होणा-या गर्दीचे नियमन करण्यासाठी जालना जिल्ह्यातील पिक कर्जासाठी इच्छुक शेतक-यांनी                                            https://forms.gle/2T19Tth3uQFe5CgS9 या संकेतस्थळावरील, गुगल लिंकवरील ऑनलाईन अर्ज भरुन पीक कर्ज मागणी नोंदणी  दि. 20 मे 2020 ते 31 मे 2020 या दरम्यान करावी. सदरची लिंक Jalna.nic.in या संकेत स्थळावर उपलब्ध असुन या लिंकद्वारे नोंदणी केलेल्या शेतक-यांची यादी जिल्हा अग्रणी बँक शाखेकडून पीक कर्ज घेण्यास पात्र  असणा-या शेतक-यांना लघुसंदेश (SMS) पाठविण्यात येणार आहे. बँकेमार्फत लघुसंदेश (SMS) प्राप्त झालेल्या शेतक-यांनी बँकेने दिलेल्या तारखेस त्यांचे आधारकार्ड 7/12,  8 – अ, फेरफार नक्कल, पॅनकार्ड, टोचनकाशा, पासपोर्ट साईज -2 फोटो, पासबुक या कागदपत्रासह बँकेत उपस्थित राहावे. अंतिम पीक कर्ज मंजुरी किंवा नामंजुरी बँकेच्या नियमाप्रमाणे करण्यात येईल. तसेच सर्व राष्ट्रीयकृत, ग्रामीण व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व जिल्हा समन्वयकांनी  व शाखाधिकारी यांनी नोंदणी केलेल्या शेतक-यांची यादी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांचेकडून प्राप्त करुन घ्यावी. त्याअनुषंगाने  पीक कर्ज घेण्यास  इच्छुक शेतक-यांनी वरील दिलेल्या संकेतस्थळावर, गुगल लिंकवरील फॉर्म भरुन पीक कर्ज मागणी नोंदणी करुन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नुतनवाडी ता.जालना येथील 11 वर्षीय मुलाच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

              जिल्हा शल्यचिकित्सकांची माहिती



जालना,प्रतिनिधी :- मुंबईवरुन परतलेले नुतनवाडी ता. जालना येथील रहिवासी असलेले 11 वर्षीय मुलगा व त्याची 16 वर्षीय बहीण नुतनवाडी ता. जालना येथे दि. 16 मे 2020 रोजी आले होते. या दोघांपैकी 11 वर्षीय मुलाला दि. 17 मे 2020 रोजी ताप येत असल्यामुळे त्याला व खबरदारीची बाब म्हणुन त्याच्या बहिणीलाही जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या दोघांपैकी 11 वर्षीय मुलाच्या स्वॅबचा अहवाल दि. 18 मे 2020 रोजी प्रयोगशाळेकडुन पॉझिटीव्ह प्राप्त झाला तर त्या मुलाच्या 16 वर्षीय बहीणीचा अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाला असुन या मुलाच्या संपर्कात आलेल्या हायरिस्क सहवाशीतातील एकुण 10 व्यक्तींच्या स्वॅब घेण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

            जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. जालना यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका आरोग्य अधिकारी, जालना व वैद्यकीय अधिकारी पिरपिंपळगाव यांनी दोन टिमच्या साह्याने नुतनवाडी येथील एकुण 57 कुटुंबातील 278 लोकांचे आरोग्य सर्वेक्षणाचे काम सुरु केले आहे.

            जिल्ह्यात एकुण 1837 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 40 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 897 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 65 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या 1527 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने -01 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 36 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 1421, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 259, एकुण प्रलंबित नमुने -66 तर एकुण 857 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.

14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या -17, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 765 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या-46, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -557, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-13, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या -40, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या -31, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 1176 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे. 

            आजपर्यंत जालना जिल्ह्यात इतर राज्यातुन 179 व राज्याच्या इतर जिल्ह्यातुन 6622 असे एकुण–6801 नागरीक दाखल झाले आहेत. या सर्वाना 14 दिवस होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातुन आजपर्यंत उत्तरप्रदेश–2727, मध्यप्रदेश -777, बिहार 160, तेलंगणा- 27, राजस्थान-167, झारखंड – 30, आंध्रप्रदेश -103, ओरिसा – 113, छत्तीसगड- 10, हैद्राबाद-05 असे एकुण – 4119 नागरीकांना परराज्यात पाठविण्यात आले आहे.

             कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 557 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास होस्टेल जालना-34, डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेल, जालना-17,  मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह-6, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-22,पोलीस प्रशिक्षण केंद्र-115 मॉडेल स्कुल, अंबा रोड, परतुर-00, हिंदुस्थान मंगल कार्यालय,जाफ्राबाद-04, जिजाऊ इंग्लिश स्कुल, जाफ्राबाद-46, राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कुल, टेंभुर्णी, जाफ्राबाद -103, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, अंबड -32, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-12, डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, घनसावंगी येथे – 41, अल्पसंख्यांक गर्ल्स होस्टेल, घनसावंगी-35, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन इमारत क्र. 1-60,डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टे क्र.2 भोकरदन-00, मॉडेल स्कुल मंठा-30 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.

            लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 595 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 108 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 587 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 2 लाख 90 हजार 100 असा एकुण         316908 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.  

कोरोनामुळे उस्मानपूरच्या शेतकऱ्यांनी उपटली ''फुलांची बाग


परतुर,प्रतिनिधी :- दुष्काळाने संकटात असलेला परतूर तालुक्यातील शेतकरी आता कोरोनाच्या या संकटामुळे पुरता उध्वस्त होत असताना पाहायला मिळत आहे .लॉकडाउनमुळे बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे परतूर तालुक्यातील उस्मानपूर या  गावचे  सतिश दत्ता राऊत या शेतकऱ्याने आपल्या शेतातील एक एकरची गुलाब,झेंडू दीड एकर फुलांची बाग उपटून टाकली आहे.दीड ते दोन लाख रुपये खर्च करून सतिश राऊत  यांनी आपल्या दीड एकर शेतात झेंडूची बाग लावली होती.तर एक एकर क्षेत्रात गुलाबाची बाग लावली होती सध्या या गुलाब व झेंडूला फुले आली आहेत. दोन ते तीन दिवसांत ही फुले तोडून बाजारात विकली नाहीत तर ती खराब होणार होती. मात्र, बाजार पेठच उपलब्ध नसल्याने त्यांनी आपली जवळपास एक हेक्टरची बाग उपटून टाकली आहे. या बागेतून त्यांना तीन ते चार लाखांचे उत्पन्न अपेक्षित होत

लग्नसराई मध्ये या वर्षी फुलांची मागणी पाहता फुले शेतात लावली होती मात्र कोरोना या विषाणूजन्य व्हायरसमुळे मेहनत घेऊन पिकविलेला फुलांचा बाग नष्ट करावा लागला यामुळे लावले खर्चही निघाला नाही म्हणून तेल गेले तूपही गेले........अशी वेळ माझ्यावर आली असल्याची प्रतिक्रिया शेतकरी यांनी दिली पुढे त्यांनी सांगितले की शासनाने मदत करावी अशी मागणी शेतकरी सतिश राऊत यांनी केली

*विलगीकरण कक्षातील सहा व्यक्तींना पुष्प वर्षाव तर टाळ्यांच्या गडगडात सुट्टी*


एका कुटुंबातील सहा जणांना अहवाल निगेटिव्ह

अंबड/अरविंद शिरगोळे* : घनसावंगी रोड वरील समाज कल्याण विभागाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलींचे वस्तीग्रह विलगीकरण साक्षात व्काँरंटाईन सहा व्यक्तींना सोमवारी दिनांक 18 मे रोजी दुपारी सुट्टी देण्यात आली याबाबत शासकीय सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की अंबड येथील घनसावंगी रोडवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुला-मुलींचे वसतिगृहात दोन विलगीकरण कक्ष असून बाहेरगावाहून अंबड तालुक्यात आलेल्या लोकांना तोरण टाईम करून तपासणी केली जाते आतापर्यंत अंबड येथील विलगीकरण कक्ष क्र.1 मध्ये 26 तर क्र.2 मध्ये 12 असे मिळून एकूण 38 व्यक्ती दाखल करण्यात आले होते त्यापैकी मुंबई येथून आलेल्या आणि विलगीकरण कक्ष क्रमांक एक मध्ये दाखल केले गेलेल्या एका कुटुंबातील सहा जणांना अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्याने त्यांना विलगीकरण कक्षातील वैद्यकीय अधिकारी डॉ.पौर्णिमा घुगे, डॉ.पांढरे, समाज कल्याण जालना विभागाचे अनिल सूनगत, डॉ.अमोल जाधव, डॉ.किर्तीचा तरटे, छाया काकड, स्वाती देवगुणे, सुनिता राठोड, आदीसह नर्स सुरक्षा कर्मचारी त्यांच्या वर पुष्प वर्षाव करून व टाळ्यांच्या गडगडात करून सुट्टी देऊन त्यांना त्यांच्या घरी पाठवण्यात आले आहे.



परदेशी शिष्यवृत्तीचा शासन निर्णयास स्थगिती नको, कायमची अट रद्द करा- राजेंद्र पातोडे



मुंबई,ब्युरो चीफ : - महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्यावतीने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी कौटुंबिक उत्पन्नाची मर्यादा सहा लाख निश्चित करण्यात आली होती. तथापि खुल्या प्रवर्गासाठी ही उत्पन्न मर्यादा २० लाख असल्याने हा निर्णय परदेशात उच्च शिक्षणासाठी जावू पाहणाऱ्या अनुसूचीत जातीच्या विद्यार्थ्यांबाबतीत केलेला उघड जातीयवाद आहे, अशी टिका वंचित बहूजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी करून हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानंतर सोशल मीडियावर आंदोलन करीत शासनाचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात आला होता. परिणामी शासनावर प्रचंड दबाव निर्माण झाला. त्यामुळे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी या निर्णयाला स्थगिती दिली. मात्र हा निर्णय रद्द करण्यात यावा, प्रशासनाने शब्दच्छल न करता सामाजिक न्याय विभागाने ही अट सरळ रद्द करावी, अशी मागणी राजेंद्र पातोडे यांनी केली आहे.



*अंबड शहरात वंजार गल्ली सील, कानडगाव दोन ते अंबड एक असे तीन संशयित रुग्ण*



पोलीस निरीक्षक अनिरुद्ध  नांदेडकर यांनी अतिदक्षता घेत आपल्या फौजफाट्यासह आरोग्य विभाग तसेच नगरपरिषद प्रशासन यांना पाचारण करून अंबड शहरातील वंजार गल्ली पूर्णपणे सील

अंबड/प्रतिनिधि* संपूर्ण देशात तसेच अनेक राज्यात कोरोनाने थैमान घातला असता असतांनासुद्धा अंबड तालुका हा कोरोना पासून मुक्त होता. मात्र आता अंबड शहरात धोरणाने शिरकाव केला असून वंजर गल्लीमध्ये एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांनी त्यांच्या फौजफाट्यासह जाऊन सोमवारी वंजार गल्ली पूर्णपणे सील केली आहे. काही दिवसापूर्वी मुंबई येथून तीन जण आहे कानडगाव येथे आले होते. त्या पैकी दोन जणांना व्काँरंटाईन करण्यात आले होते.  त्यांच्या लाळेचे नमुने जिल्हा रुग्णालयातर्फे दिनांक 8 में रोजी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. सदर रुग्णाचे आहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड यांनी दिली होती त्यामुळे पोलिसांनी कानडगाव व डोमेगाव पूर्णपणे सील केल्याने तालुक्यातील नागरिकांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण होऊन चिंतेत वाढ झाली होती. अंबड तालुक्यातील कानडगाव येथील दोन तर आता नव्याने अंबड शहरातील वंजार गल्ली येथील एक नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने अंबड तालुका शहरासह कोरोना रुग्णांचा आकडा आता तीन वर पोहोचल्याने पोलीस निरीक्षक अनिरुद्ध  नांदेडकर यांनी अतिदक्षता घेत आपल्या  फौजफाट्यासह आरोग्य विभाग तसेच नगरपरिषद प्रशासन यांना पाचारण करून अंबड शहरातील वंजार गल्ली पूर्णपणे सील करण्यात आली आहे. सध्या नंबर शहरामध्ये भीतीचे वातावरण तयार झालेले दिसून येत आहे.

                  कोरोना जनजागृतीचा संदेश

सरकारच्या आदेशाचे पालन करा. सावता परिषदेचे युवक तालुकाअध्यक्ष राम गिराम


सिंधीकाळेगाव,प्रतिनिधी (श्याम गिराम) :- कोरोनामुळे देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे संचारबंदी, जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे.कोरोनाच्या संकटकाळात आरोग्य कर्मचारी,मेडिकल,पोलीस,सफाई कामगार,महावितरण,नगर परिषद कर्मचारी,महसूल कर्मचारी हे सर्वच जण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपआपल्या परीने प्रयत्न करीत आहेत.सध्या शाळेच्या मुलांना सुट्ट्या असल्याने मुले घरी बसून त्यांच्यामध्ये असलेल्या कलागुणांना वाव देत आहेत.जगभरात थैमान घातलेल्या कोरोणा विषानुने लाँकडाऊन करण्यात आले आहे.सध्या कोरोनाच्या अनुषंगाने शहरातील अनेक दुकाने, हॉटेल्स यासह आदी दुकाने बंद आहेत. आवश्यक कामासाठी सर्वसामान्य नागरिक, परप्रांतीय मजुर बाहेर पडत. सर्वांनी घरीच रहा शासकीय आदेशाचे पालन करा व सरकारला सहकार्य करा, कामाशिवाय कोनीही बाहेर पडु नये सर्वांनी मास्कचा वापर करा. घरीच रहा आरोग्याची काळजी घ्या सुरक्षीत अंतर पाळा गरजुंना मदत करा कोरोना राक्षसाचा सामना करा, आरोग्याला जपा विनाकारण फिरू नका. सध्या कोरोणा विषाणु साठी शासन प्रशासन कसोटीचे करत असुन या विषाणुचा फैलाव होऊ नये यासाठी संपुर्ण महाराष्ट्रालात लाँकडाऊन करण्यात आलेले असुन ग्रामिण भागात देखील सर्व बंद आहे.देशांवर कोरोना ह्या विषुने थैमान घातले आहे आपला महाराष्ट्र ही कोरोना ह्या संकटांशी लढत आहे शासनाने घालून देल्याला नियमांचे पालन करा घरी राहून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करा मीच माझा रक्षक माझे आरोग्य माझी जबाबदारी, काळजी घ्या घरीच थांबा असे सावता परिषदेचे  युवक तालुका अध्यक्ष राम भाऊ गिराम यांनी सांगितले.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...