शुक्रवार, २७ मार्च, २०२०

          पोलिस मारहाणीनंतर रुग्णवाहिका चालकाचा मृत्यू 
                     मुलाकडुन होत कार्यवाही ची मागणी.
माझ्या पप्पा च्या मृत्यूस पोलिस कारणीभूत आहे असा मुलाचा आरोप.
दिवसेंदिवस पोलिसांकडून होणारा बळाचा गैरवापर थांबेल का?
ठाणे प्रतिनिधी :- आरोग्य सेवक व पत्रकार यांच्यावर
 पोलिसाकडून मारहाणीच्या घटना महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत आहेत या घटना कुठे तरी थांबले पाहिजे कारण पत्रकार बांधव आपल्या जिवाची पर्वा न करता बातम्या प्रसार करत आहेत. समाजा मध्ये जागृती निर्माण करतात तसेच आरोग्य कर्मचारीदेखील हे आरोग्य संदर्भात आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करत आहेत.सेवा करणाऱ्या व समाज जागृती करणाऱ्या बांधवास जर पोलीस प्रशासन आपल्या बळाचा गैरवापर करीत करत असतील तर हे योग्य आहे का ? यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी व गृहमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे.कारण दिवसेंदिवस पोलीस प्रशासनाचा गैरवापर होताना दिसून येत आहे हा गैरवापर थांबायला पाहिजे अशी मागणी पत्रकार,आरोग्य सेवक व सर्वसामान्य नारिकाकडून होत आहे.
हिंगोली येथील आरोग्य सेविकेची घटना ताजी असताना पत्रकारावर झालेल्या हल्ल्याची घटना तर आज 27 मार्च 2020 रोजी रुग्णवाहिका चालक नरेश शिंदे वय.49 रा.ठाणे यांना पोलिकडून मारहाण झाल्यामुळे त्यांचा मृत्यूझाला आहे.ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात 24 तास उपलब्ध असणारे, गोर गरीब रुग्णांच्या मदतीस तातडीने धावणारे समाजसेवक नरेश शिंदे रुग्णवाहिकेतून जात असताना घडली. या घटनेची सविस्तर माहिती अशी की,बोरिवली येथून श्रीगोंदा होते एका रुग्णाला घरी सोडविण्यासाठी नरेश शिंदे व मुलगा बंटी हे स्वतःची रुग्णवाहिका घेऊन पेशंटला सोडण्यासाठी जात होते. यावेळी त्यांनी रुग्णवाहिका चालविण्यासाठी त्यांचा निलेश (बंटी) नावाचा मुलाला ही सोबत घेतले होते.नरेश शिंदे हे अंबुलान्स घेऊन जात असताना टोल नाका तळेगाव येथे पोलिसांनी टोलनाक्यावर  रुग्णवाहिका थांबवली.पोलिस जवळ आल्यानंतर नरेश शिंदे यांना विचारपूस केली.चेकिंग केली त्यानंतर नरेश शिंदे याचा मुलगा याला खाली उतरण्यास सांगितले त्यानंतर नरेश शिंदे हे पोलिसांना हात जोडून विनंती केली आणि ते म्हणाले की, साहेब त्याला मारू नका मारायचं असेल तर मला मारा त्यानंतर पोलिसांनी त्यांना सांगितले की संचारबंदी लागू आहे आणि तुमच्यावर गुन्हा दाखल होईल त्यामुळे तुम्ही आम्हाला पाच हजार रुपये द्या.आम्ही तुमच्या वर गुन्हा दाखल करत नाही त्यावेळेस नरेश शिंदे हे त्यांना म्हणाले की साहेब माझ्याकडे पाच हजार रुपये नाहीत मी तुम्हाला तीन हजार रुपये देतो पोलिसांनी rs.3000 घेतल्यानंतर त्यांना नरेश शिंदे यांना काठीने मारहाण करून पोलिसांनी पैशे घेऊन सोडून दिले.त्यानंतर रुग्णवाहिका सोडून दिली व काही अंतर कापल्या नंतर बंटी चे वडील नरेश शिंदे यांना त्रास सुरू झाला.त्यांना माराच्या भीतीने आपला जीव गमवा वा लागला आहे. या सर्व घटनेची जबाबदार पोलीस आहेत.
असा आरोप मयत पिता नरेश शिंदे यांचा मुलगा बंटी यांनी केला आहे.

परभणी शहरातील दलित वस्त्यांसह अनेक भागात जंतूनाशक फवारणी करा.- मा.राधाजी शेळके
लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेचे च्या वतीने म.न.पा. आयुक्तांना निवेदन.
परभणी प्रतिनिधी:- देशासह संपूर्ण जग 
महाभयानक कोरोना या आजाराशी सामना करत आहे त्यात या आजाराचा सामना करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने स्वछतेचे आव्हान करण्यात येत आहे परभणी  मनपा प्रशासन हि यात चांगल्या पद्धतीने काम करत आहे परंतु परभणी शहरात गोरगरीब, पिढीत, दलित राहत असलेल्या वस्त्या या मोठ्या प्रमाणात आहेत या वस्त्यामधील बहुतांश व्यक्ती हे मनपामध्ये सफाई कर्मचारी आहेत. या महामारीमध्ये परभणी स्वच्छ ठेवण्याचे काम हे कर्मचारी करतात परंतु हे राहत असलेल्या वस्त्यांमध्येच अद्याप कुठल्याही प्रकारची जंतूनाशक फवारणी  मनपाच्या वतीने केली गेली नाही म्हणून या दलित वस्त्यांसह शहरातील अनेक प्रभाग असे आहेत ज्या ठिकाणी जंतूनाशक फवारणी झाली नाही हि फवारणी मनपा प्रशासनाने लवकर सुरु करावी या बाबतचे निवेदन आज लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीने परभणी मनपा आयुक्त रमेश पवार हे कार्यालयात नसल्या कारणाने  त्यांचे स्वीय सहाय्यक उमेश जाधव यांच्या मार्फत देण्यात आले या वेळी लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा राधाजी शेळके, युवा नेते शिवाजी शेळके यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

कोरोना सारखा इतर रोगाची लागणहोऊ नये म्हणून बदनापूर शहरातील मातोश्री हॉस्पिटलने राखले रुग्नांमध्ये अंतर
बदनापूर/प्रतिनिधी:कोरोना रोगाव फैलाव
होवू नये म्हणून शासन विविध उपाययोजना करीत असून नागरिकांना देखील दक्षता बाळगण्याचे आव्हान नगर पंचायत मार्फत करण्यात आलेले आहे,तर डॉक्टरांनी देखील शासनाच्या सूचनांचे पालन सुरु केले असून मातोश्री हॉस्पिटलमध्ये रुग्णांमध्ये अंतर राखले जात असून इतर दवाखाण्यात देखील अश्याच पद्धतीने रुग्णांमध्ये अंतर ठेवल्यास रोगराई पसरणार नाही असे मत व्यक्त केले जात आहे 
  सध्या कोरोना रोगामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालेले असून सदर रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून शासनाने गर्दी न करण्याचे आव्हान केलेले आहे तसेच तोंडाला मास्क,हात सिंटायझर ने धुणे आदी सूचना दिलेल्या आहेत, रोग एक दुसऱ्यांच्या संपर्कात आल्याने वाढत जातो अशी धारणा अनेकांची असल्याने बोलतांना देखील अंतर ठेऊन बोलावे असे सूचित करण्यात आले आहे त्यामुळे स्वतःचे  रक्षण स्वतः करावे असे म्हंटले जात आहे,बदनापूर तहसीलदार छ्या पवार,नगर पंचायतच्यावतीने मुख्य अधिकारी डॉ.पल्लवी अंभोरे,अभियंता गणेश ठुबे,पोलीस निरीक्षक एम.बी.खेडकर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.योगेश सोळुंके आदींनी नागरिकांना आव्हान केले आहे
   जस एक दुसऱ्यांमध्ये अंतर राखणे गरजेचे आहे तसं सध्या दवाखाण्यात विविध रुग्ण येत आहे मात्र दवाखान्यात रुग्णांमध्ये कोणतेच अंतर राखले जात नाही बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी रुग्ण येऊन बसतात आणि नंतर एक एक करून डॉक्टर कक्षेमध्ये तपासणी केली जाते त्यामुळे दवाखान्यात रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांना देखील इतर रोगाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून बदनापूर येथील मातोश्री हॉस्पिटलचे डॉ.अरुण खैरे व डॉ.अस्मिता खैरे यांनी दवाखाण्यात येणाऱ्या रुग्नांमध्ये अंतर ठेवण्यासाठी व्यवस्था केली असून आलेले रुग्ण एक मेकापासून दोन फूट अंतर राखून बसविले जात आहे त्यामुळे रोगराई पसरण्यास आळा बसणार आहे अश्याच पद्धतीने इतर दवाखान्यात देखील अंतर उपक्रम राबवावा अशी इच्छा व्यक्त केली जात आहे  
  सिद्धेश्वर पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने जंतुनाशक फवारणी
सिद्धेश्वर पिंपळगाव/ प्रतिनिधी ज्ञानेश्वर खरात:- सिद्धेश्वर पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील
सर्व भागात जंतुनाशक फवारणी करण्यात आली व गावातील नागरिकांनी स्वतःचे रक्षण स्वतः करावे या उद्देशाने कामाशिवाय बाहेर निघू नये व रस्त्यावर गर्दी करू नये. कोरोनाव्हायरस या रोगाचा उद्रेक थांबवण्यासाठी गावातील नागरिक व प्रशासन सज्ज झाले असून या कोरोनाव्हायरस या रोगावर विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे सर्व गावातील या जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे व ग्रामपंचायतचा शिपाई शंकर खेडकर यांनीही फवारणी केली आहे

संवेदनशीलता दाखवत खासगी डॉक्टरांनी रुग्णालये सुरू करावेत
      ट्रेसिंग, टेस्टींग, ट्रीटमेंट त्रिसुत्रीनुसार कोरोनाचा प्रतिबंध
               कोरोनाबाधीत १९ रुग्णांना घरी सोडले

                आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती.
मुंबई, प्रतिनिधी : कोरोनाचे संकट असताना
राज्यातील खासगी डॉक्टरांनी भीती पोटी दवाखाने बंद ठेवू नयेत. असा परिस्थितीत संवेदनशीलता दाखवून डॉक्टरांनी रुग्णालये सुरू करून नागरीकांना सेवा द्यावी, अशी सूचना करतानाच संचारबंदी काळात राज्यात रक्तदान शिबीरे घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संस्थांना सहकार्य करावे. नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे केले. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्य शासन सध्या ट्रेसिंग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट या त्रिसुत्रीनुसार काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यातील कोरोनाचे रुग्ण बरे होत असून १९ रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आल्याचे सांगत राज्यात सध्या १३५ रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधताना दिली.
*आरोग्यमंत्र्यांच्या संवादातील महत्वाचे मुद्दे:*
राज्यात सधया १३५ बाधीत रुग्ण आहेत. आतपर्यंत ४२२८ जणांच्या कोरोनासाठी चाचण्या केल्या त्यापेकी ४०१७ चाचण्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. १३५ पॉझीटिव्ह आले.
शासकीय आरोग्य सेवेतील डॉक्टर्स, कर्माचारी वर्ग तसेच अन्य आपातकालीन सेवेतील कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. सेवा देत आहेत. त्यांचे अभिनंदन. अशी सेवा देणाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता देण्याबाबत राज्य शासन विचार करीत आहेत.
कोरोना व्यतीरिक्तही अन्य आजारांच्या उपाचारांसाठी खासगी रुग्णालये सुरू साहणे आवश्यक आहेत. गरोदर महिला, लहान मुलांचे आजार, हृदयविकाराचे रुग्ण यांना वेळीच उपचाराची गरज असते. त्यामुळे राज्यभरातील खासगी डॉकटरांनी दवाखाने सुरू ठेवावेत. कोरोनाच्या भीतीपोटी दवाखाने ठेवू नका. संचारबंदीच्या काळात पोलीस आवश्यक ते सहकार्य करतील.
राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रक्ताची साठवणूक दीर्घकाळ करता येत नाही. कोवळ कोरोनच्या रुग्णांसाठी नव्हे तर अनेक वैद्यकीय उपचारांमध्ये , हिमोफेलीयाच्या रुग्णांसाठी रक्ताची गरज असते. अशावेळी सामाजिक संस्थांनी संचारबंदीकाळातील सूचनांचे पालन करून रक्तदान शिबीरे घ्यावीत. जिल्हा प्रशासनाने त्यांना सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रक्तदान शिबीरे घेताना सोशल डिस्टसिंग पाळण्याचे आवाहान करण्यात येत आहे.
ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली आहे आणि उपचाराचे व्यवस्थापन योग्य प्रकारे केले जात आहे असे कोरोनाबधीत रुग्ण बरे होत आहेत.
बाधीत रुग्णांपासून जवळच्या व्यक्तींना संसर्ग होण्याचा धोका लक्षात घेऊन राज्य शासन सध्या अशा व्यक्तींचे ट्रेसींग नंतर त्यांची टेस्टींग आणि ट्रीटमेंट म्हणजेच शोध, तपासणी आणि उपचार या त्रिसुत्रीप्रमाणे काम करण्यात येत आहे.
नागरिकांनी सोशल डिस्टंसिंगचा नियम मोडू नये. सर्वपक्षीय कार्यकर्ते, सामाजिक संघटना, मंडळांच्या कार्यकर्त्यांनी हातात हात घालून गरजूंना घरपोच सेवा देण्यासाठी पुढाकार घ्यावा.


  सुधीर शेषवरे यांना  राज्यस्तरीय गुणवंत शिक्षकरत्न पुरस्कार
औरंगाबाद/ प्रतिनिधी - औरंगाबाद जिल्ह्यातील
शैक्षणिक , सामाजिक, सांस्कृतिक, कला, अभिनय आदी क्षेत्रातील सम्राट अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक सुधीर गुलाब शेषवरे यांना  मुंबईच्या मनुष्यबळ विकास लोकसेवा संस्थेच्या वतीने राज्य स्तरीय गुणवंत शिक्षक गुरूगौरव शिक्षकरत्न पुरस्कार २०२० करीता निवङीबददलचे पञ अँङ कृष्णाजी जगदाळे यांनी एका पञकातून कळविले आहे .सदरील पुरस्कार महाराष्ट्र दिनी एका संमारंभात देण्यात येणार आहे.
या पुरस्कार  निवङीबददल ङाँ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठाचे अधिसभा सदस्य ङाँ.शंकर अंभोरे,ङाँ.अनिल पांङे,प्रा.सुनील पांङे, देवानंद वानखेङे, अवद चाऊस, प्रा.संजय काळे,ईश्वर उमाळे,प्रदीप आमले, एस.एन.ओहळ,राहुल म्हसके,अनिल जाभाङे,प्रकाश निकम,संजय निकम,अंजन साळवे, आदीनी अभिनंदन केले.या पूर्वी मुपटा आदर्श शिक्षक पुरस्कार,लोकमत आदर्श शिक्षक पुरस्कार,शालेय संस्थेचा आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार यासह अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.
        पोलिस आयुक्तालयातर्फे औरंगाबाद जनतेस आवाहन
       औरंगाबाद/शहर प्रतिनिधी- गणेश आठवले :- आज संपूर्ण जगामध्ये थैमान घातलेल्या कोरणा विषाणूमुळे परिस्थिती अत्यंत गंभीर स्वरूपाची झाली आहे, म्हणून प्रशासनाला
कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय योजनेचा एक भाग म्हणून १४ एप्रिल २०२० पर्यंत देशात संचारबंदी /जमावबंदी घालण्यात आली आहे, देशात पुढील २१ दिवस लाॅक डाऊन आहे, त्या अनुषंगाने औरंगाबाद शहर पोलीस दलातर्फे शहरांमध्ये जागोजागी चौकाचौकात गल्लीबोळात संचारबंदी/जमावबंदी,चेक पॉईंट व पेट्रोलिंग लावण्यात आली आहे .
औरंगाबाद पोलिस आयुक्त. साहेब मार्फत जनतेला काही आव्हान करण्यात आली आहेत की,कोरोचा प्रसार होऊ नये ही जबाबदारी प्रत्येकावर आहे. नागरिकांनी एकत्र जमू नये सर्व धर्मगुरूंना सर्व धार्मिक स्थळांना विनंती करण्यात आली आहे, मंदिरे, मशिदी,बुद्ध विहारे ,गुरुद्वारा, चर्च इत्यादी ठिकाणी पूजा-अर्चा नमाज/अर्दाज हे फक्त धार्मिक स्थळावरील लोकांनीच करावी.नागरिकांनी पुजा  अर्चा, नमाज ही घरीच करावी . सध्याच्या परिस्थितीमध्ये जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा अफवा पसरू नये.अत्यावश्यक सेवा जसे दूध, भाजीपाला, कृषी विक्री केंद्र किराणामाल पुरवठा केंद्र, बँका, एटीएम, दवाखाने, औषधी दुकाने, पोस्ट ऑफिस, पाटबंधारे विभाग, पाणीपुरवठा विभाग इत्यादी आवश्यक सेवा 24 तास खुली राहणार आहेत. संबंधित दुकानदारांनी ग्राहकाच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.(दोन ग्राहकांमधील अंतर हे एक मीटर असावे)निर्जंतुकीकरण स्वच्छता याबाबत शासनाने घालून दिलेल्या सूचना पाळाव्यात.
तरी नागरिक शहरामध्ये विनाकारण फिरताना दिसले तर अशा नागरिकां  विरुद्ध उद्यापासून कडक कारवाई करण्यात येणार आहे .नागरिकांनी एका वेळी घरातुन एकाच व्यक्तीने बाहेर पडावे तेही जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी असतील तरच .
जे नागरिक होम क्वारंट्यान आहेत त्यांनी घरीच थांबावे घरांमध्ये देखील इतर लोकांशी संपर्क टाळावा. शहरांमधून आवश्यक नसल्यास प्रवास करू नये, औरंगाबाद शहरामध्ये संचारबंदी/जमावबंदी असताना देखील फिरणाऱ्या व्यक्तीवर साथरोग प्रतिबंध अधिनियम १८९६,आपत्ती प्रतिबंध अधिनियम २००५ व भारतीय दंडविधान संहितेच्या अंतर्गत कडक कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये सहा महिने ते दोन वर्षापर्यंतचे शिक्षेची तरतूद आहे. या संबंधाने आज रोजी सिटीचौक येथे चार गुन्हे वाहतूक शाखेकडून तीन गुन्हे व उद्यापासून शहरांमध्ये फिरणाऱ्या फिरणार यांवर वाहनांवर ४४३ केसेस दाखल केल्या आहेत. तरी नागरिकांनी घरीच थांबावे व कोरणा विषाणूपासून स्वतःचे स्वरक्षण स्वतः करावे असे आवाहन पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी केले.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...