गुरुवार, १२ मार्च, २०२०

अपंग निवासी विद्यालय या ठिकाणी दिव्यांग विद्यार्थी सोबत इको-फ्रेण्डली होळी साजरी करण्यात आली.
जालना/प्रतिनिधि :- ज्ञानज्योत बहुउद्देशीय सेवा भावी संस्था व अंजानी आई फाउंडेशन च्या वतिने जमना नंगर येथील अंपग
निवासी विधालय या ठिकाणी दिव्यांग विद्यार्थी सोबत ईको फ्रेंडली होळी साजरी करण्यात आली.या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा यानी होळीच्या शुभेच्छा देऊन होळी सन साजरा का करतात या बाबत माहीती दिली कि हिरण्यकश्यपू नावाचा राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा. स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णू चे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते. परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णू चा परम भक्त होता. आणि हे हिरण्यकश्यपू ला अजिबात पसंत नव्हते. तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे जेणे करून पुत्र प्रह्लाद भगवान विष्णूची उपासना करणे सोडून देईल. परंतु भक्त प्रह्लाद त्यांना न डगमगता त्याच्या भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होत असे. ह्या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली, आणि त्यानुसार आपली बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते कि ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही. राजाने होलिकेला भक्त प्रह्लाद ला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले. प्रह्लाद आपल्या आत्या सोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवलं कि तिला वरदानात असेही सांगितले होते कि ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेंव्हा ती स्वतः जळून राख होईल.अशी छोटी कथा सांगुन मुलाना सागितले कि होळी सुरक्षित होळी सांजरी करा
शक्यतो रंग वापरण्या पेक्षा फुलाने होळी साजरी करावी रंग खेळतानी,त्वचा,डोळे, याची काळजी घेउन ऊत्सव साजरा करा असे ज्योती आडेकर बोलत होत्या या कार्यक्रम ला ज्योती आडेकर,विधा जाधव,रूपाली पवार गौरव जाधव जावेद भाई,पवार सर व पदाधिकारी उपस्थित होते
मादळमोहीच्या अंखड हरीनामस सप्ताहाचीउत्साहत सांगता संपन्न.
मादळमोही | प्रतीनिधी. दि.11..संत सम्राट जगतगुरू संत तुकाराम महाराज बीजेनिमित्या प्रतिवर्षी मादळमोही कर अंखड हरीनाम सप्ताह व ग्रंथराज पारायणाचे सात दिवस आयोजन करत आसतात या दरम्यान महाराष्ट्रातील प्राख्यात किर्तन काराचे किर्तन आणी प्रवचनाचे आयोजन  करण्यात आले होते.तर काल या नाम सप्ताहाची सांगाता श्रीक्षेत्र नारायण गड मठापती .ह.भ.प.शिवाजी महाराज यांच्या उपस्थितीत ह.भ.प संभाजी बाबा तुकाराम संस्थान मादळमोही यांच्या किर्तनाने झाली.
या सप्ताह सांगता प्रसंगी पंचक्रोशीतील भाविक भक्ता सह माजी राज्य मंत्री बदामराव पंडित यांच्या सुविद्य पत्नी सौ.गिरिका भाबी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

गेवराई तालुक्यात मादळमोही येथे  4 मार्च रोजी श्रीक्षेत्र तुकाराम संस्थान येथे आंरभ झालेला अंखड हरीनाम सप्ताह या सप्ताहाची पंरपरा पार जुनी आसुन बीड जिल्ह्याची धाकटी पंढरी श्रीक्षेत्र नारायण गडाच्या शुभ आशिर्वादाने सुरु आसणार्या सप्ताहात मादळमोही कर तन.मन.धनाने आपले लक्ष केंद्रित करुन ह.भ.प शिवाजी बाबाच्या आशिर्वादाने आणी ह.भ.प.संभाजी बाबा च्या सान्निध्यात हे आध्यात्म कार्य निर्विवाद पणे सुरु आहे.या सप्ताह दरम्यान ख्यातनाम किर्तन सेवा भाविक भक्ताना मंदिरात ऐकाला मिळत आसते तर येथील तरुणाचे फार मोठे योगदान या वेळी पाहायला मीळते प्रतेक वर्षी या अध्यात्मिक कार्यक्रमात मादळमोही चे तरुण रक्तदान करुन राष्ट्रीय कार्यक्रम राबवतात .या वर्षी तर कोरोना सारख्या रोगाचा जो धुमाकूळ माजला आहे. त्या बाबत सुध्दा जनजागृती करण्यात आली आणी ।ह.भ.प.संभाजी बाबानी तर गावकर्याचे आसणारे संस्थानवरचे प्रेम हे खुपच अप्रतिम आसल्याचा उल्लेख करत 2021 नारळी सप्ताहाची पुर्व तयारी सुध्दा गावकर्यानी चांगल्या पैकी सुरु केल्याने शिवाजी बाबानी गावाचे कौतुक हि केले आहे.याच कार्यक्रमात पैठण ची नाथशेस्टी कोरोना व्हायरस मुळे रद्द करण्यात आली या मुळे येथील वारकऱ्यांची दिंडी निघणार नाही आशी घोषणाहि मादळमोही त करण्यात आली.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...