शुक्रवार, २४ एप्रिल, २०२०


मुस्लीम बांधवांनी पवित्र रमजान महिन्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या सूचनांचे पालन करावे. 

उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील व निरीक्षक सोहन माच्छरे यांचे आवाहन.

धर्माबाद,प्रतिनिधी (भगवान  कांबळे):- महाराष्ट्र राज्यात मोठया प्रमाणात कोरोना विषाणूचा (कोविड-19) प्रसार होत आहे. त्यासाठी शासनामार्फत विविध प्रतिबंधात्मक वरील दिलेल्या सुचनांचे जनतेने काटेकोरपणे 
पालन करुन आपले कर्तव्य पार पाडून समाजातील लोकांचे व आपल्या कुटूंबियांच्या आरोग्य व सुरक्षिततेला प्राधान्य देणे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे समाजाच्या सुरक्षिततेसाठी नेमून दिलेली कर्तव्य पार पाडून समाजापुढे आदर्श घडवू या. शासनाच्या मार्गदर्शक सुचनांची सर्वांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करुन कोरोना विषाणूविरुध्दचा आपला लढा जिंकण्याची मनीषा आपण सर्वजण मिळून बाळगू या...! असे आवाहन धर्माबाद उपविभागीय पोलिस अधिकारी सूनील पाटील व धर्माबाद ठाण्याचे  पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांनी नांदेड तालुक्यातील  जनतेला केले आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, क्रीडाविषयक कार्यक्रम रद्द करण्याबाबत 14 मार्चच्या अधिसूचनेन्वये सूचना देण्यात आल्या आहेत.शासनाने दिलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना शनिवार 25 एप्रिल 2020 रोजी पासून सुरु होत आहे. या रमजान महिन्यामध्ये मुस्लीम समाजामध्ये मोठया संख्येने मस्जीदमध्ये जाऊन तसेच सार्वजनिकरीत्या नमाज पठण करण्याची प्रथा आहे. त्यामुळे मुस्लीम समाजातील नमाज, तरावीह व इफ्तार पार्टीसाठी एकत्र येतात. सद्य:स्थिती विचारात घेता, अधिक संख्येने लोक एकत्र आल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग / संक्रमण मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता असते व त्यामधून मोठ्या प्रमाणावर जिवित हानी होऊ शकते. त्यामुळे पवित्र रमजान महिन्यामध्ये मुस्लीम बांधवांनी पुढीलप्रमाणे सुचनांचे पालन करावे.कोणत्याही परिस्थितीत मुस्लीम बांधव मस्जीदीमध्ये नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तार पार्टीसाठी एकत्र येवू नये. घराच्या / इमारतीच्या छतावर एकत्र येवून नियमित नमाज पठण अथवा इफ्तार पार्टी करण्यात येवू नये. मोकळ्या  मैदानावर एकत्र जमून नियमित नमाज पठण, इफ्तार पार्टी करण्यात येवू नये. लोकांकडून कोणताही सामाजिक, धार्मिक किंवा कौटूंबिक कार्यक्रम एकत्रित येवून साजरे होणार करु नयेत. सर्व मुस्लीम बांधवानी त्यांच्या घरातच नियमित नमाज पठण, तरावीह व इफ्तार पार्टी इत्यादी धार्मिक कार्य पार पाडावे. इतर कोणत्याही लोकांना धार्मिक कार्यक्रमात समाविष्ठ करु नये.
उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना विषाणूचा (कोविड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 14 मार्च, 2020 पासून साथरोग प्रतिबंध अधिनियम 1897 लागू करण्यात आला आहे. 14 मार्चच्या अधिसूचनेन्वये यासंदर्भातील नियमावली प्रसिध्द करण्यात आली असून 17 एप्रिल 2020 च्या आदेशान्वये एकत्रित सुधारीत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.


            150 खाटांच्या कोरोना हॉस्पीटलचा पालकमंत्री 
                    राजेश टोपे यांच्या हस्ते शुभारंभ
कोरोनाच्या मुकाबल्यासाठी जालना जिल्हा सज्ज - पालकमंत्री राजेश टोपे                              
जालना,प्रतिनिधी:- कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांसाठी सुसज्ज व सर्व सोईनीयुक्त अशा 150 खाटांची क्षमता असलेल्या व केवळ 29 दिवसांमध्ये उभारणी केलेल्या सुसज्ज रुग्णालयाच्या, सर्व प्रतिबंधात्मक उपायोजनांच्या व सर्वांच्या सहकार्याने जालना जिल्हा कोरोनाच्या मुकाबल्यासाठी 
सुरक्षिततेच्यादृष्टीकोनातुन जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये व शहरांमध्ये सोडीयम हायपोक्लोराईड या द्रव्याची फवारणी करुन निर्जंतुकीकरण करुन घेण्यात आले आहे. प्रत्येक ग्रामपंचायतींना सॅनिटायजर, मास्क तसेच कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीची माहिती पुस्तिका यांचा समावेश असलेल्या किटचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या सेवा अधिक चांगल्या प्रमाणात देण्यासाठी राज्यस्तरीय प्लॅनच्या माध्यमातुन जिल्हा रुग्णालयासाठी 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असुन अंबड येथील रुग्णालयाच्या बळकटीकरणासाठी टाटा ट्रस्टच्या माध्यमातुनही निधी मिळण्यात येत असल्याची माहितीही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिली.   हॉस्पीटलच्या उद्घाटनानंतर श्री. टोपे यांनी संपूर्ण कोरोना हॉस्पीटलची पाहणी केली.सज्ज असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले.जालना येथील जिल्हा रुग्णालयाच्या परिसरामध्ये उभारण्यात आलेल्या कोरोना हॉस्पीटलचा शुभारंभ फित कापुन पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, उपाध्यक्ष महेंद्र पवार, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.पालकमंत्री श्री टोपे म्हणाले, जालना जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे बाधित झालेले दोन रुग्ण आहेत. या विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये यादृष्टीकोनातुन प्रशासनामार्फत आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.  परंतु जिल्ह्यात या विषाणुमुळे बाधित झालेल्यांची संख्या वाढल्यास त्यांना तातडीने उपचार मिळावेत या दृष्टीकोनातुन या दवाखान्याची उभारणी करण्यात आली आहे.  या ठिकाणी 100 खाटा व 50 खाटांचा अतिदक्षता कक्ष असुन या ठिकाणी 50 व्हेंटीलेटर्सची व्यवस्था करण्यात आली आहे.  या ठिकाणी अनुभवी व पुरेशा प्रमाणात डॉक्टरांची नियुक्तीही करण्यात आली आहे. जिल्ह्यातील दानशुर व्यक्ती तसेच विविध संस्थेच्या सहकार्याने जिल्ह्यासाठी पीपी किट तसेच ट्रीपल मास्क, एन-95 मास्कही उपलब्ध करुन देण्यात आले असुन गरजुंना उपचारासाठी प्रभावी ठरणाऱ्या टेलिमेडीसनची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात येत आली असल्याची माहितीही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिली.
          कोरोना उपचारासाठी पुल टेस्टींग आणि प्लाझ्मा 
                          थेरपी उपचाराला मंजुरी
            कोरोना उपचारासाठी महाराष्ट्रात पुल टेस्टींग आणि प्लाझ्मा थेरपी उपचाराला केंद्रीय आरोग्यमंत्र्याकडून आज मान्यता मिळाली असल्याची माहितीही पालकमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
            कोरोना प्रतिबंधाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज दुपारी देशातले सर्व आरोग्यमंत्री व सचिवांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. राज्य शासनाकडून मागणी करण्यात आलेल्या पूल टेस्टींग व प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धतीला मान्यता देण्यात आली. याबैठकीत महाराष्ट्राकडून मांडण्यात आलेल्या पोर्टेबल पल्स ऑक्सीमीटर व एक्सरे चाचणीच्या मदतीने कोरोना रुग्णाचे लवकर निदान करणे शक्य होईल आणि त्यातून मृत्यूदर कमी करता येऊ शकेल, असा मुद्दा मांडण्यात आला. त्याचबरोबर पीपीई कीटचे निर्जंतुकीकरण करून त्याचे पुर्नवापर करण्यासाठी मुद्दे सुचविण्यात आले. त्याचे विशेष कौतुक यावेळी करण्यात आल्याची माहिती देत  ज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोरोना चाचणी सुरू करण्याच्या मागणीला केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहितीही पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी दिली.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...