शुक्रवार, २९ मे, २०२०

ग्रामसेवक,सरपंचाच्या पुढाकाराने सोशल डिस्टनसिंगचे पालन करून रोहयोच्या कामाला सुरुवात..... मजुरांना काम मिळाल्याने समाधान....



परतूर /प्रतिनीधी:-प्रशांत वाकळे
तालुक्यातील अनेक गावातील मजूर शहराच्या ठिकाणी कामे करण्यासाठी जातात तर काही मजूर हे गावातच ग्रामपंचायतच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मग्रारोहयोची कामे करतात.एप्रिल,मे महिन्यात गावात अनेक मजूरांना कामे मिळायला पाहिजे होती परंतु कोरोनाने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला.देशासह महाराष्ट्रात मागील दीड महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने गावातील सर्वच कामे बंद होती.मजूरांच्या हाताला कामे नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली.ही बाब लक्षात घेऊन तालुक्यातील वरफळ येथील ग्रामसेवक एकनाथ मुरदकर,सरपंच श्रीमती मसरत बेगम शेख नदीम यांनी पुढाकार घेऊन गावातील अडचणीत आलेल्या मजुरांना मग्रारोहयो मधून कामे उपलब्ध करून दिल्याने मजूर वर्गातून समाधान व्यक्त केलं जातं आहे.कोरोनाच्या संकटकाळात मजूरांच्या हाताला उशिरा का होईना कामे मिळाल्याने दिलासा मिळाला आहे.सरपंच मसरत बेगम यांनी तसेच ग्रामसेवक श्री. मुरदकर यांनी गावातील शेकडो मजूरांना मग्रारोहयो अंतर्गत नाला खोलीकरण तसेच गाव तलावातील गाळ व इत्यादी कामे मिळवून दिल्यामुळे मजुरांना उपासमारीची वेळ टळली तर जमिनी मधील भूजल पातळी सुद्धा येणाऱ्या काळात वाढणार आहे.
याकामी ग्रामपंचायत मार्फत मजुरांना काम उपलब्ध व्हावे यासाठी सर्व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह,रोजगार सेवक ए.ए.शेख यांनी पुढाकार घेतला होता.
या कठीण परिस्थिती मध्ये हाताला काम मिळाल्यामुळे मजूरांनी ग्रामपंचायत मार्फत सुरू झालेल्या कामाबाबत आभार मानून समाधान व्यक्त केले.



प्रशासकीय सूचनांचे पालन करून काम सुरू
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावातील मजूर आर्थिक संकटात सापडला होता ही गरज लक्षात घेता त्या मजुरांना ग्रामपंचायत मार्फत कामे उपलब्ध करून देण्यासाठी गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच, उपसरपंच,सदस्य यांना सोबत घेऊन तसेच मजुरांना प्रसासकीय सूचना देऊन काम सुरू करण्यात आले असल्याची प्रतिक्रिया ग्रामविकास अधिकारी एकनाथ मुरदकर यांनी दिली.
जालना जिल्ह्यात संचारबंदी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे सुधारित आदेश जारी.






जालना दि. 29 (ब्युरोचीफ) :- कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. सद्यस्थितीत जालना जिल्ह्यात 100 पेक्षा अधिक कोरोना विषाणुमुळे व्यक्ती पॉझिटीव्ह आढळुन आल्याने याचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच या विषाणुची साखळी खंडीत करण्याच्यादृष्टीने जिल्हादंडाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दि. 28 मे, 2020 रोजी जालना जिल्ह्यातील संपुर्ण ग्रामीण,नागरी क्षेत्रात फौजदारी प्रक्रिया सहिंता 1973 चे कलम 144 (1)(3) अन्वये संचारबंदीचे आदेश जारी केले होते.  परंतु नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीचा विचार करुन आज दि. 29मे, 2020 रोजी सुधारित आदेश निर्गमित करण्यात आले असुन या आदेशानुसार खालील बाबींना सुट देण्यात आली आहे.वैद्यकीय सेवा, सर्व शासकीय व खाजगी रुग्णालये, दवाखाने, रुग्णवाहिका सर्व औषधी दुकाने, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, खत, बी-बियाणे यांची दुकाने, खत वाहतुक व त्यांचे गोदाम, तसेच कापुस, गहु, हरभरा खरेदी, अत्यावश्यक सेवांची शासकीय कार्यालये महसुल, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य, ग्रामविकास, अग्निशमन, कोविड- 19 कोरोना संबंधित कर्तव्यावर असणारे अधिकारी, कर्मचारी, औद्योगिक कारखाने, गॅस वितरक व गॅस सिलेंडर घरपोच देणारे वाहन व त्यावरील कर्मचारी, प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॅानिक मिडिया यांचे संपादक, वार्ताहार, प्रतिनिधी , वितरक इत्यादी, पेट्रोल पंप वितरक, कर्मचारी व त्यांची वाहने यांना या संचारबंदीधुन सुट देण्यात आली आहे. तसेच  दुध विक्रेते गल्ली, कॉलनी व सोसायट्यामध्ये घरोघरी जाऊन सकाळी 6 ते 9 या कालावधीत विक्री करावी, एका ठिकाणी थांबुन विक्री करता येणार नाही. सर्व शासकीय रास्त भाव दुकान व राष्ट्रीयकृत बँका केवळ रास्त भाव दुकानदार यांचेकडुन चलनाद्वारे पैसे भरणा करुन घेण्यासाठी, पाणी जार,
पाणीटँकर सप्लाय, परवानाधारक भाजी व फळ विक्रेते(गल्ली, कॉलनी व सोसायट्यामध्ये घरोघरी जाऊन सकाळी 6ते 9 या कालावधीत विक्री करावी, एका ठिकाणी थांबुन विक्री करता येणार नाही),  सर्व राष्ट्रीयकृत बँक – सर्व प्रकारच्या शासकीय चलान भरण्याकरिता, ऑनलाईन किराणा (फक्त घरपोहोच),  सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये त्यांचे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने.आदेशाचे पालन न करणा-या व्यक्ती, अधिकारी,कर्मचारी, संस्था अथवा समुह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 आणि भा.द.वि. 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे समजण्यात येईल आणि पुढील दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी.या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही पोलीस अधिक्षक, जालना व उपविभागीय दंडाधिकारी, सर्व उपविभाग जिल्हा जालना, सर्व तालुका दंडाधिकारी जिल्हा जालना, मुख्याधिकारी सर्व नगर परिषद व नगर पंचायती जिल्हा जालना यांच्यावर राहील, असेही जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केलेल्या आदेशामध्ये नमूद केले आहे.  हे आदेश दि. 31 मे रोजीच्या रात्री 12.00 वाजेपर्यंत लागू राहतील.

            वृत्तपत्रांना तात्काळ जाहिरातीच्या माध्यमातून पॅकेज जाहीर करा प्रेस ऑफ कॉन्सिलच्या
                                     मागणीला प्रेस क्लब जालन्याचा जाहिर पाठींबा.



जालना (प्रतिनिधी) :- कोरोना व्हायरसच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी भारत सरकारने महाराष्ट्रासह संपुर्ण भारतात लॉकडाऊन लागू केले आहे. यामुळे वृत्तपत्र मालक/प्रकाशक/संपादक यांना मोठे आर्थीक नुकसान सहन करावा लागत आहे. ज्याचा विपरीत परिणाम पुढच्या दोन वर्षापर्यंत होण्याची शक्यता आहे. प्रत्येक वृत्तपत्राला शासनाने 30 हजार चौरस सें. मी. जाहिरातीच्या स्वरूपात आर्थीक पॅकेज प्रदान करावे अशी मागणी प्रेस ऑफ कॉन्सिल महाराष्ट्र मुंबई यांनी शासन दरबारी केल्याने ही मागणी योग्य असून या मागणीला जालना प्रेस क्लबच्या वतीने जाहिर पाठींबा देण्यात आला. सध्या जिल्हा बंदीमुळे पेपर रोल, रिम, प्लेट, शाही रसायन उपलब्ध होत नसल्यामुळे सर्व वृत्तपत्र बंद पडल्याचे दिसून येत आहे. यामुळे आर्थीक नुकसान झाले आहे. तसेच मुद्रण बंद झाल्यामुळे ग्राहक, वाचक, वार्षीक वर्गणीदारापर्यंत वर्तमानपत्र पोहचले जात नाही. वृत्तपत्राचा मोठा महसुल बुडला आहे. तरी तात्काळ मा. मुख्यमंत्री यांनी संबंधीत मागणी  मंजुर करावी कारण ते पण एक संपादक आहे. या पाठींब्याला प्रेस क्लब जालनाचे अध्यक्ष भरत मानकर, कार्याध्यक्षा आयशा खान, सचिव विष्णू कदम, जेष्ठ पत्रकार अंकुशराव देशमुख, मकरंद जहागीरदार, अविनाश कव्हळे, पारसनंद यादव, लहु गाढे, महेश बुलगे, दिपक शेळके, भगवान साबळे, संतोष भुतेकर, बद्रीनारायण उपरे, बालाजी अढीयाल, अविनाश मगरे, दशरथ कांबळे, अर्पण गोयल, इलियास भाई, लियाकत भाई, मनोज पटवारी, किशोर शर्मा, विजय खताडे, अंकुश गायकवाड, सुहास कुलकर्णी, संजय भरतीया, सिताराम तुपे, प्रशांत कसबे, सुभाष भालेराव व इतर सर्व पत्रकारांनी या मागणीला पाठींबा जाहिर केला आहे. 


                     अंबड पंचायत समिती कार्यालयातील कृषी विस्तार अधिकारी राजेंद्र देशमुख 
                                          यांना पाच हजाराची लाच घेताना गजाआड.


डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या विहिरीच्या कामाचा धनादेश काढण्यासाठी तक्रार कडून 5 हजार रुपयांची लाच



अंबड़/अरविंद शिरगोळे :- अंबड पंचायत समिती कार्यालयातील कृषी अधिकारी राजेंद्र देशमुख (वय 57 वर्षे) यांना आज गुरुवारी ता.28 डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या विहिरीच्या कामाचा धनादेश काढण्यासाठी तक्रार कडून 5 हजार रुपयांची लाच घेताना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने देशमुख यांच्या अंबड शहरातील चांगले नगर येथील राहत्या घरी त्यांना रंगेहाथ पकडल्याने अंबड शहरात धडधडी उडाली आहे. या कारवाईमुळे पंचायत समितीचे कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ चालू आहे. लॉक डाऊन मध्ये सर्व काही थांबलेले असताना लाचखोर अधिकाऱ्यांची दुकानदारी सुरूच असल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की यातील अंबड तालुक्यातील खडकेश्वर येथील तक्रारदार यांनी तक्रार दिली की त्यांच्या वडिलांचे नाव असलेल्या शेतात डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेमध्ये विहीर खोदण्यासाठी दोन लाख 50 हजार रुपये मंजूर झाले. असून दोन लाखाचे बिल काढण्यासाठी अंबड पंचायत समितीचे कृषी विभागाचे विस्तार अधिकारी राजेंद्र विठ्ठलराव देशमुख यांनी यापूर्वी 10 हजार रुपये घेतले व उर्वरित राहिलेले 50हजार रुपयांचे बिल काढण्यासाठी आलोसेश्री देशमुख यांनी पुन्हा तक्रारदार यांच्याकडून 1 हजार रुपये लाचेची मागणी केली. सदर कामासाठी तक्रारदार लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना येथे संपर्क साधून तक्रार दिली सदर तक्रारीवरून आज गुरुवारी (ता.28) रोजी पडताळणी केली असता राजेंद्र देशमुख देशमुख यांनी तक्रारदार यांच्याकडे  पाच हजार रुपयाची लाचेची मागणी निष्पन्न झाली. शहरातील चांगले नगर येथे राहत्या घरी देशमुख यांनी तक्रारी कडून पाच हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद वारिया, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अनिता जमादार, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबादचे पोलीस उपअधीक्षक रविंद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस.एस.शेख व कर्मचारी मनोहर खंडागळे, गणेश चेके, शिवाजी जमदाडे, ज्ञानदेव झुंबड, अनिल सानप, सचिन राऊत, ज्ञानेश्वर म्हस्के, चालक प्रवीण खंदारे, आरेफ़ शेख, यांच्या पथकाने ही कामगिरी पार पडली आहे अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती


                                        बुलडाणा जिल्ह्यातील तीन रुग्णांची कोरोनावर मात..!





बुलडाणा,ब्युरोचीफ दि २९:- सामान्य रुग्णालय खामगाव येथे दाखल करण्यात आलेल्या कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये आलमपुर ता नांदुरा , जळका भडंग ता खामगाव व गोपाळ नगर खामगाव येथील रुग्णांचा समावेश आहे.  त्यापैकी आज सायंकाळी तीन रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सुट्टी देण्यात आलेल्या रुग्णांमध्ये आलमपुर ता नांदुरा येथील २० वर्षीय युवक, जळका भडंग  येथील २५ वर्षीय पुरुष व गोपाळ नगर, खामगाव येथील ६० वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. कोरोनावर मात देत बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या जिल्ह्यात 32 झाली आहे. मागील दहा दिवसांपासून कुठलेही लक्षण नसल्यामुळे शासनाच्या नवीन निकषानुसार या रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे.सामान्य रुग्णालय खामगाव येथे रुग्णांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांच्या हस्ते डिस्चार्ज पेपर देण्यात आला. याप्रसंगी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक अधीक्षक डॉ. टापरे उपस्थित होते.  रुग्णालयातून बाहेर पडताच रुग्णांचे टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले.  कोरोना वर मात केल्यामुळे आनंदित भावमुद्रेत रुग्ण घरी परतले. शासनाने रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णांना घरपोच सोडले.




‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️

*💥यावर्षी ‘वारी’ हेलिकॉप्टर, विमानातून; पायी पालखी सोहळा रद्द!*
-------------
पुणे: कोरोना संकटामुळे यंदाचा पायी पालखी वारीचा सोहळा रद्द करण्यात आला आहे. दिंड्यांना ही परवानगी नाकारली आहे. वारकरी आणि प्रशासनाचे एकमत झालं असून आळंदी आणि देहूच्या पादुका दशमीला पादुका हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानाने पंढरपूरला देवभेटीस जाणार आहेत.

आज उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात होते. दरम्यान त्यांच्या उपस्थितीमध्ये वारीबाबत बैठक झाली. या बैठकीत पायी वारी सोहळ्याबाबत आळंदी देवस्थानचे चोपदार, आळंदी, देहू आणि सोपानकाका संस्थानच्या विश्वस्तांनी त्यांच्या भूमिका मांडल्या.  त्यानंतर आळंदी आणि देहूवरुन निघणाऱ्या पादुका हेलिकॉप्टर, एसटी किंवा विमानाने पंढरपूरला नेण्यात याव्यात, असा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. याबाबत दशमीला निर्णय स्पष्ट होईल.
पतीनेच केला डोक्यात दगड घालून पत्नीचा खुन ; गेवराई शहरातील घटनेने उडाली खळबळ
"""""""""""""""""""""""""""""""""""
इम्रान सौदागर | गेवराई - शहरातील जायकवाडी परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्याच पत्नीचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली असुन परिसरात खळबळ उडाली आहे.

 गंधराबाई बप्पासाहेब घुले (वय अंदाजे 65 वर्ष) या आपल्या पत्नीला  त्याने आधी काठीने मारहाण करत डोक्यात दगड घालून हत्या करण्यात केली. सदरील ईसम हा मनोरूग्ण असल्याचे समजते घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्नील राठोड, पोलीस निरीक्षक चोबे सह अनेक कर्मचारी दाखल झाले असून आरोपी बप्पासाहेब  याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
*सरकारने परिस्थितीचे भान ठेवून "महाबीज"चे भांडार शेतकऱ्यांना मोफत खुले करावे-पूजा मोरे*


मागील वर्षी परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले.यामुळे सोयाबीन बियाण्याचीही प्रत खालावली होती.याची झळ आता आगामी खरिपाच्या हंगामात शेतकऱ्यांना सोसावी लागत आहे.सोयाबीनचे बियाणे क्विंटल मागे 1 हजार रुपयांपेक्षा अधिक महागले आहे.प्रामुख्याने महाबीजच्या बियाण्याचा दर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
सोयाबीन बियाण्याची 30 किलो ची बॅग मागील हंगामात 1890 रुपयांपर्यंत विकली जात होती.यंदा ही किंमत 360 रुपयांनी वाढवण्यात आली आहे.ही दरवाढ शेतकऱ्यांना परवडणारी नसून म्हणून सरकारने महाबीजचे भांडार शेतकऱ्यांसाठी मोफत खुले करावे किंवा तात्काळ पॅकेजचे बियाणे उपलब्ध करून घ्यावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती आघाडीच्या प्रदेशअध्यक्ष पूजाताई मोरे यांनी केले आहे.

राज्यात सोयाबीन हे प्रमुख पीक झालेले आहे.राज्यात जवळपास 39 लाख हेक्टरपेक्षा अधिक सोयाबीन क्षेत्र आहे.यासाठी सोयाबीन उत्पादकांना लाखो क्विंटल बियाण्यांची गरज भासते.सोयाबीन हे स्वपरागसिंचित असल्याने दरवर्षी नवीन बियाणे विकत घेणे गरजेचे नसले तरी महाराष्ट्रात सोयाबीनचे 30 ते 40 टक्के दरम्यान नव्याने खरेदी होते.या बियाणे विक्रीत प्रामुख्याने महाबीजच्या वाटा असतो.हंगामात सोयाबीनच्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठी झळ सहन करावी लागली.असाच फटका बीजोत्पादनालाही बसला आहे.बियाणे कंपन्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.यामुळे सहाजिकच बियाणे उत्पादनात वाढ झाली.यामुळे बियाणे उत्पादक कंपन्यांनी आता दरवाढ केलीय आहे.महाबीज बियाण्याच्या 30 किलो वजनाची बॅग मागील वर्षी पेक्षा 360 रुपयांनी यंदा महागली आहे.मागील वर्षात 1,890 ला मिळणारी बॅग 2250 रुपयांपर्यंत पोहचली आहे.म्हणून किलोलो 75 रुपयांना दर चुकवावा लागणार आहे.तर काही खासगी बियाणे कंपनीचे दर प्रति बॅग 2,400 किंवा त्यापेक्षा अधिक झाले आहेत.ही शेतकऱ्यांची लूट आहे.या कोरोनाच्या अडचणीच्या काळात सरकारने महाबीजचे भांडार शेतकऱ्यांसाठी मोफत खुले करणे अपेक्षित होते मात्र त्या उलट त्यांनी दरवाढ केली आहे.म्हणून सरकारने महाबीजचे भांडार शेतकऱ्यांसाठी मोफत खुले करावे किंवा शेतकऱ्यांना पॅकेजचे बियाणे उपलब्ध करून घ्यावे व खाजगी कंपन्यांच्या भाववाढीवर निर्बंध घालावे अशी मागणी पूजा मोरे यांनी केली आहे.

*सामाईक बांधावरील भोकरीच्या झाडाच्या कारणावरून हाणामारीत / मारहाणीत ५५ वर्षे व्यक्तीचा मृत्यू


                                         अंबड तालुक्यातील शहापूर येथील घटना,खुनाचा गुन्हा दाखल.



अंबड़ प्रतिनिधि :-  अंबड तालुक्यातील शहापूर येथील घटना शेतातील सामायिक बांधावरील भोकरीच्या झाडाच्या कारणावरून झालेल्या वादात पर्यावसान हाणामारी झाले. त्यामध्ये 4 जणांनी केलेल्या मारहाणीत एका 55 वर्षीय आदिवासी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना काल बुधवारी ता 24 सायंकाळी पाच वाजता शहापूर तालुका अंबड येथे घडली. या प्रकरणी आज 4 जणांविरुद्ध गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहापूर येथे गट नंबर 241 मध्ये शांताराम सुजनराव शिंदे यांनी बटाईने शेत केलेले असून या बटाईच्या  शेतात सामाईक बांधावर भोकरीचे झाड होते. या  झाडावरूनच शांताराम शिंदे व सोमनाथ भीमराव काळे, सोनू सोमनाथ काळे, कृष्णा सोमनाथ काळे, नवनाथ भिमराव काळे यांच्यात वाद झाला. आणि या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले यावेळी सोमनाथ काळे याने शांताराम शिंदे यांना कुऱ्हाडी च्या दांड्याने मारहाण केल्याने शांताराम शिंदे हे बेशुद्ध पडले ते बेशुद्ध पडताच सोनू काळे कृष्णा काळे व नवनाथ काळे या तिघांनी त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून त्यांना जागेवर टाकून पळ काढला सदर प्रकार दत्ता शिंदे यांना माहिती होताच त्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन शांताराम शिंदे यांना उपचारासाठी अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह ताब्यात न घेण्याच्या पैत्रावर आणि आंबेडकरी चळवळीतील नेते चंद्रकांत कारके हे स्वत: पोलिस अधिक्षक साहेबांच्या निदर्शनास आणुन दिल्यानंतर गुन्हे दाखल करण्याचा विचार केला, वाढत्या अन्याय आत्याचाराला न्याय हा चळवळीच्या रेट्यामुळे मिळने हि बाब दुर्देवीच आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो हे फुले-शाहु-आंबेडकर-आण्णाभाऊंच्या पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी बाब आहे. समाजीक न्याय मंत्र्यांनी अशा घटनेकडे लक्ष देण्याची मागणिही प्रसिद्धी माध्यमाव्दारे आंबेडकरी चळवळीतील नेते चंद्रकांत कारके यांनी केली आहे. व कारके यांच्या मार्गदर्शनाखाली खुनाचा गुन्हा दाखल झाला आणि दाखल झाल्यानंतर प्रेत त्यांच्या ताब्यात देण्यात आले यावेळी उपस्थित सुरेश
 खरात, कचरू साळवे, तरंग कांबळे (बीड हॅलो रिपोर्टर महाराष्ट्र ब्युरो चिप), नीलेश जाधाव, अभिजीत शिरगोळे, राहुल कारके, अरविंद शीरगोळे (बीड हॅलो रिपोर्ट ता. प्रतिनिधि), कार्यकर्ते, पत्रकार टीम इत्यादि आदि उपस्थित होते. आदिवासी (मयत शांताराम शिंदे) यांच्या मुलाच्या म्हणजेच  दिगंबर शांताराम शिंदे यांच्या फिर्यादीवरून आखेर गोंदी पोलीस ठाण्यात खुनचा गुन्हा नोंद झाला. जातीवाचक शिवीगाळ,  भां.द.वी कलम 302, 323,504, 506, 34 ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय अधिकारी सी.डी.शेवगन हे करत आहे.
लाॅकडाऊन मुळे या वर्षी  माणगांव तालुक्यातील कृषी सेवा केंद्रात भात बियाणे उपलब्ध नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत

शेतकर्यांना तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाची गरज

       बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवरील शासनाने लावलेल्या लाॅकडाऊन संचारबंदी मुळे या वर्षी रायगड जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्रावर महाबीज निर्मित जया भाताचे बियाणे पेरणी साठी कोणाकडेच उपलब्ध नसल्याने या वर्षी आपल्या शेतात नेमके कोणते भाताचे बियाणे पेरावे या विचाराने माणगांव तालुक्यातील सर्व शेतकरी मोठ्या चिंतेत सापडले आहेत.

    रायगड जिल्हाला भाताचे कोठार असे संबोधले जाते. कारण रायगड जिल्ह्यातील पनवेल, पेण, उरण, कर्जत, खालापूर, सुधागड, रोहा, अलिबाग मुरुड, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, पोलादपूर, महाड आणि माणगांव इत्यादी तालुक्यातील शेतकरी आपापल्या शेतात मोठ्या प्रमाणात जया भाताचे पीक घेतात. कारण रायगड जिल्ह्याच्या भौगोलिक संरचनेनुसार या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे या जिल्ह्यातील उपरोक्त सर्व तालुक्यातील सर्व ठिकाणच्या शेतकर्यांच्या शेतात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचते. आणि ते पुढील तीन ते चार महिने शेतात तसेच साचून राहते त्यामुळे रायगड जिल्ह्यातील बहुतेक शेतकरी आपापल्या शेतात लवकर तयार होणारे म्हणजे हळवे भाताचे बियाणे न पेरता जरा उशिरा तयार होणारे म्हणजे गरवे भाताचे बियाणे अर्थात जया या वाणाची निवड करून ते पेरतात.
     कारण जया या भाताला बाजारात विक्रीसाठी चांगला दर मिळतो. जया वगळता बाकी कोलम,रतना, आयरट,टायचण, सोना, कर्जत, इंद्रायणी इत्यादी सर्व प्रकारच्या भाताला बाजारात विक्री करताना अत्यल्प दर मिळतो. या शिवाय वरिल भाताचे पीक लवकर तयार होत असल्याने रायगड जिल्ह्यातील शेतकर्यांना पावसामुळे वरील सर्व प्रकारची पीके कापण्यास विलंब होतो. आणि परिणामी लवकर तयार झालेले भात पावसामुळे वेळेवर कापायला न मिळाल्याने या भाताचे प्रचंड प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यातील सर्व शेतकरी पावसाळ्या पुर्वी आपापल्या शेतात पेरणीसाठी जया या भाताची निवड करतात. परंतू सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवरील लाॅकडाऊन संचारबंदी मुळे रायगड जिल्ह्यातील ट्रान्सपोर्ट सेवेवर या चा मोठा परिणाम झाला. त्यामुळे तमाम रायगड जिल्ह्यात या वर्षी  सर्व कृषी सेवा केंद्रावर जयाचे भात बियाणे उपलब्ध नसल्याने संपूर्ण रायगड जिल्ह्यासह माणगांव तालुक्यातील सर्व शेतकरी वर्ग आपल्या शेतात या वर्षी नेमके कोणते बियाणे पेरावे या विवंचनेने चिंताग्रस्त झाले आहेत. या संदर्भात रायगड जिल्ह्यातील त्या त्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी यांनी सर्व शेतकर्यांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. अशी माणगांव तालुक्यातील सर्व शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.



                      ठाणे जिल्ह्यात मागेल त्याला मदत, वंचितचा अभिनव उपक्रम





ठाणे,ब्युरोचीफ दि.२९ :- कोरोना काळात लॉकडाऊन मुळे अनेक गरीब, गरजू तसेच हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे हाल होत आहेत, अश्या लोकांना मदत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने तालुका, जिल्हा आणि शहरी भागात वार्डनुसार अन्नधान्याचे वाटप केले. ठाणे विभागात विठ्ठलवाडी, उल्हासनगर टिटवाळा,अंबरनाथ, कल्याण,आंबिवली , डोंबिवली या सारख्या अनेक भागात अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. राज्यात लॉकडाऊन चालू झाल्यानंतर अनेकांचे काम बंद झाल्याने लोकांची उपासमार होऊ लागली. यावर उपाय म्हणून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की गरीब, गरजू लोकांना मदत करा. त्यानुसार कार्यकर्त्यांनी मदतीला सुरुवात केली. अगदी ग्रामीण भागापासून ते शहरी भागात मदत करण्यास सुरवात झाली. त्यात अन्नधान्यांचे किट, मास्क,पाण्याच्या बाटल्या तसेच  तयार केलेले जेवण इत्यादीचा समावेश होता. शिवाय मागेल त्याला ही मदत देण्यात येत होती. ठाणे जिल्ह्यात ही मोठ्या प्रमाणावर वंचित बहुजन आघाडी तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी मदत केली. ज्या लोकांनी फोन करून मदत मागितली होती. अश्या लोकांना घरपोच मदत करण्यात आली. त्यापैकी टिटवाळा येथील इंदिरानगर भागातून मदतीचा फोन आला होता, त्यानुसार वंचितच्या ठाणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा माया कांबळे, वंचितचे कार्यकर्ते संतोष गायकवाड व सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष रुपेश हूंबरे  यांनी टिटवाळा येथे जाऊन अनेक कुटुंबियांना अन्नधान्याचे वाटप केले. तसेच विठ्ठलवाडी येथील श्रीराम कॉलनी, चिंचपाडा येथे सम्यक चे कार्यकर्ते गोपाळ गव्हाळे आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मनोहर जगताप  यांनी माया कांबळे यांना अन्नधान्याचे वाटप करण्यासाठी सहकार्य केले. या कार्यकर्त्यांनी ठाणे विभागात हजारो लोकांना सर्व प्रकारची मदत दिली असून अद्यापही ते काम चालू असल्याचे ठाणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा माया कांबळे यांनी सांगितले. सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी ही मोठ्या प्रमाणावर या सामाजिक कार्यात सहभाग घेतला होता. विना बुंदिले, सुरेंद्र ठोके, ज्ञानदेव सुरवाडे, व्ही.डी. सपकाळे, उत्तम गवळी, प्रवीण गोसावी , रघुनाथ जाधव,सविता निकम,तायडे सर ,मेघराज येवले आणि विश्वविकास गायकवाड यांनी मदतीसाठी हातभार लावला. अशी माहिती राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.


पत्रकाराला मारहाण करणाऱ्या पोलिसावर गुन्हा दाखल करा - राजेंद्र पातोडे


अकोला,ब्युरोचीफ दि. २८ :- मास्कची विक्री करतो म्हणून लातूर येथील पत्रकार किशोर सोनकांबळे यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पोलीस निरीक्षक संजय हिबारे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी केली आहे. लातूर येथील पत्रकार किशोर सोनकांबळे यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने ते उदरनिर्वाहासाठी  मिळेल तो व्यवसाय करतात. सध्या कोरोनाच्या काळात मास्कची विक्री करून घरी जात असताना गांधी चौकात  सोनकांबळे यांना पोलीस निरीक्षक संजय हिबारे यांनी  अडवून मास्क विक्री करण्यास विरोध केला. त्यावर सोनकांबळे यांनी आपण चुकीचे करत नसल्याचे सांगितले. यावर संतापलेल्या हिबारेंनी सोनकांबळे यांना शिवीगाळ करून मारहाण केली, तसेच तुरुंगात टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक हिबारे यांच्यावर गुन्हा दाखल करून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी केली आहे. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.


ज्यांच्याकडे राशन कार्ड नसेल यांना सरकार मोफत राशन देणार आहे. शिवसेना उपविभाग प्रमुख विकी लोखंडे यांच्या वतीने मिसारवाडी मधील रहिवाशांना आव्हान.



राशन दुकान वर जास्तित जास्त फॉर्म भरून मिसारवाडी मधील रहिवाशांनी भरून दयावे.





औरंगाबाद,प्रतिनिधी :- औरंगाबाद मधील मिसारवाडी येथील शिवसेना उपविभाग प्रमुख विकी लोखंडे यांनी मिसारवाडी  वासियाना शिवसेना पक्षा तर्फे सूचित केली आहे की, ज्यांच्याकडे राशन कार्ड नसेल यांना सरकार मोफत राशन देणार,आप आपल्या भागातील राशन दुकानावर एक फॉर्म भरून देयचा आहे, आणि तो फॉर्म राशन दुकानावर भेटलं.त्यानंतर त्यांना मोफत राशन भेटणार आहे. जे गरजू असतील त्यांनी फॉर्म भरून द्यायचा आहे.
ज्यांच्याकडे  शिधापत्रिका (राशनकार्ड) नाही. त्यांनाही राशन दुकानातून मिळणार धान्य.त्यांच्याकरिता येणाऱ्या दोन दिवसात 31मे पर्यंत आपल्या जवळच्या राशन दुकानांमध्ये फॉर्म भरून दिल्यानंतर तो फॉर्म  पुरवठा अधिकाऱ्याकडून मंजूर झाल्यानंतर येणाऱ्या दहा तारखेपर्यंत त्यांना त्याच राशन दुकानातून धान्य उपलब्ध होणार आहे.व तसेच फॉर्म भरून राशन दुकानदाराकडे दिल्यानंतर त्याची पोहोच घेणे अत्यंत आवश्यक आहे. तरी सर्वांनी याचा पुरेपूर फायदा घ्यावा.ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही असे आपले शेजारी नातेवाईक मित्र परिवारातील व्यक्ती किंवा कुटुंब त्यांना माहिती करून द्यावी .काही अडचण आल्यास मला संपर्क करावा.विक्क़ी लोखंडे शिवसेना उपविभाग प्रमुख मिसरवाडी  9764197829 यांनी सांगितले आहे.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...