शुक्रवार, २० मार्च, २०२०

वाळुजमहानरात आर्थिक कोंङीतून वाढतेय व्यसनाचे प्रमाण.
 औरंगाबाद वाळुज | प्रतिनिधी वाळुज औद्योगिक वसाहतीत वेगवेगळ्या गावागावातून कामाच्या निमित्तानं अनेकजण या ठिकाणी आले आहेत .
आर्थिक मंदीचया फटकयामूळे या भागात व्यसन आणि गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले दिसते आहे .
आपण जीवन किती जगलोय, या पेक्षा कशा पध्दतीने जगतोय यात आनंदी क्षण लपलेले आहे .त्याचा शोध घेऊन जगणे म्हणजे खरोखरच जीवन यशस्वीपणे जगणे होय, असे म्हणाले तर चुकीचे ठरणार नाही. 'आरोग्यम धन संपदा' या उद्देशाने आपले शरीर सदैव निरोगी ठेवण्यासाठी धङपङ करीत असतो. लहानपणी जन्मलेल्या बाळाला जन्म घुटीपासून सुरू होणारा हा आरोग्य प्रवास हळुवारपणे जलदगतीने धाऊ लागतो.बाल्य, तारूण्य, किशोर आणि वृद्ध अवस्थेत जातांना शरीर पुरेपूरपणे नेटकेपणाने ठेवण्यासाठी प्रयत्नपूर्वक असतो.
माणसाच्या मुलभूत गरजांच्या संबंधित विचार केला तर अन्न, वस्त्र आणि निवारा यातच माणूस आपली सर्व हयात घालवतो.मुलभूत गरजांच्या पुरतीकरता अनेकविध समस्यांचा ङोंगर पार पाङावा लागतो आणि मग यात मानसिक,शारीरिक, भावनिक ताण तनावाचा बळी माणुस पङतो...अन् ताण घालवून तो व्यसनात स्वतःच्या आनंदाला शोधू लागतो.मग व्यसन बिङी,तंबाखू ,गुटखा,मावा,बार, सिगारेट, देशी दारू,बिअर, रम, व्हिसकी,चरस,गांजा,हुकका,  यासारख्या अनेकाचयां मोह जाळ्यात अङकला जातो. कालांतराने मनुष्याला 'आरोग्यम धन संपदा, असे म्हणण्याचयां ऐवजी "आरोग्यम मृत एकदा" असे म्हणाले तर वावगे ठरणार नाही .

निरोगी शरीर ठेवण्यासाठी आवश्यक घटक -आपल्याला नियमित जेवण जसे गरजेचे आहे तसेच नियमित योग्य वयाच्यानूसार योग्य व्यायाम करणे उपयुक्त ठरते
जसे- सकाळी पायीचालणे, योगासने करणे, प्राणायाम करणे,धावणे, निसर्गात राहणे आदीचा समावेश केला जातो.
 आपण 'आरोग्यम धन संपदा' या उद्देशाने आपले शरीर सदैव निरोगी ठेवण्यासाठी धङपङ करीत असतो. लहानपणी जन्मलेल्या बाळाला जन्म घुटीपासून सुरू होणारा हा आरोग्य प्रवास हळुवारपणे जलदगतीने धाऊ लागतो.बाल्य, तारूण्य, किशोर आणि वृद्ध अवस्थेत जातांना शरीर पुरेपूरपणे नेटकेपणाने ठेवण्यासाठी प्रयत्नपूर्वक असतो.
माणसाच्या मुलभूत गरजांच्या संबंधित विचार केला तर अन्न, वस्त्र आणि निवारा यातच माणूस आपली सर्व हयात घालवतो.मुलभूत गरजांच्या पुरतीकरता अनेकविध समस्यांचा ङोंगर पार पाङावा लागतो आणि मग यात मानसिक,शारीरिक, भावनिक ताण तनावाचा बळी माणुस पङतो...अन् ताण घालवून तो व्यसनात स्वतःच्या आनंदाला शोधू लागतो.मग व्यसन बिङी,तंबाखू ,गुटखा,मावा,बार, सिगारेट, देशी दारू,बिअर, रम, व्हिसकी,चरस,गांजा,हुकका,  यासारख्या अनेकाचयां मोह जाळ्यात अङकला जातो. कालांतराने मनुष्याला 'आरोग्यम धन संपदा, असे म्हणण्याचयां ऐवजी "आरोग्यम मृत एकदा" असे म्हणाले तर वावगे ठरणार नाही .
निरोगी शरीर ठेवण्यासाठी आवश्यक घटक -आपल्याला नियमित जेवण जसे गरजेचे आहे तसेच नियमित योग्य वयाच्यानूसार योग्य व्यायाम करणे उपयुक्त ठरते
जसे- सकाळी पायीचालणे, योगासने करणे, प्राणायाम करणे,धावणे, निसर्गात राहणे आदीचा समावेश केला जातो. वाळुज औद्योगिक वसाहत म्हणजे अशिया खंडात नंबर एकचीऔद्योगिक वसाहत म्हणून ओळख आहे .देश आणि प्रदेशातील अनेक नांमवंत कंपनीच्या माध्यमातून याभागात कंपन्यांच्या मोठे वलय आहे .कंपनीच्या वाढीचा फायदा कामगाराला काम मिळविण्यासाठी अधिक सोयीस्कर ठरते. माञ, जागतिक उदयोगात होणारे सातत्याने बदल आणि महागाईचा फटका बसला की, इथल्या कामगारांच्या बाबतीत व्यसनधिनतेचे प्रमाण वाढल्याचे समजते. महागाईचयां तुलनेत कामगारांना मिळणारा मोबदला अत्यं अल्प आहे.त्यात सर्व मुलभूत गरजा भागविण्यासाठी करावी लागणारी कसरत न करू शक्यता जाणवले असता कामगारांच्या बाबतीत व्यसन करण्याचे प्रमाण वाढलेले आहे .परीणामी वाळूज औद्योगिक वसाहतीत यामूळे औरंगाबाद शहराच्या तुलनेत सगळ्यात जास्त गुन्हे नोंदणी होतांनाचे बोलले जात आहे .
वाळूज कामगार वसाहतीत  अगोदर बारा तास काम करणारा कामगार आता त्यातुलनेत आठच तास काम करतो.'अधिक काम,अधिक मोबदला ' हि संकल्पना खाजगीकरणांचया उंबरठयावर बहुसंख्य कंपनीच्या माध्यमातून बंद झालेल्याचे कळते आहे .या मानसिक तणावाने वाळुज परीसरात असणारा कामगार व्यसनातून आपले शिण घालवतांना अनेक मदयालयाचयां निरीक्षणातून समजते आहे .
वाळूज वसाहतीत पंचताराकिंत हाँटेल,बार, देशी दारूचे दुकान म्हणजे इथल्या बङयां राजकीय वरदान असणाऱ्याची मक्तेदारी होऊन बसलेली आहे .
वाळूज औद्योगिक वसाहतीत सदयस्थितीत 'आंधळ दळत,आणि कुञ पिठ खात',  अशी गत लक्षात येत आहे .उदयोगाचे साधने अत्यंत कमी झालेल्या असल्याने कामगार हवालदिल बनला आहे .
शासकीय ,प्रशासकीय यंञणेनी याबाबतीत चुपी साधलेली आहे .
त्यामूळे विकासाच्या वाटा खुंटलेलयां दिसत आहे .
या वसाहतीचयां तुलनेत अनेक कामगार संघटना सतत कामगारांच्या समस्यांना वाचा फोङणयांसाठी धङपङ करीत आहेत .माञ, कामगारांच्या संघटनेच्या बाबतीतही व्यसनाला आळा घालण्यासाठीचे कोणतेही नियोजन आजतागायत धूसरपणे सुद्धा यशस्वी झाले,असे औद्योगिक वसाहतीचयां बाबतीत उमजलेले नाही .
यामूळे कामगारांच्या समस्यांचा पाढा कोणीही वाचण्यासाठी समोर येण्यासाठी तयार नसल्याचे कामगार वर्गात बोलले जात आहे .वाळुज औद्योगिक वसाहतीत मोरे चौक,महाराणा प्रताप चौक,कोलगेट चौक,कामगार चौक, राजणगांव फाटा,कमळापूर फाटा,मुंबई हायवे, आदी भागात राञीचयां वेळी कामगारांच्या समस्यांचे चिञ बघणयां सारखे असते, असे परीसरातील नागरिकांत चर्चा सुरू आहे .
वाळुज औद्योगिक भागातील एकदंर परस्परसंबंध पाहता,
'तोंड दाबून बुकयांचा मार' अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे समजून येत आहे .या भागातील नागरिक ,कामगार ,विद्यार्थी , महिला,सामाजिक कार्यकर्ते आदीचयां माध्यमातून व्यसनाला आळा बसविणयासाठी प्रयत्न सुरू झालेला असतांना परिस्थितीत बदल करण्यासाठी जबाबदाऱ्या असणाऱ्यानी लक्ष घालावे ,अशी नागरीकातून मागणी केली जात आहे .



प्रा.संजय काळे,आर.एच-२९७ शिवालय चौक, बजाजनगर
8698747144
साप्ताहिक संपादक संघाचे संस्थापकअध्यक्ष पदी विकास बागडी                               यांची बिनविरोध निवड.
जालना /प्रतिनिधी- जालना जिल्हा साप्ताहिक संपादक
संघाच्या अध्यक्षपदी विकास बागडी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यात एकही साप्ताहिक संघटना कार्यरत नसल्याने आज शुक्रवार दि. २० मार्च रोजी एका छोटेखानी कार्यक्रमात जालना जिल्हा साप्ताहिक संपादक संघ या नावाने संघटना स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली.संस्थापक अध्यक्ष विकास बागडी, सचिव शाहनवाज कुरेशी, सहसचिव सय्यद अफसर, उपाध्यक्ष नवनाथ जोगदंड, सय्यद करीम, कोषाध्यक्ष खलील खान, सहकोषाध्यक्ष मुकेश परमार्थ, सदस्य राजेश गौड, नरेश धारपवळे, दिनेश नंद, इमरान खान, शेख मुजीबोद्दीन, रमेश गंगोदक, शेख राजमोहम्मद, अशपाक पटेल, शेख नबी, गोकुळ स्वामी आदींची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दरम्यान,साप्ताहिक संपादक संघाची पुढील महिन्यात एक व्यापक बैठक घेण्यात येणार असून या बैठकीत   साप्ताहिक संपादक संघाच्या कार्यक्रमाची रुपरेषा आणि भविष्यात पत्रकारांसाठी राबवण्यात येणार्‍या योजनांबाबत माहिती देऊन सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे नूतन संस्थापक अध्यक्ष विकास बागडी यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, नुतन पदाधिकार्‍यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. या बैठकीस बहुतांश साप्ताहिक संपादकांची उपस्थिती होती.
      अवैद्य वाळू चोरी रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यात 42 चौक्याची               स्थापना प्रत्येक वाळू वाहनाची होणार तपासणी.
नांदेड /प्रतिनिधी (भगवान कांबळे) :-जिल्ह्यात
एकाही वाळू घाटाचा लिलाव झाला नसताना मोठ्या प्रमाणात सुरू असलेली वाळू चोरी आणि अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी महसूल आणि पोलीस विभागाने जिल्ह्यात ४२ ठिकाणी संयुक्त चौक्या उभारल्या आहेत. या ठिकाणाहून जाणाऱ्या प्रत्येक वाळू वाहनांची तपासणी केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.जिल्ह्यात वाळूची चोरी मोठ्या प्रमाणात होत असल्याची बाब पुढे आली आहे. याबाबत राजकीय कलगीतुराही अनेकदा रंगला आहे. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी वाळूमाफियांच्या मुसक्या आवळण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. नूतन जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटणकर यांनी जिल्ह्यातील वाळू चोरीचा विषय गांभीर्याने घेताना जिल्ह्यातील सर्व विभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यांची बैठक घेवून वाळू चोरीवर आळा घालण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ४२ चौक्या उभारण्यात येणार आहेत. या चौक्यांमध्ये नांदेड तालुक्यात ८ चौक्या राहणार आहेत. त्यात असर्जन येथील जुना जकात नाका, निळा रोड येथील जयभवानी चौक, वाय पॉर्इंट, पासदगाव येथील जाधव पेट्रोलपंप, कामठा येथील शंकरराव चव्हाण चौक, ब्रह्मपुरी येथील बोंढार ब्रीजजवळ, धनेगाव चौरस्ता येथील वाघाळेकर पेट्रोलपंप, हस्सापूर टी पॉइंट आणि वाजेगाव चौरस्ता येथे चौक्या राहणार आहेत.भोकर तालुक्यात उमरी टी पॉइंट, उमरी रोड, मुदखेड तालुक्यात आमदुरा, हदगाव तालुक्यात उमरखेड पॉइंट, बामणी फाटा आणि तामसा येथे तामसा चौक, हिमायतनगर तालुक्यात पळसपूर चौक, कामारी चौक, किनवट तालुक्यात कोठारी चि., घोटी, माहूर तालुक्यात केरोळी फाटा, लांजी पॉइंट, कंधार तालुक्यात गोळेगाव पाटी, तेलूर फाटा, लोहा तालुक्यात शिवाजी चौक लोहा, माळेगाव, सोनखेड आणि मारतळा (हातणी पाटी), देगलूर तालुक्यात सांगवी उमरी गावात शेवाळा नंदूर रस्त्यावर, धर्माबाद तालुक्यात बाभळी चौक, राजापूर, सिरजखोड फाटा, उमरी तालुक्यातील कारेगाव फाटा, बळेगाव चौक, हातणी चौक, बिलोली तालुकतील हुनगुंदा, जुने गावठाणजवळ, येसगी मांजरा नदीजवळील पुलाजवळ, आदमपूर, नरसी ते देगलूर रोडवर, आदमपूर कमान, लोहगाव फाटा आणि  नायगाव तालुक्यातील वजिरगाव फाटा, बळेगाव व गडगा येथे या चौक्या राहणार आहेत. वाळू वाहतूक होणाऱ्या भागांचा आढावा
जिल्हाधिकारी डॉ. ईटणकर यांनी ज्या भागातून वाळू वाहतूक होते त्या भागातील चौक्यांची माहिती मागवली होती. या चौक्यावर पोलीस, महसूल  आणि प्रादेशिक परिवहन विभागाचे संयुक्त पथक तैनात करण्याची घोषणाही त्यांनी केली होती. पोलीस व महसूल विभागाने संयुक्त पाहणी करुन पहिल्या टप्प्यात ४२ चौक्यांची ठिकाणे निश्चित केली असल्याचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी सांगितले. या चौक्यांमध्ये आणखी वाढ केली जाईल, असेही मगर यांनी सांगितले. 
जिल्ह्यातील सर्व अस्थापना व दुकाने 21व 22 मार्च रोजी बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्याचे आदेश.                                          जालना प्रतिनिधी   :- जिल्ह्यात कोरोना विषाणूचा
 प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून नागरिकांची एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी दि. 21 व 22 मार्च, 2020 रोजी जिल्ह्यातील सर्व आस्थापना व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, जालना रवींद्र बिनवडे यांनी दिले आहेत.  यामध्ये अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आस्थापनांना सुट देण्यात आली असुन शासकीय, निमशासकीय कार्यालये, पिण्याचे पाणी पुरवठा सांडपाणी निचरा व्यवस्थापन करणाऱ्या आस्थापना, सर्व बँका, दुरध्वनी व इंटरनेट सेवा पुरवठा करणाऱ्या आस्थापना, रस्ते वाहतुक व रेल्वे व्यवस्था, अन्न, भाजीपाला व किराणा पुरविणाऱ्या आस्थापना, दवाखाने, वैद्यकीय केंद्र व औषधी दुकाने, विद्युत पुरवठा, ऑईल व पेट्रोलियम व ऊर्जा संसाधने व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आय.टी. आस्थापना *वगळता* एमआयडीसीमधील कारखाने व ईतर सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुहावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंडसंहिता 1860 चे कलम 188 नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.
अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त कृष्णा दाभाडे याच्यावर केलेल्या कारवाईमुळे
 छावा क्रांतिवीर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक अधीक्षकांची भेट घेऊन मानले आभार.
प्रतिनिधी | बीड  अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त दाभाडे याच्यावरती केलेली कारवाही प्रशंसनीय असून
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्य गौरवास्पद आहे.असे बोलताना छावा क्रांतिवीर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. छावा क्रांतिविर सेनेच्या माध्यमाने वेळोवेळी नियोदन देऊन पण हे आधिकारी काही कार्यवाही करत नव्हते यासिठी छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने जिल्हा आधिकारी कार्यलयासमोर उपोषन हि केले. तरी हे आधिकारी कार्यवाही करु हे पण लिहुन देण्यासाठी तयार नाहीत,याचे कारण लाच लुचपत प्रतिबंधक अधीक्षकांच्या कार्यवाही मुळे स्पष्ठ झाले.
म्हणुन छावा क्रांतिवीर सेना बीड  जिल्हा  वतिने लाच लुचपत विभाचे आभार मानले.
यावेळी उपस्थित छावा क्रांतिवीर सेना  जिल्हाप्रमुख राहुल चाळक, अविनाश तांदळे, मुक्ताराम मोटे , ऋषिकेश परदेशी,संचार उमप,सोमनाथ मोटे,आदी उपस्थित होते.


सदर बाजार पोलीसांची धडाकेबाज कारवाई पकडली देशी-विदेशी दारु चा अवैध साठा जप्त
जालना प्रतिनिधी :- सदर बाजार पोलीसांची 
धडाकेबाज कारवाई केली आहे. व कार्यवाहीत देशी-विदेशी दारु चा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे.स्वत:च्या राहत्या घरातून गैर मार्गाने अवैध मद्य विक्री करणाऱ्या एका पुरुषासह दोन महिलांना ताब्यात घेत त्यांच्याकडून तब्बल 48 हजारांचा मुद्देमाल सदर बाजार पोलीसांनी जप्त केला आहे. शहरातील संग्राम नगर व लोहार मोहल्ला या ठिकाणी बुधवारी (ता.18) पोलीसांनी ही कारवाई केली. याबाबत सविस्तर माहती अशी की, जालना शहरातील संग्रामनगर परिसरातील सोनु बाबुलाल ढोलके (वय 27) व लोहार मोहल्ला परिसररातील दोन महिला हे त्यांच्या राहत्या घरातून अवैध मद्य विक्रीचा व्यवसाय करित असल्याची गोपनिय माहिती सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांना एका खबऱ्याद्वारे मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक गणेश झलवार यांचे एक पथक लोहार मोहल्ला व संग्रामनगर परिसरात पाठविण्यात आले होते.संबंधीत आरोपींच्या घरावर पोलीसांनी छापा मारला असता तिन्ही ठिकाणी दारुचा अवैध साठा आढळून आला. यामध्ये विविध कंपन्यांच्या विदेशी दारुचे 4 खोके, तर देशी मद्याचे 8 खोके पोलीसांनी या तीघांच्या घरातून जप्त केले आहेत. जप्त केलेल्या मद्याची किंमत ही चालु बाजारभावानूसार 48 हजार असून संबंधीत आरोपीविरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात दारुबंदी कायद्यानूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस अधिक्षक एस. चैतन्य, अतिरीक्त पोलीस अधिक्षक समाधान पवार, उप विभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पोलीस उपनिरीक्षक गणेश झलवार, कर्मचारी अशोक जाधव, दिपक घुगे, समाधान तेलंग्रे, सोपान क्षिरसागर, बंटी ओहोळ, रमेश फुसे, महिला कर्मचारी सिंधु खर्जुले आदींनी ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

कर्जत येथे ग्रामपंचायत च्या वतीने कोरोणा व्हायरस संदर्भात ग्रामस्थांमध्ये जनजागृती चे आयोजन.
अंबड / प्रतिनिधी :- राज्यभरात कोरोना विषाणूचा
प्रादुर्भाव दिसून येत आहे. या आजराचा प्रादुर्भाव ग्रामिण भागात पोचू नये, कोरोना विषाणूंचा प्रसार थांबवण्यासाठी दिनांक 21/03/2020 ते 31/03/2020 या कालावधीत गावातील लग्न, किर्तन, प्रवचन,हरिनाम सप्ताह, सांस्कृतिक कार्यक्रम, मेळावे, शिबिरे, कार्यशाळा ज्यासाठी दहापेक्षा ( 10 ) जास्त लोक एकत्र येतील असे कुठलेही ही सार्वजनिक कार्यक्रम ग्रामपंचायतीचे हद्दीत आयोजित करण्यात येऊ नये.सर्व ग्रामस्थांनी स्वतः बरोबर कुटुंबाची तसेच गावाची काळजी घ्यावी.मुंबई पुणे नागपूर औरंगाबाद  अशा शहरांमधून बाहेर गावावरून आलेले विद्यार्थी व नागरिकांनी ग्रामपंचायत मध्ये नाव नोंदणी करून जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी या आदेशाचे उल्लंघन करन्यात येऊ नये याची गांभीर्याने नोंद घ्यावी व व ग्रामपंचायतीस तसेच सामाजिक व राष्ट्रीय कार्यास सहकार्य करावे आणि शासनाच्या नियमावली चे पालन करा.अशी विनंती कर्जत येथील सरपंच श्रीहरी पाटील डोंगरे,माजी सरपंच विजय डोंगरे, भारत वाघ, गोविंद वाघ,  उमेश डोंगरे,यांनी ग्रामस्थांना केली.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...