गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२०

 निर्णय न घेतल्यास 10 ऑगस्ट नंतर रस्त्यावर उतरू - प्रकाश आंबेडकर



पुणे,ब्युरो चीफ - राज्यातील कोरोना रुग्णांना चांगले औषध द्या,  उरलेल्या ९५ टक्के लोकांना का कैद करून ठेवत आहे. राज्यातील एसटी बस सेवा सुरु करा. टपरीवाले, फेरीवाले यांना स्वतःचे आयुष्य सुरू करू द्या, महाराष्ट्राला आता निर्णयाची गरज आहे. शासनाने 10 ऑगस्टपर्यंत निर्णय न घेतल्यास वंचित बहुजन आघाडी कोणत्याही वेळेला रस्त्यावर उतरेल ,असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला. पुणे येथील पत्रकार संघात आज झालेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली.


ज्यांना कोरोना झाला आहे, त्यांच्यावर चांगले उपचार करा, त्यांना चांगले औषध द्या, मात्र ५ टक्के लोकांसाठी तुम्ही ९५ टक्के लोकांना का कैद करून ठेवत आहेत, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. पुणे येथील पत्रकार संघात आज झालेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर बोलत होते. राज्यात दहा हजार राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा विचार प्रशासन करीत आहे. त्यापेक्षा राज्य परिवहन सेवेला सुरुवात केली तर कर्मचारी कपात करण्याची वेळ येणार नाही. मुंबईत अर्ध्यापेक्षा जास्त बस सुविधा सुरू करायला पाहिजे त्या अद्यापही झालेल्या नाहीत. मुंबईसह इतर मनपा क्षेत्रातही बस सेवा सुरू करण्याची आता गरज आहे. त्याचबरोबर टपरीवाले, फेरीवाले यांना आता स्वतःचे आयुष्य सुरू करू द्या. आज महाराष्ट्राला निर्णयाची गरज आहे. शासनाने दहा ऑगस्ट पर्यंत निर्णय घेतला नाही तर वंचित बहुजन आघाडी केव्हाही आणि कधीही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला. यावेळी त्यांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची आकडेवारी व कोरोना नसतांना मृत्युमुखी पडलेल्यांची आकडेवारी जाहीर करून हे दाखवून दिले की कोरोना नसताना अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत. म्हणजेच कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या कमी असल्याचे त्यांनी कागदोपत्री पुराव्यानिशी दाखवून दिले. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली. 


शेट्टींच्या स्वाभिमानीचा  "सुधीर कथले" आता बाळासाहेबांच्या वंचितचा शिलेदार


बीड,ब्युरो चीफ - वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कार्यालय या ठिकाणी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आक्रमक आणि लढाऊ नेते सुधीर कथले यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाला सर्वोच्च मानत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.

बीड जिल्ह्याचे कृतिशील जिल्हाध्यक्ष प्रा. शिवराज बांगर यांच्या कृतिशीलतेवर  विश्वास ठेवात वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानीचा झेंडा खाली ठेवून वंचित बहुजन आघाडीच्या संघर्षाचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतला. "यापुढे जो संघर्ष आजपर्यंत मी शेतकऱ्यांसाठी केला तो संघर्ष येणाऱ्या काळामध्ये वंचितांसाठी करणार असून, अनेक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी हे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बीड जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे. अशी माहिती सुधीर कथले यांनी दिली.

अंबड शहरातील ओमशांती कॉलनीतील मुख्य रस्त्याला तळ्याचे स्वरूप


अंबड नगरपालीकेचं पावसाळी पुर्व काम पाण्यातच 

अंबड प्रतिनिधी :- अंबड शहरातील ओमशांती कॉलनी मधील हा रस्ता शॉटकट मार्ग या नावाने प्रचीत आहे.या शॉटकट मार्गाने पोलीस ठाणे, उपविभागिय कार्यलय, न्यायालय, एसबीआय बँक, भाजीमंडी, नगरपालीका,ओमशांती विद्यालय,कॉलेज, महीला बचत गट भारत फायन्स आणी मुख्य बाजारपेठे कडे जानारा हा शॉटकट मार्ग आहे.महिला बचत गट भारत फायन्स हे जवळच असल्याने  येथे महिला पादचार्यांची रेलचेल असते.व ग्रामीण भागातील वाहनचालक याच शॉटकट मार्गाने जाण्यास पंसद करतात.पंरतु याच रहदारीच्या शॉटकट मुख्य रस्त्यावर पावसाचे पाणी जमा झाल्याचे दिसुन येत आहे.पाण्याला जायला वाटच नसल्यामुळे याठिकाणी तळ्याचे स्वरूप आलेले आहे.पादचार्यांना तर या घाणपाण्यातुनच जावे लागत आहे.याचा सर्वाधिक फटका लहान बालके,अबालवृध्द व महिंलाना बसत आहे.वाहनचालकही याच पाण्यातुन मार्गक्रमण करत आहेत.यांची फजिती होत असल्याचे दिसुन येत आहे.


या ठिकाणी रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे पाण्यातुणच जाण्यावाचुन पादचारी आणी वाहनचालकांना गत्यंतर राहत नाही.अंबड नगरपरिषदेच्या पावसाळी पुर्व नियोजनाचा अभाव व हलगर्जीपणा दिसुन येतो एका ठिकाणी जास्त काळ पाणी राहील्यास अस्वस्थता पसरून डासाचा प्रादुर्भाव वाढु शकतो.यातुन रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे या कोरोना च्या काळात जास्त स्वच्छतेवर भर देणे आवश्यक आहे.पंरतु अंबड नगरपालीका कडुन ठोस उपाय योजना केल्या जात नाही. याबाबत नगरपालीकाचा कारभार हाकणाऱ्यां पुढाऱ्यांनी वेळीच कार्यतत्परता दाखवून ओमशांती कॉलनीतील आरोग्य धोक्यात येणार नाही याची काळजी घ्यावी.अशी ओमशांती कॉलनीतील रहवासी जोरदार मागणी करत आहे


  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...