मंगळवार, २८ जुलै, २०२०

कलाठिया कंपनी चा गौण खनिज (दगड) उत्खनन व वाहतुकीच तातपुरता परवाना समाप्त झाला असून तरी ही उत्खनन सुरु - राहुल व्ही खरात


अंबड,प्रतिनिधी :- में कलाठिया इंजीनियरिंग ऐंड कंस्ट्रक्शन ली.अहमदाबाद गुजरात या कंपनीस पाचोड-अंबड,घनसावंगी, आष्टी रसत्याच्या कामा करिता दगड या गौण खनिजाच्या 7000 ब्रास इतक्या मर्यादा व वाहतुकीसाठी अल्प मुदतीचा तातपुरता खांनपट्टा परवाना दिलेला होता.त्याची काढण्याची मुदत दि.5/6/2020 पासून ते मुदत दि.20/6/2020 पर्यंत सम्पात होत आहे.सदरिल खान ही मौजे वलखेड़ा गट न.25 आणि 31मध्ये परवानगी देण्यात आली.दगड काढण्याची मुदत समाप्त होऊन एक महीना उलटला तरी देखील उत्खनन सुरुच आहे.
कलाठिया कंपनीला 7000 ब्रास गौण खनिज दगड काढण्याची परवानगी आहे.म्हणून संबधित अधिकारी यांनी कलाठिया कंपनीचा चाललेला भोंगळ कारभार तात्काळ बंद करावा.आणि स्थल पंचनामा करुण ती खान सिल करण्यात यावीत.शासनाने दिलेल्या परवानगी ची पायमल्ली कलाठिया कंपनी करत आहे.त्यामुळे कंपनीवर दंडात्मक कार्यवाही करण्यात यावीत.तसेच वाहतुकीसाठी शासकीय वाहतुक पासेस खनिकर्म अधिकारी यांच्या कडून घेण्यात आल्या का? यांची ही तपासणी करण्यात यावी.दगड उत्खनन परवानगी ची मुदत संपुन ही कलाठिया कंपनी राजरोज पणे सर्व नियम धाब्यावर बसवत आहे.
मर्यादा पेक्षा एक महीना जास्त दगड उत्खन करून अवैध रित्या काढलेला दगड कुठे नेण्यात आला?आणि विशेष म्हणजे या वर नियंत्रण ठेवनारी महसूल यंत्रणा गप्प का?तसेच परवाना दिला असल्याची माहितस्तव प्रत संबधित मंडल अधिकारी,तलाठी यानां ही वरिष्ठ अधिकारी यांच्या कडून देण्यात आलेली असते ,मग मुदत संपुन एक महीना उलटला तरी सुद्धा उत्खनन सुरु कसे ?आसे मत रिपब्लिकन सेना युवा जिल्हा आध्यक्ष राहुल व्ही खरात यांनी प्रसिद्धि पत्रकात व्यक्त केले आहे.

कोळी समाजाला न्याय देणाऱ्या वंचितच्या ज्येष्ठ नेत्या, सुमनताई कोळी यांचे निधन.


अकोला,ब्युरो चीफ :- वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश महिला सचिव तथा कोकण निरीक्षक, कोळी महासंघाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षा सुमनताई कोळी यांचे काल दुःखद निधन झाले.
वंचित बहुजनांचा आवाज समजल्या जाणाऱ्या तसेच सातत्याने कोळी समाजाचे प्रश्न मांडून त्यांना न्याय देणाऱ्या सुमन ताई कोळी यांचे दुःखद निधन झाले. कोकणात त्यांनी महिलांच्या माध्यमातून मोठा गट तयार केला होता. तसेच त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेची निवडणूक रायगड मधून लढवली होती. त्यांच्या जाण्याने आमच्यात एक पोकळी निर्माण झाली आहे.
ताईंच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख पेलण्याची ताकद मिळो. अशा शब्दात वंचित बहुजन आघडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.


  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...