सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२०

   महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना टेंभुर्णी व                    तीर्थपुरी येथे आधार प्रामाणिकरणास प्रारंभ

जालना, दि. 24 - महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्याच्या टेंभुर्णी तर घनसावंगी तालुक्याच्या तीर्थपुरी या गावातील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणिकरण करून कर्जमुक्त प्रथम शेतकरी पंढरीनाथ महादू धारे यांना आधार प्रमाणित नोंद प्रमाणपत्र देऊन या योजनेचा शुभारंभ आज  दि. 24 फेब्रुवारी रोजी टेंभुर्णी येथील आपले सरकार सेवा केंद्र येथे करण्यात आला.यावेळी सहाय्यक निबंधक श्रीमती कल्पना शहा, चेअरमन रावसाहेब अंभोरे, जिल्हा सहकारी बँकेचे भागचौकसनिस देविदास दंदाले, गटसचिव गणेश चव्हाण, विष्णू डोईफोडे, भुंजगराव पिंपळे, शालिक बनकर, सरपंच गणेश धनवाई, भिकन खाँ पठाण, अंकुश देशमुख, हरिभाऊ सोनसाळे, गोरखनाथ राऊत आदींची उपस्थिती होती.
महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत आज जिल्ह्यातील टेंभुर्णी व तीर्थपुरी येथील आधार प्रमाणिकरण कामाची पथदर्शी योजना हाती घेतली असून या दोन गावातील थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या पूर्ण झाल्या असून त्यांच्या आधार प्रमाणिकरणाच्या कामाचा शुभारंभ आज झाला. टेंभुर्णी व तीर्थपुरी येथील प्रत्येकी 551 अशा एकुण 1 हजार 102 पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर असून त्यांचे आधार प्रमाणिकरण केले जाणार आहे. या दोन गावातील यादी प्रसिद्धीनंतर काही अडचणी  असतील तर त्याची माहिती शासनाला सादर करण्यात येणार आहे. यात शेतकऱ्यांनी ऑनलाईन माहितीची खातरजमा करुन कर्जमुक्तीसाठी सहमती दर्शवायची आहे.  जिल्ह्याभरातील सर्व गावांची अंतिम यादी येत्या 28 किंवा 29 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सांगितले. 
 जालना जिल्हाधिकारी कार्यालयात संत गाडगेबाबा महाराजांना अभिवादन.
जालना,प्रतिनिधी:-दि.23-  रोजी संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंती  निमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात
  अपर जिल्हाधिकारी रविंद्र परळीकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.यावेळी तहसीलदार संतोष बनकर, श्री गिरी, श्रीमती संपदा कुलकर्णी, श्रीमती छाया कुलकर्णी, श्रीमती प्रतिभा इंगळे तसेच प्रशासकीय इमारतीमधील विविध कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थित होते.

 छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने उद्या दिनांक 25- 2 -2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन.
                            || आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान ||
बीड | उमेश वाटमोडे  छावा क्रांतिवीर सेना बीड जिल्हा च्या वतीने उद्या दिनांक 25- 2- 2020 रोजी सहाय्यक आयुक्त आणि औषध प्रशासन यांच्या विरोधात धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 11 ते 1 या वेळेत होणार आहे हे आंदोलन मा.श्री.करण (भाऊ) गायकर संस्थापक अध्यक्ष यांच्या आदेशावरून व अनिल (दादा) राऊत प्रदेश सरचिटणीस आणि रामेश्वर (अण्णा) बावणे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन होणार आहे.
 प्रमुख्याने मागण्या पुढील प्रमाणे -
1)निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या  व्यावसायिकांवर कारवाई करण्यात यावी.
२)गेवराई शहरात व गावनिहाय होत असलेली भेसळ थांबवण्यासाठी व भेसळ करत असलेले दुकान चालकांच्या हॉटेल चालकांनी चौकशी करून कारवाई करणे.
३) जीवनावश्यक वस्तू रास्त दराने सहज उपलब्धतेची खात्री करणे.
४) सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी साठवण निर्मिती करणे.
५) ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 ची अंमलबजावणी करून ग्राहकाच्या हिताचे ग्राहकाच्या हिताचे संरक्षण व संवर्धन करणे व आपला लेखी अभिप्राय संघटनेचे तक्रार धारकास देणे.
-  अशा इत्यादी मागण्या घेऊन उद्या छावा क्रांतिवीर सेना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहे या आंदोलनासाठी जास्तीत जास्त संख्येने पदाधिकाऱ्यांसोबत नागरिकांनी उपस्थित राहावे.
 असे आव्हान छावा क्रांतिवीर सेना बीड जिल्ह्याच्या वतीने केले जात आहे.
राहुल चाळक -जिल्हाध्यक्ष, मुक्ताराम मामा मोटे-जिल्हा सरचिटणीस,अविनाश तांदळे- शे.आघाडी जिल्हाध्यक्ष, ऋषिकेश परदेशी -जिल्हा कार्याध्यक्ष, प्रल्हाद उजागरे- चित्रपट आघाडी जिल्हाध्यक्ष, संतोष राऊत -उपजिल्हाध्यक्ष, पंढरीनाथ शिंदे- तालुकाध्यक्ष बीड, संतोष शेळके- बीड दीलीप मोटे- तालुकाध्यक्ष गेवराई, जयराम काळे - युवा तालुकाध्यक्ष गेवराई, लक्ष्मण सटले-शे.आघाडी तालुकाध्यक्ष, बाबा खोत सोमनाथ मोटे नरसिंग पालेकर, विशाल मोटे,गणेश लोणके,
(SDM) उपविभागीय कार्यालयासमोर तीन दिवसापासून 
मुस्लिम बांधवांचे धरणे आंदोलन देशाची राजधानी दिल्ली येथे बीजेपी सरकारच्या विरोधात NRC/CAA व इतर
असंविधानिक कायदा रद्द करावा
अंबड/प्रतिनिधि : देशाची राजधानी दिल्ली येथे BJP सरकारच्या विरोधात  NRC/CAA व इतर असंवेधानिक कायदा रद्द करावा.
  या प्रमुख मागणीसाठी सर्व मुस्लिम बांधव धरने आंदोलन करीत असून त्या धरती वर अंबड येथील (SDM) उपविभागीय कार्यालया समोर तिन दिवसांपासून धरने आंदोलन सुरु आहे. या धरने आंदोलनाला बहुजन समाज पार्टीचा जाहिर पाठिबा देण्यात आला. व याकड़े सरकारने लक्ष न दिल्यास  BSP तीव्र आंदोलनाचा इशारा दिला उपस्थित चंद्रकांत कारके (BSP जिल्हाप्रभारी), रंजीत  कांबळे, शकील पठाण, वासिम तंबोळी, लालखा पठाण, राहुल कारके, सर्व मुस्लिम बांधव, है उपस्तित होते.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...