गुरुवार, १८ जून, २०२०

उदगीर ग्रामीण पो.स्टेशनच्या हद्दीत  दावणगाव  कुमदाळ शिवारात अढळला अर्धवट जळालेला मृतदेह


  उदगीर: ता. प्रतिनीधी (जीवन भोसले) हँलो रिपोर्टर
प्राथमिक मिळालेली माहीती असी कि, उदगीर तालूक्यातील  दावणगाव व कुमदाळ (हेर)  शिवारात  एका 25 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा अर्धवट जळालेला मृतदेह अढळला असून  ही माहीती दावणगाव येथिल पो. पाटील भदरशेट्टे यांना मिळाली असता त्यांनी उदगीर पोलीसांना सदर घटनेच्या संदर्भात माहीती दिली .
उदगीरचे पोलीस उपविभागीय अधिकारी मधुकर जवळकर  व ग्रामीणचे पोलीस निरीक्षक  दिपककूमार वाघमारे  व त्यांच्या टिम ने तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन मृतदेह ताब्यात घेतला . सदर मृतदेह मोठ्या प्रमानात जळाल्या मुळे त्याची ओळख  पटली नाही ,सदर घटनेचा पंचनामा सुरू आहे.
दावणगाव ते करखेली जाणारा  रोडलगत  दावणगाव कुमदाळ हेर, शिवारात  25 वयोगटातील इसमाचा कोणीतरी  अनोळखी व्यक्तीने   मारून टाकुन, त्याला जाळले आहे, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने  त्याला या ठिकानी टाकला आहे. अनोळखी मृतदेह आढळल्याची  फिर्याद दिली असता  त्याचा   पुढील तपास  चालु   आहे असे ग्रामीण पो. स्टेशनचे  पोलीस निरीक्षक दिपककुमार  वाघमारे यांनी सांगीतले.


जालना जिल्ह्यातील उप विभागीय अभियंता दूरसंचार कार्यालय परतूर येथे लॉकडाऊनचे निमित्त करून ३ महिन्यापासून कामात हलगर्जीपणा केल्यामुळे यांच्यावर  कारवाई करावी - प्रकाश सोळंके




जालना,ब्युरोचीफ :- जालना जिल्ह्यातील, परतुर दूरसंचार कार्यालयातील उप विभागीय अभियंता तीन महिन्यापासून हेडकॉटरला थांबत नाहित, यामुळे शासकीय कार्यालयातील नेटवर्क कनेक्शन बीएसएनएलच्या असल्यामुळे कामकाज ऑनलाईन काम करतांनी अनेक वेळा अडथळे निर्माण कामकाजात विलंब होत असल्यामुळे जनतेचे व शासकीय ऑनलाइन काम करणाऱ्यांचे  मोठे नुकसान होत आहे, या दूरसंचार यंत्रणेचा आहे खासगी दूरसंचार कंपन्यांचे काही आर्थिक संबंध आहे का ? अनेक वेळा दूरसंचार चे ग्राहक ऑफिस मध्ये जाऊन बीएसएनएल सेवेबद्दल तक्रार केल्यास स्थानिक उपलब्ध असल्याने अधिकारी सिम कार्ड दुसऱ्या कंपनीचा घ्या असे स्पष्ट उत्तर देतात, याचीसुद्धा चौकशी होणे गरजेचे आहे, अनेक वेळा बीएसएनएल रेंज नसते, खाजगी कंपन्या जेवढे सेवा देण्यासाठी सतर्क राहतात तेवढे बीएसएनएल अधिकारी सेवा देण्यास निष्काळजीपणा करतानी दिसत आहे, केंद्र सरकार दूरसंचार यंत्रणेवर एवढा मोठा खर्च करीत आहे, परंतु दूरसंचार अधिकारी याचा गैरफायदा घेऊन दूरसंचार वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिशाभूल करीत आहे, 


परतूर येथील उपविभागीय दूरसंचार अधिकारी व त्यांची यंत्रणा सतत गैरहजर असल्याने बीएसएनएल सेवा अनेक वेळा खंडित होऊन बीएसएनएल ग्राहकांना खूप मोठा मानसिक त्रास सहन करावा लागतो, परतुर येथील दूरसंचार अधिकाऱ्यांना दूरसंचार विभागाने राहण्यासाठी कॉटर्स उपलब्ध करून दिलेले आहेत, परंतु हे कोर्टस नुसते नावाला असून याठिकाणी अनेक दूरसंचार अधिकारी हेडकॉटर थांबत नसून औरंगाबाद याठिकाणी जाणे-येणे करतात, या तीन महिन्यात ते कार्यालयात दोन किंवा तीन वेळा आले असतील, बाकी ते कोठे काम करतात हा खरा चौकशीचा विषय आहे, परतुर येथील उपविभागीय दूरसंचार कार्यालयातील परिसरात कोठेही सी सी टीव्ही कॅमेरे लावल्याने नाहीत, कारण सीसीटीव्ही कार्यालयात असल्यास कोण कामावरती येऊ आपले कर्तव्य पार पाडीत आहेत हे कॅमेरा कैद होईल म्हणून या ऑफिसमध्ये सी सी टीव्ही कॅमेरे नाहीत.*
जालना जिल्ह्यातील परतुर येथील दूरसंचार उपविभागीय अधिकारी यांच्यासह यांची यंत्रणा कामात हलगर्जीपणा करीत, तीन महिन्यापासून कार्यालयात अनेक वेळा हजर नसल्यामुळे यांच्यावर कारवाई करण्यात अशी मागणी
मनसे जिल्हाध्यक्ष जालना प्रकाश सोळंके यांनी निवेदनात म्हटले आहे.
               


                                        

प्रकाश आंबेडकरांनी अरविंद बनसोडच्या कुटुंबियांची घेतली भेट!


न्यायालयीन लढाईत आम्ही सोबत


नागपूर,ब्युरोचीफ :- अरविंद बनसोड हत्याप्रकरणी आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. शिवाय आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, यासाठी वकिलांशीही भेटून चर्चा केली.उच्चशिक्षित अरविंद बनसोड यांची हत्या 27 मे रोजी नागपूरमध्ये करण्यात आली होती. या प्रकरणात आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता. तसेच पोलिसांची भूमिकाही संशयास्पद होती. राज्यभर गाजलेल्या या हत्या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आवाज उठविला. राज्यभर निषेध करण्यात आले. सरकारला इशारा देण्यात आल्यानंतर या प्रकरणात कारवाई करीत अटकसत्र सुरू करण्यात आले. आज आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता. यावेळी अरविंद बनसोडचे कुटुंब या ठिकाणी उपस्थित होते. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयाच्या आवारातच अरविंदच्या कुटुंबीयांची आणि वकिलांची भेट घेऊन चर्चा केली. आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी काय  प्रयत्न करता येतील, ते केले जातील असे आश्वासन प्रकाश आंबेडकर यांनी दिले.राज्यात मागासवर्गीयांवर हल्ले वाढत असून त्याच्या विरोधात बुधवरी राज्यभर वंचित बहुजन आघाडी तर्फे जिल्हा,तालुका स्तरावर  निवेदने देऊन या सरकारचा निषेध करण्यात आला.  हे हल्ले थांबले नाही तसेच सर्व प्रकरणात योग्य ती कारवाई झाली नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...