मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२०

                       परीक्षा केंद्रावर 1973 लागू करा

  जालना (प्रतिनिधी): - जालना शहरात व  ग्रामीण भागात माध्यमिक शांलान्त व उच्च माध्यामिक प्रमाणापत्र परीक्षा दि.18 फेब्रुवारी 2020 ते 23 मार्च 2020 या कालावधीत होणार आहे. सदरील परिक्षाकेंद्रावर कोणाताही गैरप्रकार होऊ नये या करीता जालना जिल्हृयातील सर्व परिक्षा केंद्रा परिसरातील 100 मीटर हद्दीतील परिक्षा चालू असताना पालक,परिक्षा न देणारे विद्यार्थी उपद्रव करीत असताना  किंवा नकला पुरवताना, परिक्षा केंद्राच्या परिसरात घुटमळत असताना तसेच परिक्षाकेंद्राच्या जवळ सार्वजनिक टेलिफोन, एसटीडी बुथ,फॅक्स,झेरॉक्स केंद्र असे बंद ठेवण्यात यावे. वरील परिक्षा केंद्राच्या कालावधीत कायदा  व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असलयाने फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 अंतर्गत वरील केंद्राच्या 100 मीटर  लागू करण्यात आली आहे. हा आदेश परिक्षा कालावधीत सकाळी 8.00 ते सायंकाळी 5.00 पर्यंत अंमलात येणार आहे.
                महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र जालना
     यांच्या कडून दिवसीय मोफत विकास कार्यक्रमाचे आयोजन.

जालना दि.18-  महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, जालना व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जातीच्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी जालना जिल्हयातील युवक-युवती, महिला-पुरूषांसाठी मोफत 1 महिना उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन जालना येथे करण्यात आले आहे. सदरील कार्यक्रमांची सविस्तर माहिती मिळावी म्हणून एक दिवसीय मोफत उद्योजकता परिचय कार्यक्रम जालना सोमवार दि. 24 फेब्रुवारी 2020 रोजी हॉटेल फ्लोराईन अतिरिक्त औद्योगिक वसाहत, जालना येथे घेण्यात येणार आहे. सदर उद्योजकता परिचय कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रशिक्षणार्थी हा फक्त अनुसुचित जाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.
         इच्छुकांनी सदरील कार्यक्रमांच्या अधिक माहिती करिता जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्डची झेराक्स व पासपोर्ट साईज फोटोसह भारती सोसे-पांढरकर, प्रकल्प अधिकारी,एमसीईडी,जालना मो. 9579264868, 9545258681, द्वारा-जिल्हा उद्योग केंद्र, अतिरिक्त औद्योगिक वसाहत, औरंगाबाद रोड,जालना फोन.नं.02482-220592,मो. येथे संपर्क साधावा असे आवाहन  सुदाम थेाटे विभागीय अधिकारी, एमसीईडी, औरंगाबाद यांनी केले आहे.
जालन्यात सकल मातंग समाजाच्या वतीने मोठ्या संख्येने विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा
जालना (प्रतिनिधी):- महाराष्ट्रामध्ये दिवसान दिवस मातंग समाजावर होत असलेल्या अन्याया बाबत मातंग समाजाच्या मुलीवर झालेल्या अत्याचार साठी आरोपीना कठोर शिक्षा देण्यासाठी जालना येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
मातंग समाजावर होत असलेल्या अत्याचार व अन्याय विरुध्द जालना जिल्ह्यातील मातंग समाज जागृत झाला आहे. या अनुषंगाने जालना येथे अक्रोश मोर्चा काढण्यात आला.या मोर्चाचे झालेल्या खुन प्रकरण, बलात्कार व मातंग समाजाला आरक्षण मिळावे श्री साईबाबा विद्यालय, शंकर नगर, नांदेड येथील अल्पवयीन विद्यार्थीनीवर चार शिक्षकांनी केलेल्या अत्याचार प्रकरणी त्या शिक्षकांना फाशिची शिक्षा देण्यात यावी ,ग्राम मरोडा, ता.अकोट, जि.अकोला, येथे घडली मातंग समाजातील विद्यार्थीनीवर गावातील चार गादगुंड नराधमांनी केलेल्या अत्याचार प्रकरणी त्यांना अटक करुन तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी.पोलीस स्टेशन दहिहंडा येथील ठाणेदार प्रेमानंद कात्रे, बिट जमादार शाम बुंदीले, पो.कॉ.सुरेश ढोरे, यांना तात्काळ निलंबीत करण्यात यावे.मातंग समाजातील दिपाली रमेश शेंडगे, म्हाडा कॉलनी, टी.व्ही. सेंटर, जालना येथील तरुणीचा खुन केल्याप्रकरणी त्या आरोपीना तात्काळ फाशी देण्यात यावी..मातंग समाजातील राहुल कचरु उमप या तरुणाच्या खुनाची चौकशी सि. आय.डी.मार्फत करण्यात यावी.कळंब, जि.उस्मानाबाद येथील मुकेश झोंबाडे या मातंग युवकाचा खुन करुन त्यांचा मृतदेह, ढोकी रेल्वे फाटकावर फेकून आत्महत्या दाखवण्याचे प्रयत्न करणारे आरोपींना तात्काळ अटक करावे.जालना जिल्ह्यातील गायरान जमीन व सव्हे नं. ४८८, गायरान ज्मीन गायरणधारकाच्या कास्तक-्याच्या करण्यात यावे.मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात स्वंतत्र आरक्षण (अ.ब.क.ड) देण्यात यावे. क्रांतीगुरु लहुजी वस्ताद पुर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा. संजय ताकडेयांनी मातंग समाजाच्या आरक्षणासाठी आपले बलीदान दिले. त्यांचे बलिदान व्यर्थ न जाता मातंग समाजाला तात्काळ आरक्षण देण्यात यावे. माळीपुरा जुना जालना येथील सा.अण्णाभाऊ साठे शॉपी सेंटरची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी. नगर परिषद जालना मार्फत गुत्तेदारी पध्दतीने मातंग समाजातील साफ सफाई करणाऱ्या कर्मचार्यांना नगर परिषद जालना येथे कायमस्वरूपी करण्यात यावे. दि. १८ फेब्रुवारी रोजी डोंगरगाव सिल्लोड येथील ३२ वर्षीय दलित महिलेसोबत सात वर्षाच्या मुलीला सोबत घेऊन गवत आणायला गेली. शनिवारपासून ती गायब होती. त्यांच्या दोघीचे विहिरीत प्रेत आढळून आले. या गुन्हेगारांना तात्काळ अटक करुन गुन्हा दाखल करण्यात यावे व शिक्षा देण्यात यावी. वरिल मांगण्या तात्काळ मंजूर न झाल्यास यापूढे महाराष्ट्र राज्यभर जेलभरो आंदोलन करण्यात येईल. आंदोलनात कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास या घटनेची जवाबदारी प्रशासनावर राहील.. दाविद गायकवाड,संतोष तुपसौंदर,किसन लांडगे, संतोष निकाळजे, अर्जुने दाकतोडे, अनिल थोरात, विक्की हिवाळे, ललित कुचेकर, गंगाधर लाखे, ओंकार घोड़े,द्वारकाबाई लोंढे संगिता कांबळे ,विशाल लांडगे, आशाबाई साबळे सह आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.
 महाराष्ट्राला काळीमा फासणारी आणखी एक घटना अत्याचार करून आई आणि मुलीला फाशी देऊन त्यांचा खून करून मृतदेह  विहिरीत टाकला 
       महाराष्ट्र मध्ये महिलासुरक्षा विषयक प्रश्न चिन्ह निर्माण
सिल्लोड (प्रतिनिधी) :- महाराष्ट्रात काळीमा फासणारी आणखी घटना डोंगरगाव, ता.सिल्लोड जि. औरंगाबाद मधे आणखी एक दालित महिलांच्या अत्याचाराची व निघृण दुहेरी हत्येच घटना घडली आहे.
डोंगरगाव, ता.सिल्लोड जि.औरंगाबाद एका विहिरीत 2 प्रेत आढळले आहे.त्यामध्ये पीडित महिला (वय 28 वर्ष) व तीची लहान मुलगी (वय 7 वर्ष ) यांच्या वर बलात्कार व खुन करुन त्यांच्या गुप्तांगात काड्या खुपसलेल्या अवस्थेत व डोळे ,जीभ बाहेर निघालेले आहेत.त्यांची बाॅडी फाशी देवून खुन करुन तिन दिवसापूर्वी  विहिरित टाकले  व ती फुगून बाहेर आल्या नंतर हि गोष्ट उघडकीस आली आहे. सदर प्रकरणात मयतांच्या नातेवाईकांनी 3 दिवसापूर्वी मिसिंग  तक्रार केल्यावर पण पोलिस प्रशासनाने  निष्काळजी पणा केल्याचे दिसून येत आहे. अजुन आरोपींचा शोध लागला नाही, वंचित बहुजन आघाडीने मागणी केल्यानुसार सकाळी  ईन कॅमेरा शवविच्छेदन होणार आहेत. सिल्लोड तालुक्यात ही 8/15 दिवसातली दुसरा घटना आहे. जर अश्या नराधमांना कायद्याची जबर नसेल तर असे प्रकार वारंवार होतील. सिल्लोड तालुक्यात कायदा व सुव्यवस्था ढासळली व मागासवर्गीय व दलितांवर अन्याय व अत्याचार वाढल्याचे दिसून येत आहे.दि.17 फेब्रुवारी  2020 रोजी  शहरातील घाटी वैद्यकीय  रुग्णालयात डोंगरगाव  ता. सिल्लोड .जि. औरंगाबाद  येथील मृतदेह  शवविच्छेदनासाठी  आणण्यात  आले.सदर दुदैर्वी घटना कळाली असता तिथे वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते अमित भुईगळ, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष लता बामणे, शहराध्यक्ष वंदना नरवडे,  जयश्री घुगे, प्रज्ञा साळवे, जिल्हाध्यक्ष (पश्चिम) योगेश बन, शाम भारसाखळे महासचिव, खालेट पटेल महासचिव, शहराध्यक्ष (पश्चिम) संदिप शिरसाठ, शहराध्यक्ष (पुर्व) डाॅ. जमील देशमुख, ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार,  वंचित बहुजन आघाडीचे विलास भिसे, रवि दाभाडे, गौतम भिसे आदि सहीत अनेक कार्यकर्त्यां सोबत जावून त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.सदर प्रकरणात पोलिस प्रशासनाने लवकरात लवकर दोषी व्यक्तींना शोधुन अटक करण्यात यावी नसता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलिस प्रशासनाच्या विरूध्द आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा अमित भुईगळ यांनी दिला आहे.
            

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...