शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

भीम आर्मी भारत एकता मिशन वर्धा जिल्हा जिल्ह्यातील पुलगाव शहरातील कार्यकारणी गठीत.


वर्धा,ब्यूरो चीफ :-दि. 30/07/2020 ला भीम आर्मी भारत एकता मिशन वर्धा जिल्हा जिल्ह्यातील पुलगाव शहरातील कार्यकारणी गठीत करण्यात आली ,भीम आर्मी भारत एकता मिशन #संस्थापक भाई #चंद्रशेखर आझाद रावण ,याचा आदेशानुसार  जिल्हाध्यक्ष आशिष सोनटक्के यांंच्या मार्गदर्शनाने भीम आर्मी  तालुका उपाध्यक्ष गुलाब खान पठान ,शहर अध्यक्ष अंकुश भाऊ कोचे,शहर उपाध्यक्ष अॅड. नम्रता बागेशवर शहर संघटक शाहिद अखतर प्रसिद्धी प्रमुख  सैय्यद सैफ अली याची नियुक्ती करण्यात आली ,तसे च भीम आर्मी शाखेचे अनावरण करण्यात अगोदर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्या अर्पण करून  ,फेजर पुरा ,पठाण चोक ,पँथर चोक सेय्यद मोहला येथे शाखा चे उटघाटन करण्यात आले , भीम आर्मी अन्याय ,अत्याचार च्या विरोधात लढणारे संघटन असून गावात जिल्हा तालुका शहरात पर्यत आपल्या शाखा सुरू करण्यात येणार आहे, तेव्हा भीम आर्मी तालुका अध्यक्ष शशांक भगत ,बंटी रंगारी ,प्रशिल पाणबुडे, मनीष प्रधान ,दीक्षित सोनटक्के, आशिष रणधीर ,आझम शेख ,एकता पाटील,मोहम्मद अशकाल, रोशन चव्हाण, सचिन चव्हाण ,मनीष मून ,यश लोहकरे ,मोनू पठाण,शहारुक सेय्यद, नानीर सेय्यद, कुणाल ताकसाडे, अमन संगोळे ,दादाभाई पठाण ,सुशील जांभुलकर,सलिम  शाहरुख सेय्यद,इकबाल खान,किम सेय्यद व भीम आर्मी चे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


जिल्ह्यात 82 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह.52 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती.


जालना,ब्युरो चीफ :- जालना शहरातील प्रयाग नगर-1, नाथबाबा गल्ली-1, गोपीकिशन नगर -1, बु-हाण नगर -1, नॅशनल नगर-4, जयभवानी नगर -1, आर.पी. रोड-3,  रामनगर पोलीस कॉलनी -3, कबाडी गल्ली -1, व्यंकटेश नगर -2, मस्तगड -1, चंदनझिरा -3, भीमनगर -2, लक्कडकोट -1, नळगल्ली -1, नयाबाजार -1, दर्गा वेस -2, कन्हैयानगर -6, सामान्य रुग्णालय परिसरातील -1, टाऊन हॉल -1, भाग्यनगर -1, मोदीखाना -1, बालाजी नगर -1,कचेरी रोड -1, प्रशांतीनगर -1, गुडला गल्ली -1, जालना शहर -2, कोष्टी गल्ली काद्राबाद -1, अंबड -1, वरुड बु. -1, बुटखेडा -4, अशा एकुण 52 रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तर जालना शहरातील मंठा चौफुली-4, फारशी गल्ली -1, नुतन वसाहत-2, हनुमान नगर-2, युसुफ कॉलनी -1, लक्ष्मीनारायणपुरा-1, भाग्यनगर -3, जमुना नगर -5, सोरटीनगर-1, सकलेचा नगर-3, वैभव कॉलनी -3, समर्थ बँकेजवळ-2, पावरलुम जुना जालना-3, काद्राबाद -1, एम.आर.डी.सी. -1, सामान्य रुग्णालय  निवासस्थान -1, महाकाळा ता. अंबड -11, रोहीलागड-1, शहागड -3, सुखापुरी -1, देऊळगाव राजा -1, उज्जैनपुरी ता. बदनापुर -1, निरखेडा-1, रांजणी-1, शनी मंदीर परतुर -1 अशा एकुण 54 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह तर अँटीजेन तपासणीद्वारे 28 अशा एकुण 82  व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. 
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-7495 असुन  सध्या रुग्णालयात-484 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-2854, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-170 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-13447 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-50, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-82 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-2269 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-10868, रिजेक्टेड नमुने-39, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-440 एकुण प्रलंबित नमुने-221, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -2382.
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-56, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-2349, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-00 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-496,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-60, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-484,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-102,दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-52, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-1506, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-691 (18 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-24233 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या-72 एवढी आहे.
अंबड शहरातील रहिवाशी असलेल्या 70 वर्षीय पुरुष रुग्णास न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना दि. 27 जुलै 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना  दि. 28 जुलै 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच दि. 31 जुलै 2020 रोजी त्यांचा मृत्यु झाला. यावलपिंप्री ता. घनसावंगी  रहिवाशी असलेल्या 70 वर्षीय पुरुष रुग्णास न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना             दि. 27 जुलै 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना  दि. 28 जुलै 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. त्यांचा 1 ऑगस्ट 2020 रोजी त्यांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 496 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-2, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना-59,मुलींचे शासकीय तंत्रनिकेतन,वसतिगृह-10,जे.ई. एस. मुलांचे वसतिगृह-8 जे. ई. एस. मुलींचे वसतिगृह-39, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स डी ब्लॉक-63, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स सी ब्लॉक-6, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स बी ब्लॉक-14, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स ए ब्लॉक-58, गुरु गणेश भवन-5, संत रामदास हॉस्टेल -10, मॉडेल स्कुल, परतुर-23, मॉडेल स्कुल, मंठा-2, केजीबीव्ही मंठा-15, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल,अंबड-51,शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-62, शासकीय मुलांचे वसतीगृह,बदनापुर-5, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह घनसावंगी -5,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह, घनसावंगी-17, शासकीय मुलींचे वसतिगृह, भोकरदन-5,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2 -24, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद-1,आय.टी.आय कॉलेज, जाफ्राबाद-8, हिंदुस्थान मंगल कार्यालय, जाफ्राबाद-4.
लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत  200 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, 880 वाहने जप्त, 1051 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आ. पी. सी. 188 प्रमाणे मा. न्यायालयाने ठोठावलेला दंड 1 लाख 7 हजार,मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 7 लाख 74 हजार 430 असा एकुण 9 लाख 8  हजार 238 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


सामाजिक अंतर न राखणाऱ्या व मास्कचा वापर न करणाऱ्यांवर जिल्हा व पोलीस प्रशासनाची कारवाई


212 व्यक्तींकडून 46 हजार 800 रुपयांचा दंड वसुल



जालना,ब्यूरो चीफ :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यामध्ये सामाजिक अंतर न पाळणाऱ्या तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर पोलीस तसेच जिल्हा प्रशासनामार्फत संयुक्तरित्या दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. दि.1 ऑगस्ट, 2020 रोजी सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या 212 व्यक्तींकडून 46 हजार 800 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
     यामध्ये जालना तालुक्यात 179 व्यक्तींकडून 42 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे तर बदनापुर 18 व्यक्तींकडून 1 हजार 800, जाफ्राबाद 4 व्यक्तींकडून 800, परतुर 11 व्यक्तींकडून 2 हजार 200 रुपये अशा प्रकारे एकुण 212 व्यक्तींकडून 46  हजार 800 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
      नागरिकांनी आवश्यकता नसताना घराबाहेर पडु नये,  सामाजिक अंतराचे पालन करावे, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा तसेच प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.


साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन


जालना,ब्यरो चीफ :- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात  जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.  यावेळी  अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) दीपाली मोतियाळे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीमती शर्मिला भोसले, उपजिल्हाधिकारी अंजली कानडे, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रिना बसेय्ये, जिल्हा नियोजन अधिकारी अधिकारी वैभव कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर,श्रीमती आर.आर. महाजन,  संपदा कुलकर्णी, श्रीमती छाया कुलकर्णी  यांच्यासह प्रशासकीय इमारतीमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही पुष्प अर्पण करुन साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले.





धुळ्यात लॉक डाऊनला विरोध, व्यापाऱ्यांनी दिला प्रतिसाद.


धुळे,ब्युरो चीफ :- सर्वसामान्य लोकांनी आता जगायला सुरवात करावी. असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबाद मध्ये केले होते. त्यांच्या आवाहनाला आज धुळे  वंचित बहुजन आघाडीच्यावतीने प्रतिसाद देण्यात आला. शहरातील दुकानदारांना आवाहन करण्यात आले जगायचं असेल तर आपले सर्व व्यवसाय सुरू ठेवावे लागतील हे सरकार भांडवलदारांचे सरकार असून या सरकारला तुमच्याशी काही देणे घेणे नाही.

स्वतःला   सिद्ध करावे लागेल मुलाबाळांसाठी घराबाहेर पडा लहान-मोठे व्यवसाय सुरू करा. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्त्यानी सर्वांना बाळासाहेबांची भूमिका समजावून सांगितले. त्यामुळे अनेक भागात व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी या आवाहनाला प्रतिसाद देत आपापली दुकाने उघडी केली.


रस्त्यावर भाकरी खाऊन वंचितने लॉकडाऊन तोडले.


बीड,ब्युरो चीफ :- राज्यभरात भाजपचे आंदोलन सुरू असतानाच दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीकडून रस्त्यावर बसून चटणी भाकर खात सरकारचा निषेध केला गेला.

लॉकडाऊनने गोरगरिबांचं कंबरडे मोडल्याचे सांगत आजपासून शासनाचा कसलाच लॉकडाऊन पाळण्यात येणार नसल्याची शपथ यावेळी घेण्यात आली. तसेच रस्त्यावरच भाकरी खात लॉकडाऊन तोडण्यात आला. आज पासून कोणीही मास्क घालणार नाही, किंवा फिजिकल डिस्टन्स पाळणार नाही.
असे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा.शिवराज बांगर यांनी जाहीर केले आहे. या प्रसंगी राज्य महासचिव भीमराव दळे प्रशांत बोराडे  सम्यकचे जिल्हाध्यक्ष अजय साबळे,    बाळासाहेब वाघमारे इत्यादी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.


उद्या पासून टाळेबंदीला न जुमानता जनतेने सामान्य जिवनास प्रारंभ करावा  - राजेंद्र पातोडे



अकोला,ब्युरो चीफ :- कोरोनाच्या नावावर देशातील लोकशाही कुलूपबंद करण्याचा सरकारचा डाव असून नागरिकांच्या जगण्यावर बंधने आणली आहेत.जनतेला टाळेबंदी नकोय म्हणून सामान्य जीवन जगण्यास प्रारंभ करावा, ही भूमिका ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतली आहे.सबब व्यापारी, कामगार, लहान मोठे व्यवसायी, नौकरदार,टपरीधारक,फेरीवाले,

ऑटो रिक्षा या सहीत सर्व नागरिकांनी आपल्या सुरक्षेच्या उपाय योजनांसह आपले दैनिक व्यवहार सुरु करून सरकारची ही दडपशाही अमान्य करावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी केले आहे.  


जनता मेटाकुटीला आलेली असताना सरकारने सहावा लॉकडाउन जाहीर केला आहे. गोरगरीब जनतेच्या जगण्याच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना शून्य असून वाढता मृत्यदर आटोक्यात आणण्यासाठी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. देशात केवळ ३ टक्के मृत्युदर असून मृत्युदर कधीही शून्य असू शकत नाही. त्यामुळे सरकार आणि चॅनेल्स भिती घालण्याचे काम करीत आहेत. कोरोना पूर्वी व कोरोना नंतर होणारे मृत्युदर तपासले असता असे लक्षात येते की कोरोना आधी मृत्युदर हा आताच्या मृत्युदरा पेक्षा १८ टक्के अधिक होता. त्यामुळे कोरोनाची भीती न बाळगता जनतेने आपले सण, दैनिक व्यवहार सुरळीत सुरु करणे गरजेचे आहे. व्यापारी, कामगार, लहान मोठे व्यवसायी, नौकरदार, टपरीवाले, फेरीवाले, ऑटो रिक्षा या सहीत सर्व नागरिकांनी आपल्या दैनिक व्यवहाराला प्रारंभ करावा. सरकारची ही दडपशाही अमान्य करावी. आपापली दुकाने उघडी करावी. जनतेने देखील शारिरीक अंतर, मास्क व सॅनिटायजरचा वापर करीत खरेदी आणि सण साजरे करणे, सामाजिक सौहार्द आणि स्वास्थ टिकविण्यास प्रारंभ करावा.

येणारे सण साजरे करण्यासाठी सार्वजनिक परिवहन व्यवस्था सरकारने सुरु करावी तसेच सरकारने शास्त्रीय माहिती देणे गरजेचे आहे. सरकार युरोपियन मॉडेलवर चर्चा करते. परंतु आशिया खंडातील चीन, भूतान, म्यानमार यांनी कोरोना कशा पद्धतीने आटोक्यात आणले यावर सरकार बोलत नाही. लोक मोठ्या संख्येने बेरोजगार होत आहेत. त्यांचे रोजगार हिरावले जात आहेत.देशातील जनतेच्या हितासाठी लस बाजारात आणावी किंवा उपायपयोजना आखाव्यात, हे करण्या ऐवजी  लॉकडाऊन करीत आहे. ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडीने व्यापारी, फेरीवाले, लहान व्यवसायी, नौकरदार यासह सर्व सामान्य जनतेच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. तारखेपासून पक्षाचे कार्यकर्ते " मी हा लॉकडाउन मानत नाही" हा निर्धार करून बाहेर पडणार आहेत. जे व्यवसायी आपले व्यवसाय करू इच्छितात त्यांना व्यापार व व्यवसाया करीता पोलीस आणि प्रशासनाचा त्रास होऊ दिला जाणार नाही. त्यासाठी प्रखर आणि लढण्याची भूमिका वंचित घेत आहे.जनतेने देखील टाळेबंदी झुगारून लावावी व आपले जीवन सामान्यरित्या सुरू करावे, असे आवाहन देखील वंचित बहुजन आघाडीने केले आहे.



अकोल्यातील हॉटेल - रेस्टॉरंट मालकांचे लॉकडाउनविरोधात ॲड प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा !


अकोला,ब्यूरो चीफ :- शासनाने ३१ जुलै नंतर लॉक डाऊन वाढविला तर वंचीत बहुजन आघाडी त्याला विरोध करेल, असे ऍड प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केल्यानंतर अनेक संघटना पुढे येत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक व्यवसायांना याचा फटका बसलेला आहे. हॉटेल व रेस्टॉरंट व्यवसायाला तर याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायीक आर्थिक संकटात आले असून यामध्ये काम करणाऱ्या मजुरांवर तर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे मालकांना मोठ्याप्रमाणावर नुकसान सहन करावे लागत आहे.

या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी नुकतीच लॉकडाउन तोडो अभियानाची घोषणा केली. त्या अनुषंगाने काल रात्री अकोला जिल्ह्यातील हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांनी ॲड बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेतला आहे . तसेच संपूर्ण व्यावसायिक या लॉकडाउन तोडो अभियानात सहभागी होऊन वंचित बहुजन आघाडीच्या भुमीकेसोबत राहण्याची ग्वाही दिली. यावेळी पक्षाचे सर्व पदाधिकारी व व्यापारी उपस्थित होते. अशी माहिती राज्याचे प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.


  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...