शनिवार, २ मे, २०२०

         मुस्तकीम हमदुले फाऊंडेशनतर्फे 500 गरजूवंतांना
                             रेशनचे किट वाटप.


  
जालना/प्रतिनिधी:-लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर  जालना शहरात आमदार कैलाश गोरंट्याल यांच्या सुचनेनुसार मुस्तकीन हमदुले फाऊंडेशन च्या वतीने 500 गोरगरीब नागरिकांना रेशनची किट देण्यात आली. यामध्ये गहू, तांदुळ, तेल, साखर, मिरची पावडर, मसाल्याच्या पुड्या, साबन, मीठ यांचा समावेश होता.मुस्तकीन हमदुले फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा नगरसेवक शेख शकील यांच्यातर्फे चाली ग्रुप व मुस्तकीन हमदुले  फाऊंडेशनच्या पदाधिकारी व सदस्यांनी ही मदत वाटप केली. यावेळी नगरसेवक शेख शकील यांच्यासह सदस्य शेख वसीम, नजीर अंन्सारी, शोएब खान, शैबाज खान, अमजद खान, फहाद काझी, अजमल अंन्सारी, मुबारक बेग, शाहरूख खान, आबदे, नेहाल, अरबाज सऊद, झुलफेखार बेग, सोहल आदिंसह अनेकांची उपस्थिती होती. जूना जालना, संजयनगर, मिल्लतनगर, बाजार गल्ली यासह शहरातील विविध भागात हातावर पोट भरणारे गरीब, शेतमजूर, कष्टकरी, अपंग, विधवा महिला, निराधार, वयस्कर मंडळी, बांधकाम कामगार, बिगारी कामगार, परप्रांतिय कामगार  व सर्व धर्मीयांना सदरच्या किट वाटप करण्यात आल्याची माहिती संयोजक नगरेसवक  शेख शकील यांनी सांगितले.
--


दिलासादायक ! कोरोनामुळे मृत महिलेच्या जवळच्या संपर्कातील दोन्ही मुलांचे अहवाल निगेटिव्ह

नांदेड( भगवान कांबळे):- राज मोहल्ला परिसरातील एका ५५ वर्षीय कोरोनाग्रस्त महिलेचा नांदेडात गुरूवारी रात्री मुत्यू झाला.मात्र या महिलेच्या सोबत नांदेड येथे असलेल्या दोन्ही मुलांचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे  वैघकीय अधिक्षक डाॅ संजय हरबडे यांनी दिली आहे .त्यामुळे  सेलूकरांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. शहरातील राज मोहल्ला परिसरातील एक महिला दुर्धर आजार असल्याने उपचारासाठी औरंगाबाद येथील खाजगी रूग्णालयात उपचार घेऊन लाॅकडाऊन मुळे औरंगाबाद येथील एका भागात राहत होती. २७ एप्रिल रोजी एका खाजगी वाहनाने ही महिला  घरी परतली होती. प्रकृती अतिशय नाजूक असल्याने सदरील महिलेला उपचारासाठी परभणी येथील खाजगी रूग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर या महिलेला नांदेडात हलविण्यात आले होते. तेथे त्या महिलेचा स्वॅब घेऊन चाचणी केली असता कोरोना पाॅझेटीव्ह अहवाल प्राप्त झाला होता. त्यानंतर सेलू शहरात दोन दिवसाची संचारबंदी लागू केली आहे.
दरम्यान, या महिलेच्या  सोबत नांदेडात असलेल्या दोन्ही मुलांचे स्वॅब घेण्यात आले होते. गुरूवारी रात्री या महिलेचा मृत्यू झाला असला तरी शुक्रवारी सकाळी या दोन्ही मुलांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने काही अंशी दिलासा मिळाला आहे.  या महिलेच्या सेलू येथील कुटूंबातील १९ आणि सहवासात आलेल्या १७ आशा ३६ व्यक्तीचे स्वॅब अहवाल येणे बाकी आहे. नांदेडात महिला कोरोना पाॅझेटीव्ह आढल्याने प्रशासनाने बुधवारी रात्रीच राज मोहल्ला परिसर सील केला आहे. या परिसरातील एक हजार घरे कंनटमेंट झोन मध्ये घेतली आहेत. तसेच आरोग्य विभागाच्या २० पथकाकडून सर्व्हेक्षण सुरू केली आहे. सदरील महिलेच्या कुटूंबात १९ आणि सहवास आलेल्या १७ आशा ३६ व्यक्तीचे स्वॅब घेऊन चाचणी साठी औरंगाबाद येथील प्रयोग शाळेत पाठवले आहेत. तसेच या सर्व व्यक्तींना क्वारंटाईन केले आहे. आता या ३६ व्यक्तीचे स्वॅब अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शनिवारी भरणारा आठवडी बाजार बंद ठेऊन शनिवारी रात्री पर्यंत संचारबंदी वाढविण्यात आली आहे.४ हजार नागरिकांचे सर्व्हक्षण
राज मोहल्ला आणि परिसरातील ६६८ घराचे सर्व्हेक्षण करण्यात आले असून शुक्रवारी दुपारी पर्यंत ४ हजार ४९ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. आरोग्य विभागाचे पथक या भागातील घरोघरी जाऊन लक्षणा बाबत विचारणा करत आहे.


               लाँकडाऊन मुळे चहाविक्रेत्यांना फटका

सिंधीकाळेगाव (प्रतिनिधी) :-कोरोना संसर्गजन्य विषानुमुळे संचारबंदी तसेच लाँकडाऊन असल्याने तालुक्यातील चहाच्या टपर्या बंद आहेत त्यांच्यासमोर कुटूंबाच्या उदरनिर्वाहाचे मोठे संकट आहे एक चहा विक्रेता 1 ते 2 हजार रुपयांचा चहा विक्री करून त्याचा उदरनिर्वाह करतो. आता चहाची दुकान बंद असल्याने चहा विक्रेत्याला चांगलाच फटका बसला आहे.शहरासह तालुक्यात चहा पिणार्यांची  मोठी संख्या माञ 22मार्च रोजी जनता कफ्रर्यु आणि त्यानंतर लावण्यात आलेल्या लाँकडाऊनमुळे चहाच्या टपर्या बंद आहेत परिणामी चहा विक्री करून कुटूंब चालविणार्या या चहा विक्रेत्यासमोर कुटूंबियांचा उदरनिर्वाह करण्याची मोठी जबाबदरी पेलण्याचे संकट उभे टाकले आहेत.दरम्यान कोरोनाचे संकट टाळण्यासाठी लाँकडाऊन महत्वाचे आहे. चहाची दुकाने बंद असली तरी त्याचा फटका आमच्यासारख्या काही चहा विक्रेत्यांना बसला आहे. माञ ही वेळ निघुन जाईल आणि पुर्वी सारखे व्यवसाय आणि उद्योग सुरु होतील. माञ त्यासाठी आपन प्रत्येकाने घरात राहुन प्रशासनास सहकार्य करावे. असे चहा विक्रेते शाम गिराम यांनी सांगितले.

पासोडी येथे जिवन आवश्यक वस्तु व सनिटाझर वाटप
जाफ्राबाद/प्रतिनिधि : पासोडी,ता:जाफ्राबाद कोरोना संकट दिवसोदिवस वाढत चालले आहे त्यामुऴे निराधार ,अपंग,विधवा व गरजु लोकांना आपले कुंटुब चालवणे अवघड झाले आहे.

यांच पार्शभुमीवर वाॅटर कप विजेता गांव पासोडी मध्ये राजपुत भामटा सामाजिक प्रतीष्टान व ग्रामपंचायत यांच्या माध्यमातुन गावातील गरजु लोकांना जिवन आवश्यक वस्तुची कीट उपलब्ध करुन देण्यात आली तसेच संपुर्ण गावातील नागरीकांना सनीटायझरच्या बाटल्या देण्यात आल्या .या कीटमध्ये १० कीलों गहु,२कीलो तादुळ,१कीलो गोडतेल,१००ग्रॅम मसाला,१०ग्रॅम हळद, १कीलो मीठ,१ माचीस बाॅक्स या प्रमाणात वस्तु उपलब्ध करुन दील्या यावेळी सुरेश दिवटे (भाजपा तालुका अध्यक्ष) चंदनसिंग ताटु (सरपंच),प्रेमसिंग धनावत ( तंठामुक्ती समिति, अध्यक्ष) पंडित सर, देवसिंग रेकनोत, तेजनकर साहेब, विजय ताटु,कीरण व्यास,बादल बारवाल, उपस्थित होते.व हे सर्व।  किराणा वस्तू देत असतांना  योग्य अंतर ठेवून  किट  देण्यात आले व कोरोना विषयी माहिती दिली. योग्य  नविन अनोळखी व्यक्ती किंवा बाहेर गावातुन  कोणीही येऊ नाही अशी माहिती या वेळी देण्यात आली.

वाढदिवस साजरा न करता गोरगरीबांना गहू, तांदुळ, तुरताळ वाटप
जालना/प्रतिनिधी:- लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर जालना नगर पालिकेचे मा. बांधकाम सभापती श्रावण भुरेवाल यांनी स्वतःचा वाढदिवस साजरा न करता त्यावर होणार्‍या खर्चातून गोरगरीबांना 20 क्किंटल गहू, 
तांदुळ व तुरदाळ वाटप केली.जालना शहरातील मंठा चौफुली परिसर,अमरछाया टॉकीज परिसरात हातावर पोट भरणारे गरीब, शेतमजूर, कष्टकरी, अपंग, विधवा महिला, निराधार, वयस्कर मंडळी, बांधकाम कामगार, बिगारी कामगार, परप्रांतिय कामगारांना  गहू, तांदुळ व तुुरदाळ वाटप केली.अत्यंत शिस्तबध्द, पध्दतीने श्रावण भुरेवाल यांच्याकडून खिचडीचेही वाटप करीत असून, कार्यकर्त्यांनी जनतेसमोर एक चांगला आदर्श ठेवला आहे. शासनाने घेतलेल्या वेळोवेळीच्या निर्णयाचे जनतेने पालन केले आहे. प्रशासनाला मदत केली आहे. घरात बसून राहिल्यामुळे अनेक कुटुंबांना मदतीची गरज होती. ही बाब लक्षात घेवून श्रावण भुरेवाल यांनी ही मदत केली आहे. यावेळी कपील भुरेवाल व त्यांचे सहकारी परिश्रम घेत आहे.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...