रविवार, २४ मे, २०२०

[24/05, 4:55 PM] Chandrakant Hakkdar: https://helloreporter108.blogspot.com/2020/05/blog-post_328.html
[24/05, 6:56 PM] Gaikawd Mangaw. (Raigad): गेली अनेक वर्षांपासून तुटलेल्या  पुलामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय संबंधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष : नागरिक नवीन पुलाच्या प्रतिक्षेत

     बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) रायगड जिल्ह्यातील  माणगांव तालुक्याच्या खरवली ते बोरघर पंचक्रोशीतील शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि या विभागाती सर्व सामान्य नागरिकांना नदीच्या पलीकडे असलेल्या आपापल्या शेतावर आणि नाईटणे, बोर्ले, सुर्ले आणि मोर्बा इत्यादी ठिकाणी आपल्या कामासाठी उन्हाळ्यात आणि   पावसाळ्यात जाण्यासाठी महत्त्वाचा दुवा असणाऱ्या चेरवली आणि नाईटणे दरम्यान च्या नदी वरील पुल जीर्ण झाल्यामुळे गेली अनेक वर्षांपासून नदी पात्रात तुटून पडला आहे. त्यामुळे या पुलावरून नदीच्या अलिकडे आणि पलिकडे दोन्ही बाजूला आपापल्या कामानिमित्त येजा करणार्या शेतकरी कामगार, शेतमजूर आणि सर्व सामान्य  नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे या विभागातील सर्व नागरिक या ठिकाणी नवीन पुलाच्या प्रतिक्षेत आहेत. 
      सदर पुल सुमारे साठ ते सत्तरच्या दशकात काळ प्रकल्प सिंचन विभाग तथा कालवा विभागाच्या माध्यमातून बांधण्यात आला होता. कारण काल प्रकल्प विभागाने माणगांव तालुक्यातील खरवली विभागातील खरवली, चेरवली, पेण तर्फे तळे, नाईटणे, सुरव, बोर्ले, सुर्ले, मोर्बा, देगाव, महादपोली, दहिवली, गोरेगांव इत्यादी ठिकाणच्या शेतकर्यांची एक पिकी जमीन ओलीताखाली आणून ती दोन पिकी तथा दुबार पिकी करून या विभागातील शेतकर्यांना समृद्ध करण्यासाठी या विभागातून सुमारे साठ ते सत्तरच्या दशकात कालवा खोदून सदर कालव्याच्या माध्यमातून या विभागातील शेतीला पाणी सोडण्यात आले. 
      सदर कालवा माणगांव तालुक्यातील खरवली विभागातून पुढे मोर्बा विभागातील गावांकडे नेण्यासाठी चेरवली आणि नाईटणे दरम्यान असलेल्या नदीचा या काल प्रकल्पात अडसर ठरत होता. यावर मात करण्यासाठी या प्रकल्पातील तत्कालीन अभियंत्यांनी सदर नदीच्या खालून भूयारी पद्धतीने पुढे कालव्याचे पाणी नेण्याची व्यवस्था केली. व या कालव्याची पुढे देखभाल करण्यासाठी सदर कालव्याला सर्वत्र समांतर रस्त्याची निर्मिती केली. व सदर नदीवर पूल बांधला. या पुलाच्या माध्यमातून या विभागातील नागरिक नदीच्या दोन्ही बाजूला आपापल्या शेतावर कामासाठी आणि मोर्बा बाजारपेठेत जाण्यासाठी व या विभागातील गावांमध्ये दळणवळणासाठी येजा करत होते. मात्र गेली दहा ते पंधरा वर्षांपूर्वी सदर पुल जीर्ण झाल्यामुळे नदीच्या पात्रात मध्यभागी कोसळून पडला आहे. तेव्हा पासून आज पर्यंत या तुटलेल्या पुलावरून जीवघेणी कसरत करून येजा करत आहेत. या मधून संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो. आणि जीवीत हानी सुद्धा नाकारता येत नाही. या तुटलेल्या पुलाकडे
 संबंधित विभागाने आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी गेली अनेक वर्षे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या विभागातील सर्व शेतकरी आणि सर्व सामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या विभागातील सर्व नागरिक या पुलाच्या प्रतिक्षेत आहेत.
*अनैतिक संबधातून पत्नीसह दोन मुलांची हत्या*

बीड : शहरातील शुक्रवार पेठ परिसरामध्ये आईसह दोन लहान मुलांची रविवारी (दि.24) दुपारी हत्या करण्यात आली. सदरील घटनाही पत्नीच्या अनैतिक संबधातून घडली असून या घटनेने जिल्हाभरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पेठ बीड पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत सशंयित म्हणून एकास ताब्यात घेतले आहे.
     पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीता संतोष कोकणे (वय 35), सिद्धेश्वर संतोष कोकणे (वय 9) व मयुर संतोष कोकणे (वय 6) अशी मयतांची नाव आहेत. संगीता व सिद्धेश्वर यांचा मृतदेह घरामध्ये आढळून आली तर मुयरचा मृतदेह पाण्याच्या बॅरेलमध्ये आढळून आला. यांना दगडाने किंवा बॅटने मारहाण केली असाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सदरील प्रकार हा अनैतिक संबधांतून घडला असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात बायको बेपत्ता असल्याची तक्रार देण्यास गेलेल्या संतोष कोकणे यास पोलीसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी पेठ बीड पोलीस ठाण्याचे पोनि.विश्वास पाटील व पोलीस दाखल झाले असून प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
*उर्वरित शेतकऱ्यांच्या शासकीय कापूस खरेदीची ऑनलाईन नोंदणी तात्काळ सुरू करा-पूजा मोरे*

*कारणे दाखवुन शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला कापूस खरेदी केंद्रावरून परत पाठवू नका*

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या कापूसाची खरेदी उद्यापासून सुरू होणार असली तरी अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या कापसाची ऑनलाईन नोंद झालेली नाही.त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांचलच्या कापसाची सुद्धा तात्काळ ऑनलाईन नोंदी घेऊन तो कापूस  शासकीय हमीभावाने खरेदी करण्यात यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पूजाताई मोरे व मराठवाडा अध्यक्ष गजानन बंगाळे यांनी केली आहे.

बीड जिल्ह्यातील एकुण १६ कापुस खरेदी केंद्रांवर प्रशिक्षित कर्मचारी अधिकारी ग्रेडर म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांनी विभागीय व्यवस्थापक,महाराष्ट्र राज्य सहकारी कापुस उत्पादक पणन महासंघ मर्या.विभागीय कार्यालय, परळी वै.जि.बीड यांचे नियंत्रणात व सुचनेनुसार ग्रेडींगचे कामकाज दि.२६मे २०२० पासुन करावे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. त्यानुसार 13 मार्च पर्यन्त प्राथमिक कापूस नोंदणी केलेल्या  24,921 शेतकऱ्यांपैकी उर्वरित 21,000 शेतकऱ्यांची कापूस खरेदी 26 मे पासून सुरू होत आहे परंतु अजूनही हजारो शेतकऱ्यांच्या कापसाची प्राथमिक नोंदणी झालेली नाही.त्या शेतकऱ्यांचा कापूस सरकार घेणार की नाही ? असा संभ्रम शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे.त्यासाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ खुलासा करणे गरजेचे आहे.व नोंदणी न झालेल्या उर्वरित शेतकऱ्यांची तात्काळ ऑनलाईन कापूस नोंदणी सुरू करून 13 मार्च पूर्वी नोंदी केलेल्या शेतकऱ्याच्या पाठोपाठ लगेच कापूस खरेदी करणे गरजेचे आहे.

तसेच 13 मार्च पूर्वी केलेल्या नोंदणी नुसार शेतकरी कापूस विक्रीसाठी केंद्रावर जात आहेत परंतु त्यांचा कापूस काही तरी कारण दाखवून खरेदी केंद्रावर गेल्यावर ग्रेडर अपात्र ठरवत आहे अश्या घटना यापूर्वी जिल्ह्यात घडल्या आहेत.त्यामुळे आता या कापसाचे करायचे काय?कापूसच खरेदी झाला नाही तर वाहतुकीचा खर्च द्यायच्या कुठून?वाहनात कापूस भरणाऱ्या मजुरांचा खर्च करायचा कुठून? हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.तरी ग्रेडरने त्या कापसाच्या ग्रेड नुसार भाव ठरवून तो खरेदी केंद्रावरच खरेदी करून घ्यावा.कोणत्याही शेतकऱ्याला कापूस खरेदी न करता परत पाठवु नये.अन्यथा शेतकरी पुन्हा दलालांच्या तावडीत सापडतील व पांढरे सोने मातीमोल भावात विकण्याशिवाय त्यांच्या समोर पर्याय रहाणार नाही व या अडचणीच्या काळात बी- बियाणे कसे खरेदी करायचे हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावेल व त्यातून शेतकरी आत्महत्याना प्रोत्साहन भेटू नये व  "सरकारचे धोरण हे शेतकऱ्याचं मरण"ठरू नये म्हणून तात्काळ ग्रेडनुसार सरसकट शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करावा.व नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांच्या तात्काळ नोंदी करून घ्याव्यात व जिल्ह्याधिकारी यांच्या मार्फत तसा खुलासा लवकरात लवकर करण्यात यावा.अशी मागणी स्वाभिमानीच्या पूजा मोरे व गजानन बंगाळे यांनी केली आहे.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...