बुधवार, ८ एप्रिल, २०२०

           सिंधी काळेगाव येथील गाजीखान बाबा यात्रा रद्द.
सिंधी काळेगाव प्रतिनिधी:-जालना तालूक्यातील सिंधी काळेगाव येथील अनेक वर्षापासून चालत 
आलेला गाजिखान बाबा आणि सय्यद सहाब यांचा उरूसानिनित्त या ठिकानी मोठ्या यात्रेचे आयोजन करण्यात येते. आज(गूरूवारी)   यात्रा उत्सव होती. परंतु या वर्षी कोरोनाच्या पार्शभूमीवर जिल्ह्यात संचार बंदी असल्याने हि यात्रा रद्द केली असल्याचे आयोजकांनी सांगीतले.आज सिंधी काळेगाव येथे गाजिखान बाबा आणि सय्यद सहाब यांचा उरूस मोठ्या उत्सवात दरवर्षी  साजरा करण्यात येतो. या ठिकाणी जेवढे काही कार्यक्रम असतील ते हिंन्दू मुस्लीम मिळून साजरे करत असतात. काम धंद्यासाठी बाहेर गावी गेलेले गावकरी ही या यात्रे निमीत्त गावात येत असतात.  त्यामुळे वर्षातून एक वेळेस सर्वाच्या भेटीगाठी घडत असल्याने सर्वजन आनंद व्यक्त करत करत होते.  परंतु या वर्षी कोरोना या विशाणूने पूर्ण जगभर हाहाकार माजवलेला आहे.   त्यामूळे अनेक तिर्थक्षेत्राच्या यात्रा रद्द केल्या गेल्या आहे. तसचे सर्वकडे संचार बंदी असल्याने सिंधी काळेगाव या ठिकानची यात्रा रद्द करण्यात आली आहे. त्याची सर्वांनी  नोंद घ्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहॆ.

    जालना येथील रमाईनगर शासनाच्या अनुदानापासून वंचित.
       अद्यापही कुठली मदत शासनाची व्यक्ती आमच्याकडे 
        आली नाही - रमाई नगर येथील नागरिकांचा आरोप
जालना प्रतिनिधी :- कोरोना ने जगात हाहाकार
माजल्यामुळे सर्वत्र सर्वत्र लॉक डाऊन आहे. अशा परिस्थितीत घरातून बाहेर पडणे हातावरील मजूरराना मुश्कील झाले आहे. रमाई नगर येथील सर्व लोक हात मजूर असल्यामुळे त्यांचे अनेक तुमचा पासून काम बंद आहे. रोज काम केले तरच संध्याकाळी चूल शिलगेल, नाही तर उपाशीच झोपावं लागेल अशी परिस्थिती रामनगर राहणाऱ्या हात मजुरांची आहे. हाताला काम नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सर्व नागरिक आर्थिक परिस्थितीने ग्रासलेले आहेत. काम बंद आहे पैसा आणायचा कुठून असा प्रश्न या नागरिकांच्या मनामध्ये उपस्थित झाला आहे. महामारी मरण चालूच आहे पण जर अन्न आपल्याला नाही मिळालं तरी आपला मृत्यु होऊ शकतो असा अशी परिस्थिती रमाई नगरातील नागरिकांची झाले आहे. ना कुठली शासनाकडून मदत ना कुठल अनुदान किंवा कुठलीही शासनाची कर्मचारी रामाई नगरात आलेली नाही असा आरोप रमाई नगरातील नागरिकांकडून होत आहे. तसेच रमाई नगर मध्ये जास्त लोकसंख्येची वस्ती आहे. रमाई नगर मधील समाजसेविका श्री.शालिनी शर्मा यांनी देखील लेखी अर्ज शासनाकडे सादर केला आहे. तरीही शासनाची अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही असा आरोप शालिनी शर्मा यांनी देखील केलेला आहे. रमाई नगर मधील सर्व कुटुंब मजुरी करणारे असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
 प्रशासनाने याकामी लक्ष घालून गरजू लोकांना आर्थिक मदत देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी रमाई नगर नागरिकांकडून होत आहे.




  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...