गुरुवार, १९ मार्च, २०२०

कोरोना बाबत जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षास प्रदेशातून किंवा जिल्हा बाहेरून आलेल्या व्यक्तीची माहिती द्यावी-जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे
जालना जि. प्रतिनिधी :-  कोरोना बाबत जिल्हास्तरीय  आपत्कालीन नियंत्रण कक्षास परदेशातून किंवा जिल्ह्याबाहेरून  जालना जिल्ह्यात आलेल्या व्यक्तींनी माहिती द्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी  यांनी केले आहे. कोरोना विषाणू संसर्ग आजाराबाबत (कोविड-19) जिल्हास्तरावर आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून या कक्षामध्ये कार्यरत अधिकारयांद्वारे परदेशातून किंवा जिल्ह्या बाहेरून जालना जिल्ह्यात आलेल्या व्यक्तींची माहिती एकत्रित केली जात आहे.
        या नियंत्रण कक्षातून संबंधित व्यक्तींना थेट दूरध्वनीद्वारे संपर्क साधला जात आहे . यावेळी त्यांना कोरोना संसर्गाच्या सतर्कतेच्या दृष्टीने माहिती विचारली जात असून ती माहिती संबंधित व्यक्तींनी कोणतीही शंका मनात न ठेवता विचारणाऱ्या द्यावी.याच बरोबर अशा कोविड- 19  चा  प्रादुर्भाव झालेल्या  देशातून  अथवा  जिल्ह्यातून  आलेल्या व्यक्तींनी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष हेल्पलाईन क्रमांक 02482-223132 क्रमांकावर संपर्क साधून सकाळी 10 :30 ते सायंकाळी 5 या वेळेत स्वतःहून आपली प्रवासाबद्दल तसेच या आजाराबद्दल काही लक्षणे जाणवत असल्यास त्याची माहिती द्यावी अशी विनंती करण्यात येत आहे.परदेशातून किंवा बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या या व्यक्तींच्या प्रवासाच्या दिवसापासून 14 दिवसांच्या प्रकृतीविषयी  निरीक्षण  ठेवणे गरजेचे  आहे. त्याची माहिती या आजाराचा  धोका  रोखण्यासाठी या नियंत्रण कक्षाद्वारे घेतली जाईल.   
     जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली असून यासाठी कोणतीही शंका मनात बाळगू नये असेही आवाहन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
 शेजारच्या तरूणाने आपली मुलगी पळवून नेली या संशयावरून त्या तरूणाच्या घरावर हल्ला करून त्याच्या भावाचे मुंडके छाटल्याची खळबळजनक घटना वैजापूर जवळच्या लाख खंडाळा या गावी शनिवारी मध्यरात्री घडली.
वैजापूर | प्रतिनिधी या भयानक घटनेत मदतीला धावून आलेले त्याचे आई-वडीलही या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी वैजापूर पोलिसांनी आरोपी दोघा भावांना अटक केली आहे.

संपूर्ण जिल्ह्याला हादरवून टाकणार्‍या या धक्कादायक घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, वैजापूर तालुक्याती लाख खंडाळा गावच्या शेतवस्तीवर गायकवाड आणि देवकर कुटुंब शेजारी शेजारी राहतात. बाळासाहेब गायकवाड कुटूंबातील मोठा मुलगा अमोल हा तीन दिवसापूर्वी कामाला जातो असे सांगून घराबाहेर पडला. मात्र त्यानंतर तो घराकडे फिरकलेला नाही. विशेष म्हणजे शेजारी राहणार्‍या देवकर कुटूंबातील मुलगी नेमक्या याच सुमारास घरातून बेपत्ता झाली होती. शेजारी राहणार्‍या अमोल गायकवाडनेच आपल्या मुलीला पळवून नेले या संशयावरून शनिवारी रात्री रोहिदास आणि देविदास हे दोघे देेवकर बंधू तलवार व कोयते घेऊन गायकवाड यांच्या घरावर चालून आले आणि त्यांनी झोपेत असलेल्या गायकवाड कुटूंबावर हल्ला चढवला. या हल्ल्यात अमोलचे आई अलकाबाई गायकवाड (41) आणि वडील बाळासाहेब गायकवाड (47) गंभीर जखमी झाले. या अवस्थेतही त्यांनी भाऊ दादासाहेब गायकवाड यांचे घर गाठून हा प्रकार त्यांना सांगितला. त्यावेळी बाळासाहेब गायकवाड यांचा दुसरा मुलगा भीमराज (17) हा घरात झोपलेला होता. घराबाहेर काय चालले आहे हे समजण्यापूर्वीच देवकर बंधूनी तो झोपेत असतनांच तलवारीने वार करून त्याचे शीर धडा वेगळे केले आणि तेथून ते दोघेही पसार झाले. या अमानुष घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व दोन्ही आरोपींना अटक केली. अमोलच्या जखमी आई-वडीलांना वैजापूर येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भीमराजचे शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आला आहे.  या  प्रकरणीवैजापूर पोलीस ठाण्यात अट्रासिटी अॅक्ट नुसार दाखल करण्यात आला कलम गुन्हा ३०२, ३०७ प्रमाणे दाखल करण्यात आला.
एल सी बी चे पी आय भागवत साहेब पुदें साहेब  हे काॅ भालेराव रमेश आपसनवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.....
ग्रह एकत्र आल्याने कोरोनाची लागवण हलाहल रोगामुळे ही परिस्थिती निर्माण झाली -वे.शा.राजू महाराज सामगावकर
जालना प्रतिनिधी :- कोरोना व्हायरस या संसर्ग
जन्य आजाराने पूर्ण जगाला हादरून टाकले आहे.यात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे जगभरात थैमान घातलेल्या या आजाराला वैदिक शास्त्रानुसार काही ग्रहांचा प्रादुर्भाव असल्याचे जालना येथील इन्कमटेक्स कोलोनीत राहणारे वेदशास्त्री राजेश महाराज सामनगावकर यांनी सांगितले.या मध्ये वैदिक कारन निश्चितच आहे यामुळे जगावर वाईट - चांगले दिवस हे ग्रहमानाच्या स्थितीनुसार येतात.गेल्या 6 फेब्रुवारीला मंगल ग्रहोणे राशीमध्ये प्रवेश केल्याने या संसर्ग जन्य कोरोना व्हायरसाने जगभरात थैमान घातलेल आहे.कोरोना व्हायरस हा भारतात जेव्हा धनु राशीमध्ये गुरू,केतू,मंगल हे तिन्ही ग्रह एकत्र आल्याने हा व्हायरस जलद गतीने पसरत असल्याचे राजेश महाराज यांनी सांगितले.यामुळे जगात लोकांच्या विनाशाचा हा प्रादुर्भाव झाला आहे.कोरोना हा भारतात लवकरच आटोक्यात येईल.हा व्हायरस येत्या 26 एप्रिल पर्यत हा भारत देशात थैमान घालणार असल्याचे ही यावेळी राजेश महाराज यांनी बोलताना सांगितले.शनी हा ग्रह मकर राशीमध्ये पहिल्यापासूनच असल्याने मंगल ग्रह हा पण पृथ्वीच्या तत्वाच्या राशीमध्ये आहे.म्हणून येणाऱ्या 22 मार्च ला यावर मात होईल.तसेच 30 मार्च रोजी गुरू हा मकर राशीत प्रवेश करेल गुरू हा मकर राशीत आल्याने हा शुभ ग्रह असल्याने हा व्हायरस लवकरात लवकर आटोक्यात येईल.याचा धोका हा भारतात 45 दिवस राहणार आहे गुरू मंगल,शनी,मकर राशीत असल्यामुळे हा हलाहल रोग निर्माण झाला आहे.गुरू त्या ठिकाणी आल्यामुळे त्याचा प्रभाव कमी होईल.हालाहल या रोगामुळे अशे रोग भूकम्प प्रकार होत असतात.अंधश्रद्धेचा ग्रहावर परिणाम हा नक्कीच होत असतो.यावर विश्वास ठेवलाच पाहिजे.ज्योतिष शास्त्र हे आजच नसून पुरातन काळापासून असल्याचे राजेश महाराज यांनी सांगितले.आजपर्यत ज्योतिष शास्त्राने सांगितल्या प्रमाणे त्या त्या गोष्टी घडत आलेल्या आहे.त्यावर विश्वास ठेवायलाच पाहिजे.सर्व शुभ अशुभ घटना हे राशी प्रमाणे होत असतात मनुष्य कुठेही हतबल झाला असेतर तो सर्वात पहिले ज्योतिष शास्त्रकडे धाव घेत असतो.म्हणून राशी ग्रहाला माणलेच पाहिजे असे यावेळी वेदशास्त्री राजेश महाराज सांमनगावकर यांनी सांगितले.
विशाल (भैया) खाताळ यांच्या अभिष्टचिंतन सोहळा थाटात संपन्न.
दौंड गिरीम | शुभम देशवंत दौंड येथील हजारो युवकांचे हृदय स्थान विशाल भैय्या खताळ यांच्या अभिष्टचिंतन

सोहळा संपन्न झाला . विशाल भैया खताळ यांचा v.k ग्रुप दौंड या माध्यमाने अनेक वृद्ध व ज्येष्ठ नागरिकांना वेळोवेळी लागेल तसे सहकार्य करण्याचा प्रयत्न हा ग्रुप करत असतो व जेष्ठ नागरिकांना बसन्यासाठी सिमेंट बाकडे गिरिम गावासाठी भेट दिले. या ग्रुपने विशाल भैया खताळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्त औचित्य  साधून वृक्षरोपण कार्यक्रम ठेवून वृक्षारोपण केले. आशा ग्रुप ची महाराष्ट्राला खरी गरज आहे, हा ग्रुप प्रत्येक तालुक्यातील गरजवंतांची गरज भागवण्याचा प्रयत्न करत असतो . वाढदिवस प्रसंगी प्रमुख उपस्थिती - नंदकुमार खताळ, हरिभाऊ खताळ, सतीश करगळ ,अमोल मारकड, बाबासाहेब मदने, सागर खताळ, व समस्त गावकरी गिरिम हे उपस्थित होते.
==========================================================================


        दुबईहून आलेला अहमदनगरचा पुरुष कोरोना बाधित 
                        राज्यातील एकूण संख्या 48 
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडून विमानतळावरील स्क्रिनीग सुविधेची पाहणी.
मुंबई, प्रतिनिधी :- राज्यात आज दिवसभरात तीन ११,पुणे मनपा ८, मुंबई ९,नागपूर ४,यवतमाळ, नवी मुंबई, कल्याण
करोना बाधित रुग्णाची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ४८ झाली आहे.  नगर जिल्ह्यातील ५१ वर्षीय पुरुष करोना बाधित आढळला असून तो आपल्या पत्नीसह दुबईला गेला होता. त्याची पत्नी करोना निगेटिव्ह आढळली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. दरम्यान, आज आरोग्यमंत्र्यांनी आज मुंबई विमानतळावर जाऊन तेथे सुरू असलेल्या स्क्रीनींग सुविधेची पाहणी केली.राज्यातील जिल्हा आणि मनपा निहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील पुढीलप्रमाणे:पिंपरी चिंचवड मनपा
प्रत्येकी३,अहमदनगर२,रायगड, ठाणे, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी प्रत्येकी १,एकूण ४८, राज्यात आज ७८ संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकुण १३०५  प्रवासी आले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत १०३६ जणांना भरती करण्यात आले आहे. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ९७१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले आहेत. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण १३०५ प्रवाशांपैकी ४४२ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. आज दुपारी अडीचच्या सुमारास आरोग्यमंत्री टोपे यांनी मुंबई विमानतळावर जाऊन प्रवाशांची होत असलेल्या स्क्रीनींग सुविधेची पाहणी केली.ही तपासणी कशी केली याची माहिती घेतली. तपासणी करणाऱ्या डॉक्टरांशी संवाद साधत त्यांचे कौतुकही केले. इमिग्रेशन अधिकारी तपा भट्टाचार्य विमानतळ आरोग्य अधिकारी डॉ ए. आर. पसी आदी उपस्थित होते.

कोरोना:येत्या रविवारी देशात जनता कर्फ्यू. 
 औरंगाबाद प्रतिनिधी:- येत्या रविवारी देशभर जनता कर्फ्यु म्हणजेच संचारबंदी असे सुचित करण्यात आले आहे. 22 मार्चला रविवारी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत कोणीही घराबाहेर पडू नये असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात आवाहन केलं आहे.
 चीनच्या वुहान शहरातून फैलावलेल्या कोरोना व्हायरसनं जगभर धुमाकूळ घातला आहे. आत्तापर्यंत या व्हायरसमुळे जगभरात 9000 हून अधिक जणांनी आपले प्राण गमावलेत.
कोरोना चे भारतात 4 बळी
तर जगभरात नऊ हजाराहून अधिक बळी आपल्या देशात 173 कोरोना बाधित रुग्ण आत्तापर्यंत आढळले असून यात सर्वात जास्त 47 रुग्ण महाराष्ट्रात आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आपल्याला संकल्प करायला हवा की, आपण स्वत:ही करोनापासून वाचू या आणि इतरांनाही वाचवूया.
 संकल्प आणि संयम हेच करोनाला उत्तर आहे. करोनावर अजूनही उपाय निघालेला नाही.
 भारतावर या जागतिक संकटाचा परिणाम होणार नाही, असं मानून चालणं चुकीच ठरेल.
 भारतासारख्या 130 कोटींच्या विकसनशील देशावर करोनाचं संकट सामान्य गोष्ट नाही.

 आज 130 कोटी देशवासियांकडे काही मागण्यासाठी आलो आहे. मला तुमचा येणारा काही काळ हवा आहे.
 देशवासियांनी मला कधीही निराश केलेले नाही. मी जेव्हा कधी काही मागितलं तेव्हा देशवासियांनी मला दिलं आहे.
 संकट टळलेलं नाही. प्रत्येक भारतीयानं सजग राहायला हवं. संपूर्ण जग मोठ्या संकटातून जातं आहे.
22 मार्चला रविवारी संध्याकाळी पाच वाजता सायरन वाजवला जाईल तेव्हा आपण आपल्या घराच्या दारात खिडकीत बाल्कनीत उभे राहून सरकारी कर्मचाऱ्यांचा डॉक्टरांचं टाळ्या वाजवून आजवरच्या कार्याबद्दल अभिनंदन करूया
असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
≠=============≠==============≠==============≠===============≠=============


त्या मौजे खंडाळा प्रकरणात घटनेची निपक्षपणे चौकशी न करणाऱ्या पोलीस निरीक्षक व विभागीय पोलीस अधिकारी यांना सह आरोपी करून निलंबित करा बहुजन समाज पार्टी जालना च्या वतीने मागणी.
बहुजन समाज पार्टी च्या वतीने मुख्यमंत्री महोदय यांना निवेदन
जालना (प्रतिनिधी) :-  वैजापूर तालुक्यातील लाख 
 खंडाळा येथील भीमराज बाळासाहेब गायकवाड यांची समाजकंटकांकडून (हल्ला करणारे आरोपी) क्रूरपणे हत्या करण्यात आली. व तसेच त्यांच्या आई-वडिलांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणारा समाजकंटकां (हल्ला करणारे आरोपी) च्या निषेधार्थ बहुजन समाज पार्टी जालना च्या वतीने मुख्यमंत्री महोदय यांना निवेदन देण्यात आले. घटनेची अधिक माहिती अशी की, वैजापूर खंडाळा येथील दलित बौद्ध तरुण भिमराज गायकवाड यांचा मोठा भाऊ कामानिमित्त बाहेरगावी गेला असता त्याच्या शेजाऱ्यांनी आपली मुलगी पळविण्याच्या संशयावरून त्या तरुणाच्या घरावर हल्ला करण्यात आला.दलित बौद्ध तरुण भिमराज गायकवाड यांच्या वर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला.दलित बौद्ध तरुण भिमराज गायकवाड यांचा मृत्यू झाला.आई-वडील वर देखील हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले.व सदर गायकवाड कुटुंब यांनी घटनेच्या एक दिवस अगोदर निवेदन दिले होते की आमच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे आम्हाला संरक्षण देण्यात यावे.त्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे हा प्रकार घडला. व संबंधित पोलिस स्टेशनला केलेली तक्रारीची दखल न घेतल्यामुळे तसेच पोलिसांच्या असभ्य वर्तना मुळे हत्याकांड घडलेले असून सदरील घटने संबंधित पोलिस निरीक्षक व पोलिस अधिकारी यांना सहआरोपी करून निलंबित करण्यात यावे व ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा संबंधित खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा.आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी. गायकवाड कुटुंबीयांना न्याय मिळावा अशी मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदना मार्फत  करण्यात आली आहे.कारवाई न झाल्यास सदरील घटनेच्या विरोधात बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हा व राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल. पुन्हा महाराष्ट्राला अशा घटना घडू नये म्हणून यासाठी शासनाकडून कठोर आदेश प्रशासनाला देण्यात यावे अशी मागणी या निवेदनात केली आहे.वेळी जिल्हयातील पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते,  जिल्हा सचिव ज्ञानेश्वर गरबडे, वैभव
दहीवाळ,रविभाऊ मगरे,दिलीप मगरे,पदमाकर बोर्ड,सोनवनेभाई,अनिल् तुपे,सचिनभाऊ खरात,लक्ष्मीबाई लोखंडे सरस्वतीबाई डोळसे,सुरेश  कांबळे, दिपक सोनवणे, बबन सोनवणे,सचिन हिवराळे, अँड ढील्पे सर, आदींची उपस्थिती होती.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...