गुरुवार, २५ जून, २०२०

आराखडा प्रमाणे शहरातील सांडपाण्याची कायमस्वरुपी व्यवस्था करावी -  देवानंद चित्राल



जालना (प्रतिनिधी):- शहरातील कुंडलिका नदी पात्राच्या दोन्ही बाजुला जालना पलिकेने  सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प मंजूर असलेल्या (डी.पी.आर.) आराखडा प्रमाणे शहरातील सांडपाण्याची कायमस्वरुपी व्यवस्था करावी अशी मागणी सफाई अभीयान राबविणार्‍यांच्या वतिने मुख्याधिकारी यांना करण्यात आली. याविषयी सामाजीक कार्यकर्ता देवानंद चित्राल यांच्यासह अनेकांच्या सहिने निवेदन देण्यात आले.समस्त महाजन ट्रस्ट आणि लोकसहभागाने जालना शहरातील कुंडलिका नदी पात्राची सफाई आणि खोलीकरणाचे काम सुरु आहे. या कामाची सर्व सामान्यांकडुन कौतुक तसेच समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या नदीपात्रात शहरातील सांडपाणी सोडल्या जाते त्यामुळे पात्रात पुन्हा पुन्हा घाण होउन स्थिती जैसेथे होण्याची शक्यता आहे. नदीपात्रात घाण-सांडपाणी  न सोडता शासकीय गॅझेट मधील नकाशा प्रमाणे नदीपात्राची दोन्ही किनारे मोजणी करुन नकाशातील रुंदी नुसार मार्कींग करणे, तसेच नदीपात्रात कायमस्वरुपी सिमारेषा आखणे आणि वृक्षारोपासाठी जागा निश्चित ‍करुण देणे तसेच पात्रातील अतिक्रमण काढण्यासाठी पालिकेने कठोर निर्णय लवकरात लवकर घ्यावे अशी मागणी निदेवदनाद्वारे जालना पालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली.या निवेदनावर देवानंद चित्राल, शिवशंकर गायकवाड, बालू चाटला, रामेश्‍वर इंदलकर, कैलास फुलारी, वैजयंती मद्दलवार, संदिप वाधमारे, विनोद यादव, अदिंची नावे आहेत.


आराखडा प्रमाणे शहरातील सांडपाण्याची कायमस्वरुपी व्यवस्था करावी -  देवानंद चित्राल



जालना (प्रतिनिधी):- शहरातील कुंडलिका नदी पात्राच्या दोन्ही बाजुला जालना पलिकेने  सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प मंजूर असलेल्या (डी.पी.आर.) आराखडा प्रमाणे शहरातील सांडपाण्याची कायमस्वरुपी व्यवस्था करावी अशी मागणी सफाई अभीयान राबविणार्‍यांच्या वतिने मुख्याधिकारी यांना करण्यात आली. याविषयी सामाजीक कार्यकर्ता देवानंद चित्राल यांच्यासह अनेकांच्या सहिने निवेदन देण्यात आले.समस्त महाजन ट्रस्ट आणि लोकसहभागाने जालना शहरातील कुंडलिका नदी पात्राची सफाई आणि खोलीकरणाचे काम सुरु आहे. या कामाची सर्व सामान्यांकडुन कौतुक तसेच समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या नदीपात्रात शहरातील सांडपाणी सोडल्या जाते त्यामुळे पात्रात पुन्हा पुन्हा घाण होउन स्थिती जैसेथे होण्याची शक्यता आहे. नदीपात्रात घाण-सांडपाणी  न सोडता शासकीय गॅझेट मधील नकाशा प्रमाणे नदीपात्राची दोन्ही किनारे मोजणी करुन नकाशातील रुंदी नुसार मार्कींग करणे, तसेच नदीपात्रात कायमस्वरुपी सिमारेषा आखणे आणि वृक्षारोपासाठी जागा निश्चित ‍करुण देणे तसेच पात्रातील अतिक्रमण काढण्यासाठी पालिकेने कठोर निर्णय लवकरात लवकर घ्यावे अशी मागणी निदेवदनाद्वारे जालना पालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली.या निवेदनावर देवानंद चित्राल, शिवशंकर गायकवाड, बालू चाटला, रामेश्‍वर इंदलकर, कैलास फुलारी, वैजयंती मद्दलवार, संदिप वाधमारे, विनोद यादव, अदिंची नावे आहेत.


दलित बहुजनांची दिशाभूल करून दलाली करणाऱ्या गोपीचंद पडळकरांची बुध्दी भ्रष्ट धडा शिकवल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही  - शरद अडागळे

जालना,ब्युरोचीफ :- दलित मागासवर्गीय बहुजन समाजाची दिशाभूल करून आरक्षणाची खोटी आश्वासने देऊन दलाली करणाऱ्या व नुकतेच आमदार झालेल्या व्यक्तीने देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर टिका करणाऱ्या गोपीचंद पडळकरांची बुध्दी भ्रष्ट झाली असून त्याला मागासवर्गीय व बहुजन समाजाने धडा शिकवावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते शरद अडागळे यांनी आज व्यक्त केले .मुळामध्ये पडळकर हे काही दखल देण्याच्या लायकीचे नेते नाहीत.बारामतीमध्ये अजितदादाच्या विरोधात डिपाॅझिट वाचवू न शकलेल्या बिनअकलीच्या कांद्याने फुकट तोंड वाजवण्याने लोकांचे फार तर काही वेळ फुकट मनोरंजन होऊ शकते. गोपीचंद पडळकर हे  दलाल असुन स्वतःच्या  फायद्यासाठी दररोज काहीना काहि उचापती करण्याचा त्यांचा धंदा आहे नेहमी माकडा सारख्या कोलांट्या मारणाऱ्या आरेवाडी च्या बणात बिरोबाची  खोटी शपथ घेवून पडळकर यानी धनगर समाजाच्या लोकांना डावावर लावून आमदारकी मिळवली   त्यामुळे त्यांना धडा शिकवला पाहिजे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते शरद अडागळे यांनी समाज माध्यमांवर व्यक्त करून जाहीर निषेध केला

सरकारंमुळे सर्वसामान्य लोकांचे जीवन उध्वस्त, लॉकडाऊन मध्ये मनोरुग्ण वाढले - प्रकाश आंबेडकर


सोलापूर,ब्युरोचीफ :- आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये डिझेल व पेट्रोलचे भाव उतरले असताना भारत देशात मात्र त्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. हे सरकार म्हणजे संघटित गुन्हेगारांचे सरकार आहे. खडखडाट असलेली तिजोरी भरण्यासाठी पेट्रोल व डिझेलचे भाव वाढवले जात आहेत असा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरात केला. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. दरम्यान शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.कोरोना हा देशात इम्पोर्ट म्हणजेच आयात केलेला जिवाणू आहे. ज्या कुटुंबात कोविडने बळी गेला असेल, त्या कुटुंबीयाने पंतप्रधानांवर 302 चा गुन्हा दाखल करावा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केले. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष यांचा कार्यक्रम घेण्यासाठी परदेशी लोकांना बंदी घालण्याऐवजी त्यांना परवानगी दिली. वास्तविक पाहता त्यांना मनाई करण्याची सूचना होती. तरीही त्यांना भारतात येऊ दिले. त्याचा फटका या देशाला बसला असा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला.

    लॉकडाऊनमुळे बारा बलुतेदारांच्या व्यवसायावर बंदी आली. आवश्यक असलेल्या वस्तूंचा व्यवसायच ठप्प झाला. बारा बलुतेदार व्यावसायिकांची उपासमार झाली. त्यांना काहीही दिले नाही. केंद्र सरकारच्या वीस लाख कोटीच्या पॅकेजमध्ये या बारा बलुतेदारांना स्थान नाही. शासन दुर्लक्ष करीत आहे, अशी टीका आंबेडकर यांनी यावेळी केली.कोरोना महामारीमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे मनोरुग्णांच्या संख्येत वाढ झाली. कोरोना महामारीच्या नावाखाली शासनाने सर्वसामान्य लोकांना ब्लॅकमेल केले आहे. त्यांचे आयुष्य उध्वस्त केले. आज बापात बाप नाही, लेकात लेक नाही, कोणी एकमेकांना घरात येऊ देत नाही, कोणी दुसऱ्याच्या घरात जात नाही. अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. तेव्हा शासनाची वाट सर्वसामान्य लोकांनी बघू नये. आपले आनंदी जीवन जगावे असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केले. केंद्र व राज्यात राजकीय नेतृत्व नाही. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांचे प्रश्न जैसे थे आहेत. त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. या प्रश्नाकडे म्हणूनच दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला या पत्रकार परिषदेस प्रदेश प्रवक्ते आनंद चंदनशिवे, नगरसेवक गणेश पुजारी ,बबन शिंदे, विक्रांत गायकवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. सूचना केल्या. यावेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच दिवंगत सागर उबाळे यांच्या कुटुंबीयांची घरी जाऊन भेट घेतली. त्यांची विचारपूस करून सांत्वन केले. त्यानंतर ते शहीद सुनील काळे यांच्या बार्शी या ठिकाणी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.


अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार,सफाई कामगार महिलेच्या जेवणात आढळली पाल !



प्रकृती बिघडल्याने जिल्हा जालना रुग्णालयात हलविले

जालना,ब्युरोचीफ :- अंबड ( जि. जालना ) येथील  उपजिल्हा रुग्णालयातील एका सफाई कामगार महिलेच्या जेवणात चक्क मेलेली पाल आढळून आल्याचा प्रकार गुरुवारी ( दि.२५) दुपारी घडला. विशेष म्हणजे एका पाल महिलेच्या खाण्यात आल्याचे या महिलेच्या नातेवाईकांनी सांगितले.दरम्यान, चक्कर यायला लागल्याने या महिलेला जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
      अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना दररोज जेवण देण्यात येते. याचे एका व्यक्तीला कंत्राट देण्यात आलेले आहे. दरम्यान, या रुग्णालयातील कंत्राटी सफाई कामगार शांताबाई धोत्रे यांनी काम दुपारी रुग्णालयात जेवण घेतले. यावेळी त्यांच्या ताटात चक्क मेलेल्या पालीचे पिल्लू आढळून आले. तसेच दुसरे मेलेले पिल्लू त्यांच्या खाण्यात आल्याचे लक्षात येताच या महिलेला उलटी झाली. यावेळी येथील डॉक्टरांनी या महिलेवर उपचार सुरू केले. मात्र शांताबाई धोत्रे यांना चक्कर येत असल्याने डॉक्टरांनी त्यांना जालना येथे हलविले. जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे शांताबाई यांचे नातेवाईक राहुल कारके यांनी सांगितले. संबधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
   
तक्रार केल्यास कारवाई - डॉ. तलवाडकर

रुग्णालयातील जेवणात पाल आढळून आल्याचे आणि ती खाण्यात आल्याचे या महिलेचे म्हणणे आहे.त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना जालना येथे हलविण्यात आले आहे. जेवण देणाऱ्या कंत्राटदराविरोधात महिलेने तक्रार केल्यास पुढील कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. तलवाडकर यांनी दिली.


सुबोध काकाणी यांना उद्योग क्षेत्रातुन राज्यपाल नियुक्त विधान परिषद वर घेण्यात यावं..


नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड.

श्रीमती ज्यांची गुलामी करते असूनही कोणत्याही प्रकारची घमेंड नसलेले *काकाणी*परिवारातील पुरुषोत्तम राजाराम काकाणी या दाम्पत्याला दि. 16/10/1978 रोजी पुत्ररत्नाचा हेंद्राबाद येथे जन्म झाला. घरातील अगदी लहान पनापासूनच लाडका असलेले हे मुलं अगदी कमी वयातच नावारुपाला येऊ लागले ते त्याच्यातील सर्व जाती धर्मातील तळागाळातील लोकांच्या मदतीला धावून जाण्याच्या प्रवृतीमुळे जनमानसात त्याच्या विषयी आपोआप आदर निर्माण होऊन कोणीही निस्वार्थ त्याचा होऊन जातो असे हे धर्माबादकराणा लाभलेले वेक्तीमत्व अगदी फोन वर जरी मदत मागितली तर ती काही वेळात मदत पोहचता करणारे मी पाहिलेले सुबोध काकाणी कोरोना वायरस च्या लॉकडाऊन काळात शहरवासीयांना हाताला काम नाही शहरात हातावर पोट असलेली गोरगरीब जनता त्यांच्या घरात कशी चूल पेटेल या विवंचनेत असलेला व आपली तळमळ मित्र परिवारांना सांगून त्यांच्या संकल्पने तुन साकार झालेले *गावकरी किचेन च्या मधून शहरातील रोज 20 ते 23 हजार जनतेची भूख भागवण्याचे सारखे 32 दिवसात 650000(सहा लाख पणास हजार )अन्नचे पाकीट व्यवस्तीत घरपोच दिले जवळ जवळ 700 किंटल तांदूळा ची खिचडी करून दिल्यामुळे या उपक्रमाची नोंद राज्यस्तरीय स्तरावर झाली.  *गावकरी किचन*मधूनघरोघरी जाऊन खिचडी वाटप करणारे सुबोध काकाणी तालुक्यातील मोठे अधिकारी उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील, तहसीलदार दत्तात्रय शिंदे, पोलीस निरीक्षक सोहन माच्छर, मुख्यधिकारी देवरे. धर्माबाद शहराचे उपनगर अध्यक्ष विनायक रावजी कुळकर्णी शहरातील सर्व नगरसेवक. व प्रतिष्टीत नागरिक यांना या माध्यमा तुन सेवा करण्याची संधी मिळून देणारा सर्व खर्च स्वतः करून हि कोणत्याच प्रकारचा आव न आणणारा मी पाहिलेला देव माणूस सुबोध काकाणी यांनी बुलढाणा अर्बन बॅंकेच्या व स्वतः च्या माध्यमातुन आपल्या परिसरातील जनतेच्या समस्याचे बारकाईने अभ्यास करून ती पूर्णत्वास आणण्याच्या जिद्दीने आपणाला यांच्या साठी काही तरी करावेच लागेल या विवंचनेतुन त्यांच्या संकल्पना साकार करणारे सुबोध काकाणी धर्माबाद तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्व प्रथम प्राधान्य दिले ते शेतकर्याचं शेत माल ठेवण्यासाठी अतकूर शिवारात भव्य असे 8हजार मेट्रिक टन व 7 हजार मेट्रिक टन क्षमतेचे 10वेअर हाऊस ची निर्मिती केली.सर्व परिसरात cctv बसून जिल्ह्यातील एकमेव ठिकाण असलेली शासन दरबारी  नोंद आहे. तिरुपती देवस्थानला सण 2015 मध्ये 5 लाख व 2016मध्ये 10 लाख दान दिले आहेत धर्माबाद परिसरात मोठया प्रमाणात उधोग निर्माती करून 500जणांना कायम स्वरूपी रोजगार उपलब्ध करून दिला अतकूरगावास माजी राज्यपाल विद्यासागर राव यांच्या संकल्पने तुन दत्तक घेतले.2016मध्ये कोरडा दुष्काळ पडला असताना शहरवासियांना मोफत दिवस रात्र पाणी पुरवठा टेक्टर द्वारे केला.बुलढाणा अर्बन बॅंक व दिवाणी न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर मध्ये 526रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला होता.धर्माबाद तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेच्या कामात तत्कालीन जिल्हाधिकारी श्री.काकाणी व ड्रा. अरुण डोंगरे यांच्या काळात मोफत जी सी बी उपलब्ध करून दिली होती   त्यामुळे पूर्वी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. शहरात रुग्णांना ने आन करण्यासाठी रुग्णवाहनाची आवश्यकता असल्याचे त्यांनी हेरलं व तीचा लोकार्पण सोहळा पारपडला त्या मुळे तालुक्यातील रुग्णांचा प्रश्न मार्गीलागला लगेच त्यांनी शववाहिनीची तालुख्यतः गरज आहे म्हणून तीही दिमतीत उभी केली.तालुक्यात कुठेही आग लागल्या वर ती वीजवण्यासाठी अग्निशमन गाडी सुद्धा जनतेच्या सेवे साठी दिली कोविड -19 च्या काळात धर्माबाद नगर पालिका हद्दीत निर्जंतुकीकरन करण्यासाठी आपली सर्व यंत्रणा नगरपालिकेस  मोफत उपलब्ध करून दिली.धर्माबाद कृषि उत्पन्न बाजार समीती परिसरात हमाल मापाडी, व्यापारी, शेतकऱ्या व जनते साठी पिण्याचे शुद्ध व थंड पाणी मिळावे म्हणून या परिवारा कडून  करण्यात आले आहे.कोविड-19पासून देशास  व राज्यास मदत म्हणून या काकाणी  परिवारा काडून अचानक धर्माबाद येथील ग्रामीण रुग्णालयास भेट व तेथील कोरोना कक्ष पाहणी साठी आलेले नांदेड जिल्याचे जिल्हाधिकारी ड्रा.विपीन इटनकर यांना स्वघरी येण्याचे आमंत्रण देऊन पंतप्रधान सहायता निधी म्हूणन 250000 व मुख्यमंत्री सहाय्य्यता निधी म्हणून 250000 चा धनादेश संपत केला. आता तालुक्यातील सर्व जाती धर्मातील जनतेच्या पाल्याना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून अतकूर  शिवारात भव्य असे राजाराम काकाणी सहकार विद्या मंदिर स्थापन करण्यासाठी इमारत बाधकाम प्रगती पथावर आहे.परिसरातील गोरगरीब  मुलींच्या लग्नासाठी ते 11000, हजार रुपये आपल्या आजोबा राजाराम काकाणी यांच्या नावे देतात.यांच्या या सेवाभावी व्रतिची दाखल उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके यांनी जिल्हाप्रशासनस देऊन ती महाराष्ट्रचे राज्यपाल कोशरिया यांच्या परेंत पोहचवण्याचे काम जिल्हा प्रशासनाणे केले आहे या कामाची दखल राज्यपालंनी घेऊन मा.सुबोध काकाणी यांना नुकतेच सांगण्यात आली आहे.त्यांच्या या विविध कामाची दखल घेऊन राज्यपाल यांनी उधोग क्षेत्रातुन विधान परिषद वर नियुक्त करावयाची मागणीने जोर धरला आहे.तालुक्यातील युवावर्गाने सामूहिक निवेदन देण्यासाठी गावोंगावी स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे.सुबोध काकाणी यांना विधान परिषद वर उद्योग क्षेत्रातुन घेण्यात यावे म्हणून धर्माबाद तालुक्यातील 52 ग्रामपंचायत पैकी 38ग्रामपंचायतिने तसा ठराव घेतला आहे उर्वरित ग्रामपंचायत मध्ये तसा ठराव घेण्यासाठीची प्रकीर्या चालू आहे.तसे काकाणी परिवाराचे सर्वच राजकीय पक्षतील नेत्यांना सोबत चांगले संबंध आहेत.माजी राज्यपाल श्री.विद्यसागर राव यांचे कोटुबिक संबंध होते.ते कोणत्या पक्षची मदत घेतात या कडे सर्व तालुक्याचे लक्ष लागून आहे.आपल्या तालुक्यात जे जे जण उपयोगी आहे त्या गोष्टी चा बारकाईने अभ्यास करून ती कशी अमलात आणावी त्याचा जनतेला कसा फायदा होईल असे हे  सुबोध काकाणी या परिसरातील असे व्यक्तीमत्व आहे की ते कोणत्याही राजकीय पक्षत नाहीत. तरी ते लोकप्रिय आहेत.अशी व्येक्ती उद्योग क्षेत्रातुन विधान परिषद सदस्य झाल्यास आम्हांला त्यांच्या अभिमानच होईल असे धर्माबाद येथील जनता व माजी नगर सेविका सौ.नीता गायकवाड यांनी म्हणले आहे.


  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...