रविवार, २१ जून, २०२०


  जालना जिल्ह्याच्या हद्दीतुन जाणाऱ्या शेगांव ते पंढरपूर  या राष्ट्रीय माहामार्गाच्या कामाची चौकशी करा.    



प्रकाश सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष यांनी निवेदना मार्फत मुख्यमंत्र्यांकडे मागणी.



जालना, ब्युरोचीफ :- जालना जिल्ह्याच्या हद्दीतून शेगाव ते पंढरपूर (५४८) क्रमांक राष्ट्रीय महामार्गाच्या, ९० किलोमीटर रस्त्याच्या बांधकामात,मेघा इंजिनिअरिंग कंपनी व (MSRDC) अधीक्षक अभियंता,कार्यकारी अभियंता, श्री विक्रम जाधव,उप अभियंता श्री अतुल कोटेचा, यांनी मेगा इंजिनिअरिंग कंपनी  कोट्यावधी रुपयाचा घोटाळाप्रकरणी २०१८ मध्ये मुख्यमंत्री यांच्या कडे तक्रार केली होती, परंतु चौकशी झाली नव्हती, या प्रकरणी नव्याने उच्चस्तरीय समिती नेमून कारवाई करण्या बाबत निवेदन देण्यात आली. व सविस्तर माहिती अशी की,
जालना जिल्ह्याच्या हद्दीतून ९० किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग शेगाव ते पंढरपूर रस्त्याचे कामत घोटाळा करून काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे,शेगाव ते पंढरपूर (५४८) क्रमांक राष्ट्रीय महामार्गाचे काम खराब होत असल्याची तक्रार दि,४,८,२०१८ परत दि,१४,८,२०१८ मुख्यमंत्री कार्यालयात निवेदन देऊ तक्रार केली होती, पण चौकशी झालेली नाही, "मग लक्षात आले जेडी हि खराब है, पेड नाही" म्हणून शेगाव ते पंढरपूर रस्त्याचे खालचे (बेडचे) मजबुतीकरण पूर्वीचा जुना रस्ता तसाच ठेवून त्याच्या बाजूचा रुंदीकरणाच्या कामांमध्ये माती मिश्रित मुरूम,निकृष्ट दर्जाच्या माळावरच्या दगडाची खडी वाफरल्याली आहे,तसेच जुन्या रस्त्याचे खोदकाम न करता,अधीक्षक अभियंता रस्ते विकास महामंडळ (MSRDC) औरंगाबाद अधीक्षक अभियंता  यांच्या कडे दि,१४,७,२०१८ रोजी निवेदन देऊन काम खराब होतात आहे असी तक्रार केले होती, 
परंतु या मध्ये MSRDC अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता,उप अभियंता जालना, यांनी कोणतीच दखल न घेता,मेघा इंजीनियरिंग कंट्रक्शन  लिमिटेड हैदराबाद,या कंपनी विरोधात (MSRDC) ने कोणची कारवाई केली नाही,कारण अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उप अभियंता,मेघा इंजिनिअरिंग कंपनी कडून टक्केवारी घेऊन संबंधित मेघा कंपनीला सहकार्य केले, व तळणी ते मंठा या रस्त्यावरील दोन ठिकाणी पुलाचे बांधकाम चालू असतांनी पूल बांधकाम कोसळून गेले,तसेच “राष्ट्रीय केंद्रीय रस्ते विकास मंत्री, मा श्री नितिनजी गडकरी यांनी या शेगाव पंढरपूर रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या जाहीर भाषण करतांनी सांगितले होते,या गुत्तेदारने या राष्ट्रीय महामार्गाचे काम खराब केले तर त्याला बुलडोझर खाली घालीन” मग या मेघा इंजीनियरिंग कन्ट्रक्शन कंपनीवर (MSRDC) ने कारवाई का केली नाही,तसेच जालना जिल्ह्याच्या हद्दीतुन जवळपास ९० किलोमीटरच्या कामत अनेक ठिकाणाहून माती मिश्रित वढ्या नाल्याची वाळू व माती मिश्रित मुरूम,माळावरील दगडाचा वाफर केले आहे,या मेघा इंजीनियरिंग कंट्रक्शन कंपनीने वाळु व मुरूम,माळावरच्या दगडाची सरास चोरी करून वापरत असल्या बाबत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या वतीने,जिल्हाधिकारी कार्यालय जालना‌. तहसील कार्यालय परतुर‌. दि,३०,७,२०१८ रोजी तक्रार दिल्यानंतर जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील मौजे येनोरा येथील शासकीय पाझर (क्रमांक-३) तलावा मधून मुरूमाची चोरी होत असतांनी मेघा इंजीनियरिंग कंट्रक्शन च्या कामावर असणारे (२) पोकल्यान (२१) हयवा असे मिळून (२३) वाहनांवर,तहसीलदार परतुर यांनी दि,३१,७,२०१८ रोजी प्रत्यक्षात पाहाणी करून पंचनामा केला व (२३) वाहने जप्त करण्यात आली होती. आज दि, १५,६,२०२० रोजी (२१) हायवा, (२) पोकलेन असे (२३) वाहने अधिकृत तहसीलदार परतुर यांच्या ताब्यात आहेत किंवा नाही अशी शंका आहे,पण (२१) हायवा, (२) पोकल्यान यांचे पासिंग नंबर (व्हिडिओ) आहे,  तसेच मेघा इंजीनियरिंग कन्ट्रक्शन कंपनी यांनी मुरमाची चोरी केल्यामुळे,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला त्यामुळे या मेघा इंजीनियरिंग कंट्रक्शन कंपनीची, गौण खनिज चोरी केल्याप्रकरणी तक्रार,

दि,२४,८,२०१८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे निवेदन देऊन तक्रार केली होती,या नंतर मा जिल्हाधिकारी जालना व तहसील कार्यालय परतुर.तशील कार्यालय यांनी गौन खानीज वाळु,मुरुम,दगड चोरी केल्या प्रकरणी मेघा इंजीनियरिंग कंट्रक्शनला (१९ )कोटी रुपये दंड केला,त्या पैकी (९) कोटी रुपये दंडाची वसूल करून,उर्वरित वसुलीसाठी कार्यवाही करण्यात आली होती. तसेच सध्या शेगाव ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्गा क्रमांक,(५४८) या महामार्गावर काम करणारे. मेघा इंजीनियरिंग कंट्रक्शन यांनी बोगस काम केल्यामुळे या रस्त्यावरुण वाहन जातेवेळी हादरे बसतात,आपण रस्त्यावरून चाललो का जहाजातून चाललोय असा भास होतो,रस्त्याच्या बाजूला ऊभे राहिल्यास वाहने जातांनी रस्त्यात "भंन भंन" आवाज येतो,कारण या रस्त्याचे  काम खुपच खराब झाले मुळे रस्ता खाली वर खाली वर झालेला आहे,शेगाव ते पंढरपूर या रस्त्याच्या कामात जालना या मेघा इंजीनियरिंग कंट्रक्शन कंपनी कडून (MSRDC) अधिकाऱ्याने टक्केवारी घेतल्यामुळेच जालना जिल्ह्यातील सरहद्द वडगाव तालुका मंठा,गंगा सावंगी तालुका परतुर,रस्ता ९० किलोमीटर जालना जिल्ह्याच्या हद्दीत जात आहे, या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्णपणे खराब झाले आहे म्हणून (MSRDC) अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंत ,उप अभियंता जालना, मेगा इंजिनिअरिंग कन्ट्रक्शन कंपनी यांची अमलबजावणी संचालनालय (ईडी) निडर अधिकाऱ्या मार्फत चौकशी करावी, प्रधानमंत्री मा श्री नरेंद्रजी मोदी यांनी देशाला आव्हान केले आहे "मै खाऊंगा ना खाने दुंगा" म्हणून राष्ट्रीय महामार्गाचे काम बोगस केले, म्हणून मेघा इंजीनियरिंग कंट्रक्शन कंपनी लिमिटेड हैदराबाद हि कंपनी किती हि मोठी असू द्या,काळ्या यादीत टाका, कारण जालना जिल्ह्याच्या हद्दीतील ९० किलोमीटर रस्ता हा आताच खराब होत चाला आहे, पुलाचे चालू बांधकाम असतांनी अनेक ठिकाणी पुलाचे बांधकाम कोसळले, अनेक ठिकाणे रस्त्याला भेगा पडल्यामुळे रस्त्याचे नवीन रस्ता खोदकाम करून नवीन दुरुस्ती काम चालू आहे, या मार्गावरील वाटुर ते परतुर दोन्ही बाजूचे १५ किलोमीटर रस्त्याचे बांधकाम खोदुन नविन काम करण्याची गरज आहे.

मा उद्धवजी बाळासाहेब मुख्यमंत्री या नात्याने शेगाव ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्गा (५४८) क्रमांक,देखरेख करणारे MSRDC अधीक्षक अभियंता,कार्यकारी अभियंता औरंगाबाद,उप अभियंता जालना यांच्या सहकार्याने मेगा इंजिनिअरिंग कन्ट्रक्शन कंपनी रस्त्याच्या कामात घोटाळा केला आहे,या घोटाळ्याची नव्याने उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करावी, हे प्रकरण  अंमलबजावणी संचालनालय (ईडी) मुंबई यांच्या कडे देऊन,योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी प्रकाश  सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष जालना यांनी निवेदना मार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...