गुरुवार, ११ जून, २०२०

सचिन साठे यांना विधान परिषदेवर घ्या नसता, येणाऱ्या निवडणुकीत पुरोगामी विचारांची स्वतंत्र राजकीय ताकद उभी करू - चंद्रकांत कारके



जालना,ब्युरोचीफ :- राज्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणूकीत मा.सचिनभाऊ साठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राहुन मातंग समाजा सहित इतर बहुजन समाजाची मते NCP ला मिळवून दिली, त्यात साठे यांच्या भाषणाने निर्णायक मतांचा फायदा होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बरीच आमदार निवडून आली. तेव्हा मा.सचिनभाऊ साठे यांना NCP च्या कोट्यातून विधान परिषदेवर  येणात यावे असे प्रतिपादन बहुजन भारत पार्टीचे राष्ट्रीय महासचिव तथा आंबेडकरी चळवळीतील नेते चंद्रकांत कारके यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. पुढे श्री. कारके म्हणाले की, फुले-शाहु-आंबेडकर-आण्णाभाऊ यांच्या पुरोगामी विचारांची महाराष्ट्र राज्याला गरज आहे. भाजप सारख्या मनुवादी सरकारने देशातील ब-याच राज्यात सत्ता हात्तगत करून भारता सारख्या लोकशाही राष्ट्राची वाट लावली आहे असा आरोप करत, आण्णाभाऊ यांचे नाव घेऊन अनेकांनी मंत्रीपदे मिळवली आहेत मात्र आजही त्यांचे कुटुंब राजकीय सत्तेपासून उपेक्षित आहे हे दुर्देवी बाब आहे, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांचे नातू मा.सचिन साठे यांचे 2010 पासून आज पर्यंतचे समाजकार्य पहाता त्यांना NCP च्या कोट्यातून विधान परिषदेवर देण्यात यावे, नसता आगामी निवडणुकीत आम्ही सर्व पक्ष संघटनेला सोबत घेऊन स्वतंत्र पुरोगामी विचारांची राजकीय ताकद उभी करू असे शेवटी पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत कारके हे म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...