रविवार, २९ मार्च, २०२०


हिंगोली येथे पुन्हा एक घटना न्यूज18 लोकमत टीव्ही चॅनेल चे पत्रकार कन्हैया खंडेलवाल यांना पोलिसाकडून अमानुष मारहाण*
         महाराष्ट्रात होतोय पोलिसांकडून अतिरेक
महाराष्ट्र मध्ये पत्रकार यांच्या सुरक्षिततेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण?
हिंगोली प्रतिनिधी :- देशामध्ये कोराने थैमान 
माजले असून सर्व देशपातळीवर त्याला रोखण्यासाठी सदैव प्रयत्न चालू आहेत. तसेच  सरकार च्या वतीने सुद्धा प्रयत्न चालू आहेत.तसेच कोरोना विषयक जनजागृती करण्यासाठी पत्रकार बांधव आपल्या जिवाची पर्वा न करता समाज जागृतीचे काम करत आहेत. कोरोना संदर्भात माहिती शासनाकडून लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम व पत्रकार करत आहे, त्याच स्थितीत अशीच एक घटना हिंगोली येथे घडली आहे सविस्तर घटनेची माहिती अशी की, हिंगोली येथे न्यूज18 लोकमत'चे प्रतिनिधी श्री.खंडेलवाल यांना पोलिसाकडून अमानुष मारहाण करण्या ची घटना घडली आहे.श्री.खंडेलवाल हे रस्त्यावरून जात असताना पोलिस हे सामान्य जनतेला मारहाण करीत होते. राज्य सरकारने जनतेला मारू नका असा आदेश दिले आहेत तुम्ही अशी मारहाण का करता असा जाब खंडेलवाल यांनी पोलिसांना विचारला असता यावरून संतापलेल्या पोलिसांनी त्यांना अमानुष मारहाण केली. आणि मारहाण केल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रसारमंत्री श्री.जावडेकर यांनी दोन दिवसा खाली सांगितले होते की, पत्रकाराला अडवले तर कारवाई करण्यात येईल. असा सांगितले असता आज पुन्हा घटना घडली आहे कारण या अगोदर हिंगोलीमध्ये पोलीस जमदार साहेबराव राठोड  व त्यांची मुलगी प्रियांका राठोड आरोग्य सेवक यांना पोलिसांकडून मारहाण करण्यात आली आहे. ती घटना ताजी असतानाच पुन्हा ही घटना घडली.हा पोलिसांचा अतिरेक दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे कारण या मारहाणीचा निषेध सर्व मीडिया व पत्रकार यांच्या वतीने करण्यात आला आहे.पोलीस जर आपल्या बळाचा गैरवापर करत असतील तर हे योग्य आहे का? लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेला पत्रकारांना सुद्धा महाराष्ट्रात असून असुरक्षितता निर्माण झाली आहे. दिवसान दिवस महाराष्ट्रात पत्रकारावर पोलिसांकडून होणारे मारहाणीचे प्रकार महाराष्ट्रात वाढत चालले आहेत .महाराष्ट्रात वाढत असलेल्या प्रकरणावर सरकारने याची दखल घ्यावी व पत्रकार च्या सुरक्षते सबंधित कडक कायदे तयार करण्यात यावे.अशी मागणी पत्रकार व मीडिया यांच्या वतीने करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...