शनिवार, ४ एप्रिल, २०२०


                147 पैकी 111 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह
            3 नमुने रिजेक्ट तर 33 नमुन्यांचे अहवाल प्रलंबित
जालना, प्रतिनिधी - कोरोना विषाणुचा (कोव्हीड-19) 
प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग  जालना जिल्ह्यामध्ये दि.4 एप्रिल 2020 रोजी 21  रुग्ण नव्याने दाखल झाले आहे आतापर्यंत एकुण 147 रुग्ण विलगीकरण कक्षात  दाखल होते. त्यापैकी 147 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले असुन त्यापैकी 111 रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले असुन ते निगेटिव्ह आले आहेत व 3 नमुने रिजेक्ट असुन 33 नमुन्यांची अहवाल प्रलंबित आहे.आज रोजी 43 रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल असुन 42 रुग्णांची प्रकृती स्थिर आहे व एका रुग्णांची   प्रकृती गंभीर असून त्यावर उपचार सुरु आहेत. सदर रुग्णाचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला असुन त्याचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे.रुग्णालयातुन डिस्चार्ज झालेल्या तसेच परदेशी प्रवासाचा पुर्व इतिहास असणा-या सर्व व्यक्तींचे घरी अलगलीकरण करण्यात आलेले आहे. आजपर्यंत एकुण 122 परदेश प्रवास केलेले व्यक्तींपैकी 115 व्यक्तींचे घरीच अलगीकरण करण्यात आलेले आहे. तसेच इतर  शहरे व राज्यातुन आलेल्या 15 हजार 458 व्यक्तींचे तपासणी अंती घरीच अलगीकरण करण्यात आले आहे.संस्थेत अलगीकरण केलेल्या सहवाशितांची (Contact) संख्या 124 असून संत रामदास मुलांचे शासकीय वसतीगृह येथे 47, बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहामध्ये 39, मुलींचे शासकीय वसतीगृह येथे 38 जणांना दाखल करण्यात आलेले आहे. प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि.13 मार्च 2020 पासुन लागु करण्यात आलेला असून त्याअनुषंगाने शासन निर्देशानुसार दि. 1 मार्च 2020 नंतर परदेश प्रवासावरुन आलेल्या नागरीकांची आरोग्य तपासणी  व आवश्यकतेनुसार अलगलीकरण किंवा विलगीकरण करणे अत्यावश्यक आहे. तरी सर्व नागरीकांनी परदेशात प्रवास केल्याची माहिती प्रशासनास देऊन स्वत:ची व आपल्या कुटुंबियांची तपासणी सामान्य रुग्णालय, जालना येथे करुन घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले.  दरम्यान  जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे  यांनी कोरोना विषाणु संबंधित सर्व मुख्याधिकारी नगर परिषद, पंचायत यांची आढावा बैठक घेऊन संशयीत रुग्ण व त्यांच्या सहवाशितांची स्थानिक आरोग्य पथकांमार्फत तपासणी करुन लक्षणानुसार अलगलीकरण किंवा विलगीकरणाबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देत सर्व सहवाशितांचा किमान 14 दिवस पाठपुरावा करण्यात यावा. या दृष्टीने कार्यक्षेत्राचा कृतिक्षेत्राचा कृति आराखड्याची रंगीत तालिम घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...