बुधवार, १७ जून, २०२०

दुध दर वाढीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱी यांना निवेदन.

औरंगाबाद,ब्युरोचीफ :- शासन धोरणानुसार शेतकऱ्यांच्या दुधाचे भाव परवडत नाहीत. याकरिता 30 रुपये दर प्रमाणे दुधाचे भाव वाढवून व 10 रुपये अनुदान स्वरुपात प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत.अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्ष युवक आघाडी औरंगाबाद च्या वतीने केली आहे. सदरील दरवाढी झाली नाही तर यापुढे रस्त्यावर उतरून रासप च्या वतीने तिव्र आंदोलन करेल याची सर्व जवाबदारी प्रशासनांची राहील .मुख्य मंत्री व पशुसंवर्धन मंत्री यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या दुधाला 30 रुपये प्रमाणे दुध दर वाढवावा हि विनंती.निवेदनात करण्यात आली. यावेळी रासपचे युवाक जिल्हा अध्यक्ष दिलीप रिठे प्रदेश प्रवक्ते प्रो भास्कर टेकाळे देविदास नजन जिल्हा सचिव सुरेश कटारे शहर जिल्हा अध्यक्ष नारायण रिठे आदी उपस्थित होते





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...