शनिवार, २७ जून, २०२०

रासायनिक खत माफिया नामांकित कंपन्यांच्या खातात भेसळयुक्त,खत निर्माण करून. शेतकऱ्यांना विक्री करत आहेत. या रासायनिक खत माफियांना कृषी अधिकाऱ्यांचे व संबंधित नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांची पाठबळ सहकार्य करत असल्यामुळे यांच्यावर सरकारने फौजदारी गुन्हे दाखल करावे - प्रकाश सोळंके


जालना,ब्युरोचीफ :- जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनेक वर्षा पासून रासायनिक खत माफिया शेतकऱ्यांना फसवत आहेत. रासायनिक खत माफियांना कायमस्वरूपी काळाबाजार बंद हवा. यासाठी खासबाब म्हणून एक वर्षासाठी पोलिसांना अधिकार द्यावेत. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनेक वर्षा पासून रासायनिक खत माफिया भेसळयुक्त रासायनिक खत शेतकऱ्यांना विक्री होत असल्यामुळे उत्पन्नात मोठी घट होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. रासायनिक खतात भेसळ करून विक्री रासायनिक खत माफिया जालना जिल्ह्यात खुप वर्षापासून सक्रिय आहे. या रासायनिक खताच्या बॅगमध्ये भेसळ करणाऱ्या लोकांच्या स्वतःच्या मालकीच्या काही रासायनिक खत निर्माण करणाऱ्या कंपन्या मालकीच्या असल्यामुळे, नामांकित रासायनिक खताच्या बॅगमध्ये भेसळ प्रक्रीया यांच्या मालकीच्या कंपनी मध्ये भेसळ करून हे भेसळयुक्त बोगस विक्रीसाठी शेतकऱ्यांना उपलब्ध असते. यांच्याच संबंधातील जवळच्या लोकांना नामवंत कंपन्याच्या अधिकृत (डीलरशिप) भेटल्यामुळे या रासायनिक खताच्या बॅगमध्ये सहज भेसळ करून अनेक वर्षापासून हे भेसळयुक्त रासायनिक खत माफिया खत विक्री करुन शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत.या रासायनिक खताच्या बॅगमध्ये भेसळ होत असल्याची संपूर्ण माहिती नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना व कृषी अधिकाऱ्यांना माहिती असेल परंतु हि यंत्रणा रासायनिक खतात भेसळ करून विकणाऱ्या टोळी कडे  दुर्लक्ष आहेत. रासायनिक खत भेसळ करणाऱ्या टोळीचे व नामांकित कंपन्यांच्या अधिकृत विक्रीत्यांच्या आर्थिक संबंध आसल्यामुळे भेसळयुक्त रसायन खत माफिया सहज विक्री उपलब्ध करून विक्री करतात.तसेच भेसळ रासायनिक खत विक्री करण्यात मोठमोठ्या नामवंत कंपन्यांच्या खताच्या बॅगमध्ये भेसळ करून जशास तसे लेबल सील करून अधिकृत विक्रेत्या मार्फत विक्री होते. उदाहरणार्थ: ही टोळी भेसळ कशी करते एखाद्या नामवंत कंपनीची खताची बॅग ५० किलो वजनाचे असते. त्या बॅगमध्ये २५ मूळ मात्रा असल्याले खत ठेवतात व २५ किलो खराब दाणेदार खत किंवा वाळु मिश्रण करून जशास तसे लेबल सील करून भेसळयुक्त रासायनिक खत विक्रीसाठी मार्केटमध्ये उपलब्ध होते.म्हणून प्रत्येक चांगल्या नामवंत कंपनीच्या खतात भेसळ करतात कारण या नामवंत कंपनीच्या खताला शेतकऱ्यांची मोठी मागणी असते. याचा गैरफायदा घेऊन हि टोळी खत मिश्रण करून कोट्यावधी रुपयांची कमाई करुन घेतात. या खत माफिया यांना कृषी अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्यामुळे खत माफिया कोणालाही काही जुमानत नाहीत.म्हणून या वर्षी रासायनिक खताचे प्रत्येक डीलरच्या गोडाऊन मधून सॅम्पल घेऊन ५ ठिकाणी क्रॉस तपासणीसाठी पाठवावेत. या रासायनिक खत माफियांचा काळ्याबाजाराला आळा बसेल. रासायनिक खतांचा बॅग भेसळ असते हे कधीच कोणाच्या लक्षात येण्यासारखा नाही.कारण बिचारा शेतकरी विश्वासाने रासायनिक खत खरेदी करून सरळ शेतात घेऊन जातो, म्हणून याची कोणाच्याही मनात शंका पण येत नाही. खत माफिया रासायनिक खताची कृत्रिम टंचाई निर्माण करून.  खत माफिया रासायनिक खताचा काळाबाजार सुरू करतात.पण या मध्ये सगळ्यात जास्त नुकसान मोठे शेतकर्‍यांचे होते.कारण  शेतकरी अधिकचे पैसे देऊन शेतकरी खत माफियांच्या जाळ्यात गुतुन जातो. हे खत माफिया अनेक वर्षापासून रसायनी खताचा काळाबाजार चालवत आहे. परंतु महाराष्ट्रातल्या जनतेला एक वेगळ्या घराण्यातील मुख्यमंत्री मिळाल्यामुळे आपल्याकडून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची वेगळी अपेक्षा आहे. एक वर्षासाठी भेसळयुक्त रासायनिक खत विक्रीवर करणाऱ्या रासायनिक खत माफिया टोळीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयोगिक तत्वावर खासबाब म्हणून पोलीस यंत्रणेकडे अधिकार द्या.या रासायनिक खतावर नियंत्रण ठेवणाऱ्या कृषी अधिकारी व संबंधित नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे सरकारमार्फत दाखल करण्यात यावेत. रसायनिक खताच्या सर्व डीलर यांच्या गोडाऊन मधून सॅम्पल घेऊन ठिकाणी क्रॉस तपासणीसाठी पाठवावे. खत माफिया जिल्हा कृषी अधिकारी यांची निडर सक्षम, निस्वार्थी अधिकारी व पोलीस चौकशी करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी प्रकाश सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष जालना यांनी मा.मुख्यमंत्री महोदयांना निवेदना मार्फत केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...