गुरुवार, १२ मार्च, २०२०

अपंग निवासी विद्यालय या ठिकाणी दिव्यांग विद्यार्थी सोबत इको-फ्रेण्डली होळी साजरी करण्यात आली.
जालना/प्रतिनिधि :- ज्ञानज्योत बहुउद्देशीय सेवा भावी संस्था व अंजानी आई फाउंडेशन च्या वतिने जमना नंगर येथील अंपग
निवासी विधालय या ठिकाणी दिव्यांग विद्यार्थी सोबत ईको फ्रेंडली होळी साजरी करण्यात आली.या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा यानी होळीच्या शुभेच्छा देऊन होळी सन साजरा का करतात या बाबत माहीती दिली कि हिरण्यकश्यपू नावाचा राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा. स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णू चे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते. परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णू चा परम भक्त होता. आणि हे हिरण्यकश्यपू ला अजिबात पसंत नव्हते. तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे जेणे करून पुत्र प्रह्लाद भगवान विष्णूची उपासना करणे सोडून देईल. परंतु भक्त प्रह्लाद त्यांना न डगमगता त्याच्या भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होत असे. ह्या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली, आणि त्यानुसार आपली बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते कि ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही. राजाने होलिकेला भक्त प्रह्लाद ला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले. प्रह्लाद आपल्या आत्या सोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवलं कि तिला वरदानात असेही सांगितले होते कि ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेंव्हा ती स्वतः जळून राख होईल.अशी छोटी कथा सांगुन मुलाना सागितले कि होळी सुरक्षित होळी सांजरी करा
शक्यतो रंग वापरण्या पेक्षा फुलाने होळी साजरी करावी रंग खेळतानी,त्वचा,डोळे, याची काळजी घेउन ऊत्सव साजरा करा असे ज्योती आडेकर बोलत होत्या या कार्यक्रम ला ज्योती आडेकर,विधा जाधव,रूपाली पवार गौरव जाधव जावेद भाई,पवार सर व पदाधिकारी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...