गुरुवार, १८ जून, २०२०

जालना जिल्ह्यातील उप विभागीय अभियंता दूरसंचार कार्यालय परतूर येथे लॉकडाऊनचे निमित्त करून ३ महिन्यापासून कामात हलगर्जीपणा केल्यामुळे यांच्यावर  कारवाई करावी - प्रकाश सोळंके




जालना,ब्युरोचीफ :- जालना जिल्ह्यातील, परतुर दूरसंचार कार्यालयातील उप विभागीय अभियंता तीन महिन्यापासून हेडकॉटरला थांबत नाहित, यामुळे शासकीय कार्यालयातील नेटवर्क कनेक्शन बीएसएनएलच्या असल्यामुळे कामकाज ऑनलाईन काम करतांनी अनेक वेळा अडथळे निर्माण कामकाजात विलंब होत असल्यामुळे जनतेचे व शासकीय ऑनलाइन काम करणाऱ्यांचे  मोठे नुकसान होत आहे, या दूरसंचार यंत्रणेचा आहे खासगी दूरसंचार कंपन्यांचे काही आर्थिक संबंध आहे का ? अनेक वेळा दूरसंचार चे ग्राहक ऑफिस मध्ये जाऊन बीएसएनएल सेवेबद्दल तक्रार केल्यास स्थानिक उपलब्ध असल्याने अधिकारी सिम कार्ड दुसऱ्या कंपनीचा घ्या असे स्पष्ट उत्तर देतात, याचीसुद्धा चौकशी होणे गरजेचे आहे, अनेक वेळा बीएसएनएल रेंज नसते, खाजगी कंपन्या जेवढे सेवा देण्यासाठी सतर्क राहतात तेवढे बीएसएनएल अधिकारी सेवा देण्यास निष्काळजीपणा करतानी दिसत आहे, केंद्र सरकार दूरसंचार यंत्रणेवर एवढा मोठा खर्च करीत आहे, परंतु दूरसंचार अधिकारी याचा गैरफायदा घेऊन दूरसंचार वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिशाभूल करीत आहे, 


परतूर येथील उपविभागीय दूरसंचार अधिकारी व त्यांची यंत्रणा सतत गैरहजर असल्याने बीएसएनएल सेवा अनेक वेळा खंडित होऊन बीएसएनएल ग्राहकांना खूप मोठा मानसिक त्रास सहन करावा लागतो, परतुर येथील दूरसंचार अधिकाऱ्यांना दूरसंचार विभागाने राहण्यासाठी कॉटर्स उपलब्ध करून दिलेले आहेत, परंतु हे कोर्टस नुसते नावाला असून याठिकाणी अनेक दूरसंचार अधिकारी हेडकॉटर थांबत नसून औरंगाबाद याठिकाणी जाणे-येणे करतात, या तीन महिन्यात ते कार्यालयात दोन किंवा तीन वेळा आले असतील, बाकी ते कोठे काम करतात हा खरा चौकशीचा विषय आहे, परतुर येथील उपविभागीय दूरसंचार कार्यालयातील परिसरात कोठेही सी सी टीव्ही कॅमेरे लावल्याने नाहीत, कारण सीसीटीव्ही कार्यालयात असल्यास कोण कामावरती येऊ आपले कर्तव्य पार पाडीत आहेत हे कॅमेरा कैद होईल म्हणून या ऑफिसमध्ये सी सी टीव्ही कॅमेरे नाहीत.*
जालना जिल्ह्यातील परतुर येथील दूरसंचार उपविभागीय अधिकारी यांच्यासह यांची यंत्रणा कामात हलगर्जीपणा करीत, तीन महिन्यापासून कार्यालयात अनेक वेळा हजर नसल्यामुळे यांच्यावर कारवाई करण्यात अशी मागणी
मनसे जिल्हाध्यक्ष जालना प्रकाश सोळंके यांनी निवेदनात म्हटले आहे.
               


                                        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...