मंगळवार, १४ एप्रिल, २०२०


                  💥भंगाराच्या दुकानाला भीषण आग🔥, 
                           सुदैवाने जीवित हानी नाही🔹
चिखली (ब्युरो चीफ) :- चिखली शहरातील मध्यवस्तीत ,आठवडी बाजार स्थित असलेल्या मच्छी बाजारातील भंगाराच्या दुकानांमध्ये आज दि 14 एप्रिल रोजी दुपारी अचानक आग 
लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.याबाबत असे की, कोरोना पासून बचाव करण्यासाठी सर्वत्र लॉक डाउन करण्यात आले आहे, तर चिखली शहरात मुख्याधिकारी यांचे आदेशानुसार मेडिकल व दवाखाने वगळून संपूर्ण व्यापारी प्रतिष्ठाने आज पासून तीन दिवस संपुर्ण बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार आज संपूर्ण दुकाने बंद होती मात्र दुपारी 1 वाजेच्या सुमारास शहरातील आठवडी बाजारातील काही भंगाराच्या दुकानांना अचानक आग लागली, सर्वत्र सामसूम असल्याने आगीने लगेच रौद्ररूप धारण केले, आगीचे वृत्त समजताच परिसरातील नागरिकांनी मिळेल त्या मार्गाने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले, नगर पालिकेची अग्निशमन दलाची गाडी वेळेवर पोहचल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे सोपे गेले, वृत्त लिहिपरेत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले होते, तर प्राथमिक माहितीनुसार या ठिकाणी शे समदखा यांची भंगार दुकान व नजीर कुरेशी यांचे भंगाराचे गोडाऊन असल्याचे समजते.           

            जालना आॕईल मिल आसो.च्या वतीने मागील 
                15 दिवसा पासून गरजूंना अन्न वाटप.
                 जालना आॕईल मिल आसो.चे अध्यक्ष 
                 श्री.संजय जी शिनगारे यांचा पुढाकार

जालना,प्रतिनिधी :- जालना आॕईल मिल असोशियसन चे अध्यक्ष श्री संजय जी शिनगारे,अमित शेठ मिसाळ,कैलासजी सोनुने  यांचे सहकार्य लाभले. तर राजेश जी जिंदल,
सचिन मिसाळ, सचिन अग्रवाल,अंकित अग्रवाल,जितेंद्र मुंदडा,हेमेन्द्र लखोटीया,विजय कामड,सतीश पंच,नितिन पंच,विक्की बोथरा, मनोज देम्बडा,जयाजी देम्बडा,मुकेश अग्रवाल,रामेश्वर गाडगीळ,अरुण गाढे,विनोद शिनगारे,गणेश शिनगारे, ,अक्षय मिसाळ,गोपाल गौड,अमित मिसाळ,मनोज गडगील,संजय करवंदे,दीपक लोणकरवले,नारायण मिटकर,अनुज शिनगारे आदींनी अन्नदान साठी विशेष योगदान दिले.संपूर्ण जगामध्ये थैमान घातलेल्या कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव भारतामध्ये सुद्धा दिसून येत आहे. त्यातच महाराष्ट्रामध्ये कोरोना ने जास्तच थैमान घातले आहे.माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21दिवसा साठी संपूर्ण देश लाॕक डाऊन केल्याचे निर्देश दिले आहेत. देशात व महाराष्ट्रात संचारबंदी लागू झाल्यानंतर सर्व छोटे-मोठे उद्योगधंदे, व्यापार बंद झालेले आहेत. अशा स्थितीत मोलमजुरी करून ऊदरनिर्वाह करणाऱ्यांची बिकट स्थिती होत आहे.त्याच प्रमाणे जालना शहरातील बऱ्याच  भागामध्ये कामगार,मजूर व हातावर काम असणारे बरेच कुटुंब आपला उदरनिर्वाह करीत आहेत. परंतु लाॕक  डाऊन मुळे या सर्वांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.त्या अनुषंगाने आॕईल मिल असो.चे अध्यक्ष संजयजी शिनगारे यांच्या पुढाकाने गरजूंना मागील 15 दिवसा पासून पूरी भाजी आणि खिचडी देण्यात येत आहे.गांधीनगर येथील वृध्दाश्रम,संजीवनी हाॕस्पीटल येथील रूग्णांचे नातेवाईक,SPआॕफीस हेडक्वाटर परिसरातील गरजू तसेच चंदनझीरा येथील योजना हाॕटेल, ईंदेवाडी व शहरातील विविध परिसरात अन्नवाटप करण्यात आले.राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प अधिकारी मनोज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मागील 15 दिवसांपासून जालना आॕईल मिल आसोशियसन चा अन्नदान ऊपक्रमांमध्ये सहभाग.
 विश्वाला मिळालेले महान व्यक्तीमत्व - डाॕ.बाबासाहेब आंबेडकर
भारताच्या पावन भूमीवर अनेक थोर महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशा दर्शक ठरलेला आहे.
अशा या थोर महापुरुषात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव व सर्वात वर आहे.भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म वडील रामजी व माता भीमाबाई यांच्या पोटी १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. बाल भीमाचे वडील रामजी आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून दक्ष असत, त्यांना स्वतः वाचनाची आवड असल्यामुळे घरात ग्रंथसंग्रह हा होताच. मुलांना ही ते चांगली पुस्तके वाचावयास आणून देत असत. म्हणून बाबासाहेबांच्या आयुष्याच्या अंतिम क्षणापावेतो वाचनाची व अभ्यासपूर्ण चिंतनाची सवय त्याच्या ठायी आढळते. तुकाराम व कबीर बाबासाहेबांच्या अभ्यासाचे विषय भावी आयुष्यात झालेले दिसतात.डॉ.बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन, दलितांच्या, श्रमिकांच्या विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. गलितगात्र झालेल्या मनामनांतून समाजक्रांतीचे स्फुलींग चेतवून डॉ. आंबेडकर यांनी मुर्दाड झालेल्या समाजाला आपल्या हक्काप्रती जागृत केले.
डॉ. आंबेडकर म्हणजे प्रेरक, उद्धारक व तारक शक्ती होय:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नुसते पुस्तकी पंडित नव्हते तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घातली आणि आपल्या तत्वज्ञानाला कृतीची जोड दिली. त्यांनी मनुष्य मात्रांच्या जीवनातील दुःख, दारिद्रय आणि क्लेश दूर करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले पूरे ज्ञान माहिती व बळ लावले आणि रंजल्या गांजल्या जनतेच्या तसेच स्त्री वर्गाच्या शेतकरी, मजूर वर्गाच्या आणि पददलितांच्या उद्धारार्थ आपले प्राण पणाला लावून समतेची मंगलवाट दाखविते आणि मानवतेची दिव्य ज्योत निर्माण करते ती व्यक्ती केवळ वंदनीय नव्हे तर ती व्यक्ती प्रेरक, उद्धारक व तारक शक्ती ठरते.
शैक्षणिक विचार:
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वत्वाची जाणीव व्हावी या साठी त्यांनी शिक्षणाचे महत्व समाजात विशद केले. ''शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही,'' असे ते समाज बांधवांना सांगत. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे सांगत. ''प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे की, मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत दाखल झाले की, ते पूर्णपणे सुशिक्षित, माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करुनच बाहेर पडावेत. शासनाने यासाठी लक्ष द्यायला हवे त्यांचे म्हणणे हाते की, समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे. शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौद्धिक दृष्टा सशक्त होतो. व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक समजायला लागतो. प्रज्ञा, शील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज त्यांनी प्रतिपादन केलेली आहे. शाळेत मुलांना केवळ बाराखडी शिकवू नये तर मुलांची मने सुसंस्कृत व गुणवत्तामय बनवावी. समाज हितार्थ या ज्ञानप्राप्त मुलांनी आपली सामाजिक बांधिलकीची कर्तव्ये योग्य व समर्थपणे पार पाडावीत असे शिक्षण असावे. शाळा म्हणजे उत्तम नागरिक व कर्तव्यदक्ष नागरिक बनविणारे कारखाने आहेत. याचे भान या प्रक्रियेत भाग घेणार्‍यांनी ध्यानी घ्यावे. पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापन १९४६ साली करुन त्यांनी मुंबइला सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबादला मिलींद महाविद्यालय सुरू केले. राष्ट्रहीत व समाजहीताचे भान ठेवणारेच खरे शिक्षण होय असे ते मानीत.
सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते. भ्रष्टाचार, अनीति, अत्याचार, अन्यायास त्यांचा प्रखर विरोध होता. जातीभेदाच्या ते विरोधात होते. जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली किड ते मानत असत. ही सामाजिक किड नष्ट केल्याशिवाय समाज एकसंघ होणार नाही असे ते समजत. डॉ. आंबेडकर म्हणजे तळागळातील लोकांना बौद्धिक व समाजिक गुलामगिरीतून मुक्त करुन त्यांना मंत्र देणारे एक पथदर्शक होते. शिकल्याशिवाय आपल्यावरील न्याय, अन्याय, आपले हक्क ही आपल्याला कळत नाही अशा प्रकारे त्यांनी सामाजिक क्रांतीचे रणशिंग समाजात फुंकले.
बाबासाहेबांचे प्रखर राष्ट्रप्रेम व राष्ट्रनिष्ठा :
डॉ. बाबासाहेबांच्या आचार विचारांत राष्ट्रप्रेम व राष्ट्रनिष्ठा भरलेली होती. डॉ. आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा करताच तात्कालीन राष्ट्रीय नेते मंडळी घाबरली त्यांना वाटले डॉ. आंबेडकर आता देश सोडून जाणार परंतु डॉ. आंबेडकरांनी सांगितले, '' आम्ही या भारतदेशाची संतान आहोत, आम्हाला राष्ट्रीयत्वाची जाणीव आहेच, राष्ट्रावर संकट आल्यास प्राणपणाला लावून देशाचे रक्षण केले व करु सुद्धा '' यात डॉ. आंबेडकरांची प्रखर राष्ट्रनिष्ठा समावलेली आहे. 
विनोद पाटोळे सर 
सहशिक्षक सरस्वती विद्यामंदिर बीड
मो.8275004299

स्त्रियाचे शेतकरी, शेतमजूर श्रमजीवी, व दलितांचे कैवारी :
स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळावेत यासाठी त्यांनी अनेक चळवळी केल्या. स्त्रियांची गुलामगिरी डॉ. आंबेडकरांनी दूर केली. १९२७ ते १९५६ पर्यंतच्या काळात बाबासाहेबांनी भारतीय स्त्रीचा सामाजिक, कायदेशीर आणि राजकीय दर्जा, वाढावा म्हणून सतत प्रयत्न केला. १९४२ साली भरलेल्या नागपूर येथील परिषदेत त्यांनी महिलांना सांगितले की, स्वच्छता पाळा, सर्व दु्र्गुणांपासून दुर रहा, मुलामुलींना शिक्षण द्या त्यांना महत्वाकांक्षी बनवा, त्यांचा न्यूनगंड दूर करा असा महत्वाचा उपदेश केला. दलितांना त्यांचे हक्क मिळावे यासाठी त्यांनी त्यांच्या हक्कासाठी लढा दिला. श्रमजिवीच्या साठीही ते खंबीरपणे उभे राहिले. दलितांना मानाचे जीवन जगता यावे म्हणून ते सातत्याने संघर्ष करीत राहीले. केवळ दलितासाठीच नव्हे तर शेतकरी व मजूर यांच्या प्रश्नासंबंधी जोरदार लढा दिला.
अशा या महामानवाचे महान कार्य म्हणजे देशासाठी व समाजासाठीचे
सामाजिक बांधिलकीचे कर्तव्य होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विश्वाला मिळालेली महान देणगी होय. अशा या महामानवाने 6 डिसेंबर 1956 साली या महान व्यक्तीमत्वाने जगाचा निरोप घेतला घेतला .

सोमवार, १३ एप्रिल, २०२०


     शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचे अतिरिक्त नियतन मंजूर
           धान्यवाटपाबाबत तक्रार असल्यास संपर्क साधा.
        जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती बसेय्ये यांचे आवाहन
 जालना,प्रतिनिधी :-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत शिधापत्रीकाधारकांना 
धान्य  वाटप करण्यात येत आहे. या धान्य वाटपाबाबत नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रिना बसैय्ये यांनी केले आहे.
               नागरिकांच्या तक्रारीसाठी शैलेश राजमाने जालना-८००७०७०२२२,डी. बी. राजपूत,  बदनापूर,  ९४२१९९२८३८,  बी.बी.पाप्पूलवाड  भोकरदन-७४१०११५२२२,  श्रीमती व्ही.बी.पाप्पूलवाड जाफ्राबाद-८८०५१२८२४४, श्रीमती धनश्री भालचीम, परतूर-९१७५१००८८८,आर.आर.राखे,मंठा- ९९२१९६१२४४,एन.वाय.दांडगे,अंबड-९५५२७५६८२४ व श्री.एम.बी.उन्हाळे   घनसावंगी- ७३८७३७२७६६ यांना संपर्क साधावा,
     शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचे अतिरिक्त नियतन
अंत्योदय अन्न योजने मध्ये लाभार्थ्यांना दरमहा प्रति कार्ड २३ किलो गहु व १२ किलो तांदुळ असे एकूण ३५ किलो धान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामध्ये २ रुपये प्रति किलोप्रमाणे गहु व ३ रुपये प्रति किलोप्रमाणे तांदुळ असा दर राहणार आहे.
प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजने मध्ये व एपीएल केशरी शेतकरी लाभार्थी योजने मध्ये दरमहा प्रति सदस्य ३ किलो गहु व २ किलो तांदुळ असे एकूण ५ किलो धान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामध्ये २ रुपये किलोप्रमाणे गहु व ३ रुपये किलो प्रमाणे तांदुळ असा दर राहणार आहे.
                   प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत
अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील लाभार्थ्यांसाठी माहे एप्रिल, मे व जून २०२० या प्रत्येक महिन्यासाठी प्रति सदस्य ५ किलो मोफत तांदुळ ज्या-त्या महिन्यात वाटप करण्यात येणार आहे.
                        शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना
मे व जून 2020 या प्रत्येक महिन्यासाठी प्रति सदस्य ३ किलो गहु व २ किलो तांदुळ असे एकूण ५ किलो धान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामध्ये गहु ८ रुपये प्रति किलो प्रमाणे व तांदुळ १२ रुपये प्रति किलो प्रमाणे वाटप करण्यात येणार आहे.
                       प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस धारकांना
माहे एप्रिल, मे व जून २०२० दरमहा १ सिलेंडर याप्रमाणे एकूण ३ सिलेंडर मोफत मिळणार आहेत. गॅस सिलेंडरची किंमत ज्या-त्या गॅस धारकांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. ती रक्कम खात्यातून काढून गॅस कंपनीला द्यायची आहे.

                कृषी सेवा केंद्र, पशुखाद्य दुकाने सुरू ठेवा - 
                                                            खासदार प्रतापराव जाधव
🔴रात्रीचे दूध संकलन बंद करू नका
🔴कृषी फिडरवर रात्रीची लाईन पूर्णक्षमतेने द्यावी
🔴ऑनलाईन रेशन कार्ड नसलेल्यांनाही राशन द्यावे
 बुलडाणा, प्रतिनिधी:-कोरोना विषाणू प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यात लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. अशा परिस्थितीतही शेतकरी शेतात कष्ट उपसत आहेत. येत्या खरीप 
हंगामासाठी  तयारी करीत आहे. त्यामुळे कृषी सेवा केंद्र, पशुखाद्य  दुकान आणि तालुका पातळीवर पाईपलाईन साठी शेतात लागणाऱ्या अवजारांचे हार्डवेअर चे काही प्रमाणात दुकाने उघडण्यात यावेत. यावेळी सोशल डिस्टसिंगचे पालन करण्यात यावे, अशा सूचना  केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव यांनी केली आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आज खासदार प्रतापराव जाधव यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्ससिंग पाळत जिल्हा आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार संजय गायकवाड, कृउबास सभापती जालिंदर बुधवत, जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, जिल्हा परिषदेचे सीईओ षन्मुख राजन, अप्पर जिल्हाधिकारी श्री  दुबे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे , जिल्हा पुरवठा अधिकारी  गणेश बेल्लाले , समाज कल्याण अधिकारी श्री. मेरत आदी उपस्थित होते. 
 बाजारपेठा बंद असल्याने शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले असल्याचे सांगत खासदार श्री. जाधव म्हणाले, सद्यस्थितीत फळबागांमध्ये अंगूर तसेच टरबूज, खरबूज आणि कांदा पिकाच्या बाबतीत स्थानिक पातळीवर नियोजन करून स्टॉल लावून विक्री व्यवस्था करावी अथवा पर्यायी उपाययोजना करावी. शिवाय ट्रान्सपोर्ट सुविधा सुद्धा उपलब्ध करून द्यावी. कृषी सेवा केंद्र बंद आहेत. शेतकऱ्यांना येत्या हंगामाला सामोरे जायचे आहे. त्यामुळे कृषी सेवा केंद्र, पशुखाद्य दुकाने आणि शेतातील पाईपलाईन साठी लागणाऱ्या दुकाना पैकी हार्डवेअरची दुकाने देखील काही तासांसाठी करता उघडण्यात यावी किंबहुना तसे शक्य नसल्यास किमान एक दिवसाआड तरी उघडण्यात यावीत. नाफेड मार्फत कापूस आणि तूर खरेदी सुरू करण्यात येत आहे. त्या ठिकाणी मार्केटिंग फेडरेशन ही मुख्य एजन्सी असल्याने स्थानिक पातळीवर खरेदी केंद्र ठिकाणी सनेटायझर व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. अशा सूचना मार्केटिंग फेडरेशनने कराव्यात. दूध हे सध्या महत्त्वाचे असून सकाळी संकलन केंद्र सुरू आहे. मात्र रात्रीचे संकलन केंद्र बंद आहे. 
 ते पुढे म्हणाले, ग्रामीण भागात शेतकऱ्याकडे फ्रीज अथवा दूध थंड ठेवण्यासाठी साधनसुविधा नाहीत. त्यामुळे रात्रीचे संकलन (वाटप नव्हे) केंद्र सुरू ठेवावे.
सर्व प्रकारची कामे बंद असल्याने कामगारांवर आणि गोरगरिबांना रेशनचे धान्य शिवाय दुसरा सध्या आधार नाही. त्यामुळे ज्यांचे राशन कार्ड ऑनलाईन नसेल त्यांनाही धान्य वाटप व्हावे. काही गावात एकाच राशन दुकानदाराकडे दोन ते तीन गावे जोडलेली आहेत. इतर गावातून त्या ठिकाणी धान्य घ्यायला आलेल्या लोकांना विरोध होतो. त्यामुळे त्याच्या गावात जाऊनच ग्रामपंचायतमध्ये काय होईना परंतु धान्य वाटपाची व्यवस्था करण्यात यावी. कुटुंब प्रमुखालाच सध्या तांदूळ मिळत आहेत. मात्र एका घरात चार ते पाच जण असल्याने त्या सगळ्या व्यक्तींना लाभ मिळावा. 
समृद्धी महामार्गाचे काम सुरू ठेवण्यात आले असल्याचे सांगत खासदार म्हणाले, क्रशरच्या व अन्य कामासंबंधी ब्लास्टिंग साहित्य त्यांना आणावे लागते. त्याकरिता वाहनांसाठी विशेष परवानगी देण्यात यावी. नॅशनल हायवेच्या  कामातील ब्रिज अर्थात पूल बांधण्याचे काम जोमाने करण्यात यावे. सध्याही कामे बंद आहेत. मजुरा संबंधीचे अडचणी लक्षात घेता येतील. मात्र आगामी पावसाळ्याच्या आधी काम झाली नाहीत, तर प्रशासनाला कुठलीही मदत गाव खेड्यांमध्ये पोहोचता येणार नाही. या गंभीर बाबीकडे ही त्यांनी लक्ष वेधले. 
     बऱ्याच महानगरांमध्ये दुर्धर आजारावर उपचार घेण्यासाठी जिल्हावाशी गेले आहेत. काहींचे मुलं शिक्षणासाठी आहेत. त्यांच्याकडील राशन, पैसे संपले आहेत. त्यामुळे अशांना प्राधान्याने जिल्ह्यात त्यांच्या घरी सुखरुप आणण्यासाठी परवानगी द्यावी अथवा तशी व्यवस्था जिल्हा प्रशासनाने करावी, अशी मागणीही त्यांनी याप्रसंगी केली. जनधन खात्यामध्ये तसेच वृद्ध, निराधार व अन्य योजनांसाठी पैसे जमा झाले म्हणून बँका समोर गर्दी होत आहे. यात वृद्धांची संख्या मोठी आहे.ही बाब धोक्याची आहे. त्यामुळे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांचे कडून बँक निहाय यादी घ्यावी आणि गाव निहाय अकाउंट नंबरचे वाचन करून दवंडी देत सूचना द्याव्यात. जेणेकरून त्यांचा नंबर असेल त्यांना दिनांकासहित बँकेत बोलवावे. अथवा जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यावर पैसे घेऊन ग्रामसेवक, तलाठी यांच्यामार्फत गाव निहाय ते पैसे लाभार्थ्यांना देण्यात यावेत अशाही सूचना याप्रसंगी खा.जाधव यांनी केल्या. 
  लॉक डाऊन मध्ये ग्रामीण भागात लोक थेट शेतात राहायला गेले आहेत. सध्या कारखानदारी बंद असल्याने वीज वापर मोठ्या प्रमाणात थांबला आहे. सर प्लस विज सध्या आहे. उन्हाळा दिवस असल्याने गर्मी वाढत आहे. त्यातच शेतात रात्री लाईन बंद असते. ग्रामीण भागातील लोक प्रशासनाला मोठ्या प्रमाणात स्वतःहून सहकार्य करत आहेत. त्यासाठी कृषी फिडर आणि गावठाण फिडर पूर्णक्षमतेने 24 तास वीज पुरवठा करावा. निदान कृषी फिडरवर रात्रीचा पुरवठा बंद करू नये असेही ते म्हणाले.
पोलिसांना मिळाव्यात कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी मुलभूत सुरक्षा सुविधा
आज पोलीस खंबीर पणे या लढ्यात सामील झाले आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या तुलनेत त्यांच्याकडे मास्क, ग्लोज, पीपी ई किट, सनेटायझर, उपलब्ध नाहीत. ही बाब लक्षात घेऊन त्यांना मुलभूत सुरक्षा कवच देण्यासाठी  खासदार निधीमधून निधीदेखील दिला होता. मात्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेमध्ये आरोग्यसेवा पुरविणाऱ्या व्यक्तीसाठीच असा उल्लेख असल्याने अडचण निर्माण झाली आहे. याबाबत स्थानिक डीपीडीसी अथवा अन्य पातळीवर निधी घेऊन पोलीस विभागाला द्यावा. जेणेकरून पोलीस कर्मचाऱ्यांना या सुविधा तातडीने देता येतील.
जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट
यावेळी खासदार प्रतापराव जाधव यांनी उपचारासाठी लागणारे साहित्य, व्यवस्था व औषधसाठ्याची घेतली माहिती.
या बैठकीपूर्वी खासदार यांनी  जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. कोरोना  बाधित रुग्ण या दवाखान्यात असून तेथील औषध उपचार याबाबत जाणून घेतले. शिवाय उपचारासाठी लागणारे साहित्य, व्यवस्था व औषधसाठा आणि भविष्यात लागणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेतली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयाला वाढीव सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी खासदार निधीमधून देण्यात आलेल्या ३० लक्ष रु. याचे नियोजनबाबत माहिती घेतली. तसेच व्हेंटिलेटर व अन्य सुविधा वाढवण्यात याव्यात असेही जिल्हा शल्य चिकित्सक यांना निर्देशित केले.                                
  कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी  डॉ.बाबासाहेब आंबेडकर             यांची जयंती ऑनलाईन साजरी करा- दीपक डोके

जालना (प्रतीनिधी):-देशातच नव्हे तर जगात कोरोनाने थैमान घातले आहे. प्रत्येक देश कोरोनाला रोखण्यासाठी त्याचे मुळापासून उच्चाटन करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहे आणि त्या कामी प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, प्रशासनाला सहकार्य करायचे. त्यामुळे येणारे सण, उत्सव यंदा सार्वजनिक स्तरावर साजरे न करता आपल्या घरातच साजरे करून प्रशासनाला सहकार्य करायचे आहे. यावर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भव्यदिव्य साजरी न करता एकजुटीने ऑनलाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या ऑनलाईन जयंती
सर्वांनी या जयंतीच्या कार्यक्रमात भाग घेऊन देशाला कोरोना मुक्त करण्यासाठी यंदाची जयंती घरीच साजरी करून प्रशासनाला सहकार्य करावे तसेच जयंतीनिमित्त जमा झालेला निधी गरिबांना द्यावा. जेणे करून हातावर पोट असलेल्या लोकांची चुल पेटती राहिली पाहिजे. हाच संदेश महात्मा जोतिबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अँड.बाळासाहेब आंबेडकर यांनी दिला आहे. या उपक्रमास मोठ्याप्रमाणात ऑनलाइन प्रतिसाद मिळत असून यातून प्रेरणा घेऊन अनेक फेसबुक पेजेस आणि संघटनांनी जयंती ऑनलाईन साजरी करण्यात पुढाकार घेतला आहे.असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी दीपक डोके यांनी केले आहे.
     परिवर्तनवादी विचारांची जयंती साजरी करा - हरीश बोरुडे
बदनापूर प्रतिनिधी :-डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती लॉकडउन मुळे व्यापक 
प्रमाणावर साजरी करणे शक्य नाही.त्यामुळे नागरिकांनी आपल्या कुटुंबासोबत विविध परिवर्तनवादी विचारांचे पुस्तके ,ग्रंथ वाचून परिवर्तन विचाराची एक आदर्श जयंती साजरी करावी.देशभरात सध्या कोरोनाचा फैलाव होत असल्यामळें नागरिकांनी घराबाहेर न पडता शासनाच्या सूचनांचे पालन करावे.व जयंतीनिमित्त एका ठिकाणी गर्दी करू नये.आपण सर्वांनी भिमजयंती घरीच साजरी करू. कोरणा वर मात करू .असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे युवा तालुका संघटक हरीश बोरुडे यांनी केले आहे

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...