गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२०

 तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा तलावात बुडून मृत्यू.

औरंगाबाद (प्रतिनिधी) :- औरंगाबाद येथील दिनांक 19 फेब्रुवारी वार बुधवार रोजी शिवजयंतीनिमित्त पाहण्यास गेलेल्या दोन मित्रांचा गाळात फसून मृत्यू झाला. बुधवारी दुपारी महालपिंप्री शिवारात तलावात
पोहण्यासाठी संदेश गंगाराम कापसे (वय 17 वर्ष) राहणार आंबेडकर नगर औरंगाबाद  व साहेब खान मुमताज खान (वय 16 वर्ष) रा. मिसारवाडी औंगाबाद. मृतांची नावे आहेत. अधिक माहिती अशी की शिवजयंती निमित्त सुट्टी असल्या कारणाने बुधवारी दुपारी महाल पिंप्री शिवारात साडेचारच्या सुमारास पाहण्यासाठी गेले होते त्यांना खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडायला लागले मित्राने आरडाओरड केली त्याचा काहीच उपयोग झाला नाही घटनेची माहिती कळताच चिकलठाणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश आंधळे, नगरसेवक कलीम कुरेशी, सुनील धोत्रे यांच्यासह नागरिक व अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. संदेश कापसे व साहेब खान मुमताज खान यांचे मृतदेह तालवाबाहेर काढून घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले. मृत संदेश सध्या बारावी शिकत होता तर साहेब खान हा आठवी शिकत होता. घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...