बुधवार, २६ फेब्रुवारी, २०२०

हरीनाम हे मानव जीवनाचे उध्दार करणारे नाम आहे- ह.भ.प
बद्रीनाथ महाराज यज्ञेकर जोशी
सिंधीकाळेगाव (प्रतिनिधी):-भगवंताच्या नाम चिंतनाने मोह,मध,मत्सर, या सर्व गोष्टीचा नाश होतो तसेच मानव जीवनाचा उध्दार होतो असे प्रतिपादन रामनगर येथील बाल कीर्तनकार बद्रीनाथ महाराज यज्ञेकर-जोशी यांनी मौजपुरी येथे सुरू असलेल्या 
 अखंड हरिनाम सप्ताह प्रसंगी पहिल्या दिवशी कीर्तन रुपी सेवेत केले.किर्तनरुपी सेवेसाठी घेतलेल्या ज्ञानदेव राय यांचा अभंग रामकृष्ण नामे हे दोनी साजिरे हृदय मंदिरी स्मरा कारे आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा रुदय जिव्हाळा श्रीमूर्ती राया या अभनगवर पुढे निरुपम करताना ते म्हणाले की एकदा मनुष्य मोह पाश्यात अडकला गेला की त्याला काही कळत नाही त्याचप्रमाणे मद्यपान केलेला माणूस मद्यपान केल्यानंतर आपले श्रेष्ठत्व व स्थान विसरून जातो पण मद्याची नशा ही काही काळापुरती मर्यादित असते पण मोहाची नशा ही जन्मोजन्मी उतरत नाही त्याच बरोबर ज्ञानी मनुष्य मोहपाश्या अज्ञानी होतो सदाचारी हा दुराचारी होतो अशा मोहतून जर सुटका करायची असेल तर भगवंतांचे नामसमरण जीवनात केले पाहिजे त्याचबरोबर तारुण्य हे माणसाला नको त्या गोष्टीकडे घेऊन जात जाते तेव्हा तरुणपणात भगवंताचे नामचिंतन करणे आवश्यक आहे आपुलिया आपण करा सोडवणं या अभंगतील उकतीप्रमाणे आपली जर दुःखातून सोडवणं करावयाची असेल तर ते आपणच सोडवू शकतो कीर्तन श्रवणासाठी मौजपुरी सह पंचक्रोशीतील भाविक भक्ताची मोठ्या प्रमाणात उपस्तीती होती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...