रविवार, १९ एप्रिल, २०२०

छावा क्रांतिवीर सेना महाराष्ट्र व शिवसेना-युवासेना पक्षाच्या वतीने कोरोना पार्श्वभूमीवर अन्न धान्याचे २८०० किट व ९००० कुटुंबना कांदा व बटाटेचे किट वाटप करुण मानुसकीचे नाते जपले.
प्रतिनिधी |नाशिक आजचा चौदावा दिवस दि १८/४/२०२० प्रभाग क्र 9 शिवाजीनगर,जिजामाता कॉलनी, साई बाबा गार्डन,महाराणा प्रताप चौक,विठाई चौक,स्वामी समर्थ केंद्र परिसर, श्रीकृष्ण मंदिर परिसर,जुने दत्त मंदिर परिसर, सप्तशृंगी नगर परिसर, शनि मंदिर परिसर,शिव शक्ति चौक,अभ्यासिका परिसर,धर्माजी कॉलनी, श्रमिकनगर भाग माळी कॉलनी, स्वामी समर्थ केंद्र परिसर, कालिका मंदिर, विट्ठल रुक्मिणी मंदिर, छत्रपति संभाजी नगर कॉलनी, अभ्यासिका
 परिसर, गणेश मंदिर, शनि चौक, तुळजा भवानी मंदिर परिसर, आय टी आय कॉलनी तसेच इतर परिसरात देखील आता पर्यंत २८०० किट गरीब व गरजू कुटुंबांना

दैनंदिन जीवन आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.त्यामध्ये प्रामुख्याने तांदूळ,गव्हाचे पीठ,तेल,मीठ,साखर,हळद,मिरची,अंगाची साबण,मसूर दाळ,मसाला,बिस्कीट इ.चे वाटप करण्यात आले. तसेच २० टन कांदे आणी 10 टन बटाटे यांचेही वाटप करण्यात आले.हे सर्व किट घरोघरी जाऊन देण्यात आले व शाषणाने दिलेल्या सर्व नियम पाळून ही मदत करण्यात आली.
        यावेळी करण गायकर यांनी मानवता हाच सर्वात मोठा धर्मं आहे त्यापेक्षा कोणती जात धर्मं व्यक्ति मोठी नाही त्यामुळे समाजातील दानशुर व्यक्तिनी  सरळ हाताने पुढे येऊन गरजूवंतांना मदत करावी तसेच
      आपण घरात थांबुन आपले कुटुंब आपला परिसर,जिल्हा,राष्ट्र  कोरोनापासून सुरक्षित ठेवु शकतो . आपण सुरक्षित तर आपला परिवार व देश सुरक्षित राहील ही लढाई आपण घराच्या बाहेर नाही तर घरात थांबुनच जिंकू शकतो पोलिस व शासकीय यंत्रणेला आपण सहकार्य करावे असे आवाहन देखील करण गायकर यांनी केले आहे.

            यावेळी  छावा क्रांतिवीर सेनचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर,सामाजिक कार्यकर्त्या सविता गायकर,शिवसेनेचे प्रमोद जाधव, कैलास आण्णा गायकर, समाधान गायकर, युवा प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदें,गिरीश आहेर,अविनाश गायकर,युवासेना उप महानगर प्रमुख सचिन निकम,प्रितेश पाटील,किरण बोरसे,वैभव दळवी, अनिल वाघचौरे, रवी भांबिरंगे ,रोहित कांडेकर, रोहन सपकाळ, भाऊ कदम, छगन भले, यांनी अथक परिश्रम घेतले.



===========================°°°°=°°°°°========================================

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...