मंगळवार, २८ एप्रिल, २०२०

धर्माबाद तालुक्यात ब-याच दिवसांपासून वडाफोन/ आयडिया  कंपनी ची सेवा विस्कळीत असल्याने  नागरिकांचा जीव मेटाकुटीस

र्माबाद (भगवान कांबळे ) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे संपूर्ण नागरिकांची स्थिती बंदिस्तसारखी झाल्यामुळे आधीच नागरिकांचा जीव मेटाकुटीस आला आहे.अशा परिस्थितीत नागरिकांना घरात सवडीचा वेळ असल्याने फोनवरून मित्र-मैत्रिणी नातेवाईक इष्टमित्रांसह संपर्क साधून सर्वांचे कुशलता विचारणे कोणी आजारी असल्यास त्याची विचारपूस करणे आणि आपण जवळ नसलो तरी एकमेकांच्या सुख,दुःखात सहभागी आहोत याची जाणीव करून देण्यासाठी भ्रमणध्वनीच्या माध्यमातून वार्तालाप करणे महत्त्वाचे असते.एवढेच  नाही तर आता 4 G इंटरनेट सेवेद्वारे घरातील सर्व सदस्यांना मनोरंजनासाठी स्मार्टफोन हाच महत्वाचा दुवा आहे. स्मार्टफोन द्वारेच मनोरंजन सोबतच विद्यार्थ्यांना अनेक शाळांमधील शिक्षकगण ऑनलाइन पद्धतीने इंटरनेट द्वारे शिक्षण देत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सिमेवर आसले पोलिस कर्मचारी तेथे काम करीत आहेत व त्यांच्या कडील माहिती व इतर वरिष्ठांनी 

पाठवली माहिती लवकर समजत नसल्याने धर्माबाद चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सन्नगले हे आयडीया व वडाफोन कंपनी वर नाराजगी व्यक्त करित केली आहे.  राज्य सिमेच्या परिसरात वडाफोन /आयडिया कंपनी ची सेवा कधी सुरू कधी बंद कधी नेटवर्क कमी  जास्त होत आहे . दोन मिनिटांसाठी जरी लाईन गेली तरी बरेच तास मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद राहणे,  कधी पावर प्लांट बंद पडणे, वरून डिझेल मिळत नसल्याची तक्रार, इत्यादी शेकडो कारणांमुळे वारंवार येथील दोन्ही कंपनीची सेवा बंदच राहत आहे .
कोरोनाच्या आपत्तीमध्ये लॉकडाऊनच्या काळातही  वडाफोन आयडिया कंपनी च्या टॉवर्सची मोबाईल आणि 4G इंटरनेट सेवा सतत बंद चालू होत असल्यामुळे  ग्राहकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. वरिष्ठ  अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन वारंवार बीएसएनएलची सेवा बंद पडण्याचे प्रकार थांबवावे अशी मागणी त्रस्त ग्राहक करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...