शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०


          आवश्यक कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी 
                           मास्क वापरणे बंधनकारक.
जालना,प्रतिनिधी:- साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसुचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार प्राप्त अधिकाराचा वापर
करत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना रवींद्र बिनवडे यांनी कोवीड-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडणाऱ्या सर्व नागरिकांना तीन लेअर मास्क, साधा मास्क, होममेड कॉटन मास्क, हातरुमाल आदीचा वापर तोंड व नाक व्यवस्थित झाकले जाईल अशा पद्धतीने वापरणे बंधनकारक केले आहे.आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा समुह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 आणि भा.द.वि. 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असल्याचे समजुन कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...