गुरुवार, ९ एप्रिल, २०२०


            !! काय केलस कोरोंना......भूक घरी बसु देत नाही !!                                   सरकार घराबाहेर निघू देत नाही !
देशाची संवाद साधायची बातमी येते तेव्हा मनामध्ये धस करते. कारण देशातील नागरिकांनी धसकाच घेतलाय .देशवासियांना याचा पूर्वानुभव आहेच. संपूर्ण जग कोरोना.नावाच्या
भयानक वायरस चा सामना करण्यासाठी आपल्या देशातील आरोग्य सेवेचा आढावा घेऊन.पूर्वतयारी करत असताना. आपल्या देशाचे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मात्र  आपल्याच धुंदीत होते. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात. आपल्या देशांमध्ये पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हा प्रधानमंत्री .नमस्ते ट्रम्प. आणि मध्यप्रदेशच्या  प्रदेश सरकारच्या घडामोडींमध्ये व्यस्त होते. त्यांच्या अगोदर राज्य सरकारांनी. आपल्या  राज्यात खबरदारीचा उपाय करत असताना .चहूबाजूने नरेंद्र मोदी यांच्यावर टीका होण्यास सुरुवात झाली. तेव्हा त्यांना अचानक देशातील नागरिकांना संवाद साधण्याची आठवण आली. पहिल्याच संवादामध्ये त्यांनी एक दिवसाचा जनता कर्फ्यू. स्वतःहून पाळण्याचे आव्हान देशवासीयांना केले. तेव्हा कुठे त्यांना डॉक्टर. नर्स .पोलीस .सफाई कामगार. आपल्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस लढत असल्याचे दिसले. या सर्वांचं मनोबल वाढवण्यासाठी. व आभार व्यक्त करण्यासाठी. संध्याकाळी पाच वाजता सर्वांनी. आपल्या घरासमोर दारात येऊन टाळी आणि थाळी वाजवून यांचे आभार मानावे असे आव्हान केले. बहुतांशी देशातील जनता कुठलीही शंका न घेता मोठ्या प्रमाणावर याच्यावर अमल केली. टाळी थाळी वाजवून काही होणार नाही. माहित असून सुद्धा. मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. ते या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्व बंधू भगिनींन च मनोबल वाढवणे साठीच. आपण जे आव्हान केलं. त्याला जनता प्रतिसाद देते.म्हणून कसलीही  पूर्वतयारी न करता अचानक 21 दिवसाचे लॉक डाऊन जाहीर केले. झालं असं अन्नधान्य यांचा तुटवडा पडतो की काय. या भीतीपोटी लोकांनी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी तुंबळ गर्दी केली. आपापल्या कुवतीप्रमाणे खरेदी करून साठवले. दुसरीकडे मजूर वर्ग चिंतेत पडला. रोज काम केल्याशिवाय चूल पेटत नाही. अशांची संख्या लाखोंच्या घरात जाते. त्याच बरोबर ज्यांचं पोट भिक्षेवर अवलंबून आहे. त्यांची तर कल्पनाच केलेली बरी. डोंबारी समाज .रस्त्यावर खेळ मांडून .आपल्या मुलांचा जीव धोक्यात घालून. लोकांचं मनोरंजन करतो. त्यावर मिळालेल्या पैशावर पोट भरतो. पारधी समाज. रस्त्यावर खेळणी लहान सहान  वस्तूंची विक्री करून आपली भूक भागवतो. मांगारूडी समाज .म्हशी भादरने. जनावरांची सिंग कापणे. करून आपलं घर चालवतो .डक्कलवार समाज . भिक्षेवर अवलंबून असतो. त्याच बरोबर बुर बर् पोचंमा. असो किंवा गोसावी डौरी गोसावी असो.हा  सर्व समाज आज सुद्धा मोठ्या प्रमाणावर भिक्षा मागूनच जगतो. या सर्वावर उपासमारीची वेळ आली. त्यांच्याकडे  कुणाचेच लक्ष नाही. नेत्यांचे लक्ष भविष्यात आपल्या कामी येणार याकडे .शासकीय अधिकाऱ्यांचे त्यांचं  लक्ष जाईल तिथेच .अशी अवस्था दिसून येते. शासन सांगते कोणीच उपाशी झोपणार नाही. इकडे मजुरांना व गरिबांना काहीच मिळत नाही. प्रश्न असा की खाते कोण?
आठ एप्रिल रोजी धानुरे. ता. खेड. जिल्हा .पुणे येथून मला फोन आला .लातूर विभागातील तीनशेच्या आसपास मजुर  अडकलेत. गावी जाण्यासाठी साधन नाही .घरी भरलेलं राशन  संपत आले. आमच्यावर उपासमारीची वेळ आली. आम्हाला कोणीच मदत करत नाही. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राम वावडे. यांनी आपल्या परीने थोडीफार मदत करण्याचा प्रयत्न केला .परंतु तेवढ्यावर कसं भागणार? शासनाची काहीच मदत पोहोचत नाही .असे संगीले. यांची दुसरी अडचण अशी. की यांच्याकडे रेशन कार्ड नाहीत. एक वर्षासाठी तात्पुरते रेशन कार्ड दिले होते. परंतु एक वर्षानंतर त्याचा सर्वे केला नाही. त्यांना कायमची रेशन कार्ड दिले नाहीत .त्यामुळे शासनाचे रीतसर अन्नपुरवठा दुकान आहेत. तिथून यांना रेशन मिळत नाही. म्हणून त्यांच्या अडचणीत आणखीनच भर पडली. शासन व्यवस्था असंच काम करत राहिली. तर कोरोना  पेक्षा जास्त लोक अन्न अन्न करुन तडफडून मरतील. ही वेळ येऊ द्यायची नसेल  तर सरकारला आपल्या कामाची गती वाढवावी लागेल. अन्न व नागरी पुरवठा. संबंधित जिल्हा अधिकारी. प्रांत अधिकारी. गाव पातळीवरील कर्मचारी .या सर्वांच्या संगनमताने. योजनाबद्ध पद्धतीने गरजू उपाशीपोटी झोपणाऱ्या पर्यंत. अन्न धान्य तातडीने  पोहोचवले पाहिजे. याच बरोबर  आदिवासी समाजाची. सुद्धा अधिक काळजी घेण्याची गरज आहे. आगोदरच कुपोषणामुळे  रोज हजारो बालकांचा मृत्यू होतो .अशा महामारी च्या वेळी तर परिस्थिती आणखीन भयानक होऊ शकते. म्हणून त्यांच्याकडे विशेष  लक्ष देण्याची गरज वाटते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे. आरोग्य मंत्री आदरणीय राजेश टोपे .आदरणीय गृहमंत्री अनील देशमुख .आणि त्यांचे सर्व मंत्रिमंडळ .डोळ्यात तेल घालून 24 तास या परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. खूप चांगलं काम करत आहेत. किती रुग्ण वाढले. किती रुग्ण बरे झाले .किती रुग्ण दगावले.डॉक्टर .नर्सेस. सफाई कर्मचारी.यांच्या सुरक्षेसाठी काय काय उपाययोजना केली. तपासणी केंद्र किती वाढवले. सरकार याविषयी किती संवेदनशील आहे .तपशीलवार माहिती महाराष्ट्राला देत आहेत. परंतु एवढ्यावर भागणार नाही. हे सुद्धा तेवढेच खरे. गोरगरीब वंचित बेसहारा लोकांना वेळेवर अन्नधान्य पोहोचलं नाही. तर पुढील काळामध्ये भयंकर परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे याचा गंभीरपणे विचार व्हायला हवा. प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल. ज्या पद्धतीने माध्यमे कवर करत आहेत. त्यावरून असे दिसते की मजूर गरीब सर्वहारा समाजाचं यांना काहीच पडलेले नाही .किती गरिबांपर्यंत अन्नधान्य गेलं अडकलेल्या मजुरांची काय  अवस्था. याची बातमी ना वाचायला मिळते ना बघायला मिळते .फक्त शासनाने कोरोना विषयी .जी माहिती दिली जाते त्याच बातम्या वारंवार दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून वास्तव समोर येत नाही. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. म्हणतात माणूस कोणत्याही परिस्थितीत जगलाच पाहिजे. अन्न व नागरी पुरवठा संबंधित जिल्हा अधिकारी प्रांत अधिकारी गाव पातळीवरील अधिकारी कर्मचारी यांना एवढीच विनंती .या संकट काळी.कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही मार्गाने यांना जगवा. कारण महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी  या कष्टकरी वंचित समूहाचा सिंहाचा वाटा आहे. शेवटी या गरीब व बेसहारा समूहाला जगवण्याची शासन व समाज.या सर्वांची जबाबदारी आहे. माणूस हा जगलाच पाहिजे. आता या गरीब वंचित कष्टकरी समूहावर असं

  म्हणायची वेळ आली आहे...काय केलंस कोरोना....भूक घरात               बसू देत नाही.. सरकार घराबाहेर निघू देत नाही.
                       ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
                       सुभाष हणमंते./संपादक.चार्वाक                                                   दर्शन.मुंबई.मो.नो.9987788692


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...