बुधवार, २७ मे, २०२०

,परतूर तालुक्यातील कापूस विक्रीसाठी चार हजार शेतकरी वेटींगवर,

परतूर प्रतिनिधी/इम्रान कुरेशी
परतूर तालुक्यातील कापूस विक्री करिता जवळपास पाच हजार शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे या ठिकाणी रोज फक्त 40 ते 50 शेतकऱ्यांचा कापूस मोजला जातो. पाऊस काही दिवसावर येऊन ठेपला आहे परतूर तालुक्यात कापूस उत्पादकांची जवळपास सीसीआय कडे ऑनलाइन पाच हजारपेक्षा जास्त नोंदणी आहे आतापर्यंत अकराशे बाराशे लोकांचाच कापूस खरेदी केलेला आहे. दररोज केवळ चाळीस-पन्नास शेतकऱ्यांचा कापूस घेतल्या जात आहे.

सीसीआय व त्याचे अधिकारी पाऊस पडण्याची वाट पाहत आहेत की काय ? असा शेतकऱ्यांना प्रश्नः पडत आहे. पाऊस पडला म्हणजे कापूस घ्यायचा प्रश्नच उरत नाही आणि मग परतूर तालुक्यातील तीन हजारपेक्षा जास्त शेतकऱ्याची नोंद तशीच बाकी राहील असे चिन्ह सध्याची परिस्थितीवरून पाहायला मिळते तरीही कोणतेही अधिकारी याबाबत गंभीर दखल घेतील असे वाटत नाही ? तरी संबंधित प्रशासनाने नोंदणीकृत शेतकऱ्यांचा कापूस हा 7 जून अगोदर घेतला पाहिजे. आजच्या घडीला कोरोनापेक्षा शेतकऱ्यांना कापूस घरात राहतो की काय याची भीती आहे आणि पावसाळा तोंडावर येऊन ठेपलेला आहे ,तरी संबंधितांनी जास्तीचे खरेदी केंद्र तात्काळ सुरु करावेत आशी शेतकऱ्याकडून मागणी जोर धरत आहे.

प्रतिक्रिया भाऊसाहेब देविदासराव मुके पाटील रा. परतूर ( शेतकरी )
लॉकडाऊनच्या काळात खरेदी केंद्र बंद असल्याने शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून आहे कापूस घरात राहिल्यामुळे त्यात किडे झाल्याने घरात राहणे मुश्किल झाले आहे. कित्येक शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या अंगावर बारीक बारीक लाल पुरळ ( गुथी ) आल्या सारखे दिसते व काहीच्या कानात रात्री झोपेतअसताना गेलेले आहेत हे असा मानसिक व आर्थिक त्रास अजुन काही दिवस असाच राहिला तर कोरोना राहील बाजूला अन् त्या किड्यांमुळे वेगळीच रोगराई पसरेल.व शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडेल आणि मग शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारेल की काय यांची भीती वाटते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...