सोमवार, ४ मे, २०२०

जिल्ह्यातुन परराज्यात, परजिल्ह्यात जाण्या  व येण्यासाठी आजपर्यंत 7 हजार 78 अर्ज प्राप्त
कागदपत्रांची तपासणी करुन निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरु
जालना,प्रतिनिधी :- जालना जिल्ह्यातुन इतर राज्यात जाण्यासाठी आजपर्यंत ऑनलाईन पद्धतीने 5 हजार 369 तर जालना जिल्ह्यातुन महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात जाण्यासाठी 1 हजार 709 असे एकुण 7 हजार 78 अर्ज प्राप्त झाले असुन अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी करुन पुढील निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे. जिल्ह्यातील ज्या नागरिकानी ऑनलाईन पद्धतीने https:jalna.gov.in/mr/tofrmjalna/ या लिंकवर इतर राज्यात, जिल्ह्यात जाण्यासाठी अर्ज केले होते.  त्यांचे पास संबंधित तहसिल कार्यालयाकडे वर्ग केले असुन अर्जदारांनी संबंधित तहसिल कार्यालयाशी संपर्क साधुन पास हस्तगत करुन घ्यावेत.  यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क करुन नये.  तसेच जालना जिल्ह्यातुन इतर राज्यात, जिल्ह्यात जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून https://jalna.gov.in/tofromjalna/ तसेच पोलीस विभागाच्या प्रवासाचा परवाना मिळण्यासाठी https://covid19.mhpolice.in/ या लिंकवर माहिती भरावी. वरील दोनही प्रकारच्या परवानग्या बाहेर राज्यात, जिल्ह्यात जाण्यासाठी आवश्यक आहेत.  या परवानग्या केवळ ऑनलाईन पद्धतीने दिल्या जातील.  यासाठी कोणीही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करु नयेत.  तसेच जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नोंदणी करु नये अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असेही प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे. 
  जिल्ह्यात एकुण 1121 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 56 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 765 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 32 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 1073 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने -00 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 08 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 1026, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 221, एकुण प्रलंबित नमुने-35 तर एकुण 709 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे. 
14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या 19, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 421 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या 15, सध्या अलगीकरण  केलेल्या व्यक्ती -275, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-17, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या 56, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या 19, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 230 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे.   
कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 275 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास मुलांचे शासकीय वसतीगृह, जालना – 48,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह-41, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह-26, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-24, पोलीस प्रशिक्षण केंद्र-119, परतुर-08, जाफ्राबाद-6 तर भोकरदन येथे 03 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 469 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 80 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 540 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 2 लाख 59 हजार 400 असा एकुण तर 2 लाख 86 हजार 208 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...