सोमवार, ४ मे, २०२०

लॉकडाऊनसंदर्भात यापूर्वीचेच आदेश कायम राहणार
जिल्ह्यातील मद्यविक्रीचे दुकाने पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार  - जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे
जालना,प्रतिनिधी:- कोरोना विषाणुच्या अनुषंगाने राज्य शासनाने लॉकडाऊनसंदर्भात नवीन नियमावली जाहीर केलेली आहे.परंतु सुरक्षिततेच्यादृष्टीकोनातुन तसेच कोरोनाविषाणुचे संक्रमण वाढू नये यादृष्टीने 
जालना जिल्ह्यात यापूर्वी निर्गमित केलेले आदेश कायम राहणार आहेत. जिल्ह्यातील जनतेला रोजगार मिळावा यादृष्टीकोनातुन औद्योगिक वसाहतीमधील कारखाने सुरु करण्यात येणार असुन जिल्ह्यातील मद्यविक्रीची दुकाने पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी स्पष्ट केले आहे.
शासनाने परराज्य, परजिल्ह्यातील व्यक्तींना आपल्या मुळगावी परत येण्यासाठी परवानगी दिलेली आहेत.  लॉकडाऊनमुळे जालना जिल्ह्यातील अनेक व्यक्ती परराज्य, परजिल्ह्यातुन मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे. तसेच जालना जिल्ह्यातुनही व्यक्ती परराज्यात, परजिल्ह्यात जाणार आहेत.  कोरोनाचे संक्रमण वाढु नयेयासाठी जिल्ह्यात येणाऱ्या व जाणाऱ्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी होऊन खात्री होणे गरजेचे असल्याने जिल्ह्यात यापूर्वी वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहेत.  कृषिशी निगडीत तसेच अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने यापुर्वी देण्यात आलेल्या आदेशाप्रमाणे सुरु राहणार असुन जिल्ह्यातील प्रत्येकाला सकाळी 7-00 ते दुपारी 2-00 या वेळेत पेट्रोल पंपावरुन इंधन उपलब्ध होणार आहे. 
जनतेला याबाबत काही शंका अथवा माहिती हवी असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. प्रत्येकाने सोशल डिस्टन्सचे पालन करावे,  तोंडाभोवती मास्क वापरावा, वैयक्तिक स्व्छता राखत साबनाने वारंवार हात धुवावेत. अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा आपल्या घरातच रहावे. प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करुन जनतेने सहकार्य  करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...