विराज जगतापच्या मारेकर्यांना फाशी द्या - संघर्ष शांती मोर्चा
जालना (प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड पुणे येथे विराज जगताप यांची जातीय द्वेशातुन निर्घूणपणे हत्या करणार्या आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी व सोशल मिडीयाच्या माध्यमातुन दोन समाजात तेड निर्माण करणार्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी जालना येथील संघर्ष शांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.
महाराष्ट्रामध्ये दिवसागनीक जातीयवाद वाढत आहे. गुंडावर कायद्याचा वचक राहीलेला नाही. बौध्दांवर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार वाढत आहेत. बौध्द तरुण विराज जगताप याला प्रेम प्रकरणानून जिवे मारण्यात आलेे आहे. नागपुर यथील अरविंद बनसोडे यांची सुध्दा हत्या करण्यात आलेली आहे. या प्रकरातील आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच या प्रकरणाला समोर करुन अनेक समाज कंटकांनी मोठ्या प्रमाणात दोन समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य केले आहे. तसेच महापुरुषांची नावे घेऊन त्यांचा अवमान केला आहे. अशा समाज कंटकांवर तात्कळ गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करण्यात यावी. अशी मागणीही संघर्ष शांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी ब्रम्हानंद चव्हाण, गणेश रत्नपारखे, अॅड. शिवाजी अदमाने, सुभाष गाडगे, आण्णासाहेब चित्तेकर, सुधाकर निकाळजे, रोहीदास गंगातिवरे, एन.डी. गायकवाड, संदीप खरात, विलाम रत्नपारखे, कपील खरात, रवि खरात, कैलास रत्नपारखे, संदीप रत्नपारखे, राहुल खरात, संदीप साबळे, सुनिल रत्नपारखे, राज रत्नपारखे, सचिन कांबळे, दिपक दांडगे यांच्यासह अनेकांची यावेळी उपस्थिती होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा