सामाजिक अंतर न राखणाऱ्या व मास्कचा वापर न करणाऱ्यांवर जिल्हा व पोलीस प्रशासनाची कारवाई
212 व्यक्तींकडून 46 हजार 800 रुपयांचा दंड वसुल
जालना,ब्यूरो चीफ :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यामध्ये सामाजिक अंतर न पाळणाऱ्या तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर पोलीस तसेच जिल्हा प्रशासनामार्फत संयुक्तरित्या दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. दि.1 ऑगस्ट, 2020 रोजी सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या 212 व्यक्तींकडून 46 हजार 800 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
यामध्ये जालना तालुक्यात 179 व्यक्तींकडून 42 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे तर बदनापुर 18 व्यक्तींकडून 1 हजार 800, जाफ्राबाद 4 व्यक्तींकडून 800, परतुर 11 व्यक्तींकडून 2 हजार 200 रुपये अशा प्रकारे एकुण 212 व्यक्तींकडून 46 हजार 800 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
नागरिकांनी आवश्यकता नसताना घराबाहेर पडु नये, सामाजिक अंतराचे पालन करावे, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा तसेच प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
्
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा